Tisarya Parvakade (तिसऱ्या पर्वाकडे)
गेली साडेनऊ वर्षे भारतात 'मोदी पर्व' सुरू आहे. या काळात मोदींनी परराष्ट्र संबंध, सीमा सुरक्षा, ईशान्य भारतातील राज्यांच्या समस्या, सुरक्षा दलांतील सुधारणांबरोबरच गेली सत्तर वर्षे रखडलेले ३७० कलम, तोंडी तलाक यांसारखे प्रश्नही सोडवले. महिलांसाठी भरघोस काम, गरिबी, बेरोजगारीच्या क्षेत्रांतील आशादायक काम, शेतकऱ्यांच्या जटिल समस्यांचे निराकरण, यांबरोबरच शिक्षण, दळणवळण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्येही देशाच्या प्रगतीचा रथ सुसाट वेगाने धावतो आहे. या वेगाला आणखी एका पर्वाची संधी मिळाली, तर ती नक्कीच 'सुवर्णसंधी' ठरेल!