-
Krushnasakha (कृष्णसखा)
कृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं. कृष्ण एकमेव असे आहेत जे जीवनाला पूर्णत्वाने स्वीकारतात. म्हणूनच सामान्य माणसालाही ते परिपूर्णतेने जगायला शिकवतात आणि जीवनरूपी द्वंद्वाला भिडायलाही शिकवतात. ओशोंच्या मते विरक्त होणं, शांतीचा मार्ग धरणं हे चुकीचं नसलं तरी त्यातून जीवनापासून पळण्याची एक वृत्ती दिसते. त्याउलट कृष्ण जीवनाला निर्भयपणे सामोरं जायला सांगतात. कृष्णांचं इतर संत-महात्म्यांच्या तुलनेतील वेगळेपण ओशोंनी विविध उदाहरणांतून, विवेचनातून या पुस्तकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
-
Pidhi Dar Pidhi (पिढी दर पिढी)
ही कादंबरी वांग युआन या तरुणाच्या जीवनाभोवती फिरते. त्याचे वडील टायगर वांग सरदार असतात. सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळेत राहून शिकणारा युआन अचानक घरी येतो; कारण क्रांतिकारकांच्या सैन्यामध्ये जाऊन स्वतःच्या वडिलांविरुद्ध त्याला लढायचं नसतं. त्यानंतर आजोबांच्या जुन्या मातीच्या घरात रमलेल्या युआनला टायगर पुन्हा घरी बोलावतो, तेव्हा युआन रागानं घराबाहेर पडतो आणि आपल्या सावत्र आईकडे जातो. तिथे त्याला आय-लान ही बहीण, तसेच जमीनदार वांग आणि व्यापारी वांग हे दोन थोरले काका आणि त्यांची बायका-मुलं असा गोतावळा भेटतो. शिक्षणासाठी युआन परदेशी जातो. मोठ्या विद्यापीठात शेतकी शास्त्राचं शिक्षण घेऊन सहा वर्षांनंतर मायदेशी परत येतो. आईने आश्रमातून सांभाळायला आणलेली, डॉक्टर होऊ इाQच्छणारी मी-लिंग युआनला आवडते. मात्र, तिला प्रथम शिक्षण पूर्ण करायचे असते. युआनही वडिलांचे कर्ज फेडणे आपले कर्तव्य आहे असे मानून नोकरी करू लागतो. वास्तवता-भावपूर्णतेचा अनोखा संगम.
-
Krushnarang Savala (कृष्णरंगसावळा)
कृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं. कृष्ण एकमेव असे आहेत जे जीवनाला पूर्णत्वाने स्वीकारतात. म्हणूनच सामान्य माणसालाही ते परिपूर्णतेने जगायला शिकवतात आणि जीवनरूपी द्वंद्वाला भिडायलाही शिकवतात. ओशोंच्या मते विरक्त होणं, शांतीचा मार्ग धरणं हे चुकीचं नसलं तरी त्यातून जीवनापासून पळण्याची एक वृत्ती दिसते. त्याउलट कृष्ण जीवनाला निर्भयपणे सामोरं जायला सांगतात. कृष्णांचं इतर संत-महात्म्यांच्या तुलनेतील वेगळेपण ओशोंनी विविध उदाहरणांतून, विवेचनातून या पुस्तकाद्वारे स्पष्ट केलं आहे.
-
Bhaktichandra (भक्तिचंद्र)
संत नामदेव. एक निस्सीम विठ्ठलभक्त. आद्य कीर्तनकार, आद्य चरित्रकार, आद्य आख्यानकर्ता, कुशल संघटक, कुशल नेता अशी नामदेवांची विविध रूपं या कादंबरीतून भेटतात. नामदेवांचं बालपण ते त्यांच्या निर्वाणापर्यंतचा हा प्रवास अतिशय रसाळ भाषेत उलगडला आहे. नामदेवांचं कौटुंबिक जीवन. नामदेव-ज्ञानेश्वर भेट, ज्ञानेश्वरादी भावंडं, चोखोबा इ. अन्य संतांबद्दल नामदेवांना असलेला जिव्हाळा. या सर्वांसह त्यांनी हातात घेतलेली भागवत धर्माची पताका. महाराष्ट्राव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाबपर्यंत त्यांनी केलेली भटकंती आणि मराठीव्यतिरिक्त हिंदी, राजस्थानी, पंजाबी भाषेत केलेली अभंगरचना इत्यादीतून नामदेवांनी संत म्हणून केलेल्या अजोड कामगिरीचं दर्शन या कादंबरीतून घडतं. यवनांच्या राज्यातही मनाची सकारात्मकता कशी जपावी, हेच नामदेवांनी भक्तिमार्गातून, आपल्या कीर्तनांतून सूचित केलं आणि भागवतधर्माची पताका महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवली, हे त्यांचं महान कार्य अधोरेखित करणारी, भक्तिरसात चिंब भिजलेली प्रासादिक कादंबरी.
-
How To Kidnap The Rich (हाउ टू किडनॅप द रिच)
रमेश हा एक एज्युकेशन कन्सल्टंट. मध्यमवर्गीय भारतीयांच्या गाड्याचा भार ओढणाऱ्या चाकाचं जणू तो वंगण आहे. आपल्या हुशारीच्या बळावर त्यानं बनावट परीक्षा उमेदवारीचं थक्वंÂ करणारं नाट्यमय जाळं उभं केलं आहे. जणू चिनी बनावटीचा नकली परीक्षा उमेदवारच. रमेश एका श्रीमंत आणि महाआळशी किशोरवयीन रुडीसाठी बनावट उमेदवार म्हणून परीक्षा देतो. कर्मधर्म संयोगाने थेट देशात पहिला येतो. ज्याने रुडीला वेगळीच ख्याती प्राप्त होते. पण रमेशचं आयुष्य मात्र अनपेक्षित वळण घेतं. `हाउ टू किडनॅप द रिच` ही नवीन युगातल्या प्रसिद्धीची आणि यशाची एक खिळवून ठेवणारी पण वेगवान कहाणी आहे. राहुल रैना यांच्या खुसखुशीत निवेदनाचा रंगतदार नमुना !
-
The Ultimate Happiness Prescription (द अल्टिमेट हॅ
जीवनाचा हेतू्च आनंदाचा विस्तार करत जाणे आहे. प्रत्येक ध्येयाचे ईप्सित आनंदप्राप्ती हेच असते. या आनंदातून अंतिमत: मोक्ष मिळावा अशीही प्रत्येकाची इच्छा असते. या पुस्तकाचे लेखक दीपक चोप्रा यांनी आनंदप्राप्तीसाठी सात गुरुकिल्ल्या (अर्थात सात सहजसुलभ मार्ग) वाचकांच्या हाती दिल्या आहेत. या सात गुरुकिल्ल्या आहेत - स्वत:च्या शरीराचा परिचय करून घ्या, तुमच्या खऱ्या आत्मविश्वासाचा शोध घ्या, तुमच्या जीवनातून अशुद्ध तत्त्व काढून टाका, बरोबर असणं सोडून द्या, वर्तमानावर लक्ष केंद्रित करा, स्वत:मध्ये जग पाहा, मोक्षप्राप्तीसाठी जगा. या सातही मार्गांचे लेखकाने सविस्तर विवेचन केले आहे. दैनंदिन जीवनात त्याचा वापर करून प्रत्येकजण आनंदी होऊ शकतो. अशा प्रकारे सर्वजण सुखी झाल्याने अवघं जग (विश्व) आनंदमय होईल. हे पुस्तक वाचकांना भौतिक सुखांच्या पलीकडचा आनंद कसा मिळवायचा याचे विस्तृत मार्गदर्शन करते.
-
Kandyacha Vandha (कांद्याचा वांधा)
माणसाच्या आयुष्यातील रसिकता, विनोद काढून टाकला तर ते आयुष्य शुष्क, नीरस आणि भणंग होऊन जाईल...जीवनातला निखळ आनंद शोधूनही सापडणार नाही. अशावेळी आपल्या रोजच्या जगण्यातूनच निर्माण होणारा ‘वास्तव विनोद` म्हणजे ‘कांद्याचा वांधा` या कथासंग्रहातील कथा होय. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा आपल्याला हसवते व अंतर्मुख करते. जीवनातील चतुराई शिकवते, शहाणं करून सोडते.
-
Zanzibari Masala (झांझिबारी मसाला)
झांझिबारी मसाला... आंबट, गोड, तिखट, खारट अशा सर्व चवींचं मिश्रण असणारा लज्जतदार साहित्यिक ऐवज. झांझिबारी या ऐतिहासिक बेटासोबतच जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या या खमंग कथा. यातली कित्येक पात्रं खास मराठी मातीतली, पण ती जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात रंगतदार गोष्ट गुंफत जातात. कधी कोल्हापूरचा धट्टाकट्टा मालोजी मॅटहॅटनमध्ये खंडेनवमी साजरी करतो, तर कधी पाटील पॅरिसची पोरगी पटवण्याच्या नादात भलत्याच फंदात अडकतो. या कथा कधी डच पाहुचणार घडवतात, तर कधी जपानी. त्यांचा कॅनव्हास जगातल्या भिन्न रंगी अवकाशाने व्यापलेला असला, तरी त्या तितक्याच आपल्या मातीशीही नातं सांगतात. कल्पनेचे पंख घेऊन जगाचा अवकाश अनुभवू देणाऱ्या अफलातून कथांचा हा तृप्त करणारा संग्रह.
-
Dongra Evdha (डोंगराएवढा)
प्रतिकूल परिस्थीती आणि निसर्गाशी दोन हात करत जगणारे गोपालय्या आणि त्यांना साथ देणारी पत्नी शंकरम्मा यांचे सहजीवन तसेच त्यांचा मुलगा त्या उभयतांना भेटायला येत नसल्याची हृदयातील वेदना व त्यांच्या कणखर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी मनोवेधक कादंबरी. मुळात कट्टद गोविंदय्या या व्यक्तीचं बोलणं, वागणं, सच्चेपणा आणि धीरोदात्त वृत्ती या कादंबरीच्या प्रेरणास्थानी आहे. लेखकाने त्यांच्या जीवनावर आधारित गोपालय्या हे पात्र साकारले आहे.
-
Khalalta Awakhal Zara (खळाळता अवखळ झरा)
सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांचा खास मुलांसाठीचा हा नवा कथासंग्रह... ‘खळाळता अवखळ झरा!’ यातील सर्व कथा मनोरंजक तर आहेतच, पण रंजनाबरोबर त्यात विज्ञान, भाषाज्ञान, जीवनमूल्ये, सामाजिक भान वगैरे कथेच्या ओघात स्वाभाविकरीत्या येत असल्याने मुलांकडून सहजगत्या आत्मसात होण्याजोग्या गोष्टी आहेत. कथांच्या ओेघातच मुलांनी आनंदाने म्हणाव्यात अशा कविताही आहेत. मुलांना जे जे रुचेल ते देतानाच खुबीने त्यातून संस्कार घडावेत अशी प्रत्येक कथेची रचना आहे. एकनाथ आव्हाड यांचा हा सातवा बालकथासंग्रह आहे. पहिल्या सहा कथासंग्रहांप्रमाणेच यातील मुख्य व्याQक्तरेखा शमी आणि बाळू हे बहीण-भाऊ आहेत. ही दोन्ही पात्रे बालवाचकांना आव्हाड यांच्या कथासंग्रहांमधून सतत भेटल्याने, परिचित झाल्याने आपलीशी वाटणे, त्यामुळेच शमी आणि बाळूच्या या नव्या कथा वाचण्याची उत्सुकता वाटणे स्वाभाविक आहे. या कथांची कथानकेसुद्धा मुलांचा उत्साह, उत्सुकता वाढविणारी आहेत.
-
Rutuja (ऋतुजा)
घटकेत थंडी वाजणं, घटकेत उकडणं, अकारण चिडचिड करणं, कारण नसताना रडू येणं, मूड स्विंग होणं, केस, त्वचा खरखरीत होणं... रजोनिवृत्तीपूर्वी, रजोनिवृत्तीच्या काळात, रजोनिवृत्तीनंतरच्या वयात वरील लक्षणं प्रत्येकीला थोड्याफार प्रमाणात जाणवत असतात. स्त्री शरीरातील संप्रेरकांच्या असंतुलनामुळे (हार्मोनल इम्बॅलन्स) ही लक्षणं दिसतात. या वयोपरत्वे होणाऱ्या बदलांना निसर्गनियम समजून त्यांच्याशी आपण जुळवून घेणं गरजेचं असतं. रजोनिवृत्तीच्या काळात आणि नंतर येणाऱ्या समठा समस्या याच्या अनुषंगाने आपली शरीररचना, क्रिया, त्यात वयोमानपरत्वे होणारे बदल, शरीरसौष्ठव व्यवस्थित राहण्यासाठी आवश्यक ते व्यायाम, आवश्यक तो संतुलित आहार, त्यासाठी योग्य त्या पाककृती, त्या काळात आवश्यक असणारे अन्नघटक यांची माहिती, तसेच महिलांच्या जननेंद्रियांच्या रोगांविषयी अवगत करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून लेखिकेने केला आहे.
-
Gof..(गोफ)
‘वपु’ ही आद्याक्षरं मराठी माणसाच्या मनाच्या खूप जवळ आहेत... त्यांच्या कथांनी वाचकांच्या मनावर गारूड केलं... त्यांच्या काही कथांभोवती, वेगवेगळ्या लेखकांनी एकांकिकेच्या आविष्काराचा ‘गोफ’ विणला... या गोफातून घडतं जीवनाचं व्यामिश्र दर्शन... कधी एखादी लोकलमध्ये भेटलेली तरुणी स्वप्नवत् वाटते... तर कधी एका लहान मुलीचा करुण अंत होतो... कधी एखादा फेरीवाला मुलासारखा जीव लावतो... तर कधी नवरा-बायकोचं अर्थहीन नातं अस्वस्थ करून जातं... भांडणाच्या क्लासची कल्पनाही समोर येते एखाद्या एकांकिकेतून... तर भावाभावांच्या नात्यातील गैरसमज मानवी मनाचं वास्तव चित्र रेखाटून जातो... एखाद्या सोनटक्केवर नियती घाव घालते... किती ही गुंतागुंत भावनांची आणि त्यामुळे होणारी घुसमट माणसाच्या मनाची... ‘वपुं’च्या कथांचं हेच वैशिष्ट्य अधोरेखित करणारे हे एकांकिकांचे ‘नवरंग’... प्रभावी संवाद आणि भावनांचे पडसाद हे या ‘नवरंगां’चं सामर्थ्य... कथा ते एकांकिका असा हा प्रवास वाचकांना नक्कीच लुभावणारा... ‘फॉर्म’ आणि आशय यांचं नातं उलगडून दाखवणारा... वाचा आणि अंतर्मुख व्हा...
-
Tod (तोड)
< BACK TOD by SWATI CHANDORKAR 0 Reviews facebook sharing buttontwitter sharing buttonpinterest sharing buttonwhatsapp sharing buttonlinkedin sharing buttonblogger sharing buttontelegram sharing buttonemail sharing button Previous Next* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately. Original Book Title: TOD Availability : Available ISBN : 9789392482205 Edition : 1 Pages : 152 Language : MARATHI Category : FICTION Quantity 1 INR 200.00+ ADD TO CARTBuying Options: Ebooks: Print Books: Summary(English) Summary(Marathi) Awards Translation Adaptation Youtube Audio ऊसतोडीच्या हंगामाला जायच्या तयारीत असतानाच शिवाचा सर्पदंशाने मृत्यू होतो. त्याची बायको भिकू सासऱ्याबरोबर (दगडू) आपली तान्ही मुलगी बारकी हिच्यासह ऊसतोड हंगामाला खुर्डावाडीला जाते. बारकीच्या पायगुणामुळे आपला मुलगा गेला असं वाटून तिचे सासू-सासरे बारकीचा रागराग करत असतात. खुर्डावाडीला गेल्यावरही दगडू बारकीचा दुस्वास करतच राहतो. तो बारकीवर राग काढण्यासाठी टोकाचं पाऊल उचलेल या भीतीने भिकू भूमीताईंकडे काही वेळेला बारकीला सांभाळायला देते. ऊसतोड मजुरांना भाड्याने जागा देणाऱ्या, एकाकी असलेल्या भूमीताईंना बारकी ऊर्फ गौरीचा लळा लागतो. हंगाम संपल्यानंतर दगडूच्या गौरीला बरोबर न नेण्याच्या दुराग्रहामुळे भिकू नाईलाजाने गौरीला भूमीताईंकडेच ठेवते. भिकूने मागितल्यावर भूमीताईंनी गौरीला परत द्यायचं, असा लेखी करार झालेला असतो; पण प्रत्यक्षात जेव्हा गौरीला परत द्यायची वेळ येते तेव्हा काय होतं? ऊसतोड कामगारांच्या जीवनाच्या पार्श्वभूमीवर रंगलेलं एक उत्कट भावनाट्य.