-
Explaining Life Through Evolution (एक्सप्लेनिंग लाईफ थ्रू इव्हॉल्युशन)
उत्क्रांतीची तत्त्वे आणि प्रक्रिया या विषयावरील हे अतिशय वाचनीय पुस्तक आहे. या पुस्तकात उत्क्रांतीविषयीचे मार्गदर्शन अगदी सोपेपणाने आणि हसत खेळत केले आहे म्हणजे ते काय आहे आणि काय नाही, ही प्रक्रिया कशी काम करते, खास करून सध्याच्या काळात तिचे महत्त्व काय आहे हे लेखक विषद करतात. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि ज्या कुणाला या पृथ्वीवरील जीवसृष्टी कशी निर्माण झाली, याबद्दल आश्चर्य वाटते त्या सर्वांनी वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक आहे. उत्क्रांती या विषयाचे खरे मर्म समजून घेताना ऐतिहासिक काळात तसेच सध्याच्या काळातही येणार्या समस्यांवर या ठिकाणी लेखकाने उत्तम विश्लेषणामुळे प्रकाश टाकला आहे. त्याचप्रमाणे जे लोक या क्षेत्रातील ताज्या घडामोडींवर काम करतात, त्यांच्याबद्दलही आपल्याला जागृत केले आहे. जागतिक रोगराईची संकटे आणि सामाजिक बदल यांच्यातून मार्ग काढण्यासाठी हे पुस्तक आपल्यासाठी आवश्यक आहे, तसंच ‘वंश’ ही संकल्पना जनुकीय की सामाजिक आणि कोविड 19 ही जागतिक साथ हे सध्याच्या काळातील अतिशय महत्त्वाचे विषय लेखकाने घेतले आहेत.
-
Mi HIndu Stri Ka Nahi : Majha Ladha, Majhi Kahani (मी हिंदू स्त्री का नाही : माझा लढा, माझी कहाणी)
वंदना सोनाळकर या स्त्रीवादी अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकाद्वारे त्यांनी राजकीय हिंदुत्व आणि व्यापक हिंदू धर्म या दोहोंची चिकित्सा करताना एक स्त्री, त्यातही महाराष्ट्रातील उच्चजातीय स्त्री म्हणून जन्माला येऊनसुद्धा स्वतःची धार्मिक ओळख आपण का नाकारली, याची तर्कसंगत अशी मांडणीही केली आहे. वैयक्तिक अनुभव तसेच लिखित आणि अनुभवजन्य पुराव्याआधारे त्यांनी या पुस्तकात जातकेंद्री परंपरा आणि व्यवहारांचे समीप दर्शन घडवले आहे. तसे ते घडवताना पुसरुषसत्ताक व्यवस्था आणि ब्राह्मणवाद हे हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण असल्याचा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. त्यांच्या मते, ही व्यवस्था आणि त्याआधारे प्रभाव राखत आलेला ब्राह्मणवादी धर्म मुळातूनच जातभेदी आणि स्त्रीद्वेष्टा राहिला आहे. ब्राह्मणवादी धर्माने लादलेले नियम आणि आज्ञा या दोन्ही गोष्टी प्रथा-परंपरांचे पालन करण्याकामी तसेच राजकीय हिंदुत्वाच्या विस्तारासाठी आवश्यक ठरत आले आहेत. याच रुढीकेंद्री रिवाजांचे पुढे जाऊन मुस्लिमांवरही आक्रमण होत आले आहे. वंदना सोनाळकर या पुस्तकाद्वारे हेदेखील जोरकसपणे सांगितले आहे की, भेदभाव आणि विषमता ही दोन वैगुण्ये हिंदू धर्मात अशा रीतीने आत्मसात झालेली आहेत, ज्यायोगे दैनंदिन परस्परव्यव्हारात या वैगुण्यांचे नकळत पालनही होत आले आहे आणि त्यास मान्यता मिळून ही वैगुण्ये समाजात खोलवर मुरलेलीसुद्धा आहेत.
-
Dardpur (दर्दपूर)
सन १९४७ मध्ये भयानक दंगली, जाळपोळ, अमानवीयता आणि क्रूरतेचे दर्शनहोऊन अखंड देशाचे दोन तुकडे झाले. त्यानंतर भारतातील शांतता नष्ट झाली. काश्मीर प्रश्न सतत धुमसत राहिला. सन १९८९ मध्ये याची जऊण पुनरावृत्ती झाली. श्रीनगरमधील पंडितांना हाकलले गेले. आपले घरदार, जमीनजुमला, सफरचंदाच्या बागा, गाई,गुरे सगळे काही सोडून रात्रीच्या वेळी गुचूप जम्मूला निर्वासित कॅम्पमध्ये यावे लागले. ’दर्दपूर’ कादंबरीत या सगळ्याचा वृत्तान्त लिहिला आहे.
-
Savat Adnyatache ( सावट अज्ञाताचे)
प्रत्येक कथा वाचताना तुम्हाला जाणवेल की कथेतील पात्रांवर कुठल्या तरी एका अज्ञात शक्तीचे सावट पडले आहे आणि त्यातूनच ती कथा पुढे सरकायला मदतच झाली आहे. जरी ह्या कथा गूढ, अमानवी विषय धरून लिहिल्या असल्या तरी त्यात अंधश्रद्धेला मुळीच वाव नाही. मला स्वतःला ठाऊक नाही की, कथा लिहिताना मी हा गूढ, अमानवी कथांचा बाज का निवडला ? खरे तर सर्वजण अशा कथा वाचतील की नाही, हा ही विचार मी केला नव्हता. पण लिहायला बसले की, बाप्पांच्या कृपेने आणि सरस्वती देवीच्या आशीर्वादाने मी कित्येक कथा ह्या एकटाकी लिहिल्या. म्हणजे मला सुचत जायचे आणि मी लिहित जायचे. अर्थात मी हे माझे कौतुक म्हणून सांगत नाही आहे. सतत लिहित बसल्यामुळे कंबरेचा काटा कुठे असतो ते चांगलेच कळले मला त्या दिवसात. कथा लिहून झाल्यावर ती मी माझ्या मोठ्या बहिणीला- ज्योतीला, आणि माझ्या शाळेतील दोन मैत्रिणी-तेजस्विनी कोटियन आणि अनामिका थिटे ह्यांना वाचायला द्यायचे. त्यांनी हिरवा बावटा दाखविला की, मी दुसऱ्या कथेकडे वळायचे. ह्या तिघींचे किती आभार मानू? की आभार मानून त्यांना परके का करू ? तिघीही माझ्या हक्काच्याच पण त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याशिवाय मला राहवत नाही. माझ्या 'घुमर' कथेसाठी राजपूती लहेजाची ओळख करून घेताना, माझ्या माहेरच्या दोन राजपूती शेजारणींनी- किर्ती व बेन म्हणजेच ज्योतीबाला ह्यांनी मला बरेच मार्गदशन केले, त्यामुळे त्यांचेही मनःपूर्वक आभार!
-
Sahebee Jagat (साहेबी जगात)
भक्तीच्या नऊ प्रकारांत शेवटचा टप्पा असतो अमूर्त पूजेचा, असं त्या क्षेत्रातले जाणकार सांगतात. नवविधा भक्ती म्हणजे पहिला टप्पा मूर्तीच्या वा व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवण्याचा. असं करत करत नवव्या टप्प्यावर समोर काहीच नसतं, तरी त्या काहीच नसण्याची पूजा करायची, असा. पर्यटनाचंही असंच असावं बहुधा. पहिला टप्पा हातात प्रेक्षणीय स्थळांची यादी घेऊन धावपळ करत यादीबरहुकूम एकेक स्थळ पाहिल्यावर त्या त्या नावासमोर 'टिक' करत जाण्याचा. नववा टप्पा हाती अशी कुठलीही यादी नसताना पर्यटनाचा निखळ आनंदानुभव घेण्याचा ! ताज्या इंग्लंड दौऱ्यात या टप्प्याच्या खूप जवळ जाता आलं, असं म्हणता येईल. इंग्लंडचं अंतरंग उलगडून दाखवणारी अविस्मरणीय सफर !
-
Sandanvaat (सांदणवाट)
सांदणवाट म्हणजे पळवाट नव्हे अथवा चोरवाटही नव्हे, सांदणवाट म्हणजे वेगळी वाट. आयुष्यात कायम वेगळा मार्ग अस्तित्वात असतो, मात्र तो राजमार्ग नसतो. अशी वेगळी वाट निवडून त्यावर निग्रहाने पावले टाकणे हे एक प्रकारे आव्हानही असते अन् संधीही ! जीवनाची सुरुवात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होऊनही डॉ. पंडित विद्यासागरांनी नंतरच्या आयुष्यात बहुतेक वेळा जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडली. त्यामुळे वाट्याला आलेल्या विविध अनुभवांचा लेखाजोखा मांडणारे हे प्रेरणादायी आत्मकथन
-
Maharashtracha Safarnama (महाराष्ट्राचा सफरनामा)
सारेच महाराष्ट्राच्या प्रेमात.. !! महाराष्ट्र हे नाव जरी नुसते उच्चारले, तरी आपण पर्यटनाच्या वेगळ्याच विश्वात जातो. या विश्वात इतिहास, भूगोल, सह्याद्री, मंदिरे, नद्या, जंगले, गड-किल्ले, समुद्रकिनारे, स्मारके, संग्रहालये, गावे, या साऱ्या गोष्टी सामावल्या आहेत. पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्राचे अवकाश खूप मोठे आहे. इतर राज्यांपेक्षा कांकणभर अधिक सरस आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा विविध भागांतली संस्कृती आणि वेगळेपण हासुद्धा एक अनुभवायचा भाग आहे. या राज्याला लाभलेला शिव-छत्रपतींचा इतिहास तर कळसबिंदू ठरावा. कितीतरी गोष्टींनी महाराष्ट्र समृद्ध आहे. एक जन्मसुद्धा अपुरा पडेल हे सारे डोळे भरून पाहायला. संपूर्ण महाराष्ट्र हा पर्यटनाच्या बाबतीत एका पुस्तकात कधीच मावणार नाही. या पुस्तकात विविध भागांतील निवडक ठिकाणांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्राचा हा सफरनामा निश्चितच तुम्हाला आवडेल.
-
Enjoy (एंजॉय)
गेल्या ४-५ वर्षांमध्ये कारणपरत्वे वृत्तपत्रांमध्ये आणि हौसेने दिवाळी अंकांमध्ये मी लिहिलेल्या काही लेखांचं संकलन म्हणजे हे पुस्तक होय. ह्या लेखांना सन्मानाने जागा देणाऱ्या संपादक-प्रकाशकांची मी ऋणी आहे. तसंच सध्याच्या थोड्या अवघड वाङ्मयीन वातावरणातही हे पुस्तक प्रसिद्ध करणाऱ्या नावीन्य प्रकाशनाचे श्री. नितीन खैरे आणि त्यांचे सर्व सहकारी ह्यांचीही मी आभारी आहे. लेख मराठी भाषेत, लेखिका मराठी प्रेमी, मग पुस्तकाचं शीर्षक इंग्रजी का असावं? असं विचारणारे कोणी निघतील. त्यांना उत्तर असं की, एकतर आता 'एंजॉय' हा इंग्रजी शब्द मराठी भाषेत अत्यंत प्रचलित झाला आहे. गाणं-खाणं-सभा-संमेलन- प्रवास-निवास ह्यासारख्या सर्व व्यवहारांमध्ये 'एंजॉय करा' असं उच्चरवाने सांगितलं जातं. करताकरता एंजॉय हा नुसता शब्द न राहाता वृत्ती बनत चाललीय. आसपास काहीही, कितीही, अनुकूल- प्रतिकूल असो-नसो जगणाऱ्याने त्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करावा. होणाऱ्या गोष्टी होणारच. मग पुढ्यातला क्षण मनमुराद उपभोगू का नये ? ‘एंजॉय!’ हे पुस्तक वाचणाऱ्यांनी हीच दृष्टी ठेवावी असं मी नम्रपणे सुचवेन. खुलेपणाने स्वीकारल्यास ह्या पुस्तकात दिलखुलास क्षण नक्कीच मिळतील. ते वाचकांनी घेतले, प्रसंगी माझ्याकडे नोंदवले तर मला ह्या लेखनाच्या खटाटोपाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. मग काय, करणार ना 'एंजॉय ?' -- मंगला गोडबोले
-
Bhor, Velhe, Purandhar Parisar Paryatan Margdarshika (भोर, वेल्हे, पुरंदर परिसर पर्यटन मार्गदर्शिका)
भोर वेल्हे तालुका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी नटलेल्या या परिसरात गडकोट किल्ले, शिल्पकला असलेली मंदिरे, धरणे, लेण्या, घळी, धबधबे असे वैभव आहे. याच तालुक्याला लागून वाई, महाड असे तालुके आहेत. या पुस्तकात येथील पर्यटनस्थळांचाही समावेश केलेला आहे. या सर्व पर्यटनस्थळांची माहिती व रंगीत छायाचित्रे आणि नकाशे दिलेले आहेत.
-
Technical Analysis (टेक्निकल ॲनालिसिस)
“Finowings Training & amp; Academy Pvt Ltd” ने संस्थापक, मुकुल अग्रवाल यांनी लिहिलेले हे पुस्तक, स्टॉक, इंडेक्स आणि कमोडिटी मार्केट्समध्ये तुमची एंट्री, एक्झिट आणि एक्झिट करण्यासाठी टेक्निकल अनिलिसिस कसे वापरावे हे स्पष्ट करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करते. मी जे काही शिकलो ते आणि गेल्या 18 वर्षात या मार्केटमधून अनुभवलेले, मी तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून सोप्या भाषेत समजावून सांगण्याना प्रयत्न केला आहे. ज्यांना टेक्निकल ऑनलिसिस शिकायचे आहे त्यांनी हे पुस्तक वाचायला हवे. कारण या पुस्तकाची लेखन शैली सहज समजण्याजोगी आहे. हे पुस्तक ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदारांना अशी सर्व मूलभूत आणि जटिल तंत्रे सोप्या पद्धतीने समजावून सांगेल जी त्यांना टेक्निकल ऑनेलिसिस समजून घेण्यासाठी आवश्यक असतील आणि हे पुस्तक वाचल्याने हे ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदारांना योग्य वेळी योग्य स्टॉक खरेदी करण्याचा पर्याय निवडण्यात देखील उपयुक्त ठरेल जेणेकरून त्यांना त्यांच्या स्टॉकमधून चांगला परतावा मिळू शकेल. यामध्ये समाविष्ट असलेली विविध उदाहरणे ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदारांना ट्रेड करताना सपोर्ट आणि रेझिस्टंस, मूव्हिंग ऑव्हरेज, कैंडलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न इत्यादी सारखी विविध टेक्निकल ऑनलिसिसनी तंत्र समजून घेण्यास आणि ती लागू करण्यासाठी योग्य दिशेने मार्गदर्शन करतील. या व्यतिरिक्त, या पुस्तकामध्ये ट्रेडिंग जर्नलसह पोझिशन साइडिटंग, स्टॉक पिकिंग स्ट्रेटेजीज, आद्याक्षरे सेट अप करणे आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस यासारख्या जोखीम व्यवस्थापनाचा समावेश आहे.
-
Nehruncha Bharat Itihas,Vartman Aani Bhavishya (नेहरूंचा भारत इतिहास, वर्तमान आणि भविष्य)
इतिहास आणि भारताचा सांस्कृतिक भूतकाळ याविषयी नेहरूच्या आकलनावर भर देत हे पुस्तक अशी एक खिडकी उघडतं जिच्यातून आपल्याला सांप्रदायिकतेविषयी नेहरूंची समज काय होती आणि धर्मनिरपेक्षतेविषयी त्यांची बांधिलकी कशी होती ते दिसतं. हे पुस्तक लोकशाही समाजावरील त्यांचा अढळ विश्वास आणि भारतातील लोकशाहीचं पालनपोषण करण्यात त्यांची अमूल्य भूमिका यावर प्रकाश टाकतं. तसंच स्वतंत्र, समतावादी अर्थव्यवस्था उभारत असतानाच त्याच्या जोडीला विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोनयुक्त समाजव्यवस्था उभारण्याच्या नेहरूच्या प्रयत्नांची दखलही घेत. या सर्व प्रयत्नांतूनच विसाव्या शतकातील एका महान व्यक्तिरेखेचे जीवन आणि कार्य यासंबंधी आपल्याला पुष्कळ माहिती मिळते, त्यांच्या निधनानंतर सहा दशके उलटली आहेत, इतका काळ गेल्यावरही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या मूल्यांचं प्रतिबिंच उमटलं होतं आणि त्यातील जी तत्त्वं नेहरूंनी स्वीकारली होती ती तत्त्वं आजही तेवढीच कालसुसंगत आहेत का? हे पुस्तक अतिशय रोखठोक, युक्तिवादपूर्ण आणि विचारप्रवृत्त करणारं असून ते नवभारताची मूलभूत संकल्पना शोधण्यासाठी, तिचा प्रसार करण्यासाठी आणि तिचं संरक्षण करण्यासाठी ज्या माणसाने अतिशय प्रामाणिक प्रयत्न केले त्याच्याबद्दल महत्वाची माहिती देत.
-
Hoy Hoy Warkari (होय होय वारकरी)
वारकऱ्यांनी सर्व नव्या साधनांचा स्वीकार केला तसा नव्या विचारांचा पण स्वीकार करायला हवा, असं मला वाटायचं. समाजधुरिणांनी सतत जुना विचार नवा करायचा असतो. महात्मा फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, बा. र. सुंठणकर, गं. बा. सरदार, वि. भि. कोलते, भालचंद्र नेमाडे, अरुण कोलटकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, सदानंद मोरे, आ. ह. साळुंखे यांनी वारकरी विचाराच्या संदर्भात वेळोवेळी असे नवे आयाम सादर केले. आधुनिक समजल्या जाणाऱ्या विचार व्युहातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचे वातावरण वारकरी संप्रदायानेही तयार केलेले होते. संत साहित्य म्हणजे केवळ अध्यात्मिक अवडंबर नव्हे, तर संत साहित्य म्हणजे मूल्य रुजवण्याचे प्रभावी माध्यम होते. संतांनी समाजावर, राष्ट्रावर, भाषेवर, माणुसकीवर प्रेम करायला शिकवले. धर्मविचार कधीच कालबाह्य नसतात. तसे असते तर बाबासाहेब निर्धमी राहिले असते. धर्माशिवाय समाज धारणा होत नाही. धर्माला आपली गरज नाही. आपणाला धर्माची गरज आहे. वारकरी चळवळीचा असा सर्वांगाने कुणीतरी विचार करावा असे मला नेहमी वाटायचे. वरील विचारवंतांपैकी सर्वच लेखक, कवी आणि विचारवंत होते. पण मला वाटायचं प्रत्यक्ष वारकरी संप्रदायातल्या एखाद्या कीर्तनकारानेही अशा प्रकारचा विचार करावा आणि वारकरी परंपरेला नवे परिमाण द्यावे. ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांचे ‘होय होय वारकरी’ हे पुस्तक वाचले आणि माझ्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या. अत्यंत कमी वयात ज्ञानेश्वर बंडगर महाराजांनी केलेला व्यासंग आणि कमावलेली मर्मदृष्टी ही त्यांच्या कठोर साधनेची फलश्रुती आहे. बंडगर महाराज यांचे हे लेखन परीवर्तनकारी ठरेल याची मला खात्री आहे.
-
Ishara (इशारा)
माणसातल्या पशुत्वाचं दर्शन घडवणाऱ्या दोन दीर्घकथांचा संग्रह. लेखक माधव दामले यांच्या ओघवत्या लेखनशैलीमुळे ‘प्रतिलिपी’ या ॲपवर अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या दीर्घकथांचा संग्रह वाचकांसाठी पुस्तकरूपात उपलब्ध.
-
Mahapratapi Subhedar Malharrao Holkar (महाप्रतापी सुभेदार मल्हारराव होळकर)
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार हिंदुस्थान आणि हिंदुस्थानाबाहेर करणारे आणि मराठेशाहीचा इतिहास घडवणारे काही शूरवीर होते. त्यामध्ये अग्रस्थानी असणारे सुभेदार मल्हारराव होळकर हे अत्यंत पराक्रमी, शूर, बुद्धिमान आणि धाडसी असे सुभेदार होते. धर्म, आचार, विद्या, व्यापार आणि युद्धकला या सर्वात ते पारंगत होते. सामर्थ्य, न्याय, नीतिमत्ता, महत्वकांक्षीपणा आणि स्वतःच्या मनगटाच्या बळावर या सामान्य मेंढपाळ व्यक्तीने दिल्लीचा बादशाह कोण व्हावा हे ठरवण्यापर्यंत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले. त्यामुळे एखाद्या स्वतंत्र राज्याच्या राजासारखे ते आयुष्यभर वागले. पण छत्रपती शाहू महाराज आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्यावरील निष्ठा त्यांनी अखंड जपली. एकूण ७४ परगणे मल्हाररावांच्या ताब्यात होते. प्रत्येक युद्धात मल्हाररावांनी भीम पराक्रम केला. आपल्या कारकिर्दीत ते एकूण ५२ लढाया लढले आणि त्या सर्वांमध्ये त्यांनी यश मिळवले. मराठेशाहीच्या उत्कर्षात मल्हारराव होळकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मराठेशाहीचा भगवा झेंडा अटकेपार फडकवण्यात मल्हाररावांचा सिंहाचा वाटा होता. उत्तर हिंदुस्थानात मराठेशाहीचा पाया मल्हाररावांनी बळकट केला. आपल्या राज्यात प्रशासन, शेती, जलव्यवस्था, न्याय, धार्मिक बाबी, स्थैर्य, शांतता राबवून त्यांनी शिवरायांचा लोककल्याणकारी राज्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. रघुराज मेटकरी हे प्रतिभावंत साहित्यिक आहेत. त्यांनी अनेक पुस्तके, दुमिर्ल कागदपत्रे धुंडाळून मल्हारराव होळकर यांचे हे चरित्र लिहिलेले आहे. मल्हाररावांचे हे चरित्र प्रेरणादायी आहे. मराठी वाचकांना ते नक्कीच आवडेल, असा विश्वास आहे. डॉ. देवीदास पोटे (ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक, मुंबई)
-
Avakash Peltana (अवकाश पेलताना)
कादंबरीकार प्रियांका कर्णिक यांचा हा पहिला कथासंग्रह. संघर्ष आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक द्वंद्वांचं वैविध्यपूर्ण चित्रण असणारा कथासंग्रह
-
Menduchi Mashagat (मेंदूची मशागत)
‘मेंदूची मशागत’ या देवा झिंजाड लिखित पुस्तकात गावाशी जोडलेले अनुभव, संघर्ष आणि ज्वलंत विषय मांडले आहेत. शहरात राहत असूनही त्यांच्या लेखनाची नाळ गावाशी जोडलेली आहे. वाचनसंस्कृतीचे महत्त्व ते वारंवार अधोरेखित करतात. मेंदूच्या विकासासाठी वाचन गरजेचे असून, हे पुस्तक छोट्या प्रकरणांतून अनुभवांद्वारे मौल्यवान संदेश देते. आजचा मेंदू मोबाइलमध्ये अडकला असून, तो पुन्हा डोक्यात आणण्यासाठी अशी ‘मेंदूची मशागत’ आवश्यक आहे, असे मत शरद तांदळे यांनी व्यक्त केले. – शरद तांदळे
-
Krudhyati Ek Thararak Mahasangram (कृध्यती एक थरारक महासंग्राम)
मानवतेच्या कल्याणासाठी महाभारतासमान विध्वंस पुन्हा होऊ नये, हे गरजेचे होते. याच उद्देशाने श्रीकृष्णाने दैवी अस्वे सुरक्षित ठेवण्याची सोय केली होती; परंतु सत्तेच्या लोभापायी मनुष्य कोणताही थर गाठू शकतो, हे कृष्णमृत्यूपश्चात सातशे वर्षातच समजले. कृथ्यति, हा दैवी शक्तीने भरलेला एक असा विक्षिप्त गुन्हेगार उठ्यास आला, ज्याचे लक्ष्य शत्रू राज्यातील गर्भाचा वध करणे, हे होते. हा योद्धा जर 'विद्यधुरंधर स्पर्धा जिंकून इंद्रपदी बसला, तर समग्र आर्यावर्ताचा सर्वनाश होणार हे निक्षित. या दैवी शक्तीने उन्मत्त विक्षिप्त गुन्हेगाराला छोट्याशा राज्याचा सेनापती वीरसेन रोखू शकेल का? डॉ. ऋषिकेश बोधे यांसारख्या लेखकांनी 'कृथ्यती'सारखी गहिराई असलेली साहित्यकृती साकारून मराठी फिक्शनला एक नवे परिमाण दिले आहे. या कादंबरीचे साहित्यिक मूल्य अत्यंत ठोस आहे. तिचं भाषिक सौंदर्य, मनाच्या गुंतागुंतीचा सुक्ष्म येध आणि अंतःप्रेरणेला भिडणारी तिची शैली यामुळे ही कादंबरी एक दीर्घकाळ आठवणीत राहील अशी ठरते. खरे सांगायचे तर, बऱ्याच काळानंतर एवढं शुद्ध, विचारप्रवृत्त आणि संवेदनशील साहित्य वाचायला मिळाल्याचा आनंद झाला. मराठी साहित्यात अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या सशक्त कल्पनाविष्काराच्या अभावाची जाणीव होती; पण 'कृध्यती मुळे त्या पोकळीची भरपाई झाल्याचे समाधान वाटते. आगामी काळात ह्याचे पुढील भागही येवोत, अशा शुभेच्छा.
-
Pimpalpan Part -16 (पिंपळपान भाग-१६)
आशयसमृद्ध, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका'चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणाऱ्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका'चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणाऱ्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...