-
The Day Of The Jackal (द डे ऑफ द जॅकल)
आपल्या हाती अनिर्बंध सत्ता असावी या हेतूने सरकारविरोधी ओएएस संघटनेने प्रÂान्सचे अध्यक्ष जनरल द गॉल यांचा वध करण्याचा कट रचला; पण तो असफल झाला. हा प्रयत्न फसल्यामुळे लगेच पुढच्याच वर्षी १९६३ मध्ये ओएएस संघटनेच्या प्रमुखाने एका अज्ञात इंग्लिशमनला द गॉल यांच्या हत्येची सुपारी दिली. ऐशआरामी जीवन आणि पैशासाठी काहीही करणार्या इंग्लिशमनने अर्थात अतुलनीय बुद्धिमत्तेच्या आणि अफाट क्षमतेच्या निष्णात नेमबाजाने हा विडा उचलला. त्याचा सुगावा लागताच अध्यक्षांच्या जीवावर उठलेल्या जकॉल या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणार्या निर्दयी व क्रूर मारेकर्याला रोखणे अत्यावश्यक तर होतेच, परंतु केवळ सांकेतिक नावाच्या आधाराने त्याचा माग काढणेही अवघड आणि अशक्य होते. तरीही जकॉलच्या लक्ष्य साध्य करण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंतच्या प्रत्येक खेळीवर मात करत फ्रान्स च्या पोलीस आणि गुप्तहेर यंत्रणेने जकॉलचीच यमसदनाला पाठवणी केली...
-
Lokmanaya Tilak Darshan (लोकमान्य टिळक दर्शन)
`लो. टिळक दर्शन’ हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं चरित्र आहे. प्राधान्याने टिळकांच्या राजकीय जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांतून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा या चरित्रातून घेतला आहे. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीच्या आधारे स्वातंत्र्य मिळविण्याचं आवाहन टिळकांनी जनतेला केलं आणि ती चतु:सूत्री राबवण्यासाठी ते सक्रिय झाले ते शेवटपर्यंत. या पुस्तकात टिळकांनी केलेली होमरूल चळवळ, मवाळ पक्षाशी त्यांचा झालेला सघर्ष, त्यांनी वेळोवेळी लिहिलेले अग्रलेख, त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया, विविध सभांमध्ये त्यांनी घेतलेला भाग, त्यांनी वेळोवेळी जनतेच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा केलेला प्रयत्न, त्यांचे गाजलेले वेदोक्त प्रकरण, ताई महाराज प्रकरण, त्यांना वेळोवेळी घडलेले तुरुंगवास, मंडालेची काळ्या पाण्याची शिक्षा, रँडच्या खून खटल्यात त्यांना गोवण्याचा झालेला प्रयत्न, टिळकांनी इंग्रज सरकारवर भरलेला अब्रूनुकसानीचा खटला, त्यामुळे त्यांना झालेला मनस्ताप आणि सोसावा लागलेला आर्थिक भुर्दंड, त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत केलेली न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसनची स्थापना आणि नंतर केवळ तत्त्वासाठी त्या संस्थेच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा, राजकीय जीवनात टिळकांना लाभलेले अनुयायी, टिळकांची लोकप्रियता, त्यांच्या विचारांनी क्रांतिकारकांना पुरविलेलं बळ आणि जनतेत पसरलेलं चैतन्य, मुस्लिम समाजाबद्दल त्यांना वाटणारी आस्था इ. अनेक मुद्दे, घटना, प्रसंग अधोरेखित करण्यात आले आहेत, ज्यातून टिळकांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचं आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाचं यथार्थ दर्शन घडतं. योगी अरविंद, मंडालेच्या तुरुंगात त्यांना स्वयंपाक करून जेवायला घालणारा कुलकर्णी इ. लोकांनी टिळकांबद्दल लिहून ठेवलं आहे.
-
Palavarcha Jag (पालावरचं जग)
‘पालावरचं जग’ या पुस्तकातून लक्ष्मण माने यांनी शोषित-पीडितांच्या व्यथा-वेदना मांडल्या आहेत. या प्रत्येक लेखांतून अंगावर शहारा उमटणारं जगणं दृष्टीस पडतं. भटक्या-विमुक्तांचं अमानवी जगणं, अन्याय, दुःख-दैन्य आणि अपेक्षा यांनी पछाडलेला हा समाज. सर्वस्व नष्ट झालेल्या समाजाचा उद्धार व संघर्षगाथा-‘यल्लपाचा चंग’मधून दिसते. ‘मरण येत नाही, म्हणून जगायचं!’ हे पालावरचं बेभरवशाचं हीन व शोषित जगणं, भटक्या-विमुक्तांचं स्वत्वं-स्वाभिमान हिरावून घेणारं. (वैदू, कैकाडी, कोल्हाटी, गोसावी-बैरागी, डवरी गोसावी, भराडी-कानफाटे, किंग्रीवाले, बालसंतोषी, पारधी, टकारी भामटा, रजपूत भामटा, कंजारभाट या व इ. अठरापगड जातींना) उच्चभ्रू समाजाने हीन व उपरं ठरवलेलं. या समाजाचा वाली कोण? कधी जाग येणार या पतितांना? त्यांची मनं कधी पेटून उठणार? त्यांच्यासाठीचा तीव्र संघर्ष, चळवळ व आंदोलने लेखकाने व कार्यकर्त्यांनी छेडलेली, तुरुंगवास पत्करलेला. त्यांच्या स्वातंत्र्याचा ध्यास, हेच लेखकाचे जगणे बनले आहे. म्हणूनच माणुसकीची नवी वाट, जाहिरनामा : नंदीवाल्यांच्या दु:खाचा, मरणानंतरही जात आडवी, फाटलेलं आभाळ या लेखांतून मानवी जीवनातील दारिद्र्य, लाचारी, त्यांच्या समस्या, संघर्ष व अवहेलनेला लेखक वाचा फोडतो. गुन्हेगारीचा शाप मागं लेवून जगणारा हा समाज दिवसेंदिवस दु:खाच्याच दलदलीत फसलेला आणि पिचलेला. दलित चळवळीला नेतृत्वस्पर्धेचा शाप आणि या समाजाला अनिष्ट चालीरीति-रूढीं-परंपरांचा शाप. त्यामुळे गावगाडा उचकटून लाचारांच्या/बेरोजगारांच्या फौजा तयार झालेल्या. सत्यानास, अन्नानदशा व कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का जगणं नकोसं करतो; शिवाय स्त्री जातीचे धिंडवडे, अन्यायाची परिसीमा-बलात्काराने पोखरलेलं हीन-दीन जगणं, दहशत, अपमान व स्त्री जन्माला मिळालेला शाप म्हणजे हे नकोसं वाटणारं, पालावरचं जग. लक्ष्मण माने यांनी ‘उपरा`मधूनही या दु:खाला वाचा फोडली आहेच. व्यासपीठावरूनही भटक्या विमुक्तांचे प्रश्न लेखकाने मांडले ते ‘बंद दरवाजा` या नावाने. लेखकाने सच्च्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून हे ‘पालावरचं जग’ आपल्यासमोर मांडलंय, त्यातील धगधगते दाहक सत्य काळजाला पीळ पाडते. भटक्या-विमुक्तांच्या वस्त्या-पालं यांचा शोध घेऊन, लेखकाने त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांची स्थितिगती जाणून घेऊन, त्यांच्या अन्यायाला वाचा फोडली आहे... मानवी हक्क व न्याय यांपासून भटका-विमुक्त समाज वंचित राहू नये, हीच तळमळ या सर्व लेखनातून स्पष्ट होते. समाजासाठी सामाजिककार्यांतून चळवळींना बळ देऊन मानवी उन्नत्ती व माणुसकीचं, साक्षरतेचं-सुसंस्कृत जगणं भटक्या-विमुक्तांचं असावं, अज्ञानाला थारा नसावा, हाच लेखकाला ध्यास आहे. म्हणूनच या अत्याचाराच्या कहाण्या, मसणजोग्यांचं अपरिमित दु:ख, अंगात देव येणं, एका लाडवाची गोष्ट, वहिवाटीसाठीची लढाई, आभाळाएवढ्या छत्रपतींचा आदर्श लेखक लक्ष्मण माने समाजापुढे उभा करतात. या पालावरच्या जगण्याला निश्चितच एके दिवशी आकार प्राप्त होईल, हा दुर्दम्य विश्वास लेखकाला आहे. म्हणूनच ‘पालावरचं जग’ म्हणजे धगधगतं-भयानक अमानवी वास्तव म्हणता येईल.
-
Chhota Desh ( छोटा देश)
बुरुंडी आणि रवांडा येथे घडणारी ही कादंबरी दहा वर्षांच्या गॅबीची कहाणी आहे, जो आपल्या फ्रेंच वडिलांसोबत आणि रवांडाच्या आईसोबत बुजुंबुरा या जिल्ह्यात राहतो. गॅब्रिएलच्या सुखासीन आयुष्यामुळे त्याला हुतू बहुसंख्य आणि तुत्सी अल्पसंख्याक यांच्यातील वाढत्या तणावाची जाणीव नसते. पण रवांडात पेटलेलं गृहयुद्ध आणि नरसंहाराच्या उद्रेकाची झळ बुरुंडीमध्ये पसरते, आणि गॅबी व त्याच्या मित्रांचं स्वास्थ्य हरवतं. ही कादंबरी बुरुंडीमध्ये वाढलेल्या गेल फेयच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित आहे; पण ती आत्मचरित्रात्मक नसल्याचे लेखकाने ठामपणे स्पष्ट केले आहे.
-
Nirjan Pool (निर्जून पूल)
राजकीय इतिहासाची एक अशी तप्त आत्म कहाणी जिने तेलुगू साहित्य विश्वात वादळ निर्माण केले. आंध्रप्रदेशातील माओवादी चळवळीचे संस्थापक दिवंगत कोंडापल्ली सितारामय्या यांची पत्नी कोंडापल्ली कोटेश्वराम्मा यांची ही आत्मकथा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचा उठाव आणि आंध्रप्रदेशमधील नक्षल चळवळ हे सर्व जवळून पाहिलेल्या, अनुभवलेल्या, या सगळ्याचा एक भाग असलेल्या अशा या लेखिका आहेत. चाळीसच्या दशकात त्या भुमीगत आयुष्य जगू लागल्या. त्यांचे पती कोंडापल्ली यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि साथीने कोटेश्वराम्मा यांना जगण्याची आणि लढण्याची ताकद मिळाली. पण नंतर जेव्हा ते कोटेश्वराम्मा यांना सोडून गेले तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसला. पुढचा एकटीचा वेदनादायी प्रवास कोटेश्वराम्मा यांनी धाडसाने आणि मानाने केला. त्या शिकल्या, नोकरी करू लागल्या. आपल्या नातवंडांना त्यांनी वाढवलं. त्या कविता लिहू लागल्या. एक वैचारिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी स्वतःचे अस्तित्व स्वत: निर्माण केले. ही त्यांची आत्मकथा म्हणजे अतिशय बिकट परिस्थितीमधील त्यांच्या धाडसाचा आणि दृढतेचा पुरावा आहे. त्यांना जाणवलेल्या माणसांच्या आणि राजकीय संस्थांच्या वृत्ती त्यांनी यात मांडल्या आहेत. भारतीय स्त्रिया कठीण परिस्थितीचा सामना करतात हे सर्वश्रुत आहेच. पण त्या कोटेश्वराम्मा यांच्यासारख्या यशस्वी सुद्धा होतात हे सांगणारी ही आत्मकथा आहे.
-
Mark Twainchya Nivadak Katha (मार्क ट्वेनच्या कथा)
‘लाखाची गोष्ट’ या कथेतील कंगाल नायकासमोर आव्हान आहे लंडनसारख्या शहरात दहा लाख पौंडाच्या नोटेच्या आधारे एक महिना तग धरून राहण्याचं. तो यशस्वी होतो का? ‘ऑनलाइन शुभमंगल’ कथेत अमेरिकेतील दूरदूरच्या दोन टोकांच्या शहरातील युवक-युवती एकमेकांना न पाहता टेलिफोनवरून माध्यमातून एकमेकांच्या प्रेमात पडतात; पण त्यांच्या प्रेमात कोणीतरी बिब्बा घालतं. काय होतं पुढे? ‘परतीची वाट’ या कथेतील हेन्री आपल्या घरात आलेल्या अतिथीला आपल्या माहेरी गेलेल्या बायकोविषयी सांगत असतो. तिच्या येण्याची अतिथीही औत्सुक्याने वाट पाहत असतो. येते का ती?... ‘एक डाव भुताचा’ ही कथा पुतळ्याच्या भुताभोवती फिरते... ‘मृत्यूची गोल चकती’ ही कथा, आपल्या पित्याला फाशीच्या शिक्षेपासून वाचवणाऱ्या निरागस मुलीची आहे...मार्क ट्वेनच्या रंगतदार शैलीतून साकारलेल्या आणि अंतर्मुख करणाऱ्या कथांचा संग्रह.
-
Runanubandh (ऋणानुबंध)
दुसऱ्यांच्या घरात केअरटेकर म्हणून राहताना नावाच्या आणि मुलाच्या प्रेमाला पारख्या झालेल्या नीलाताई...आईच्या अंत्ययात्रेत परक्यासारखं सामील व्हावं लागलेले गणेश जोशी...आयुष्यभर अहंकाराने पछाडलेले आणि जीवनाच्या संध्याकाळी नात्यांचं महत्त्व पटलेले डॅडा...स्वार्थी मुलाला धडा शिकवणारी लक्ष्मी... ‘डिव्होर्स’ घेता न आल्याचं शल्य आयुष्यभर मनात बाळगणारी निमाकाकी...जीवनभर दु:ख सोसल्यानंतर वृद्धपणी समाजाची वेगळ्या प्रकारे सेवा करणारे दादा...गर्भश्रीमंत तरुणाला नाकारणारी अनाथाश्रमातील बाणेदार सरिता...विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून मानवी मनाचा वेध घेणाऱ्या , मानवी जीवनाचं यथार्थ चित्रण करणाऱ्या कथा
-
Marathi Daulatanche Nari Shilpa (मराठी दौलतीचे नार
जिजाबाईंच्या शिवरायांनी स्थापन केलेली मराठी दौलत ते ‘मेरी झांसी नहीं दुंगी’ म्हणणारी मराठमोळी राणी. या संपूर्ण मराठी दौलतीच्या कारकीर्दीमध्ये अनेक स्त्रियांचा अनन्य साधारण हातभार आहे. महाराष्ट्र विकास सेवा वर्ग १ चे निवृत्त अधिकारी, कथालेखक, इतिहास अभ्यासक-लेखक गोपाळ देशमुख यांनी अशी मराठी दौलतीची नारी शिल्पं या पुस्तकात रेखाटली आहेत. भोसले राजघराण्यातील जिजाऊ, येसूबाई, ताराबाई, सरदारांतील उमाबाई दाभाडे, दर्याबाई निंबाळकर, पेशव्यांमधील गोपिकाबाई, पार्वतीबाई , रमाबाई ते अहिल्याबाई होळकर. पुस्तकातील पंधरा प्रकरणांतून मराठी सत्तेतील धडाडीच्या स्त्रियांची कर्तबगारी अभ्यासपूर्वक, ओघवत्या आणि प्रेरणादायी भाषेत सांगितली आहे.
-
Khujaba (खुजाबा)
या विज्ञान कथासंग्रहा बारा कथा आहेत आणि प्रत्येक कथा ही स्वतंत्रपणे विज्ञान संकल्पना घेऊन पुढे आलेली आहे. या कथांमध्ये विज्ञान हाच खरा नायक असल्याने, विज्ञानाचा परिसस्पर्श जागोजागी जाणवेल यात शंका नाही. शिवाय, मूळ विज्ञानाच्या वाईटसाईट गोष्टींची उकल झाल्याचे निश्चितच दिसेल. ‘अपहरण’ ही कथा संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानाच्या मुळाशी जाणारी व त्याचा व्याप मांडणारी आहे. तर ‘आगंतुक’ ही कथा अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचा उपयोग करून मानवाला संजीवनी देणारी व मानवी स्वभावाचे विघातक दर्शन घडवणारी आहे. तसेच, ‘साक्षीदार’ ही कथा मृत व्यक्तीच्या मेंदूतील स्मृती संचयाचे चित्रण करणारी आहे. ‘अज्ञात जीवाणू’ ही कथा जीवाणूंच्या डीएनए व जनुकांचा अभ्यास करताना, परग्रहावरील जीवाणूच्या शोधाचा परिपाक आहे. विविध विज्ञान संकल्पनांतून साकारलेल्या रंजक कथांचा वाचनीय संग्रह.
-
Shall We Tell The President? (शाल वी टेल द प्रेसिड
फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टीगेशनला अमेरिकेच्या अध्यक्षांच्या खुनाच्या कटाची माहिती मिळते. ज्या पाच लोकांना या कटाची तपशीलवार माहिती असते, त्यातील चारजणांचा गूढ रीतीने मृत्यू होतो. ही सर्व माहिती एफ.बी.आय.चा एजंट मार्क अॅण्ड्र्यूज याला असते. या कटात एका सिनेटरचा हात आहे, हेही त्याला समजते. फक्त सहा दिवसांत त्याला या कारस्थानाची पाळेमुळे शोधायची असतात; पण मार्क हे कसे करणार? त्याच्या जीवालाही धोका असतोच! अध्यक्षांचे प्राण वाचविण्याचा शर्थीने प्रयत्न करताना, मार्क स्वत:चे प्राण तर धोक्यात घालणार नाही ना? जगप्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली उत्कंठावर्धक कहाणी. ‘शल् वी टेल द प्रेसिडेन्ट.’
-
Felanee (फेलानी)
सत्यघटनांवर आधारित हे पुस्तक म्हणजे धाडसाची, वांशिक लढ्याची - हिंसेची आणि तग धरून जिवंत राहिल्याची कथा आहे. आतापर्यंतच्या आसाम मधील दोन मोठ्या आंदोलनांनी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. यांचे राजकीय चित्रण या पुस्तकात आहे. आसामच्या लोकप्रिय कादंबरी लेखिकेने या पुस्तकात सत्ता स्पर्धेमध्ये दिसणारा मानवी जीवनाविषयीचा अनादर आणि अनास्था, सत्तेसाठी चाललेला किळसवाणा खेळ, त्यात सामील झालेल्यांचा ढोंगीपणा आणि वांशिक हिंसेची भयानकता यांचे कठोर आणि निर्भीड शब्दात चित्रण केलेले आहे. पुस्तकाची भाषा आणि एकामागोमाग येणाऱ्या घटना यामुळे श्वास रोखून वाचत जावे असे हे पुस्तक आहे.. फेलानी नावाच्या आसामी स्त्रीच्या अनुभवांभोवती हे कथानक गुंफलेले आहे. `फेलानी` या शब्दाचा अर्थ `फेकून दिलेली` असा आहे. कारण दंगलीमध्ये पेटलेल्या गावात तसेच टाकून फेलानेची आई निघून जाते. फ़ेलानेला दलदलीमध्ये फेकून दिले जाते. पण फेलाने आणि तिच्या सारखे हजारो अशाही परिस्थितीतून वाचतात. स्वतःचे मूळ हरवून बसलेली ही निरनिराळी माणसे रेफ्युजी कॅम्पस मध्ये एकत्र जगतात, आसामी नद्यांच्या खोऱ्यात एकत्र रुजतात, वाढतात. त्यांच्या या प्रवासाच्या कथा फेलानेच्या नजरेतून पुस्तकात सांगितल्या आहेत. राजकीय पार्श्वभूमीवर निर्माण झालेले हे सत्तेचे, संघर्षाचे, जिवंत राहून जगत राहिलेल्यांचे कथानक आहे.
-
The Lost City of Z (द लॉस्ट सिटी ऑफ Z)
अॅमेझॉन! जगातली सर्वांत मोठी नदी आणि तिच्या खोऱ्यात पसरलेले जगातले सगळ्यात मोठे जंगल. त्याला ते हरवलेले शहर – झेड शहर आणि ती नाहीशी झालेली संपन्न संस्कृती शोधायची असते; पण जंगलात गेल्यावर काही महिन्यांत तो नाहीसा होतो. त्याच्या शोधात गेलेले निम्मे लोक परत येत नाहीत. त्यानंतर डेव्हिड ग्रॅन नावाचा अमेरिकन पत्रकार फॉसेटच्या शोधात अॅमेझॉनच्या जंगलात जातो, जिथे सर्वाधिक आक्रमक जंगली जमाती राहत असतात.ऐंशी वर्षांपूर्वी जंगलात नाहीशा झालेल्या फॉसेटचा माग काढण्यासाठी, आपले गोजिरवाणे कुटुंब आणि रांगता मुलगा घरी सोडून जाणाऱ्या लेखकाला तिथे काय सापडते? हे जाणून घेण्यासाठी जरूर वाचा – द लॉस्ट सिटी ऑफ झेड.
-
Nate Bramhandache (नाते ब्रह्मांडाचे)
मानवजातीच्या इतिहासामध्ये माणसाचे आणि ताऱ्यांचे कायमच एक घट्ट नाते राहिले आहे. कधीकाळी आपल्या धार्मिक श्रद्धांवर, सत्तेच्या संरचनांवर, वैज्ञानिक प्रगतीवर आणि अगदी आपल्या जीवशास्त्रावर सुद्धा ताऱ्यांचा कितीतरी प्रभाव होता. पण मागील काही शतकांपासून आपल्या भोवतालच्या अवकाशापासून आपण स्वतःला दूर ठेवले आहे. आणि त्याची किंमत आपल्याला मोजावी लागते आहे, लागणार आहे. हे पुस्तक म्हणजे एक इतिहासाची सफर आहे. इतिहास कशाचा? तर लासकॉक्स गुहेतील आदिमानवाने काढलेल्या बैलांच्या चित्रांपासून ते ताहितियन नावाडी ताऱ्यांचा दिशादर्शकासारखा उपयोग करून प्रवास करू लागले तिथे पर्यंत. मध्ययुगीन साधू `काळाच्या` प्रकृतीला आव्हान देऊ लागले तिथपासून ते अवकाश आणि वेळ एकच असल्याचा आईनंस्टाईनला शोध लागला तिथेपर्यंत सगळ्याचा सोप्या आणि रंजक भाषेत सांगितलेला हा इतिहास आहे. लेखक असे सुचवतो आहे की आपण ज्या अवकाशाचा भाग आहोत ते अवकाश, त्याचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम, त्यातील संभाव्य प्रेरणा आणि अविष्कार यांचा आपण नव्याने शोध घेतला पाहिजे.
-
Rahasya Prachin Natarajache (रहस्य प्राचीन नटराजा
अपंग असलेला टॉम पुरातत्त्व खात्याच्या एका लायब्ररीत मोठ्या पदावर काम करत असतो. नटराजाची एक चौलकालीन मूर्ती लिलावात विकत घेण्याची संधी टॉमला प्राप्त होणार असते; पण त्या मूर्तीच्या खरेपणाविषयी टॉमला शंका असते. म्हणून त्या मूर्तीचा खरे-खोटेपणा तपासण्यासाठी तो त्याच्या भावाला, जोशला भरीला घालतो आणि इथूनच एका नाट्याला सुरुवात होते. त्या शोधासाठी इंटरनेट हॅकर असलेला जोश भारतात “NOT TOO LONG BEFORE WE CAN GET AS MANY OF THEM 3-D PRINTED.” THAT PRETTY MUCH SUMS UP JOSH WINSLOW’S FEELINGS ABOUT CLASSIC ARTIFACTS. AS A MAN OF SCIENCE AND TECHNOLOGY, HE COULDN’T CARE LESS ABOUT OLD BRONZE IDOLS. UNFORTUNATELY, HIS BROTHER TOM HAS JUST MADE ONE SUCH IDOL HIS PROBLEM. VIDYA THYAGARAJAN, A YOUNG BANKER येतो. इथे चेन्नईत त्याची भेट विद्याशी होते. विद्या आणि तो त्या नटराजाच्या मूर्तीचं रहस्य शोधायला लागतात. पुरातन वस्तू विकणाNया एका छोट्या स्टोअरपासून सुरू झालेली ही शोधयात्रा एका मोठ्या स्टोअरपाशी येते, या स्टोअरच्या मालकाचं शंकास्पद वागणं गूढता निर्माण करतं. त्यातच विद्यावर पाळत ठेवली जात असते. लंडनमधून टॉम त्यांना आवश्यक ती माहिती पुरवत असतो. विद्याचे वडीलही त्यांना मदत करत असतात. ही शोधयात्रा एका छोट्या गावातील मूर्तिकारापाशी येऊन थांबते. या मूर्तिकाराद्वारे उलगडतं का त्या नटराजाच्या मूर्तीचं रहस्य?
-
Honour Among Thieves (ऑनर अमंग थीव्हज)
१९९१ च्या आखाती युद्धात अमेरिकेने सद्दाम हुसेनचा पराभव केल्यावर, सद्दामने त्याचा बदला घेण्याचा बेत केला. सद्दामने वापरलेले सर्वांत महत्त्वाचे शस्त्र म्हणजे माणसाची हाव. अमेरिकेतल्या नामांकित गुन्हेगारांना हाताशी धरून, सद्दामने अमेरिकेचा मानबिंदू असणारा स्वातंत्र्याचा जाहीरनामा हस्तगत करण्याचा धाडसी बेत आखला आहे. त्यासाठी त्याने शंभर मिलियन डॉलर्सचे आमिष गळाला लावले आहे. जाहीरनाम्याची मूळ प्रत ताब्यात घेऊन, अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी जगभरातील वार्ताहर बोलावून त्यांच्यासमोर त्याचे जाहीर दहन करायची सद्दामची योजना आहे. सद्दामच्या या कारस्थानात अडथळा आहेत दोन व्यक्ती. स्कॉट ब्रॅडली, एकीकडे येल विश्वविद्यालयातील घटनात्मक कायद्याचा विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि दुसऱ्या बाजूला सीआयएचा उगवता तारा, जो कधीचाच प्रत्यक्ष कामगिरीवर जाण्यासाठी उत्सुक आहे. दुसरी आहे हान्ना कोपेक, मोस्साद या इस्रायली गुप्तहेर संस्थेची देखणी हस्तक; १९९१ च्या युद्धात तिने तिचे अख्खे कुटुंब गमावलेले आहे. सद्दामचा सूड हे आता तिच्या आयुष्याचे एकमेव ध्येय आहे. शह-काटशह, कट-कारस्थाने आणि वळणावळणांनी भरलेली ही वेगवान कथा वाचकांना खिळवून ठेवते.
-
Dreams Of Joy (ड्रीम्स ऑफ जॉय)
जॉय ही एकोणीस वर्र्षांची मूळ चिनी वंशाची मुलगी अमेरिकेतून चीनमध्ये येते, झेड. जी. या तिच्या चित्रकार असलेल्या वडिलांना शोधण्यासाठी. झेड.जी. तिला भेटतात. ती त्यांच्याबरोबर एका खेड्यात जाते. तिथे ताओ नावाच्या शेतकरी मुलाशी लग्न करते. तिला मुलगी होते; पण खेड्यातील कष्टप्रद जीवन, तिच्या नवNयाचं आणि त्याच्या कुटुंबाचं स्त्रीद्वेष्टेपण तिला रुचत नाही. तिच्या खेड्यावर ओढवलेल्या उपासमारीच्या संकटात ती, तिचा नवरा आणि मुलगी मरणाच्या दारात जातात; पण तिला शोधत अमेरिकेहून चीनला आलेली तिची आई पर्ल आणि झेड.जी. त्यांना तिथून बाहेर काढतात आणि वाचवतात. आता या सगळ्यांना चीनमधून कायमचं निसटून हाँगकाँगला जायचं असतं; मात्र सरकारच्या जाचक धोरणांमुळे ते महाकर्मकठीण असतं. कसं पार पाडतात ते हे दिव्य? शेवटी ते हाँगकाँगला पोचतात की नाही? कम्युनिस्ट राजवटीच्या पाश्र्वभूमीवरील, स्थलांतरितांच्या आणि स्थानिकांच्याही गळचेपीचं, शोषणाचं विदारक चित्रण करणारी कादंबरी.
-
The Women In The window (द वूमन इन द विंडो)
२४ ऑक्टोबर रविवारपासून सुरू होणाऱ्या या कहाणीची नायिका आहे, मॅनहॅटनमध्ये एका भव्य घरात एकटीच राहणारी, बाल मानसशास्त्रज्ञ असलेली, ३८ वर्षांची अॅना फॉक्स! सुरुवातच अॅनाच्या हेरगिरीपासून होते. ती स्वतःच्या घरातून आजूबाजूच्या घरांवर आणि त्यातल्या लोकांवर आपल्या कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवून असते. गेले दहा महिने तिने स्वतःच्या घराचा उंबरादेखील ओलांडलेला नसतो. अॅगोराफोबिया असल्याने घरातून बाहेर पडण्याची तिला नेहमी भीती वाटत असते. तशीच ती सातत्याने अगदी सराईतपणे मद्यपान करते. तिला जुन्या जमान्यातले उत्तमोत्तम कृष्ण-धवल चित्रपट पाहण्याचा छंद आहे. तिने आपल्या तळघरामध्ये डेव्हिड नावाच्या एका पेइंग गेस्टला राहायला जागा दिलेली आहे. तिच्या बोलण्यामधून समजते की, तिचा नवरा एड आणि ८ वर्षांची तिची मुलगी ऑलिव्हिया हे दोघेही तिच्यापासून दूर कुठेतरी राहत आहेत आणि ती त्यांच्याशी संपर्क ठेवून आहे. अॅनाचे डॉक्टर आणि बिना ही तिचा व्यायाम घेणारी स्त्री हे दोघे अॅनाच्या घरात अधूनमधून ठरावीक काळाने येत असतात. त्यांना अॅनाबद्दल काळजी वाटते.
-
Setubandhan (सेतुबंधन)
रामाच्या जन्मापासून ते त्याने जलसमाधी घेईपर्यंतचा त्याच्या जीवनाचा समग्र प्रवास या कादंबरीतून चित्रित केला आहे. अर्थातच विश्वामित्रांच्या सान्निध्यातील राम-लक्ष्मण यांचे जीवन, राम-सीता आणि रामाच्या अन्य बंधूंचा विवाह, रामाच्या राज्याभिषेकाची दशरथाने केलेली घोषणा, त्यावर वैÂकयीने रामाला चौदा वर्षं वनवासात पाठवण्याचा धरलेला हट्ट, राम-लक्ष्मण सीता यांचं वनवासातील जीवन आणि वनवासादरम्यानच्या घटना...जसे रामाने केलेला अहल्येचा उद्धार...रावणाने सीतेचं केलेलं अपहरण...हनुमान-सुग्रीवासह रामाला भेटलेली वानरसेना...राम-रावण युद्ध...रावणाचा मृत्यू...सीतेचं अग्निदिव्य...राम-लक्ष्मण-सीतेचं वनवास संपून अयोध्येत आगमन...रामाचं राज्यारोहण...लोकापवादावरून गर्भिणी सीतेचा रामाने केलेला त्याग...रामाने केलेल्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी लव-कुश या त्याच्या पुत्रांशी त्याची झालेली भेट...आणि कालांतराने रामाची झालेली अवतारसमाप्ती...रामायणातील मुख्य आणि उपकथानकांमधून निर्माण झालेल्या उत्कट भावनाट्याचा नवरसपूर्ण आविष्कार
-
Maza Anand (माझा आनंद)
प्रसाद ओक यांना ‘धर्मवीर’सारख्या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीतला ‘टर्निंग पॉइन्ट’ होता तो आनंद दिघे साहेब यांचं व्याQक्तमत्त्व पडद्यावर साकारण्यासाठी त्यांना किती मेहनत घ्यावी लागली, मग मेकअप असो, २८ दिवसांत साडेसात किलो वजन घटवायचं असो, शूटिंगदरम्यानची धावपळ असो विंÂवा प्रत्येक शॉटसाठी तयार होणं असो त्यांनी या रोलसाठी घेतलेले अपार कष्ट त्यांच्याबरोबरच्या प्रत्येक घटकाचं (दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माता मंगेश देसाई इ.) या चित्रपटासाठीचं योगदान त्या सगळ्यांबद्दलची कृतज्ञता चित्रपटाबाबत आणि त्यांच्या अभिनयाबाबत मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया आनंद दिघे साहेबांचे शिष्य माननीय एकनाथ शिंदे (आताचे मुख्यमंत्री) त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी या चित्रपटासाठी, प्रसाद ओक यांना त्यांच्या भूमिकेसाठी दिलेलं आत्मिक बळ थोडक्यात, ‘धर्मवीर’साठी निवड झाल्यापासून ते चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानचा प्रवास, अनुभव आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मनात उठलेले भावतरंग म्हणजेच ‘माझा आनंद.’
-
Tell Tale (टेल टेल)
जेफ्री आर्चरच्या चौदा कथांचा हा अनुवादित संग्रह आहे. ‘मेअरला कुणी मारलं?’ या कथेतला तरुण डिटेक्टिव्ह जेव्हा नेपल्ससारख्या मोठ्या शहरातून इटलीतल्या, डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका नितांत रमणीय खेड्यात शोधकार्यासाठी येऊन पोहोचतो, तेव्हा तिथे काय घडतं, ते प्रत्यक्षच वाचा. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मुलाचं संपूर्ण आयुष्य एका प्रसंगानंतर क्षणार्धात कसं बदलून जातं, ते ‘दमास्कसच्या वाटेवर’ या कथेत वाचा. ‘सद्गृहस्थ आणि पंडिता’ या कथेत १९३०च्या दशकात आय. व्ही. लीग युनिव्हर्सिटीमध्ये पुरुषांना आव्हान देण्यासाठी उभ्या ठाकलेल्या विदुषीची कहाणी वाचा आणि एक तरुण विद्यार्थिनी एका म्हाताऱ्याच्या कारमधून लिफ्ट घेऊन जेव्हा कॉलेजला परत जायला निघते, तेव्हा त्या तासाभराच्या प्रवासात तिला नेमकं भेटतं तरी कोण, हे जाणून घ्या ‘वाया गेलेला तास’ या गोष्टीतून. धक्कादायक शेवट असलेल्या रोचक कथांचा वाचनीय संग्रह.