-
Vatchal Fergussionchi (वाटचाल फर्ग्युसनची )
IN 1879 TILAK AND AGARKAR STAYED IN THE SAME ROOM WHILE IN THE DECCAN COLLEGE HOSTEL. WHILE TALKING ABOUT THOSE DAYS HE SAYS; “BOTH OF US WERE COMPLETELY CAPTIVATED. WE COULD THINK OF NOTHING ELSE BUT THE CONDITION OF OUR COUNTRY. AFTER MUCH BRAIN STORMING WE BELIEVED THAT ONLY EDUCATION COULD RESCUE US FROM THE BAD SITUATION.” THIS BRAIN STORMING LATER RESULTED INTO A SCHOOL PROJECT. THE NEW ENGLISH SCHOOL WAS ESTABLISHED ON 1ST JANUARY 1880 UNDER THE ABLE LEADERSHIP OF VISHNU SHASTRI CHIPLUNKAR. THE DECCAN EDUCATION SOCIETY WAS ESTABLISHED ON 24TH OCTOBER 1884 WHILE FERGUSSON COLLEGE CAME INTO EXISTENCE ON 2ND JANUARY 1885. FERGUSSON COLLEGE COMPLETED 125 YEARS ON 2ND JANUARY 2005. FERGUSSON COLLEGE HAS ALWAYS BEEN ONE OF ITS OWN TYPES. IT WAS A COMPLETELY NEW VENTURE. IT IS A COMBINATION OF CONTRARY ASPECTS. IT ALLOWS FREEDOM OF THOUGHTS. IT HAS AIMED AT SELFLESSNESS. PERSISTENCE HAS BEEN AT ITS CORE. SINCE, IT WAS FIRST IN THE ROW, THERE WERE MANY TYPES OF PROBLEMS AND HURDLES LIKE IN ANY OTHER INSTITUTION. DIFFERENCE OF OPINION, GOVERNMENT OPPOSITION, ECONOMIC AND ADMINISTRATIVE CHALLENGES, EXTREME EFFORTS TAKEN IN AN ATTEMPT TO RUN THE INSTITUTION, THE TEACHERS’ CONTRIBUTION TO TAKE THE EDUCATION TO DEFINITE HEIGHTS, THE HONEST EFFORTS BY THE STUDENTS, THEIR LOVE FOR THE INSTITUTION, THEIR CONTRIBUTION IN DIFFERENT AREAS OF LIFE INCLUDING POLITICS, ECONOMICS, SOCIAL COMMITMENT, LITERATURE AND ART AND THE CONTINUOUS SUPPORT FROM THE SOCIETY HAD ALWAYS BEEN A PART AND PARCEL OF THE INSTITUTION. THIS BOOK TRIES TO FATHOM THESE VARIOUS ASPECTS. THIS BOOK IS DIVIDED INTO THREE PARTS: ESTABLISHMENT TO GOLDEN JUBILEE YEAR: 1885-1935; GOLDEN JUBILEE TO CENTURY: 1935-1985 AND CENTURY TO POST CENTURY SILVER JUBILEE: 1985-2010.
-
The Art Of Creative Thinkng (द आर्ट ऑफ क्रिएटीव्ह
सर्जनशीलतेचा रूढ अर्थ बदलवून टाकून, एका अगदी अभिनव संकल्पनेद्वारे सर्जनशीलतेचे अगणित पैलू लेखकानं या पुस्तकात उलगडून दाखवले आहेत. ही सर्जनशीलता – रुळलेली वाट नाकारणारी, खडतर वाटेवर चालायला लावणारी, साहसपूर्ण प्रवासातून नवनिर्मितीच्या शोधाचा शुद्ध आनंद देणारी आहे. सर्जकता ही केवळ कलावंतांची मिरासदारी नाही, ती तुमच्या-आमच्यात, साध्यासुध्या माणसांत दडलेली असते. जगात आपल्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण करणारे चित्रकार, शिल्पकार, नाट्यकर्मी, चित्रपटनिर्माते, अभिनेते, लेखक, वास्तुरचनाकार, संगीतकार, संशोधक... या सर्व लोकांनी दैनंदिन घटनांमधील वेगळेपण सदैव टिपलं आणि त्यातूनच नवनिर्मिती केली. प्रत्येक व्यक्तीत कल्पकता आहे, सर्जनशीलतेचा स्फुलिंग आहे, असा दिलासा देणारी असंख्य उदाहरणं या पुस्तकात जागोजागी विखुरलेली आहेत. लेखक स्वत:च एक अत्यंत प्रतिभावान कलाकार आहे. कलाक्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तींच्या उदाहरणांसह त्यांनी सर्जनशीलतेबद्दल मार्गदर्शन केलं आहे.
-
Criminals In Uniform (क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म)
देशाच्या आर्थिक राजधानीत खळबळ माजवणाNया घटनेचा ‘आंखो देखा हाल’रंजक अविष्कारात...प्रत्यक्ष कुबेराचाच वरदहस्त असलेला कुबेर... ‘कुबेरिया’ या त्याच्या अलिशान निवासासमोर एक अज्ञात स्कॉर्पिओ आढळते आणि सुरू होतं उत्सुकता आणि थरारानं भरलेलं नाट्य... तरुण मुंबई पोलीस आयपीएस अधिकारी महावीर तोमर आयुक्तपदाच्या अति महत्त्वाकांक्षेपोटी, पैशांच्या हव्यासापोटी पैसा वसुलीतंत्र अवलंबतो. हाताखालच्या पोलीस कर्मचाNयांची गुन्हेगारी टीमच बनवतो...कायदा, सुरक्षायंत्रणांनाही न जुमानता राक्षसी कल्पना अवलंबतो...एकही पुरावा मागे न ठेवता तो मगरूरपणे जगत असतो... अखेर एके दिवशी पर्दाफाश होतोच... हा पोलीस आयुक्त कायद्याच्या अक्राळ-विक्राळ जबड्यात सापडतोच...! कसा...? कुठे...? जाणून घेऊ या... ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’मधून.
-
Krushnasakha (कृष्णसखा)
कृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं. कृष्ण एकमेव असे आहेत जे जीवनाला पूर्णत्वाने स्वीकारतात. म्हणूनच सामान्य माणसालाही ते परिपूर्णतेने जगायला शिकवतात आणि जीवनरूपी द्वंद्वाला भिडायलाही शिकवतात. ओशोंच्या मते विरक्त होणं, शांतीचा मार्ग धरणं हे चुकीचं नसलं तरी त्यातून जीवनापासून पळण्याची एक वृत्ती दिसते. त्याउलट कृष्ण जीवनाला निर्भयपणे सामोरं जायला सांगतात. कृष्णांचं इतर संत-महात्म्यांच्या तुलनेतील वेगळेपण ओशोंनी विविध उदाहरणांतून, विवेचनातून या पुस्तकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
-
Pidhi Dar Pidhi (पिढी दर पिढी)
ही कादंबरी वांग युआन या तरुणाच्या जीवनाभोवती फिरते. त्याचे वडील टायगर वांग सरदार असतात. सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळेत राहून शिकणारा युआन अचानक घरी येतो; कारण क्रांतिकारकांच्या सैन्यामध्ये जाऊन स्वतःच्या वडिलांविरुद्ध त्याला लढायचं नसतं. त्यानंतर आजोबांच्या जुन्या मातीच्या घरात रमलेल्या युआनला टायगर पुन्हा घरी बोलावतो, तेव्हा युआन रागानं घराबाहेर पडतो आणि आपल्या सावत्र आईकडे जातो. तिथे त्याला आय-लान ही बहीण, तसेच जमीनदार वांग आणि व्यापारी वांग हे दोन थोरले काका आणि त्यांची बायका-मुलं असा गोतावळा भेटतो. शिक्षणासाठी युआन परदेशी जातो. मोठ्या विद्यापीठात शेतकी शास्त्राचं शिक्षण घेऊन सहा वर्षांनंतर मायदेशी परत येतो. आईने आश्रमातून सांभाळायला आणलेली, डॉक्टर होऊ इाQच्छणारी मी-लिंग युआनला आवडते. मात्र, तिला प्रथम शिक्षण पूर्ण करायचे असते. युआनही वडिलांचे कर्ज फेडणे आपले कर्तव्य आहे असे मानून नोकरी करू लागतो. वास्तवता-भावपूर्णतेचा अनोखा संगम.
-
Krushnarang Savala (कृष्णरंगसावळा)
कृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं. कृष्ण एकमेव असे आहेत जे जीवनाला पूर्णत्वाने स्वीकारतात. म्हणूनच सामान्य माणसालाही ते परिपूर्णतेने जगायला शिकवतात आणि जीवनरूपी द्वंद्वाला भिडायलाही शिकवतात. ओशोंच्या मते विरक्त होणं, शांतीचा मार्ग धरणं हे चुकीचं नसलं तरी त्यातून जीवनापासून पळण्याची एक वृत्ती दिसते. त्याउलट कृष्ण जीवनाला निर्भयपणे सामोरं जायला सांगतात. कृष्णांचं इतर संत-महात्म्यांच्या तुलनेतील वेगळेपण ओशोंनी विविध उदाहरणांतून, विवेचनातून या पुस्तकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
-
Bhaktichandra (भक्तिचंद्र)
संत नामदेव. एक निस्सीम विठ्ठलभक्त. आद्य कीर्तनकार, आद्य चरित्रकार, आद्य आख्यानकर्ता, कुशल संघटक, कुशल नेता अशी नामदेवांची विविध रूपं या कादंबरीतून भेटतात. नामदेवांचं बालपण ते त्यांच्या निर्वाणापर्यंतचा हा प्रवास अतिशय रसाळ भाषेत उलगडला आहे. नामदेवांचं कौटुंबिक जीवन. नामदेव-ज्ञानेश्वर भेट, ज्ञानेश्वरादी भावंडं, चोखोबा इ. अन्य संतांबद्दल नामदेवांना असलेला जिव्हाळा. या सर्वांसह त्यांनी हातात घेतलेली भागवत धर्माची पताका. महाराष्ट्राव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाबपर्यंत त्यांनी केलेली भटकंती आणि मराठीव्यतिरिक्त हिंदी, राजस्थानी, पंजाबी भाषेत केलेली अभंगरचना इत्यादीतून नामदेवांनी संत म्हणून केलेल्या अजोड कामगिरीचं दर्शन या कादंबरीतून घडतं. यवनांच्या राज्यातही मनाची सकारात्मकता कशी जपावी, हेच नामदेवांनी भक्तिमार्गातून, आपल्या कीर्तनांतून सूचित केलं आणि भागवतधर्माची पताका महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवली, हे त्यांचं महान कार्य अधोरेखित करणारी, भक्तिरसात चिंब भिजलेली प्रासादिक कादंबरी.
-
How To Kidnap The Rich (हाउ टू किडनॅप द रिच)
रमेश हा एक एज्युकेशन कन्सल्टंट. मध्यमवर्गीय भारतीयांच्या गाड्याचा भार ओढणाऱ्या चाकाचं जणू तो वंगण आहे. आपल्या हुशारीच्या बळावर त्यानं बनावट परीक्षा उमेदवारीचं थक्वंÂ करणारं नाट्यमय जाळं उभं केलं आहे. जणू चिनी बनावटीचा नकली परीक्षा उमेदवारच. रमेश एका श्रीमंत आणि महाआळशी किशोरवयीन रुडीसाठी बनावट उमेदवार म्हणून परीक्षा देतो. कर्मधर्म संयोगाने थेट देशात पहिला येतो. ज्याने रुडीला वेगळीच ख्याती प्राप्त होते. पण रमेशचं आयुष्य मात्र अनपेक्षित वळण घेतं. `हाउ टू किडनॅप द रिच` ही नवीन युगातल्या प्रसिद्धीची आणि यशाची एक खिळवून ठेवणारी पण वेगवान कहाणी आहे. राहुल रैना यांच्या खुसखुशीत निवेदनाचा रंगतदार नमुना !
-
The Ultimate Happiness Prescription (द अल्टिमेट हॅ
जीवनाचा हेतू्च आनंदाचा विस्तार करत जाणे आहे. प्रत्येक ध्येयाचे ईप्सित आनंदप्राप्ती हेच असते. या आनंदातून अंतिमत: मोक्ष मिळावा अशीही प्रत्येकाची इच्छा असते. या पुस्तकाचे लेखक दीपक चोप्रा यांनी आनंदप्राप्तीसाठी सात गुरुकिल्ल्या (अर्थात सात सहजसुलभ मार्ग) वाचकांच्या हाती दिल्या आहेत. या सात गुरुकिल्ल्या आहेत - स्वत:च्या शरीराचा परिचय करून घ्या, तुमच्या खऱ्या आत्मविश्वासाचा शोध घ्या, तुमच्या जीवनातून अशुद्ध तत्त्व काढून टाका, बरोबर असणं सोडून द्या, वर्तमानावर लक्ष केंद्रित करा, स्वत:मध्ये जग पाहा, मोक्षप्राप्तीसाठी जगा. या सातही मार्गांचे लेखकाने सविस्तर विवेचन केले आहे. दैनंदिन जीवनात त्याचा वापर करून प्रत्येकजण आनंदी होऊ शकतो. अशा प्रकारे सर्वजण सुखी झाल्याने अवघं जग (विश्व) आनंदमय होईल. हे पुस्तक वाचकांना भौतिक सुखांच्या पलीकडचा आनंद कसा मिळवायचा याचे विस्तृत मार्गदर्शन करते.
-
Kandyacha Vandha (कांद्याचा वांधा)
माणसाच्या आयुष्यातील रसिकता, विनोद काढून टाकला तर ते आयुष्य शुष्क, नीरस आणि भणंग होऊन जाईल...जीवनातला निखळ आनंद शोधूनही सापडणार नाही. अशावेळी आपल्या रोजच्या जगण्यातूनच निर्माण होणारा ‘वास्तव विनोद` म्हणजे ‘कांद्याचा वांधा` या कथासंग्रहातील कथा होय. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा आपल्याला हसवते व अंतर्मुख करते. जीवनातील चतुराई शिकवते, शहाणं करून सोडते.
-
Zanzibari Masala (झांझिबारी मसाला)
झांझिबारी मसाला... आंबट, गोड, तिखट, खारट अशा सर्व चवींचं मिश्रण असणारा लज्जतदार साहित्यिक ऐवज. झांझिबारी या ऐतिहासिक बेटासोबतच जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या या खमंग कथा. यातली कित्येक पात्रं खास मराठी मातीतली, पण ती जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात रंगतदार गोष्ट गुंफत जातात. कधी कोल्हापूरचा धट्टाकट्टा मालोजी मॅटहॅटनमध्ये खंडेनवमी साजरी करतो, तर कधी पाटील पॅरिसची पोरगी पटवण्याच्या नादात भलत्याच फंदात अडकतो. या कथा कधी डच पाहुचणार घडवतात, तर कधी जपानी. त्यांचा कॅनव्हास जगातल्या भिन्न रंगी अवकाशाने व्यापलेला असला, तरी त्या तितक्याच आपल्या मातीशीही नातं सांगतात. कल्पनेचे पंख घेऊन जगाचा अवकाश अनुभवू देणाऱ्या अफलातून कथांचा हा तृप्त करणारा संग्रह.
-
Dongra Evdha (डोंगराएवढा)
प्रतिकूल परिस्थीती आणि निसर्गाशी दोन हात करत जगणारे गोपालय्या आणि त्यांना साथ देणारी पत्नी शंकरम्मा यांचे सहजीवन तसेच त्यांचा मुलगा त्या उभयतांना भेटायला येत नसल्याची हृदयातील वेदना व त्यांच्या कणखर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी मनोवेधक कादंबरी. मुळात कट्टद गोविंदय्या या व्यक्तीचं बोलणं, वागणं, सच्चेपणा आणि धीरोदात्त वृत्ती या कादंबरीच्या प्रेरणास्थानी आहे. लेखकाने त्यांच्या जीवनावर आधारित गोपालय्या हे पात्र साकारले आहे.