-
Intimate
व. पु.काळे ह्यांचा कथातले जग हे आपल्या अवतीभोवतीचेच असते. किंबहुना त्यात कोठे ना कोठे आपण असतोच परंतु जे आपल्या लक्षात आलेले नसणे किंवा लक्ष जाऊनही कळलेले नसते ते वपुंनी मार्मिकपणे टिपलेले असते आणि त्यावर मिष्कीलपणे शब्द केलेले असते. त्यातून मत्सरी मंडळींचे 'दिलासा मंडळ’ सारख्या अफलातून कल्पना वाचकांसमोर देतात न त्यातून असे अचूक लिहू शकणार्याबद्दलही मत्सर वाटू लागतो! संवादातून कथा फुलविणे ही तर वपुंची खासियतच. त्यामुळेच तर वपुंच्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या वाटतात- अश्याच वपुंच्या नऊ कथा ह्या संग्रहात आल्या आहेत. ज्यता 'मोदी अँड मोदी’ सारखी वाचकांनी उचलून धरलेली कथाही ह्यात आहे.
-
Zopala
मनाच्या विविध रंगछटांचं र्दन वपुंच्या या पुस्तकातून घडतं यातल्या प्रत्येक कथेतला वेदनेचा अंत:स्त्रोत वाचकांना वेढून टाकतो. या वेदनेसह जगणार्या मनस्वी व्यक्तींच्या मनस्वी कथा आपल्याला अंतर्मुख करतात. स्वत:चा ोध घ्यायला भाग पाडतात. या कथांमधील माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामथ्र्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो.
-
Karmachari
वपु काळेसुद्धा एकेकाळी कर्मचारीच होते. रांगा-निरनिराळ्या कारणांसाठी. आणि त्यात ताटकळत उभे राहणे, लोकल पकडण्यासाठी म्हणजे ऑफीस गाठण्यासाठीची घाई, त्या सार्यात आडवे येणारे बंद वगैरे प्रकार, साहेबांसह इतरांची खवचट बोलणी, कँटीन नामे ठिकाणी दिला जाणारा चहा वगैरे वगैरे त्यांनी सुद्धा अनुभवले आहे आणि त्यांनीसुद्धा इतरांप्रमाणेच सारे हसत हसत हसण्यावारी नेले आहे पण सोडून नाही दिले- त्यांच्या लेखकीय मनाने हे सारे मिस्किलपणे टिपले आहे- वेळोवेळी म्हणूनच गोखले, खांबेटे, सातवळेकर, वंदना वगैरेंना बरोबर टिपणार्या ह्या कथा त्यांचे हातून लिहून झाल्या आहेत व ह्याच मंडळीनी त्या डोक्यावर घेतल्याने त्याच्या ह्या संग्रहाच्या पुन्हा पुन्हा आवृत्त्या निघाल्या आहेत.
-
Chaturbhuj (चतुर्भुज)
दोनाचे चार हात' झाले, की सगळ्या चिंता मिटल्या... हा एक समज, पण आयुष्याचे खरे सूर तर इथूनच झिरपू लागतात. रोजच्या जगण्यातली मोठी-मोठी स्थित्यंतरं... भावनिक, मानसिक आंदोलनं... आणि सुखाची आवर्तनं... हे सगळं गुंफून राहतं केवळ 'लग्न' या शब्दाभोवती ! 'चतुर्भुज' कथेतला चिंतातूर वर, 'चुडा' मधील वधुपक्षाची केविलवाणी दैना, 'अंतर' मधल्या दोन मैत्रिणींची लग्नामुळे पालटलेली आयुष्यं आणि 'बलिदान' मधील नियतीच्या फे-यात अडकलेली बायको... आपल्याच आजूबाजूची ही पात्रं खास 'वपु' शैलीतून अवतरलेली... त्यांच्या बहारदार लेखणीतून बहरलेली.
-
Aik Sakhe
वसंत पुरुषोत्तम काळे यांचे हे पंचविसावे पुस्तक एका निराळ्या पद्धतीने छापलेले. गोष्टीतून गोष्ट सांगत जाणारे, 'अरेबियन नाइट्स’ सारखे त्याचे स्वरूप आहे. वपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहेत. पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे, तोरा आहे.
-
Ka Re Bhulalasi
का रे भुललासी' हा वपुंचा कथासंग्रह 'वरलिया रंगा'चा भेद करून माणसाच्या खर्या रंगांचे दर्शन घडवितो. माणसाला जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे घालून वावरावे लागते. प्रसंग निराळे तसा मुखवटाही निराळा, त्यात माणूस आपले अंतरंग, सुख-दु:खे, प्रेम, प्रतारणा, भ्याडपणा, हताशपणा, सूड लपवत जगत असतो. हे मुखवटे, बुरखे परिस्थितीनुरूप घालावे लागतात तर लबाडपणाने घातलेले बुरखे वेगळेच असतात ! प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन असतो. आपण आपल्याच रंगांनी माणसं, प्रसंग रंगवू पाहतो. खुल्या मनाने, खुल्या दिलाने विचार करत नाही. दुसर्यावर आपले विचार लादू पाहतो. हे ही एक प्रकारचे मुखवटेच की ! वपुंच्याच भाषेत सांगायचं झालं तर, "ह्या वरवरच्या भुलण्यामध्ये आपल्याला माणसाचे, जगाचे, निसर्गाचे खरे रंग कधी सापडतच नाहीत."