-
Khalalta Awakhal Zara (खळाळता अवखळ झरा)
सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांचा खास मुलांसाठीचा हा नवा कथासंग्रह... ‘खळाळता अवखळ झरा!’ यातील सर्व कथा मनोरंजक तर आहेतच, पण रंजनाबरोबर त्यात विज्ञान, भाषाज्ञान, जीवनमूल्ये, सामाजिक भान वगैरे कथेच्या ओघात स्वाभाविकरीत्या येत असल्याने मुलांकडून सहजगत्या आत्मसात होण्याजोग्या गोष्टी आहेत. कथांच्या ओेघातच मुलांनी आनंदाने म्हणाव्यात अशा कविताही आहेत. मुलांना जे जे रुचेल ते देतानाच खुबीने त्यातून संस्कार घडावेत अशी प्रत्येक कथेची रचना आहे. एकनाथ आव्हाड यांचा हा सातवा बालकथासंग्रह आहे. पहिल्या सहा कथासंग्रहांप्रमाणेच यातील मुख्य व्याQक्तरेखा शमी आणि बाळू हे बहीण-भाऊ आहेत. ही दोन्ही पात्रे बालवाचकांना आव्हाड यांच्या कथासंग्रहांमधून सतत भेटल्याने, परिचित झाल्याने आपलीशी वाटणे, त्यामुळेच शमी आणि बाळूच्या या नव्या कथा वाचण्याची उत्सुकता वाटणे स्वाभाविक आहे. या कथांची कथानकेसुद्धा मुलांचा उत्साह, उत्सुकता वाढविणारी आहेत.
-
Rutuja (ऋतुजा)
घटकेत थंडी वाजणं, घटकेत उकडणं, अकारण चिडचिड करणं, कारण नसताना रडू येणं, मूड स्विंग होणं, केस, त्वचा खरखरीत होणं... रजोनिवृत्तीपूर्वी, रजोनिवृत्तीच्या काळात, रजोनिवृत्तीनंतरच्या वयात वरील लक्षणं प्रत्येकीला थोड्याफार प्रमाणात जाणवत असतात. स्त्री शरीरातील संप्रेरकांच्या असंतुलनामुळे (हार्मोनल इम्बॅलन्स) ही लक्षणं दिसतात. या वयोपरत्वे होणाऱ्या बदलांना निसर्गनियम समजून त्यांच्याशी आपण जुळवून घेणं गरजेचं असतं. रजोनिवृत्तीच्या काळात आणि नंतर येणाऱ्या समठा समस्या याच्या अनुषंगाने आपली शरीररचना, क्रिया, त्यात वयोमानपरत्वे होणारे बदल, शरीरसौष्ठव व्यवस्थित राहण्यासाठी आवश्यक ते व्यायाम, आवश्यक तो संतुलित आहार, त्यासाठी योग्य त्या पाककृती, त्या काळात आवश्यक असणारे अन्नघटक यांची माहिती, तसेच महिलांच्या जननेंद्रियांच्या रोगांविषयी अवगत करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून लेखिकेने केला आहे.
-
Gof..(गोफ)
‘वपु’ ही आद्याक्षरं मराठी माणसाच्या मनाच्या खूप जवळ आहेत... त्यांच्या कथांनी वाचकांच्या मनावर गारूड केलं... त्यांच्या काही कथांभोवती, वेगवेगळ्या लेखकांनी एकांकिकेच्या आविष्काराचा ‘गोफ’ विणला... या गोफातून घडतं जीवनाचं व्यामिश्र दर्शन... कधी एखादी लोकलमध्ये भेटलेली तरुणी स्वप्नवत् वाटते... तर कधी एका लहान मुलीचा करुण अंत होतो... कधी एखादा फेरीवाला मुलासारखा जीव लावतो... तर कधी नवरा-बायकोचं अर्थहीन नातं अस्वस्थ करून जातं... भांडणाच्या क्लासची कल्पनाही समोर येते एखाद्या एकांकिकेतून... तर भावाभावांच्या नात्यातील गैरसमज मानवी मनाचं वास्तव चित्र रेखाटून जातो... एखाद्या सोनटक्केवर नियती घाव घालते... किती ही गुंतागुंत भावनांची आणि त्यामुळे होणारी घुसमट माणसाच्या मनाची... ‘वपुं’च्या कथांचं हेच वैशिष्ट्य अधोरेखित करणारे हे एकांकिकांचे ‘नवरंग’... प्रभावी संवाद आणि भावनांचे पडसाद हे या ‘नवरंगां’चं सामर्थ्य... कथा ते एकांकिका असा हा प्रवास वाचकांना नक्कीच लुभावणारा... ‘फॉर्म’ आणि आशय यांचं नातं उलगडून दाखवणारा... वाचा आणि अंतर्मुख व्हा...
-
Tod (तोड)
< BACK TOD by SWATI CHANDORKAR 0 Reviews facebook sharing buttontwitter sharing buttonpinterest sharing buttonwhatsapp sharing buttonlinkedin sharing buttonblogger sharing buttontelegram sharing buttonemail sharing button Previous Next* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately. Original Book Title: TOD Availability : Available ISBN : 9789392482205 Edition : 1 Pages : 152 Language : MARATHI Category : FICTION Quantity 1 INR 200.00+ ADD TO CARTBuying Options: Ebooks: Print Books: Summary(English) Summary(Marathi) Awards Translation Adaptation Youtube Audio ऊसतोडीच्या हंगामाला जायच्या तयारीत असतानाच शिवाचा सर्पदंशाने मृत्यू होतो. त्याची बायको भिकू सासऱ्याबरोबर (दगडू) आपली तान्ही मुलगी बारकी हिच्यासह ऊसतोड हंगामाला खुर्डावाडीला जाते. बारकीच्या पायगुणामुळे आपला मुलगा गेला असं वाटून तिचे सासू-सासरे बारकीचा रागराग करत असतात. खुर्डावाडीला गेल्यावरही दगडू बारकीचा दुस्वास करतच राहतो. तो बारकीवर राग काढण्यासाठी टोकाचं पाऊल उचलेल या भीतीने भिकू भूमीताईंकडे काही वेळेला बारकीला सांभाळायला देते. ऊसतोड मजुरांना भाड्याने जागा देणाऱ्या, एकाकी असलेल्या भूमीताईंना बारकी ऊर्फ गौरीचा लळा लागतो. हंगाम संपल्यानंतर दगडूच्या गौरीला बरोबर न नेण्याच्या दुराग्रहामुळे भिकू नाईलाजाने गौरीला भूमीताईंकडेच ठेवते. भिकूने मागितल्यावर भूमीताईंनी गौरीला परत द्यायचं, असा लेखी करार झालेला असतो; पण प्रत्यक्षात जेव्हा गौरीला परत द्यायची वेळ येते तेव्हा काय होतं? ऊसतोड कामगारांच्या जीवनाच्या पार्श्वभूमीवर रंगलेलं एक उत्कट भावनाट्य.
-
Dhyasparva (ध्यासपर्व)
सेवासदनच्या संस्थापक रमाबाई रानडे...भारतातील पहिली डॉक्टर स्त्री आनंदीबाई जोशी...महर्षी कर्व्यांच्या कार्याशी एकरूप होऊनही स्वत्व जपणाऱ्या बाया कर्वे... विधवेच्या जिण्यातून बाहेर पडून समाजसेवेत स्वत:ला झोकून देणाऱ्या पार्वतीबाई आठवले...बालकवींसारखा प्रतिभावंत नवरा मिळूनही दु:खाच्या खाईत लोटल्या गेलेल्या पार्वतीबाई ठोंबरे... ज्ञानकोशकार केतकर यांच्यासाठी परदेशातून इथे येऊन हिंदू झालेल्या आणि त्यांच्या निधनानंतरही त्यांचं जीवितकार्य पूर्ण करणाऱ्या शीलवती केतकर...भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमलाबाई सोहोनी...स्त्रियांचे प्रश्न धीटपणे मांडणाऱ्या, काळाच्या पुढे असणाऱ्या देदीप्यमान लेखिका मालतीबाई बेडेकर...लेखिका, समीक्षक विदुषी कुसुमावती देशपांडे...`पाणीवाली बाई’ म्हणून मुंबईत प्रसिद्धीस आलेल्या मृणाल गोरे... उच्च कोटीचा कलाकार असूनही एकटेपण वाट्याला आलेल्या अन्नपूर्णादेवी...गोवा मुक्ती लढ्यात उडी घेणाऱ्या सुधा जोशी... एकूण बारा स्त्रियांच्या जीवनाचा आणि कार्यकर्तृत्वाचा सहृदयतेने घेतलेला वेध
-
Halya Halya Dhudhu De (हाल्या हाल्या दुधू दे)
न्यानबा शेतकऱ्याची मन हेलावून टाकणारी ही कथा आपल्याला अंतर्मुख करते. दुष्ट हाल्या कुठल्या ना कुठल्या रूपात वावरत असतोच. तो कुणाचीच कदर करत नाही. भुलभुलय्या निर्माण करून तो माणसाला चकवतोच! न्यानबा हाल्यावर भरवसा ठेवतो आणि त्याचे सारे कुटुंबच दु:खाच्या गर्तेत ओढले जाते...! न्यानबा संकटांना तोंड देता देता पराभूत होतो. काय आहे न्यानबाच्या जीवनाची ही शोकांतिका? एका शेतकऱ्याची शोकान्तिका समर्थपणे चितारणारी बाबाराव मुसळे यांची विलक्षण कादंबरी.
-
The Bridge On The River Kwai (द ब्रिज ऑन द रिव्हर
’द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ ही दुसर्या महायुद्धाच्या वेळची एक कहाणी आहे. 1942मध्ये जपान्यांनी ब्रिटिशांवर विजय मिळविला होता. विजयी जपानी सेनेने ’युद्धबंदी’ म्हणून अशा कित्येक तुकड्यांना कैद करून त्यांना बँकॉक, सिंगापूर व रंगून यांना जोडणार्या एका रेल्वेमार्ग उभारणीच्या कामास लावले होते. यांतील एक तुकडी क्वाय नदीवर जो पूल उभारला जात होता, तेथे काम करत होती. कर्नल निकलसन हा त्या ब्रिटिश तुकडीचा प्रमुख होता, तर कर्नल साइतो हा विजयी जपानी तुकडीचा प्रमुख होता. अधिकार्यांनाही सैनिकांप्रमाणे या शारीरिक कष्टांच्या कामावर लावण्याच्या प्रश्नावरून या दोघा कर्नल्समध्ये वाद होतो व निकलसन साइतोशी संपूर्ण असहकार्य जाहीर करतो. मग अधिकार्यांच्या छळाला सुरुवात होते. तिकडे साइतोला तो पूल सहा महिन्यांच्या आत उभारण्याच्या आज्ञा मिळालेल्या असतात; पण या संघर्षामुळे कामाला धड प्रारंभच होत नाही. तिकडे साइतोला तो पूल सहा महिन्यांच्या आत उभारण्याच्या आज्ञा मिळालेल्या असतात; तर एकीकडे ब्रिटिशांची एक घातपात करणारी संघटना हा पूल उडवायच्या उद्योगाला लागलेली असते. तो पूल बनतो का आणि तो उडविलाही जातो का?
-
Gruhabhang (गृहभंग)
गृहभंग ही स्वातंत्र्यपूर्व भारतात 1920 ते 1940 सालादरम्यान घडणारी कादंबरी. याचं कथासूत्र एका चारी बाजूंनी समस्यांनी ग्रासलेल्या महिलेच्या, नंजम्माच्या संघर्षाभोवती फिरतं. मूर्ख नवरा, खाष्ट सासू, अंधश्रद्धाळू शेजार आणि भीषण गरिबी अशी ओढाताण सहन करत नंजम्माचा जीवनसंघर्ष सुरू आहे. नंजम्माची सासू प्रत्येक दुर्दैवाला नंजम्माला जबाबदार धरते. नवरा घरची जबाबदारी नाकारतो. अशात आपल्या निर्भेळ स्वभावानं आणि धैर्यानं नंजम्मा परिस्थितीवर मात करू पाहते. घरसंसार उभा करू पाहते. आत्मनिर्भरपणे उभं राहत असतानाच आपल्या मुलांना चांगलं आयुष्य आणि चांगले संस्कार देण्यास धडपडते. मानवी मनाच्या अतर्क्य व्यापारांमुळे आणि नियतीच्या घावांमुळे घायाळ झालेल्या नंजम्माची हदयाला पीळ पाडणारी कथा.
-
Amnesty (अमेन्स्टी)
श्रीलंकेचा मूळ रहिवासी असलेला धनंजय ऊर्फ डॅनी सिडनीत बेकायदेशीर स्थलांतर करतो. साफसफाईची कामं करून किराणा मालाच्या स्टोअर रूममध्ये लपून राहतो. एके दिवशी डॅनीला आपल्या एका मालकिणीचा - राधा थॉमसचा सुरा भोसकून खून झाल्याचं कळतं. त्याला हेही कळतं की, खून झाला, तेव्हा तिच्या अंगावर एक जॅकेट होतं. डॅनीच्या कल्पनेनुसार ते जॅकेट त्याच्या आणखी एका मालकाचं होतं. डॅनीला माहीत होतं की, त्या बाईचं त्या माणसाबरोबर प्रेमप्रकरण चाललेलं आहे. आता त्याच्यासमोर आकस्मिकपणे एक यक्षप्रश्न उभा आहे. खुनामागील ही हकिगत माहीत असणारा साक्षीदार म्हणून पुढे येऊन मायदेशी रवाना होण्याचा धोका पत्करावा की गप्प राहून अन्याय घडू द्यावा? डॅनीचा स्वतःच्याच सदसद्विवेकबुद्धीबरोबर झगडा सुरू होतो. एका देशांतरित माणसाच्या मनोवस्थेचा, आजच्या जगातील त्याच्या एका विशिष्ट अवघड आणि म्हणूनच निकडीच्या झालेल्या अवस्थेचा रहस्यपूर्णतेने तरी व्यामिश्रतेने घेतलेला वेध
-
Udayast (उद्यास्त)
एकीकडे कामाठीपुऱ्यातलं बदनाम वास्तव, तर दुसरीकडं विठोबाची भक्ती. या दोन्हीचा अनोखा संगम साधत रचलेलं दमदार कथानक म्हणजे, उद्यास्त (अवसान) ही कादंबरी. कामाठीपुऱ्यातल्या वेश्येच्या पोटी जन्मलेल्या सत्याची ही कहाणी. सत्याचं भविष्य उज्वल असावं म्हणून त्याची कामाठीपुऱ्यातून एका आश्रमात रवानगी होते. तिथं त्याच्यात विठुभक्तीचे नवे संस्कार रुजतात. सत्याचं आयुष्य नवी उभारी घेतं. पण त्याचं भागदेय तरीही त्याला सुखासीन आयुष्य बहाल करत नाही. तो नोकरी करत असलेल्या कारखान्याच्या मालकाचा मृत्यू होतो आणि त्याच्या आयुष्यात नवं वादळ येतं. मानवी नात्यातली गुंतागुंत आणि नैतिक-अनैतिकाच्या संकल्पनांमध्ये भरडल्या जाणाऱ्या आयुष्यांची ही आगळीवेगळी कहाणी.
-
Don Shinge Aslela Rushi (दोन शिंगे असलेला ऋषी)
देवादिकांचे आपापसातले भांडणतंटे असोत, नाहीतर महान ऋषी महर्षींच्या हातून घडलेले प्रमाद असोत, लोककल्याणकारी राजे असोत, नाहीतर सामान्यातील सामान्य माणसांच्या अंगातील सद्गुण असोत, भारतीय लोकप्रिय लेखिका सुधा मूर्तींनी भारतीय पुराणातल्या या तुम्हाला-आम्हाला फारशा परिचित नसलेल्या कथा शब्दबद्ध करून आपल्यासमोर ठेवल्या आहेत. ‘दोन शिंगे असलेला ऋषी’ हा सुंदर चित्रांनी नटलेला, साध्या-सोप्या, अतिशय प्रवाही आणि प्रत्ययकारी भाषेतल्या कथांचा संग्रह आहे. या संग्रहातल्या सर्वच कथा आबालवृद्धांच्या लाडक्या लेखिका सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून उतरलेल्या असून, या कथा वाचकांची मनं जिंकून घेतील यात शंकाच नाही.
-
Humber Boy B (हम्बर बॉय बी)
बेन एक बाल गुन्हेगार आहे जो आठ वर्षांचा तुरुंगवास भोगून नुकताच बाहेर पडलेला आहे. तो दहा वर्षांचा असताना त्याच्याच वयाच्या दुसऱ्या मुलाचा नोहाचा खून केल्याचा आरोप सिद्ध होऊन तो तुरुंगात गेलेला होता. नोहाची आई फेसबुकवर बेनला शोधण्याची एक मोहीम सुरू करते. त्या मोहिमेत नोहाच्या आईला मदत करण्याच्या नावाखाली जेसिका या पात्राचा स्वत:चा असा एक सुडाचा प्रवास सुरू आहे. वर्तमानात हे घडत असताना मागे काय घडलं याचा एक धागा या कादंबरीत सतत विणलेला आहे. बेनची परिविक्षा अधिकारी असलेली केट आहे जी तिच्या भूतकाळाचं ओझं घेऊन जगते आहे आणि बेनला सुरक्षित ठेवण्याकरता धडपडते आहे. लिऑन आणि इस्सी हे बेनच्या नव्या आयुष्यातील पहिलं महत्त्वपूर्ण जोडपं आहे. नोहासारख्या निष्पाप, सरळमार्गी मुलाचा खून का केला गेलाय, याची जिज्ञासा जशी नोहाच्या आईला असते तशीच ती वाचकालाही लागून राहते. वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी उत्कंठावर्धक कादंबरी.
-
Bhagvatgita (भगवद्गीता)
ऐन रणांगणात समोर आप्तस्वकीयांना पाहिल्यावर युद्धापासून परावृत्त होऊ पाहणाऱ्या अर्जुनाला कृष्णाने केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता...आज हजारो वर्षांनंतरही ही गीता जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन करते आहे...हे मार्गदर्शन सगळ्यांपर्यंत पोचवणे हा उद्देश आहे...गीता सांगते...आपल्या सद्सद्विवेकबुद्धीशी बोला...जे काही आहे, ते आपल्यामध्ये आहे आणि ते कधीही नष्ट पावत नाही(आत्मा)...कोणतंही काम मनापासून करा...काम-क्रोधावर नियंत्रण ठेवा...सन्मार्गाची कास धरा...श्रद्धा ठेवा...जबाबदारी घ्या...समानतेने वागा...स्वत:ला शिस्त लावा...ध्येयाचा पाठपुरावा करा...चांगला माणूस म्हणून जगा...स्वभावधर्माशी मैत्री करा... इ. मुद्दे या पुस्तकात उदाहरणांसह स्पष्ट केले आहेत...आवश्यक तिथे चित्रांचीहीR जोड दिली आहे...त्यामुळे हे पुस्तक सगळ्यांसाठीच खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असं आहे.
-
George and the unbreakable code (जॉर्ज एण्ड अनब्रे
जॉर्ज आणि अॅनी काही दिवस अंतराळ साहसांपासून दूर असतात. त्यांना आपल्या साहसी प्रवासातला थरार आठवत राहतो. पण अवघ्या काही दिवसातच त्यांच्यापुढं नवं आव्हान उभं राहतं. बॅंका फुकट पैसे वाटू लागतात. सुपरमार्केटमधलं सामान फुकट वाटलं जाऊ लागतं. विमानं उडायला नकार देतात. जगातले सर्वात मोठे आणि चांगले संगणक अचानक बंद पडतात आणि जणू जगाच्या व्यवहारालाच खीळ बसते. आणि जॉर्ज व अॅनीला याची कारणं शोधायला पुन्हा अंतराळात झेप घ्यावी लागते.
-
Dosti Duniyadari Aur Dil (दोस्ती दुनियादारी और दि
कबीर खान हा अनाथ मुसलमान मुलगा. काका-काकू कसंबसं सांभाळतात; पण देवधर सर आणि त्यांची बायको कालांतराने कबीरची जिम्मेदारी घेतात. तो खूप हुशार असतो. बोर्डात येतो, उत्तम शिक्षण घेतो. पुढे नोकरीतही झळकतो. प्रेमात पडतो, हिंदू मुलीशी लग्न करतो. त्यांना एक मुलगी होते. ‘तू मुस्लीम आहेस’ ही जाणीव समाज करून देत राहतो. कबीर तसं काही मानत नसला तरी मनात खोलवर अढी बसू लागते. मग तो मशिदीत जाऊ लागतो, कुराण वाचू लागतो, धर्मचर्चा करू लागतो. त्याच्या चार वर्षांच्या मुलीची, मीराची तिच्याहून तीन-चार वर्षांनी मोठ्या असलेल्या बांधकाम मजुराच्या मुलाशी, धनाशी असलेली मैत्री त्याला रुचत नाही. तो त्यांची मैत्री तोडायचा प्रयत्न करतो; पण त्याला यश येत नाही. मीरा वारंवार आजारी पडू लागते. तपासणीअंती तिच्या हृदयाला भोक असल्याचं निदान होतं. तिला हृदयरोपण करणं गरजेचं असतं. कोणाचं हृदय मिळतं तिला? सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारी भावपूर्ण कादंबरी.