-
Sunitabai (सुनीताबाई)
सुनीताबाई देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी. मात्र एवढीच ओळख ठेवून त्या वावरल्या नाहीत. लेखक म्हणून त्यांचे स्वतंत्र स्थान साहित्यविश्वात होते. पुलंना सांभाळत त्यांचे लेखनव्यवहार सांभाळणाऱ्या, प्रसंगी कर्तव्यकठोर भूमिका निभावणाऱ्या, माणसांना जोडणाऱ्या तीक्ष्ण बुद्धीच्या, तर्कशुद्ध विचार करणाऱ्या सुनीताबाई यांची समाजातील प्रतिमा वेगळी होती. मात्र, त्या मित्रपरिवार त्यांचे खरे व्यक्तिमत्व जाणून होता. पुलंच्या निधनानंतर काहीशा हळव्या झालेल्या सुनिताबाईंची ओळख मंगला गोडबोले यांनी 'सुनीताबाई' मधून करून दिली आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण यातून कळते. त्यांचे हे स्मरण प्रेरक व उद्बोधक आहे.
-
Eka Dishecha Shodh (एक दिशेचा शोध)
'भारत-पाकिस्तान, भारत-चीन, इस्त्रायल,-पॅलेस्टाइन असे देशादेशांमधील संघर्ष. सा-या जगाला टांगत्या तलवारीसारखा भेडसावणारा दहशतवाद. पर्यावरणाची हानी, त्यातून नजीकच्या भविष्यात उभ्या राहणा-या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या गंभीर समस्या. भारत आणि भारतासारख्या अनेक देशांपुढे उभे असलेले गरिबी, कुपोषण, अनारोग्य, बेकारीचे प्रश्न. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी रस्ता दाखवत आहे जागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत. जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सल्लामसलत करणा-या संदीप वासलेकरांचे भारतीय युवकाला ध्येयदर्शन घडवणारे एका दिशेचा शोध '
-
Annapuraan
चरकाचार्यांनी हजारो वर्षांपूर्वी आहारातून रोग उत्पन्न होतात असें म्हटले आहे. त्याकाळी पाणी व आहारद्रव्ये प्रदुषित व भेसळयुक्त नव्हती. आज २१ व्या शतकात प्रदूषण, रासायनिक खते व भेसळ यामुळे आहारद्र[...]
-
Seawitch
समुद्र म्हटला की संघर्ष! जीवन-मरणाचा संघर्ष! असा संघर्ष करून त्यातून संपत्ती मिळवणार्यांचा एक वर्ग तयार होतो. मग त्या वर्गात अंतर्गत संघर्षाचे अंगार फुलतात. समुद्र म्हटला की साहस! ...एका तेलसम्राटाची समुद्रातील तेलविहीर म्हणजे त्याच्या साम्राज्याचे केंद्र. हा तेलसम्राट. संपत्तीच्या जोरावर काहीही करण्याची हिंमत असणारा. त्याची दोन मर्मस्थळे होती. ती तेलविहीर आणि त्याच्या दोन लाडक्या कन्या. शेवटी त्यांच्यावरच घाला पडला. केवळ सूडापोटी! संघर्ष, साहस, संपत्ती व सूड यांनी रंगलेले एलिस्टर मॅक्लीनने लिहिलेले हे समुद्रावरचे नाट्य.