-
Golmaal (गोलमाल)
‘‘हे पहा, बाहेर टळटळीत दुपार आहे. उजेड नुसता पावसानं कोसळणाऱ्या दरडीसारखा अंगावर कोसळतोय. तरीही तो बाहेरच ठेवून इथं मिट्ट काळोख केल्याशिवाय तुम्हाला काही दिसत नाहीय. मघाशी तुम्हाला दिलेली कॉफी जीभच काय पण हातही भाजेल इतकी कडकडीत होती. त्यात पाक होण्याइतपत साखर घातली होती; पण ती तुम्हाला प्रेतासारखी थंडगार आणि खारट लागली. उलट तुम्हाला दिलेल्या दुसऱ्या कपात बर्फाचा खडा आणि चमचाभर मीठ घालताच ती तुम्हाला व्यवस्थित वाटली. आज उन्हाळ्याचा कडाका आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारं टेम्परेचर आहे. आणि तुम्ही अर्धा डझन ब्लँकेट्स अंगावर घेऊनही थंडीनं कुडकुडताय. मी तुमच्या गालावर सॅन्डपेपर फिरवला तेव्हा तुम्हाला कोणीतरी मोरपीस फिरवल्यासारखं हुळहुळलं. उलट कापसाच्या बोळ्यांत कोणी टाचण्या का ठेवल्यात म्हणून तुम्ही बोंब ठोकलीत. निरनिराळे रंग मी तुम्हाला दाखवले तेव्हा जांभळ्याच्या ठिकाणी तुम्हाला पिवळा दिसला, तांबड्याच्या जागी हिरवा आणि नारिंगीच्या ऐवजी निळा. आता समजलं, तुम्हाला काय झालंय ते?’’
-
Asa Asava Jodidar (असा असावा जोडीदार)
एलियट काट्झ यांनी ‘बीइंग द स्ट्राँग मॅन ए वुमन वाँट्स’ या विचारांना चालना देणार्या पुस्तकात ‘महिलांना नेमकं काय हवं असतं?’ या मुद्द्याचा वेध घेतला आहे. एका निरोगी स्त्रीला कणखर पुरुष हवा असतो. निर्णय घेईल असा पुरुष, ज्याच्यावर अवलंबून राहता येईल असा पुरुष, आपल्या जवळच्या माणसांसाठी सर्वोत्तम असंच ठरवेल असा पुरुष, योग्य गोष्टी करेल असा पुरुष - केवळ सोप्या, लोकप्रिय, फायदेशीर गोष्टी करणारा नाही. अनादि काळापासूनच्या शिकवणीतून, काट्झ यांनी वाचकांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्री-पुरुषांच्या भूमिकांबाबत सध्या होत असलेल्या चर्चांतून निर्माण झालेला संभ्रम. हजारो वर्षांपासूनच्या उपयुक्त तत्त्वांचा आधार घेऊन, अधिकार न गाजवता, अपमानास्पद न वागवता, नियंत्रित करण्याचा प्रयत्न न करता, महिलांना हवा असलेला पुरुष कसं बनायचं, हे काट्झ यांनी आधुनिक पुरुषांना सांगितलं आहे.
-
Mothyanchya Chotya Goshti (मोठ्यांच्या छोट्या गोष्
माणूस आपल्या कर्तृत्वावर मोठा होतो. त्यांचा आदर्श, त्यांचे कार्य, त्यांची थोरवी समाजाला प्रेरणा देते. विविध क्षेत्रांतील निवडक ३२ व्यक्तींच्या आयुष्यांतील या छोट्या गोष्टी. सहज लक्षात ठेवण्यासाठी. गोष्टीच्या पहिल्या भागात त्या थोर महापुरुषाची धावती, सारभूत ओळख. त्याच्या महान कार्यावर एक प्रकाशझोत. नंतरच्या भागात त्याच्याशी संबंधित असलेली घटना, प्रसंग अशी मांडणी केलेली आहे. प्रामुख्याने माध्यमिक शाळेतील विविध स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून केलेले हे लेखन लहान-थोर दोघांनाही आवडेल. शिक्षकांना, पालकांनाही त्याचा उपयोग होईल.
-
Aku-Aku (आकु-आकु)
‘आकू आकू’ पुस््तकाचे लेखक थॉर हेयरडाहल यांनी पॉलिनेशियन लोकांच्या उत्पत्ती सिध्दांताबद्दलचा रहस्यमयता उलगडून दाखविली आहे. जगाचे टोक गाठायला निघालेली ही शोधमोहीम ‘प्रशांत महासागरा’कडे निघते व ‘ईस्टर बेटा’वरील यूकेचा भाग जगातील अतिशय दुर्गम वस्तीचा. चिलीच्या महाद्विप किनार्याचे हे अंतर ३७०३ कि.मी. ‘इस्टर संडे’-१७२२ रोजी डच प्रवासी जेकब रोगवेन याने या बेटाचा शोध लावला. ही मोहीम राक्षसांचे व लंबकर्ण जमातींचे गुपित जाणून घेते.पुतळे स्वत: ठिकाणे बदलतात,असे म्हटले जायचे. ‘रानोराराकू’ च्या ज्वालाकुंडावर उभे राहून शोधमोहिम गवताळ बेटाचे नयनरम्यदृश्य पाहते. पाण्याने भरलेला ज्वालामुखी म्हणजे-‘रानोराराकू’, हे जगातले सर्वांत मोठे कोडे.‘आकु-आकु’ म्हणजे भूत-सैतान किंवा आत्मा. यांना ‘वरुआ’ही म्हणतात. प्रत्येकाचा ‘आकु-आकु’ स्वत:शी संवाद साधतो. ‘इस्टर बेटा’ च्या ‘रापानुई ’ पौराणिक कथेतील हे मानवीय आत्मे असून, ते आपल्या बांधवांशी बोलतात.मेयर आपल्या आजीच्या ‘आकु-आकु’शी बोलायचे. ईस्टर बेटाच्या पहिल्या राजाच्या पूर्वजांची ही कहाणी ‘मायथॉलॉजी-मिथक विद्या,’ ‘आकु-आकु’ तून दंतकथेप्रमाणे वाचकांसमोर येते.
-
Icon (आयकॉन)
बलाढ्य रशिया अराजकतेच्या चक्रात सापडतो. समाजजीवन गढूळ होते. जनता दु:खसागरात लोटली जाते. अशा भावूक स्थितीत देशाला तरून नेणारा तारणहार नेता-‘इगॉर कोमारोव्ह’ समोर येतो. कोमारोव्हची प्रभावी भाषणे, आत्मीयता पाहून, योग्य नेता मिळाल्याचा आनंद रशियन जनतेला होतो. रशियाचा सुवर्णकाळ आता दूर नाही, असे स्वप्न लोक पाहतात... आणि एकदमच रहस्यमय, ‘काळ्या जाहीरनाम्या’ चा बोलबाला होतो. कोमारोव्हने गुप्तपणे लिहलेला ‘काळा जाहीरनामा’ चोरीस जातो. त्याचे हिटलरशाही राबवायचे मनसुबे कोसळतात. ‘काळा-रहस्यमय जाहीरनामा’ ब्रिटिशांच्या हाती लागतो. जाहीरनामा अनधिकृत असल्याने पाश्चात्य राष्टे कारवाई करू शकत नाहीत. पण ‘कॉन्सिल ऑफ लिंकन’ हा प्रभावी आंतरराष्ट्रीय समुदाय, अनधिकृत अस्तित्व नाकारणारा गट. हा गट ‘गुप्तहेर यंत्रणेचे-सीआयए’ चे ‘जेसन मंक’ यांची प्रतीक-आयकॉन-म्हणून निवड करतात. ही महान कामगिरी मंक यांचेवर सोपवल्याने इमॉर कोमारोव्हचे दुष्ट मनोरे गळून पडतात. जेसन मंक त्याची कृष्णकृत्ये शोधून ती धुडकावून लावतात. कोमारोव्हचा पर्दापाश होऊन हिटलरशाहीला पायबंद बसतो, हे ‘आयकॉन’ ही कादंबरी सांगते.
-
Mumbai After Ayodhya (मुंबई आफ्टर अयोध्या)
गेल्या तीन दशकांत मुंबईने जे अनपेक्षित असे पाहिले, भोगले, अनुभवले त्याचा दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक. अयोध्या घटनेनंतर माफिया जगतातील घडामोडींनी समाजकारण आणि राजकारणही बदलले. सोबतच मुंबईचे भौगोलिक रूपदेखील बदलले. नवीन उपनगरांची आणि वस्त्यांची निर्मिती झाली. शहर दंगलीतून बाहेर पडून नि:श्वास सोडत नाही, तोच पुन्हा २००२मध्ये झालेली बॉम्बस्फोट मालिका आणि २००८मधील २६/११चा दहशतवादी हल्ल्यामुळे हिंसेने परमोच्च सीमा गाठली. जीतेंद्र दीक्षित हे याच शहरात जन्माला आले आणि इथेच वाढले. ज्या तीन दशकातील घडामोडींबद्दल त्यांनी वर्णन केले आहे, त्यातील बराच काळ त्यांनी स्वत: अनुभवला आहे. त्यांचे हे पुस्तक म्हणजे जणू मुंबई शहराची आत्मकथा. गिरण्यांचे शहर ते मॉलचे शहर झालेली मुंबई, इथे गगनचुंबी इमारती वैÂक पटींनी वाढल्या. शहराची जीवनवाहिनी असणारी लोकल ट्रेन लांबीने वाढतच गेली, तरीही गर्दीला सामावून घेणे, मुंबईला अवघड जात आहे. जगातील सर्वांत मोठं सिनेजगत असणारं बॉलिवुडही या विळख्यातून सुटले नाही. इथं चित्रपटकारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. येथील पारंपरिक, ऐतिहासिक गणेशोत्सव आणि दहीहंडीसारखे उत्सव भक्तिभावरहित झाले आहेत आणि त्यांचे व्यापारीकरण झाले आहे. अत्यंत महत्त्वाचे घटनाक्रम, शहराला मुंबई म्हणून घडवणार्या लोकांची माहिती आणि मुंबईच्या व्यक्तिमत्त्वातील बदलाचे वर्णनही या पुस्तकात अनुभवास येते. शहराची भौगोलिक स्थिती, नागरी समस्यांचा चढता आलेख, गजबजलेले अर्थकारण, रिअल इस्टेटचा बुजबुजाट आणि राजकारणाची शंभर शकले, असे सगळे एकत्रित वाचायला मिळते.
-
Maharudra (महारूद्र)
पहिल्या प्रयत्नातच कुशल खेळाडूप्रमाणे कुठल्याही खेळाची लय भीमरावांना साधत असे. या दैवी देणगीला कठोर कष्टांची जोड देऊन भीमरावांनी फुटबॉल बहरवला. या खेळाचा स्थायीभाव आहे, त्या खेळाची विलक्षण गती. भीमरावांना सहजसाध्य असलेले अनेक खेळ होते, परंतु फुटबॉलकडे लक्ष द्यायचं असं न ठरवताही भीमराव फुटबॉलमध्येच रमले. कारण या खेळाची नैसर्गिक गती आणि भीमरावांच्या व्यक्तिमत्त्वातील असामान्य वेग यातील ताळमेळ सहज होता. फुटबॉलमध्ये नावारूपास येणं हे त्यांच्या अंतर्बाह्य व्यक्तिमत्त्वाचं सहजसुंदर प्रकटीकरण होतं. फुटबॉलशी त्यांचं नातं ही सर्वात नैसर्गिक गोष्ट होती.
-
Solapur Malshal Law 1930 (सोलापूर मार्शल लॉ १९३०)
"सत्याग्रहाची विलक्षण देणगी महात्माजींनी देशाला दिली. महात्माजींच्या सत्याग्रही तंत्राचा पूर्ण विकसित अविष्कार १९३० सालच्या सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यात दिसला. याची अखेर महात्माजींच्या कल्पनेतले ‘लोकराज्य` सोलापूरात अस्तित्वात येण्यात झाली. चाणाक्ष साम्राज्यसत्तेने यामधला धोका ओळखत सोलापूरात मार्शल लॉ जारी करून तब्बल एकोणपन्नास दिवस राबवला. सोलापूरात जे घडले ते सोलापूरबाहेर कधी आलेच नाही. खुद्द महात्माजींना व त्यांच्या अनुयायांना आपल्या सत्याग्रही तंत्राचा हा विजय अखेरपर्यंत समजला नाही. समज गैरसमजाच्या या कल्लोळात सोलापूरच्या लढ्याबाबतची तमाम भारतीयांची धारणा ही सिसेरोच्या वरील वचनाप्रमाणे राहिली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णपान ठरावे अशी ही घटना सजगपणे नोंद न झाल्याने विस्मृतीच्या अडगळीत गेली. सोलापूर मार्शल लॉ १९३० या पुस्तकात या अज्ञाताचा शोध घेतलेला आहे. "
-
Swamikar (स्वामीकार)
सरदार घराण्यात जन्मूनही लेखणी हातात घेतलेले रणजित देसाई...पद्मश्रीसारखा नागरी सन्मान मिळालेला साहित्यिक...लहानपणीच मातृसुखाला मुकलेल्या रणजितजींनी आपल्या दोन्ही मुलींना आईचंही प्रेम दिलं, दोन्ही मुलींबाबतची कर्तव्यं मन:पूर्वक निभावली. कनवाळू पिता, दिलदार मित्र, कोवाडच्या लोकांवर मायेची पाखर घालणारा गावप्रमुख, मेहता पब्लिशिंग हाऊसशी घट्ट ऋणानुबंध असलेला लेखक, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या कलावांतांशी स्नेहबंध जोडणारा कलासक्त रसिक, प्रचंड लोकप्रियता लाभून, मानसन्मान मिळवूनही मनाचं नितळपण जपणारा माणूस... तर रणजित देसाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचे त्यांच्या कन्या मधुमती शिंदे यांनी हृद्यतेने उलगडलेले हे पैलू आहेत.
-
The Art Of Choosing (द आर्ट ऑफ चूझिंग)
निवडप्रक्रिया...जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया. निवड करण्याची कला काय काय नाही करत? ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाला, जीवनाला आकार देते. अगदी दैनंदिन जीवनातील गोष्टींपासून ते जीवनातील महत्त्वाच्या निर्णयापर्यंत हे निवड करण्याचं कौशल्य तुम्हाला उपयुक्त ठरतं आणि तुमच्या जीवनात सुसूत्रता आणून तुम्हाला आनंदही देतं. क्षेत्र कुठलंही असो, निवडीची कला तुम्हाला यशस्वितेच्या मार्गावर नेऊन ठेवते. तर असं सुसूत्र, आनंदी, समतोल, यशस्वी जीवन साध्य करायचं असेल तर ‘द आर्ट ऑफ चूझिंग’ हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मदत करेल; कारण हे पुस्तक करतं निवडीची कला अंगात कशी बाणवावी याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन. शीना अयंगार यांनी अंध असूनही डोळस लोकांच्यात वावरून आपलं ‘निवडप्रक्रिये’चं संशोधन चिकाटीने पूर्णत्वास नेलं व सत्य निष्कर्ष काढून जगासमोर ठेवले. अर्थातच या निष्कर्षांना सुयोग्य अशा उदाहरणांची जोड दिली आहे
-
Eka Aparichit Gandhichi Aatmakatha (एका अपरिचित गा
नटवर गांधी यांचं हे आत्मकथन आहे. गुजरातमधल्या एका खेड्यातून मुंबईत येऊन त्यांनी बी.कॉम.पर्यंत घेतलेलं शिक्षण, ओढग्रस्तीची आर्थिक परिस्थिती, धाकट्या सहा भावंडांची जबाबदारी त्यांनी घ्यावी, अशी वडिलांची अपेक्षा, नोकरीसाठीचा संघर्ष, लग्नानंतर भाड्याच्या एका खोलीसाठी करावा लागलेला संघर्ष, तुटपुंज्या पगारात प्रपंच चालवताना होणारी असह्य ओढाताण, अशातच अमेरिकेत मित्राच्या मदतीने एम.बी.ए.साठी मिळालेला प्रवेश, एम.बी.ए.नंतर अमेरिकेत प्रोफेसरची मिळालेली नोकरी, यथावकाश अमेरिकेत स्वत:चं घर, गाडी, अपत्यांसह संपन्न जीवनाचा घेतलेला अनुभव, तेथील नोकरीचे, पीएच.डी.चे अनुभव, वॉशिंग्टन डी. सी.च्या टॅक्स विभागात कमिशनर आणि सीएफओ पदावर केलेलं महत्त्वपूर्ण काम, अमेरिका आणि भारताची विविध बाबतीत तुलना इ. बाबींतून ओघवत्या भाषेतून हे आत्मकथन उलगडत जातं. तत्कालीन मुंबई, तत्कालीन अमेरिकेचं दर्शन घडतं. अंतर्मुख करणारं प्रेरणादायक आत्मकथन.
-
The New BJP (दि न्यू बीजेपी)
"२०१४ पासून भाजपने केंद्र आणि राज्य दोन्ही पातळ्यांवर निवडणुकांमागे निवडणुका जिंकल्या आहेत. हे त्यांच्या हिंदू परिघापलीकडच्या विस्ताराचे संकेत आहेत. प्रश्न असा आहे की, जात, धर्म आणि लिंगाधारित विभागणीच्या पुढे जात इतके लोक अनाकलनीय आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या पक्षाला मत का देतात? त्यांच्या बहुचर्चित विकास योजनांमध्ये दोष काहीही असोत, त्या योजनांच त्यांच्यासाठी लक्षवेधी ठरताहेत का? की आरएसएस केडरचे सक्रिय एकत्रीकरण कारणीभूत ठरतेय? या आकर्षक सुधारणावादी इतिहासात, राजकीय शास्त्रज्ञ आणि पत्रकार नलिन मेहता भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कसा बनला याचे परीक्षण करतात. पक्षाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाच्या नेहमीच्या कथनाच्या पलीकडे जाऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्यांनी स्वत:च्या सोशल इंजिनिअरिंगचा ब्रँड वापरून भारतीय राजकारणाचा आकार कसा बदलला हे स्पष्ट केले. ही पुनर्रचना चतुराईने नवीन जातीय युती, उपेक्षित सामाजिक गटांवर लक्ष केंद्रित करणार्या नवीन कल्याणकारी राज्याचा दावा आणि महिला मतदारांचा आधार बनवण्याद्वारे करण्यात आली. भारतीय राजकीय पक्षांच्या जातीय रचनेचा अभ्यास करणार्या तीन अनन्य निर्देशांकांच्या डेटावर आधारित मांडणी मेहता करतात. पक्ष आणि देश या दोहोंच्या कार्यपद्धतीबद्दल द न्यू बीजेपी पुस्तक चकित करणारी नवी अंतर्दृष्टी देते. पूर्वी न वापरलेल्या ऐतिहासिक नोंदी, पक्षाच्या नेत्यांच्या विशेष मुलाखती आणि संपूर्ण भारतातील सर्वसमावेशक अहवाल यातून देशातल्या राजकीय स्थित्यंतराचा आलेखच समोर येतो. भाजप आणि आजच्या भारताचा स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ अभ्यास करणारे हे पुस्तक आहे जे राजकीय विभाजनाच्या सर्व बाजूंनी सहभाग आणि वादविवादाची मागणी करते. "
-
Sex Scotch And Scholarship (सेक्स स्कॉच अँड स्कॉलर
खुशवंत सिंग म्हणजे एक बहुरंगी आणि बहुढंगी असे व्यक्तिमत्त्व, साहित्य, इतिहास, संस्कृती, तत्त्वज्ञान आणि विविध विषयांवरील स्तंभलेखन यामुळे ते भारतात व परदेशातही वाचकप्रिय लेखक आहेत.‘सेक्स, स्कॉच अँड स्कॉलरशिप’ या त्यांच्या निवडक लेखसंग्रहात काही सेक्स, थोडी स्कॉच आणि बरंच काही स्कॉलरशिप, अशा विषयांवरील लेख आहेत. त्यांचे निसर्गप्रेम, पंजाब प्रश्नाबाबतची आस्था, जगातील सर्व धर्मांचा अभ्यास आणि त्याचबरोबर स्वत:च्या शीख धर्माचे संशोधन, या विषयांवरील अभ्यासपूर्ण आणि उत्कट विवेचन ही या संग्रहाची वैशिष्ट्ये आहेत. खुशवंत सिंग यांचे खास खुसखुशीत आणि परखड शैलीत केलेले स्वत:चे सविस्तर असे लिखाण हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. किंबहुना खुशवंत सिंग यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांपैकी हे परिपूर्ण असे व्यक्तिचित्र आहे. खुशवंत सिंग यांच्या ‘सेक्स, स्कॉच अँड स्कॉलरशिप’ या पुस्तकातील एकूण लेखनाचा केंद्रबिंदू हा ‘माणूस’ आहे, म्हणून हे लेख वाचताना प्रत्येकजण नकळत अंतर्मुख होतो.
-
Manjirya (मंजिऱ्या)
श्री. वि.स.खांडेकरांच्या सतरा ललित गद्यलेखांचा हा संग्रह आहे. श्री. खांडेकरांनी लेखनास प्रारंभ केला, तो साप्ताहिकातून. सावंतवाडीच्या `वैनतेय` या साप्ताहिकात ते नियमितपणे लिहीत असत. त्यानंतर `अखंड भारत` या साप्ताहिकात त्यांनी असेच सातत्याने लेखन केले. लघुनिबंधाशी जवळचे नाते सांगणारे हे लेखन आहे. त्यातील विषय प्रासंगिक स्वरूपाचे असले, तरी त्यावरील हे लेखन चिंतनगर्भ असे आहे. त्यावर श्री. खांडेकरांची स्वतंत्र अशी मुद्रा उमटलेली आहे. पंचाहत्तर वर्षांपूर्वींची मराठी संस्कृती कशी होती, याचे नेमके चित्रण या सतरा ललित गद्यलेखांच्या संग्रहातून अभ्यासू वाचकाला आढळेल.
-
Manzadhar (मंझधार)
वि.स.खांडेकर यांच्या ‘मंझधार’ या मूळ बृहदसंग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंधांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधांत दिसतो. लघुनिबंधातली काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यांतला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमकू लागलेल्या चांदण्यांप्रमाणे विरळ, पण सुंदर असावेत, अशा आदर्श लघुनिबंधांविषयीच्या खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात खांडेकरांच्या लघुनिबंधात तत्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंधसंग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.
-
Pahile Pan (पहिले पान)
श्री. वि. स. खांडेकर यांच्या मंझधार या मूळ बृहद्संग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंघांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधात दिसतो. लघुनिबंधातील काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यातला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्त्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमवूÂ लागलेल्या चांदण्यांप्रमाणे विरळ, पण सुंदर असावेत, अशा आदर्श लघुनिबंधाविषयीच्या श्री. खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात श्री. खांडेकरांच्या लघुनिबंधांत तत्त्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्त्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंधसंग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.
-
Ragini (रागिणी)
"‘मी एका ज्यू आईच्या पोटी जन्माला आलो. जर्मनीनं माझ्या शरीराचं पालनपोषण केलं. युरोपनं माझ्या आत्म्याला संस्कारसंपन्न बनवलं. धरणी हेच माझं घर आणि सारं जग हीच माझी पितृभूमी...’ अशा गौरवपूर्ण शब्दांत स्वत:विषयी प्रांजळ निवेदन करणा-या अन्स्र्ट टोलरनं तुरुंगातून लिहिलेल्या छोट्या छोट्या पत्रांचा हा स्वैर अनुवाद. मागच्या पिढीतल्या एका प्रतिभासंपन्न, ध्येयवादी आणि असामान्य अशा कलावंत क्रांतिकारक आत्म्यानं लिहिलेल्या या पत्रांमध्ये कवित्व आणि कर्तृत्व या दोन्ही दृष्टींनी प्रतिबिंबित झालेलं त्याचं व्यक्तित्व जेवढं कलापूर्ण, तेवढंच जीवनदर्शीही आहे. भोग आणि त्याग, प्रतिभा आणि प्रज्ञा, विचार आणि आचार, कठोरपणा आणि कोमलपणा यांच्या संगमात न्हाऊन निघालेल्या टोलरच्या व्यक्तित्वाचं समग्र दर्शन या पत्रांतून वाचकांना घडेल.
-
An Island (ॲन आयलंड)
"सॅम्युअल प्रदीर्घ काळापासून एकटा राहिला आहे. ठरावीक कालावधीनं सामानाचा पुरवठा करणारी बोट आणि भूतकाळात मुख्य भूमीवरून आलेले सरकारचे प्रतिनिधी यांनीच केवळ इथं भेट दिली आहे. तो दीपस्तंभाची व्यवस्था पाहतो आणि आपल्या कोंबड्या सांभाळत किनार्यावर येणार्या लाटा बघत राहतो. मग एका सकाळी, त्याच्या सोबतीसाठी आणि त्याच्या एकांतवासाला धोका निर्माण करण्यासाठी समुद्र कुणाला तरी घेऊन आला असल्याचं त्याला आढळतं... अपराधभाव आणि भीती, मैत्री आणि नकार यांविषयीची; तसंच `घर` या संकल्पनेच्या अर्थाविषयीची उत्कट आणि प्रभावी कादंबरी. "
-
Bhavgiri (भावगिरी)
मृत्यूच्या सावलीत सतत वावरणारी कोकणी माणसं भुताला घाबरत नसली, तरी त्यांच्या सभोवतालचे जग व त्यांच्या कुटुंबांच्या व्यथा-वेदना-दु:ख, काळजाला पीळ पाडते; कारण कोकणातील निसर्गसमृद्धी जरी आपल्याला वेड लावत असली, तरी परिस्थितीने गांजलेल्या माणसांची दुनिया तिथेही आहेच.गरिबीत दिवस काढूनही कोकणी माणूस काटेरी फणसासारखा आहे. वरून कठोर वाटला तरी त्याच्या हृदयात शहाळं असल्याची जाणीव कायमच दिसते. कोकण म्हणजे पिशाच्चांचं आगर समजलं जातं. मानवी प्रवृत्तीत जसा स्वार्थ-अधाशीवृत्ती दडलेली असते,तीच अतृप्त इच्छा मनात धरून भुतांच्या जगतातील विचित्र असे मानसिक व्रÂौर्य, बदला आणि अतृप्त आत्म्यांची घालमेल कोकणकथांतून आपल्याला दिसते. भावगिरी पर्वताचे दर्शन मनाला मोहवणारे, त्यामुळे माणूस कोकण प्रेमात पडला नाही तर नवलच! येथील जीवनानुभव, जीवनसंघर्ष नाट्यमयता, गूढगुंजनात्मकता कोकणचे गाणं बनते... मनात रुंजी घालते. ‘भावगिरी’ पर्वताशी केलेलं हे हितगुज म्हणजे आपल्या गावातील मातीशी असलेलं विश्वासाचं घट्ट नातं!
-
Room Number 312 Aani Itar Katha (रूम नंबर ३१२ आणि
देशभरातील नामांकित लेखकांनी लिहिलेल्या १९ खुमासदार कथांचा हा संग्रह. कथानकांमधले अजब ट्वीस्ट आणि रंगत प्रत्येक कथेत अनुभवास येते. मैत्री, नातेसंबंध, भयपट आणि अशाच गमतीशीर रोमांचित करणाऱ्या या कथा आहेत.
-
Amir Khusro (अमीर खुस्रो)
तेराव्या शतकातील भारतीय कवी, संगीतकार, संशोधक, तत्त्वज्ञानी व भाषातज्ज्ञ अबुल हसन यमीनुद्दीन ख़ुसरो. सुलतान जलालुद्दीन खिलजीने खुसरोंच्या काव्यरचनेवर खूष होऊन त्यांना `अमीर` हा किताब दिला. या अमीर खुस्रो यांची जीवनकथा उलगडणारे पुस्तक म्हणजे मिलिंद जाधव यांची ही नवी कादंबरी `अमीर खुस्रो`. खुस्रो यांचा जन्म सध्याच्या पंजाबातील पतियाळा येथे झाला. खुस्रोनी फारसी, हिंदवी आणि उर्दू मध्ये काव्यरचना व लिखाण केले. ते उर्दू भाषेतील पहिले कवी. खुस्रो उत्तर भारतीय संगीतातील खयाल गायकीचे, कव्वाली रचनांचे आणि गझल या काव्यप्रकाराचे जनक मानले जातात. खुस्रो दिल्लीच्या तत्कालीन सात सुलतानांचे दरबारी जाणकार, संगीतकार होते. मिलिंद जाधव यांनी खुसरोंच्या जीवनपटासोबतच तेव्हाच्या काळाला देखील वाचकांसमोर उभे केले आहे. खुस्रो यांच्या मूळ लेखनाच्या बरोबरीने त्या लेखनाची प्रक्रिया, खुस्रो यांचा दरबार, समाज आणि वैयक्तिक आयुष्यतील वावर, त्यांनी केलेल्या चर्चा, टीका यांचा समावेश कथानकात केला आहे. तत्कालीन उर्दू, हिंदवी भाषेचा लहेजा वापरत कादंबरीची भाषा नटवली आहे.
-
Manasa Ashi Aani Tashihi (माणसं अशी आणि तशीही)
माणसं...स्वार्थी...लोभी... वासनांध...दुष्ट...माणसं...माणुसकी जपणारी, प्रेम करणारी, िंचतावणारी, खंतावणारी, दुसर्याचं दु:ख जाणणारी, हसणारी आणि रडणारीही...अनंत परी माणसांच्या...टर्नर सिंड्रोमची समस्या असलेल्या कोट्यधीश अमृताशी लग्न करून संपत्ती की माणुसकी या कात्रीत सापडलेला निशिकांत...नवर्याकडूनच कुंटणखान्यात विकली गेलेली अनामिका...वार्धक्यातही कॉलेजमधल्या कुमुदची आठवण मनाशी जपणारा ‘तो’...नवर्याच्या अपघाती मृत्यूच्यावेळी त्याच्या बरोबर असणार्या तरुणीविषयीचं गूढ उलगडू पाहणारी ऊर्मिला...दोन खतरनाक गुंडांचा खात्मा करणारे मनोहर आणि मदिरा...भावनांच्या आणि विचारांच्या वादळात सापडलेली घटस्फोटित सविता...रोजच्या धावपळीने उबगलेला अशोक...प्रवासात एकमेकींना भेटलेल्या दोन तरुणी, पारंपरिक गौरी आणि आधुनिक सान्वी...पोलिसांनी पकडलेलं असतानाही फाटलेला शर्ट घालून इन्टरव्ह्यूला पोचणारा विठ्ठल...माणसं बहुरंगी आणि त्यांच्या कथा बहुढंगी.
-
Dnyanasuryache Akash-Sant Nivruttinath (ज्ञानसूर्य
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चौघांच्याही जीवनाशी निगडित सर्व घटना याही कादंबरीत अपरिहार्यतेने येतात. निवृत्ती हे ज्ञानदेवांचे मोठे बंधू आणि गुरू, तसेच सोपान-मुक्ताईचेही मोठे बंधू. त्यामुळे या चौघांच्याही जीवनाशी निगडित सर्व घटना याही कादंबरीत अपरिहार्यतेने येतात; पण त्या घटनांकडे पाहण्याचा निवृत्तिनाथांचा दृष्टिकोन, भावंडांवर मायेची पाखर घालणं, ज्ञानदेवांचं गुरूपद स्वीकारणं इ. बाबींतून निवृत्तिनाथांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू या कादंबरीतून उलगडत जातात. निवृत्ति-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई या चार अलौकिक मुलांना जन्म देणार्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंचे ज्येष्ठ अपत्य म्हणून निवृत्तिनाथांचा जन्म होणं आणि तीन भावंडांना सामधिस्थ होताना त्यांना पाहावं लागणं, नाथपंथाची दीक्षा घेऊनही विठ्ठलभक्ती आणि भागवत धर्माशीही त्यांनी स्वत:ला जोडून घेणं, हेच निवृत्तिनाथांच्या जीवनातील वेगळेपण ही कादंबरी अधोरेखित करते.