-
Ganimi Kava Ajinkya Yudhdaniticha Gudh Mantra (गनिमी कावा अजिंक्य युद्धनितीचा गुढ मंत्र)
शिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती गनिमी कावा युद्ध तंत्रात इतके माहीर आणि वाकबगार होते की स्वराज्याचे कट्टर शत्रू असलेल्या मोगली सैन्याला ते हातोहात मूर्ख बनवत. डॉ. बाळकृष्ण थोर इतिहासकार, तथा कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू असामान्य योद्ध्याचे अद्ययावत गुण शिवाजी महाराजांमध्ये ठासून भरलेले होते. याबरोबरच त्यांच्यात कमालीची चपळाई होती. त्यामुळे युद्धाचा निकाल बऱ्याचदा त्यांच्या बाजूने होई. एका टोकाशी युद्ध जिंकल्यानंतर क्षणार्धात ते दुसऱ्या आघाडीवर दिसत, तिकडे हाहाकार माजवून तिकडली महत्त्वाची ठाणी ते झटपट काबीज करत असत.
-
Swarajyacha Chhava Chhatrapati Sambhaji Maharaj (स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराज)
शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा दैदीप्यमान वारसा समर्थपणे पेलणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे शंभूराजे ! इतिहासाच्या पानांवर एकीकडे तलवारीची धार आणि दुसरीकडे लेखणीची अमोघ शक्ती घेऊन वावरलेले हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व. 'बुधभूषण' सारखा संस्कृत ग्रंथ रचणारी त्यांची प्रज्ञा, आणि रणांगणावर मोगलांच्या अवाढव्य साम्राज्याला नऊ वर्षे एकाकी झुंज देणारे त्यांचे शौर्य, हे दोन्ही एकाच नाण्यात सामावलेले होते. हे पुस्तक केवळ एक राजाची कथा सांगत नाही, तर शिवरायांचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या शिवपुत्राची कथा सांगते. ज्याने स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण स्वाभिमान गहाण टाकला नाही.शिवरायांचे संस्कार, राज्यशास्त्रातील त्यांची गती आणि रणांगणावरील त्यांचा झंझावात यांचा साकल्याने वेध घेणारा हा एक प्रामाणिक प्रयत्न. ज्यांच्या पराक्रमाला मृत्यूही घाबरला, अशा अजेय योद्धा आणि महाकवीची ही गाथा......
-
Guptaher Bahirji Naik Itihasachya Panatil Adnyat Nayak (गुप्तहेर बहिर्जी नाईक इतिहासाच्या पानातील अज्ञात नायक)
मी बहिर्जी नाईक, स्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना, मी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं, पण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, मी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या. माझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी, माझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....
-
Pani Panyavha Pravas : Itihas, Vidnyan, Upyog Te Pradushanaparyant (पाणी पाण्याचा प्रवास : इतिहास, विज्ञान, उपयोग ते प्रदूषणापर्यत)
पाणी - पाण्याचा प्रवास: इतिहास, विज्ञान, उपयोग ते प्रदूषणापर्यंत (मराठी) - अच्युत गोडबोले अच्युत गोडबोले यांचे 'पाणी' हे एक मनमोहक मराठी पुस्तक आहे, जे वाचकांना एका विलक्षण साहित्यिक प्रवासावर घेऊन जाते. विशाल महासागरांवरून प्रवास करणाऱ्या जहाजाप्रमाणे, ही कलाकृती आकर्षक कथा आणि सखोल विचारांमधून मार्गक्रमण करते. आपल्या प्रभावी लेखनशैलीसाठी ओळखले जाणारे अच्युत गोडबोले, मराठी साहित्यप्रेमींना भावेल असा वाचनानुभव निर्माण करतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर खुल्या पाण्यावर एका भव्य जहाजाचे लक्षवेधी चित्र आहे, जे शोध आणि आविष्काराचे प्रतीक आहे, तसेच एका तराफ्यावर ध्यानस्थ बसलेल्या व्यक्तीचे चित्र आहे, जे प्रवास, एकांत आणि आत्मचिंतनाच्या संकल्पना सुचवते. ही विचारपूर्वक डिझाइन केलेली आवृत्ती वाचकांना तिच्या पानांमधून स्वतःच्या बौद्धिक आणि भावनिक प्रवासाला सुरुवात करण्याचे आमंत्रण देते. तुम्ही मराठी साहित्याचे जुने चाहते असाल किंवा गोडबोलेंच्या कार्याचा पहिल्यांदाच अनुभव घेत असाल, 'पाणी' हे तुमच्या संग्रहात एक समृद्ध भर ठरेल. हे पुस्तक वाचकांना दर्जेदार मराठी गद्यात रमून जाण्याची संधी देते, त्याचबरोबर भाषेच्या सीमा ओलांडणाऱ्या सार्वत्रिक विषयांचा शोध घेण्यास प्रवृत्त करते.
-
Tukobanche 51 Preranadayi Jeevansutre (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसुत्रे)
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ नसून, ते मानवी मनाचा अचूक ठाव घेणारे एक महान युगपुरुष आहेत. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्याला अंधारात प्रकाशाची वाट दाखवतात. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जगात शांत व समाधानी आयुष्य कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन तुकोबांच्या गाथेत आढळते. याच कालातित विचारांचे सार अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत मांडणारे पुस्तक म्हणजे 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे'. हे पुस्तक म्हणजे केवळ अभंगांचे संकलन नसून, ती आनंदी आणि यशस्वी जीवनाची एक गुरुकिल्ली आहे. कठीण प्रसंगात खचून न जाता हिंमतीने कसे उभे राहावे?, माणसांची पारख कशी करावी?, नातेसंबंध कसे जपावेत? आणि व्यवहारात सत्य व नीतिमत्ता कशी ठेवावी? हे या ५१ सूत्रांमधून उलगडते. तुकाराम महाराजांचे रोखठोक आणि वास्तववादी विचार आजच्या आधुनिक जीवनशैलीशी जोडून वाचकांना सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक केवळ वारकरी किंवा भक्तांसाठी नाही, तर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि गृहिणी अशा प्रत्येकासाठी आहे. नैराश्य दूर करून मनात आत्मविश्वासाचा आणि चैतन्याचा दिवा लावणारे, जगण्याची नवी उमेद देणारे हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे.
-
Zapooza (Part 4) झपूर्झा (भाग ४)
आपला भारत अनेक प्रज्ञावंत, साहित्यिक, तत्त्वज्ञ, संशोधक, संत आणि विचारवंत यांचा देश आहे. विशेषत: महाराष्ट्र हा मराठी साहित्याने सुसंपन्न आहे. मराठीतले अनेक साहित्यिक आपणाला परिचित आहेत. अण्णाभाऊ साठे, पू. भा. भावे, पु. ल. देशपांडे, जी. ए. कुलकर्णी, प्र. के. अत्रे, वि. वा. शिरवाडकर ही आणि अशी अनेक नावं आपल्या ओठांवर सहजगत्या येतात, अगदी त्यांच्या टोपणनावासकट! पण आपल्याच देशातल्या मराठीव्यतिरिक्त साहित्यिकांची यादी तितकीशी आपल्याला तोंडपाठ नसते, म्हणजे फार परिचित नाहीत! खरंतर त्यांचंही साहित्यातलं योगदान अत्यंत मोलाचं आहे. त्यांचाही साहित्यिक प्रवास जाणून घ्यावा, म्हणून हा एक प्रयत्न! झपूर्झा-४ (भारतीय) घेऊन आलंय २० उत्तम साहित्यिक आपल्याचसाठी!
-
-
Radha Bhag 2 (राधा भाग २)
राधा कादंबरीच्या पहिल्या भागात राधा आणि श्रावणीचा संवाद वाचकांनी वाचला आणि अनेक वाचकांनी अगत्याने त्यांचे उत्तमोत्तम अभिप्राय पाठवले; पण पहिल्या भागात गोष्ट संपली नव्हती... राधेने श्रावणीला सांगितलेल्या प्रेमाच्या व्याख्येत प्रेमाचे नऊ पैलू नमूद केले होते. श्रावणीने त्याबद्दल बराच विचारही केला होता; पण तिच्या आयुष्यात ती या तत्त्वज्ञानानुसार आचरण करू शकली का? असा प्रश्न अनेक वाचकांच्या मनात होता. '... आणि ते कायम सुखी आणि आनंदीच राहिले' असा कथेचा शेवट होऊ शकत नाही, असं मलाही वाटत होतं. कारण आपलं आयुष्य ही अनेक चढ-उतार, अडचणी, अनिवार्यता आणि हतबलतेने युक्त असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण कथा असते. हेच उदाहरण पहा : श्रीकृष्ण आणि राधा यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम असलं, तरी त्यांना विरह सहन करावा लागलाच. राधेसारख्या दैवी स्त्रीच्या वाट्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख आलं, तर श्रावणीसारखी सामान्य मुलगी सदैव चिंतामुक्त आणि आनंदी कशी राहू शकेल? या दुसऱ्या आणि अंतिम भागात तिच्या जीवनातील चढ-उतार वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे...
-
Mahasamrat Asmanbharari Khand-3 (महासम्राट अस्मानभरारी खंड-३)
श्री. विश्वास पाटील यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांचे साहित्यिक योगदान, विशेषत: ‘झाडाझडती’ आणि अलीकडच्या ‘नागकेशर’ या कादंबरीचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये पासीघाट (अरुणाचल प्रदेश) येथे झालेल्या तेवीस भारतीय भाषांच्या बहुभाषिक संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या कादंबऱ्या यांची अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरे होऊन त्या जनप्रिय ठरल्या आहेत. त्यांच्या ‘पानिपत’, ‘महानायक’ आणि ‘संभाजी’ या कादंबऱ्या इंग्रजीमध्ये वेस्टलँड अमेझॉन कंपनीने तर ‘झाडाझडती’ (A DIRGE FOR THE DAMMED) ही कादंबरी हॅचेट या कंपनीने प्रकाशित केली आहे. त्यांना या आधी केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार, प्रियदर्शनी नॅशनल अवॉर्ड, गोव्याचा नाथमाधव पुरस्कार, कोलकात्याचा भारतीय भाषा परिषदेचा साहित्य पुरस्कार असे साठहून अधिक साहित्य पुरस्कार गेल्या बत्तीस वर्षांत प्राप्त झाले आहेत. पाटील यांच्या साहित्यगुणांचा गौरव श्री. सुनील गंगोपाध्याय, श्री. अमिताव घोष, इंदिरा गोस्वामी अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या साहित्यिकांनी जाहीरपणे केला आहे. राज्य शासनाच्या सेवेत असताना आय.ए.एस. अधिकारी या नात्याने त्यांनी शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अनेक वर्षं रखडलेले बांधकाम चौदा महिन्यांच्या अवधीत अग्रक्रमाने पार पाडले. मराठी व इंग्रजी भाषेतील एक उत्तम वक्ते म्हणून श्री. पाटील यांनी लौकिक मिळविला आहे. शिवाय दिल्ली, लखनऊ, कोलकाता, भुवनेश्वर आदी शहरांतील लिटररी फेस्टिव्हल व इतर साहित्यविषयक समारंभांमध्ये आपल्या साहित्याचे व भाषेचे दर्शन घडविले आहे.
-
Lust For Mumbai (लस्ट फॉर मुंबई)
परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे... संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं, पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवून गिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या. चोरांची आणि थोरांचीही स्वप्नं एकजीव झाली. मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला. शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्या एफएसआयचा बाजार गरम केला गेला ! तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा...
-
Tipu Sultan Gatha Mysorechya Rajkiya Antaralachi 1760-1799 (टिपू सुलतान गाथा म्हैसूरच्या राजकीय अंतराळाची १७६०-१९७७)
टिपू सुलतान भारतीय इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तिमत्यांपैकी एक. तो शूर सैनिक, पण अपयशी रणनीतीकार आणि कट्टर धार्मिक शासक होता. पण तो खरोखरच युद्धनायक होता का? की स्वातंत्र्यसैनिक होता? त्याचे सामाजिक आणि राजकीय कार्य किती परिणामकारक होते? या आणि अशा अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकणारे हे टिपू सुलतानचे अधिकृत आणि सखोल चरित्र त्याच्या जीवन आणि कशाचे अनेक नवे पैलू उघड करते.
-
Kanchangangechya Kushit (कांचनगंगेच्या कुशीत)
कांचनगंगा शिखर आणि त्याच्या आसपासचा भूभाग म्हणजेच महाभारत काळातील किरात राजांचा प्रदेश. दऱ्यांमागून दऱ्या, घनदाट जंगलं, असंख्य प्राणी-पक्षी, मुळात हा सर्व परिसरच अस्पर्श अशा निसर्गसौंदर्यानं भरलेला आहे. येथील अभयारण्ये जगातील निसर्गदत्त वारसाहक्क स्थळांपैकी एक आहेत. जोसेफ हूकर सारखे वनस्पती शास्त्रज्ञ येथील निसर्ग सौंदर्याने भारून गेले होते. निसर्गाच्या जोडीला हा परिसर धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अंगाने देखील समृद्ध आहे. जगातील तिसरे सर्वोच्च शिखर म्हणून या कांचनगंगा शिखराला लौकिक प्राप्त झाला आहे. कांचनगंगा शिखर रांग खूप मोठी आहे. या शिखराला अनेक नावांनी ओळखतात- कांचनगंगा, खान्नचेनझोंगा, कांगचेनजुंगा इत्यादी. याच्या 'कांग-चेन-झोन्गा' या तिबेटी नावामध्ये आणखी एक अर्थ दडलेला आहे, तो म्हणजे पाच ऊर्जास्रोतांचा साठा किंवा उगम. अशा या शिखराच्या पायथ्याशी केलेली मनसोक्त भटकंती म्हणजे हे पुस्तक