-
Brave New Words (ब्रेव्ह न्यू वर्ड्स)
आपल्याला आवडो वा न आवडो, शिक्षण क्षेत्रात एआयची क्रांती दार ठोठावत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि GPT तंत्रज्ञानामुळे शिकण्याची प्रक्रिया बदलणार आहे. ती कशी, हे या पुस्तकात खान अॅकॅडमीचे संस्थापक सलमान खान सांगतात. एआयच्या या रोमांचक नव्या जगात पुढे जाण्यासाठी हे पुस्तक शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. शिक्षण क्षेत्रातील अग्रणी या नात्याने लेखक सलमान खान या अत्याधुनिक साधनांतील सूक्ष्म गोष्टी समजावून सांगतात. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात शिकण्याची व शिकवण्याची पद्धत कायमची कशी बदलणार आहे, हेही सांगतात. या ChatGPT क्रांतीकडे भीतीने पाहण्याऐवजी, पालक आणि शिक्षकांनी एआयला स्वीकारावे आणि त्याच्याशी जुळवून घ्यावे असे ते सुचवतात. खान सर यावर भर देतात की, शिक्षणात एआयचा वापर मानवी संवाद संपवण्यासाठी नव्हे, तर तो अधिक समृद्ध करण्यासाठी आहे. यामुळे पुढील गोष्टी घडतीलः प्रत्येक विद्यार्थी आपल्या सध्याच्या कामाला पूर्णपणे नवीन आणि सर्जनशील पद्धतींनी पूर्ण करू शकेल. शिकण्याची प्रक्रिया अधिक वैयक्तिक (Personalized) करता येईल. विद्यार्थ्यांचं मूल्यांकन अधिक अचूकपणे करता येईल. झपाट्याने डिजिटल होत असलेल्या भविष्याकरिता विद्यार्थ्यांना तयार करता येईल.
-
How To Control the Uncontrollable (हाऊ टू कंट्रोल अनकन्ट्रोलेबल)
“आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींना आपण जितकं जास्त महत्त्व देतो, तितकं आपलं नियंत्रण कमी होतं.” – एपिक्टेटस आयुष्यात कठीण प्रसंग येणार, हेच माणूस असण्याचं वास्तव आहे. पण त्यांना अधिक मजबूतपणे सामोरं जाण्याचा काही मार्ग असेल तर? तो मार्ग आहे, स्टोईक तत्त्वज्ञान ही प्राचीन ग्रीक विचारसरणी आजही तितकीच उपयुक्त आहे, जितकी ती दोन हजार वर्षांपूर्वी होती. याचा मूलभूत उद्देश एकच आहे तो म्हणजे, आपल्याला अधिक चांगलं आयुष्य जगायला मदत करणं. स्टोईक तत्त्वज्ञानाचं सूत्रमंत्र सांगतो: “आपण बाह्य घटनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण त्यांना कसा प्रतिसाद द्यायचा हे मात्र आपण ठरवू शकतो.” व्यावहारिक तत्त्वज्ञ आणि सल्लागार व्यक्तिमत्त्व बेन ऑल्ड्रिज स्टोईक विचारांतील १० महत्त्वाच्या तत्त्वांद्वारे तुम्हाला अधिक लवचिक, संतुलित आणि समृद्ध जीवन कसं घडवायचं हे शिकवतील. हे पुस्तक केवळ विचार करण्यासाठी नाही, तर कृती करण्यासाठी आहे. बेन तुम्हाला काही आव्हानात्मक पण उपयुक्त सरावही सुचवतात, ज्यामुळे तुम्ही स्टोईक तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरवू शकता. जसे की, • स्वतःची अँटी-बकेट लिस्ट तयार करणं • जाणूनबुजून थोडंसं अस्वस्थ अनुभव घेणं • निःस्वार्थी दृष्टीकोन विकसित करणं • स्वतःच्या मृत्यूचा विचार करणं (मेमेंटो मोरी) “तुमचं नियंत्रण तुमच्या मनावर आहे-बाह्य घटनांवर नाही. हे ओळखा, आणि तुम्हाला तुमच्यातील खरी ताकद सापडेल. – मार्कस ऑरेलियस”
-
Dnyanendriyantun Jivan (ज्ञानेंद्रियातून जीवन)
हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही, ते अनुभवण्यासाठी आहे. दैनंदिन धावपळीत आपण आपल्या विचारांमध्ये आणि इतर कामांमध्ये इतके गुंतून जातो की, आजूबाजूच्या सुंदर जगाकडे आपलं लक्षच जात नाही. लेखिका ग्रेचेन रुबिन यांच्या बाबतीतही असंच झालं. इंद्रियाच्या बाबतीतील एका धक्कादायक घटनेमुळे त्यांना अचानक लक्षात आलं की, त्या आसपासचं जग अनुभवतच नव्हत्या. त्या म्हणतात, गंध, चव, स्पर्श, दृष्टी आणि श्रवण या इंद्रियांना जाणीवपूर्वक अनुभवायला शिकलं, तर आयुष्य समृद्ध आणि आनंदी होऊ शकतं. मग त्यांनी या पंचेंद्रियांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. कसं, ते या पुस्तकात वाचायला मिळेल. या पुस्तकात, पंचेंद्रियांचं महत्त्व दैनंदिन छोट्या गोष्टींत (जसे आवडते अन्न, गाणी) आनंद शोधण्याची कला छोट्या सवयी आणि प्रयोगांमधून स्वतःला नव्याने ओळखण्याचा अनुभव वर्तमान क्षणात पूर्णपणे कसं जगायचं अधिक ऊर्जा, उत्साह आणि प्रेमाने जगण्याचा मार्ग "वर्तमान क्षणात जगण्याची प्रेरणा देणारं आणि प्रत्यक्षात उपयोगी पडणारं मार्गदर्शक" - सुसन केन, क्वाएटच्या लेखिका
-
12 Varsh Mazi Viskalit Premkatha (12 वर्षं माझी विस्कळीत प्रेमकथा)
तो ३३ वर्षांचा. ती २१ची. तो एक स्ट्रगलिंग स्टैंड-अप कॉमेडियन, ती खाजगी कंपनीमधील प्रतिभावान अधिकारी. तो पंजाबी. ती रूढीपरंपरा जपणाऱ्या जैन कुटुंबातील. तो घटस्फोटित. तिच्या आयुष्यात कधी बॉयफ्रेंडही आला नाही. खरंतर त्यांनी एकत्र यायलाच नको होतं. पण ते वेगळे राहूच शकत नव्हते. '१२ वर्षः माझी विस्कळीत प्रेमकथा' साकेत आणि पायल; वय, राहणीमान, संगोपन, विचारसरणी यापैकी कशातच साम्य नाही, तरीही ते एकमेकांकडे का आकर्षित झाले? याचं उत्तर त्यांच्याकडेही नाही. ही फक्त केमिस्ट्री आहे की मनाच्या अंतरंगातील वेगळं काही... हा निव्वळ वेडेपणा आहे, की नुसतीच वासना, की निखळ प्रेम ? वाचकांना गुंतवून ठेवणारी आणि मनोरंजक अशी ही कादंबरी. एखादी व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे हे कसं ओळखायचं, या मूलभूत आणि महत्त्वपूर्ण प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते, विशेषतः तेव्हा, जेव्हा आजूबाजूचे सगळेच लोक आणि परिस्थितीही ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नाही असं जोरजोरात सांगत असेल. भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांचे लेखक चेतन भगत यांची एक नवीन, शक्तिशाली प्रेमकथा जी तुम्हाला हसवेल, कधी कधी रडवेलही आणि प्रेमाबद्दल तुम्हाला माहीत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर पुनर्विचार करायला लावेल.
-
Yesterday Night I Killed My Husband (यस्टरडे नाईट आय किल्ड माय हजबंड)
कबुली दिली गेली आहे.... पण रहस्याची खरी सुरुवात तर आत्ता होत आहे. एका वादळी रात्री, एका दुर्गम गावात मोनिका एक धक्कादायक कबुली देतेः "काल रात्री मी माझ्या नवऱ्याचा खून केला." पण इन्स्पेक्टर तिथे पोहोचतो तेव्हा तिचा नवरा तिच्या शेजारी अगदी जिवंत उभा असतो. मग खरे काय?, मोनिका भ्रमात आहे?, खोटं बोलतेय? की या सगळ्यामागे अजूनच भयंकर सत्य दडलंय ? इन्स्पेक्टर एका अशा रहस्याच्या जाळ्यात ओढला जातो, ज्याचा सामना त्याने याआधी कधीच केलेला नसतो एक काळोखाने भरलेला प्रवास... जो भीषण रहस्यांनी व्यापलेला आहे. तुम्ही हे रहस्य उलगडू शकता का ? एक स्त्री खुनाची कबुली देते. पण ज्याचा खून झाल्याचं ती म्हणते, तो अजूनही जिवंत आहे. आणि एक सिरीयल किलर मोकाट फिरत आहे. पण सत्य तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक भयानक आहे. कोण खोटं बोलतंय?, गुन्हेगार कोण आहे? आणि खरा राक्षस कोण? गडद अंधारात लपलेली रहस्यं, थरारक वळणं आणि असा एक खुनी, ज्याला तुम्ही कधीच विसरू शकणार नाही - अशी ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. सायकोलॉजिकल सस्पेन्स आणि रहस्याचा अप्रतिम संगम असलेली यस्टरडे नाईट आय किल्ड माय हजबंड ही कादंबरी शेवटच्या हादरवून टाकणाऱ्या द्विस्टपर्यंत तुम्हाला सतत अंदाज बांधायला लावेल.
-
Krodhagni Rajendra Choal Cha(क्रोधाग्नी राजेंद्र चोल चा)
इ.स. १००१. वयाच्या ३०व्या वर्षी महमूद गझनवी साम्राज्याची सूत्रे हाती घेतो आणि आपली नजर पूर्वेकडे वळवतो. मज़हबी उन्मादाने प्रेरित होऊन, तो भारतवर्षावर (ज्याला त्या वेळी भिन्नधर्मीयांची आणि काळ्या जादूची भूमी, तसेच अमाप संपत्ती आणि कीर्तीचे स्थान मानले जात होते) अराजकता आणि हत्याकांडांची एक भयानक मालिका सुरू करतो. असा अत्याचाराचा कहर जगाने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. इ.स. १०२५. चेरा आणि पांड्यांना पराभूत केलेला, गंगा जिंकलेला, आणि वंग प्रदेशाचा अधिपती असलेला राजेंद्र चोल आपली समुद्री मोहीम श्रीविजय साम्राज्याकडे सुरू करायला तयार असतो. तेव्हाच सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचते. याच दरम्यान, अनाकलनीय लिपीतील एक प्राचीन पुस्तक त्यात दडलेली रहस्यं उलगण्यासाठी त्याच्या पालनकर्त्याला साद घालत असते. तर इकडे क्रोधाने भरलेला एक युवक युद्धासाठी अतिशय आतूर असतो. त्याचे प्रारब्ध अजून पूर्ण झालेले नाही. तो जिथे जातो, तिथे विध्वंस माजवतो आणि विनाशाच्या खुणा मागे सोडत पुढे जातो. आदिम परंपरेतील एक घातक योद्धा स्त्री, आपल्या सुलतानाच्या लालसेने भरलेल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्याची कृपा मिळवण्यासाठी आपल्या कौशल्यांचा उपयोग करते. या वैकल्पिक कालरेषेत, सोमनाथ मंदिराच्या विध्वंसामुळे चोल राजा प्रचंड क्रोधित होतो, आणि तो अचानक आपली योजना बदलतो. तो महमूदला थेट सामोरे जाण्याचा निर्णय घेतो. राजेंद्र चोलच्या या एका निर्णयामुळे भविष्य बदलेल का, भविष्यातील घौरी, खिलजी, बाबर यांना रोखता येईल का आणि वारंवार होणाऱ्या हत्याकांडांना आळा बसेल का? की भारतवर्षच अस्तित्वात राहणार नाही? ही पूर्वपक्ष, स्वयंबोध आणि शत्रुबोध यांची कथा आहे... धर्म आणि अधर्म यांच्या युद्धाची कहाणी. हे युद्ध प्रत्यक्षात कधी झाले नाही, पण झाले असते तर इतिहासाची दिशा पूर्णपणे बदलण्याची क्षमता त्यात होती.
-
Bruhad Stotra Ratnakar 464 Stotra (बृहद् स्तोत्र रत्नाकर ४६४ स्तोत्र)
बृहत् स्तोत्र रत्नाकर हा हिंदू देवतांना समर्पित ४६४ सामर्थ्यशाली आणि पवित्र स्तोत्रांचा एक व्यापक संग्रह आहे.
-
Msanvata (मसणवटा)
घकादायक शेवट हे या कादंबरीचे खास वैशिष्ठा. अनपेक्षितपणे शेवट आपल्यासमोर येतो. विजय-चंदा पाच भुयारांमधून जातानाची घटना वाचताना अंगावर काटा येतो. तसेच प्रत्येक वेळेस हाँसाका आणि तिचा संवाद आला, की अंगातून भीतीची एक लहर जाते. मातीतल्या माणसांची ही कथा, काही तरी सांगू पाहणारी, ऐकवणारी आहे. आपण नीट लक्ष देऊन ऐकले तर बरेच काही ऐकू येईल. तसे झाले तर लेखकाचा हेतू सफल होईल. कोयना धरणाच्या परिसरात या कादंबरीतली पात्रे राहतात. साहजिकच तिथली बोली. भाषा ते बोलतात. ही भाषा या कादंबरीत लेखकाने एकदम नेमकी पकडली आहे. या पात्रांचे एकमेकांशी संवाद इतके जिवंत झाले आहेत की, ती घटना आपल्यासमोर घडत आहे असे वाटते. साधी सोपी; पण खास गावरान, ठसकेबाज भाषा हे या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य. त्यामुळे त्या प्रवाहात आपणही अलगद उतरतो. हा एक नक्कीच वेगळा प्रयत्न आहे आणि तो वाचकांना नक्की आवडेल यात शंका नाही
-
Aadi Sanatan (आदी सनातन)
'आदि सनातन' हा उज्ज्वला लुकतुके यांचा कथासंग्रह मानवी जीवनातील नातेसंबंध, संस्कार, परंपरा, बदलती सामाजिक मूल्ये आणि काळानुरूप घडणाऱ्या मानसिक संघर्षांचा संवेदनशील वेध घेणारा आहे. परंपरेशी नाळ जोडूनही आधुनिक जीवनातील प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या व्यक्तिरेखांमधून लेखिकेने मानवी मनाचे विविध पैलू प्रभावीपणे उलगडले आहेत. या संग्रहातील कथा कुटुंबव्यवस्था, सामाजिक मूल्ये, प्रेम, संघर्ष, आशा, संवेदना आणि जीवनातील सकारात्मकतेचा शोध घेतात. प्रत्येक कथा वाचकाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते आणि बदलत्या काळातही माणुसकी, सहजीवन व संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करते. सहज, सरळ आणि ओघवत्या शैलीत लिहिलेल्या या कथा वास्तवाशी घट्ट जोडलेल्या असून, वाचकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळणारा विचारांचा ठसा उमटवतात. 'आदि सनातन' हा केवळ कथासंग्रह नसून, सनातन मानवी मूल्यांचा आणि जीवनदृष्टीचा अर्थ नव्याने उलगडून दाखवणारा संवेदनशील साहित्यप्रवास आहे.
-
Immediate Action (इमिडीएट ॲक्शन)
७ किंवा त्याहून कमी दिवसात चालढकलीवर मात कशी करायची ते शिका कधीही न येणाऱ्या उद्यावर तुम्ही गोष्टी ढकलत आहात का? तुमची अतिशय अवघड कामे टाळण्यासाठी तुम्ही महत्त्वाची नसलेली कामे अगोदर हाती घेता का? जर असे असेल, तर इमिडीएट अॅक्शन, हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. जगातील सर्वात उत्पादक लोक देखील कामे लांबणीवर टाकतात. आपण सर्वजण ते करतो, पण जर असे आढळले की कामे लांबणीवर टाकल्याने तुमचे चांगले होण्याऐवजी नुकसानंच होत आहे, तर त्यासाठी काहीतरी करण्याची ही वेळ असू शकते. खास करून, इमिडीएट अॅक्शन मध्ये तुम्ही खालील बाबी जाणून घ्याल:; तुम्ही चालढकल करत असल्याची नेमकी कारणे ओळखणे ( नेहमी तुम्ही जो विचार करता तसे नसते); तुमच्या चालढकल करण्याच्या नैसर्गिक सवयीवर मात करण्यासाठी एक साधी कृती योजना; तुम्ही तुमच्या मनातील गोंधळ कसा दूर करावा, ज्यामुळे तुमच्या हालचालीस, तुमच्या कामात वेग मिळेल आणि तुमच्या उद्दिष्टांकडे सहजपणे पुढे जाऊ शकाल; विचलने दूर करणे आणि एकाग्रता निर्माण करणे , आणि बरेच काही.
-
Adnyat Mumbai Bhag 2 (अज्ञात मुंबई २)
“मुबई आता पहिल्यासारखी राहिली नाही - आज साठी-सत्तरीत असलेल्या मुंबईकराच्या तोंडून अशी खंत वारंवार ऐकायला मिळत असते. परंतु मुंबई ही प्रवाही नगरी आहे. ती सतत बदलत आली आहे. मुंबईकराची प्रत्येक नवी पिढी त्या बदलांबरोबर कधी आपखुशीने, कधी नाइलाजाने मुंबईला उराशी बाळगून असते आणि मुंबई त्याला। मुंबई आणि मुंबईकराच्या या प्रेमसंबंधातूनच तर रोजच्या वावरातल्या मुंबईची कालची एखादी खूण सापडते तेव्हा तो हरखून जातो. मुंबईकराच्या मनाच्या तळाशी दडलेल्या या कुतूहलाला जागे करण्याचा प्रयत्न म्हणजेच नितिन साळुंखे यांचे 'अज्ञात मुंबई' हे पुस्तक आणि एकदा चाळवलेले ते कुतूहल पुरवणारे त्यांचे नवे पुस्तक म्हणजे प्रस्तुत 'अज्ञात मुंबई - २'. मनोविकास प्रकाशनचा पत्ता पुण्याचा असला तरी प्रकाशक अरविंद पाटकर हे अगदी गाभ्यातून मुंबईकर आहेत, याचाही हा पुरावाच. हा प्रयत्न जितका अभ्यासपूर्ण आहे तितकाच लोभस आणि कुतूहल-भूक वाढवणारा आहे. मुंबईबाहेरच्या माणसाला असलेलं मुंबईविषयीचं आकर्षण लपून राहिलेलं नाही. त्याचं रूपांतर प्रेमात होतानाही प्रत्ययाला येतच असतं... प्रस्तुत पुस्तकामुळे त्या प्रेमाला मुंबईच्या जपणुकीचंही अस्तर लावलं पाहिजे अशी भावना झाली तर मुंबई आणखी 'बाका नगरी' ठरेल... - रेखा देशपांडे