-
Agnihotra(अग्निहोत्र)
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान !. महासंहारक अण्वस्त्रांचा वापर होईल, अशा तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग उभे आहे. अण्वस्त्रांपासून निघणार्या किरणोत्सर्गाचा प्रभाव नष्ट करू शकेल, असा सोपा, अल्प वेळेत होणारा यज्ञविधी म्हणजे ‘अग्निहोत्र’ ! या ग्रंथाद्वारे अग्निहोत्राचे महत्त्व समजून घ्या आणि आपत्काळात परिवाराचे रक्षण करा !
-
Devpujepurvichi tayari
पूजास्थळाची शुद्धी करण्याचे महत्त्व, पूजेला बसण्यासाठी पूजकाने पाटाचे आसन का घ्यावे ? निर्माल्य काढतांना ते अंगठा आणि अनामिका यांनीच का उचलावे, निर्माल्य काढल्यावर पूजकाने त्याचा वास कशा प्रकारे आणि का घ्यावा इत्यादी माहिती या ग्रंथातून करून देण्यात आली आहे.
-
Dharmantar An Dharmantaritanche Suddhikaran-Hindu(
'हिंदू जनजागृती समिती' पुरस्कृत ग्रंथ !. भाग १. 'धर्मरक्षण 'विषयक ग्रंथमालिका - धर्मांतर १
-
Sadhana(साधना)
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान !. भाग ३. पदवीपूर्व स्तरावरील अध्यात्मशास्त्र - खंड ११. साधना १. धर्माचरणाला साधनेची जोड देण्याची आवश्यकता, सकाम साधनेपेक्षा निष्काम साधना अधिक महत्त्वाची असण्याची कारणे, साधना कोणती करावी हे स्वतः का ठरवू नये, गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याचे महत्त्व, षड्रिपू आणि अहं यांमुळे साधनेत कशी हानी होते, यांविषयीचे विस्तृत विवेचन या ग्रंथातून करण्यात आले आहे.
-
Sant Bhataraj Maharaj Amrutmahotsav,Dehatyag Va Ut
प.पू. भक्तराज महाराज यांनी (बाबांनी) सांगितल्यानुसार ‘अमृतमहोत्सव’ अपूर्व होण्यामागील कारणे, बाबांच्या देहत्यागाविषयी भक्तांना मिळालेल्या पूर्वसूचना, बाबांच्या देहत्यागापूर्वी घडलेल्या सूचक घटना आणि स्वप्नदृष्टांत यांविषयीची माहिती या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच उत्तराधिकारी ‘प.पू.रामानंद महाराज’ यांची गुणवैशिष्ट्येही यात अंतर्भूत करण्यात आली आहेत.
-
Devsbhasha,Vaspati An Parani,Tasech Anya Lok Yanch
शुद्ध भाषा, तसेच देवनागरी लिपी यांचे महत्त्व, मानवांची भाषा आणि देवतांची भाषा यांतील भेद, भाषानिर्मितीविषयी पाश्चात्त्यांचे अयोग्य अनुमान, सप्तलोक, सप्तपाताळ अन् सप्तनरक येथील भाषा, जिवाणू, जंतू, वनस्पती, पक्षी आणि पशू यांच्या भाषा यांविषयीचे एकत्रितपणे कुठेही उपलब्ध नसलेले ज्ञान या ग्रंथातून आपल्याला मिळते.
-
Dhyasparva(ध्यासपर्व)
रावसाहेबांच्या जीवनाचा आलेख प्रामुख्याने संघर्ष आणि लढे यांनीच चितारलेला आढळून येतो. जे मनाला आणि बुद्धीला भावले, त्याची सदोदित पाठराखण केली. जे भावले नाही, त्याच्या विरोधात परिणामाची क्षिती न बाळगता उभे ठाकले. फुले, गांधीजी आणि कर्मवीर अण्णाना अभिप्रेत असणारी समाजिक व्यवस्था निर्माण करण्याचा जीवनभर ध्यास घेतला. या ध्यासापोटी सत्ता आणि मत्ता यांच्यापासून जाणीवपूर्वक आणि निग्रहाने दूर राहिले. इतकेच नाही तर सर्व समाजिक आणि शैक्षणिक कार्यांत कोणाकडून पै - पाव आण्याची अपेक्षा न करतना पदरमोड करून तनमनधनाने सहभागी झाले. एका ध्येयवादी, संवेदनशील व्यक्तीने जीवनातील अनुभूतींचे केलेले कथन.
-
Tejshalaka-Irena Sendler(तेजशलाका- इरेना सेंडलर)
नाझी भस्मासुर हिटलर आणि त्याच्या अनुयायांचा हिंस्त्र व क्रूर नंगानाच चालू असताना तब्बल अडीच हजार ज्यू बालकांचा प्राण वाचवणार्या शूर महिलेची ही गोष्ट. इरेना सेंडलर या त्या तेजस्वी महिलेचे अलीकडेच निधन झाले. ती मावळतीकडे जात होत होती तसतसे तिचे दुसर्या महायुद्धातले हे अलौकिक शौर्य जगाला कळत गेले. ही ओघवती कहाणी श्वास रोखून धरायला लावते. दुसर्या महायुद्धाच्या छळछावणीतून अडीच हजार ज्यू मुलांना नाझींच्या तावडीतून वाचविण्याचे अद्वितीय कार्य करणार्या पोलिस महिला इरेना सेंडलर यांची स्फूर्ती देणारी कहाणी 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक अभिजीत थिटे यांनी या पुस्तकात कथन केली आहे ..... दुसर्या महायुद्धाचा काळ, पोलंड पुन्हा एकदा पारतंत्र्यात गेलं, रशिया आणि जर्मनीनं पोलंडचे लचके तोडले. नाझी सेना पोलंडमध्ये घुसल्या आणि सुरू झालं एक विनाशपर्व, मानवी इतिहासातील सगळ्यात काळाकुट्ट अध्याय याच काळात रचला गेला. ज्यूंचं शिरकाण सुरू झालं. वॉर्सा घेटोमध्ये लाखो ज्यूंना कोंडून ठेवलं होतं. पोलंडमधील छळछावण्या रोज हजारो ज्यूंना जाळत होत्या. घेटोमध्ये दरमहा किमान पाच हजार ज्यू मृत्युमुखी पडत होते. लहान मुलांना फूस लावून पळवून नेलं जात होतं. त्यांच्यावर वेगवेगळे वैद्यकीय प्रयोग करून पाहिले जात होते. सगळीकडे अंधार दाटून आला होता. सूर्य उगवेल की नाही, अशीच शंका वाटत होती. अशा वेळी एक पणती धीटपणे उभी राहिली. या अंधाराला भ्यायलेलेल्यांना धीर देत राहिली. त्या पणतीचं नाव होतं इरेना सेंडलर. स्वत:च्या जिवाचा विचार न करता अडीच हजार ज्यू मुलांना नाझींच्या तावडीतून वाचविणारी धीट आई. नाझींच्या छळाला तोंड देत, स्वत: मृत्यूच्या दारी पोहोचलेली असतानाही मानवता धर्माचाच विचार करणारी अखिल मानवतेची आई.