-
Akhand Sherlock Holmes-Tarkashaktiche Ayudh Part -2 (अखंड शेरलोक होम्स - तर्कशक्तीचे आयुध भाग- २)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Akhand Sherlock Holmes-Ek Avaliya Part-1 (अखंड शेरलोक होम्स-एक अवलिया भाग -१)
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत प्रथमच अखंड स्वरूपात. जशा घडल्या तशा.
-
Aabhalache Tukade (आभाळाचे तुकडे)
या विस्तीर्ण आभाळखालचा माणूस इथून तिथून जरी एकच असला तरी या आभाळाखालील निसर्ग, पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती यातून त्यानं आपलं जगणं कसं समृद्ध केलं, विकसित केलं किंवा बरबाद केलं. या सगळ्याचा धांडोळा म्हणजे जगण्याचा प्रवास ! या प्रवासात कळत नकळत आजूबाजूच्या वातावरणाचे, घटनांचे, मानवी जीवन, नातेसंबंध, नियतीचे खेळ, कला, साहित्य, विनोद किंवा राजकारण या सर्वांचे ठसे मनावर उमटत राहतात. त्यातूनच जे मनात खोलवर मुरलेलं असतं ते या ना त्या निमित्ताने शब्दांत उमटतं. प्रख्यात कादंबरी लेखक, नाटककार, अभिनेता आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या अशाच काही ललित लेखांचा संग्रह...
-
Trio (ट्रायो)
भीती ही गोष्ट माणसाच्या जन्माबरोबरच त्याच्या आयुष्याला चिकटून आलेली आहे. भीतीपेक्षा मृत्यू बरा असे म्हटले जाते; कारण मृत्यू एकदाच तुमचे प्राण हरण करतो, पण भीती पदोपदी तुम्हाला मरणाच्या दारात उभी करत असते. अशा विषयांशी निगडित कथा लिहिणाऱ्या कथाकाराकडे वेगळे कौशल्य असावे लागते ते वातावरणनिर्मितीचे. त्यात राजीव तांबे यांचा हातखंडा आहे. त्यांच्या कथांमध्ये ते आरंभापासून असा काही माहोल निर्माण करतात की वाचक त्या भीतीच्या डोहाच्या काठापर्यंत कधी येऊन पोहोचतो ते त्यालाच समजत नाही. सकस कथाबीजातून अज्ञाताच्या त्या विश्वामध्ये ते वाचकांना घेऊन जातात. मग गूढतेचे एकेक पापुद्रे उलगडायला लागतात. इथे वाचकांवरची कथाकाराची पकड थोडी जरी ढिली झाली तरी अपेक्षित परिणाम साधता येत नाही. 'ट्रायो' या कथासंग्रहातील सर्व कथा वाचल्यानंतर राजीव तांबे या कथांमध्ये वाचकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत याची साक्ष पटते.
-
Detective Alpha Aani Blue Moor Che Rahasya (डिटेक्टिव अल्फा आणि ब्लू मूरचे रहस्य)
भारतीय गुप्तचर संघटनेच्या हेडक्वार्टरमधून अत्यंत गोपनीय कागदपत्रांची चोरी झाली आहे. ती कागदपत्रे चोरणारा 'रॉ'चाच एक गद्दार एजंट मनीषकुमार बेदी हा इंग्लंडमध्ये जाऊन धडकतो. बेदीला 'रॉ'चे इतर एजंट्स ठाऊक असल्याने त्याला पकडण्यासाठी 'रॉ'ला हवाय कोणीतरी त्रयस्थ गुप्तहेर आणि पहिलं नाव समोर येतं अल्फाचं ! अल्फा इंग्लंडमध्ये पोचतो आणि तिथे केंब्रिज विद्यापीठात संशोधन करणाऱ्या त्याच्या प्रिय मित्राला प्रभवला सोबत घेतो. आणि मग सुरू होतं अॅडव्हेंचर ! अल्फा आणि प्रभव बेदीपर्यंत पोचतात, पण त्याच्या खोलीत तो मरून पडलेला आढळतो. त्याने चोरलेली कागदपत्रे गायब आहेत आणि त्याच्या मोबाइलवर एक गूढ मेसेज टाइप केलेला आहे 'फाईंड ब्लू मूर'! बेदीकडची कागदपत्रे कोणी चोरली? शत्रू राष्ट्रांच्या हातात पडण्याआधी अल्फा ती कशी मिळवणार? आणि बेदीने पाठवलेल्या गूढ मेसेजचा अर्थ काय आहे ?
-
Detective Alpha Aani Gramdevatecha Prakop (डिटेक्टिव अल्फा आणि ग्रामदेवतेचा प्रकोप)
मुंबईतून कोकणच्या वाटेवर जाताना समुद्रकिनारी, गर्द नारळ-आंब्यांच्या झाडांच्या कुशीत वसलेलं नावगाव हे गाव जितकं सुंदर, तितकेच तिथं राहणारे लोक चमत्कारिक. गावात देव कालभैरवाचं एक पुरातन मंदिर आहे. गावकऱ्यांची अशी समजूत आहे, की या मंदिरातला देव हा जागृत आहे. तो रात्रीच्या अंधारात मंदिराबाहेर पडतो आणि गावाचं रक्षण करतो. पण त्याची दृष्टी इतकी प्रखर आहे, की त्यात चुकून जर कोणी मनुष्य आला, तर तोही जळून भस्म होतो. या देवतेच्या भीतीने गावातले लोक रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडायला घाबरतात. अशा या नावगावातून अल्फाला एक गूढ निनावी पत्र येतं आणि मग सुरू होतो एक जीवघेणा खेळ. गावातले जुने मुरब्बी लोक एक एक करून मरायला लागतात आणि मंदिरातील देवतेचा प्रकोप झाला, अशी गावकऱ्यांची समजूत होते. डिटेक्टिव्ह अल्फा आणि त्याचा मित्र प्रभव यांच्यासमोर आव्हान आहे, या गावात घडणाऱ्या अनैसर्गिक, दैवी वाटणाऱ्या घटनांमागचं सत्य शोधून काढण्याचं. ते हे करू शकतील का ?
-
Detective Alpha Aani Makhamali Mohjal (डिटेक्टीव अल्फा आणि मखमली मोहजाल)
पावसाळ्यातील एक अंधारी रात्र. संदीप आपल्या कारमधून उशिरा घरी जातो आहे. वाटेत त्याला दिसते एक भिजून चिंब झालेली, साडी परिधान केलेली एक तरुण, सुंदर स्त्री. तो तिला लिफ्ट देतो, ती त्याला घरी चलण्याचा आग्रह करते. संदीपला एकूणच हा प्रकार थोडा गूढ वाटतो, पण तिच्या सौंदर्याला भाळून तो तयार होतो. ते दोघेही तिच्या घरी जातात आणि पुढे जे घडतं, त्याची संदीपने स्वप्नातही कल्पना केलेली नसते ! तो एका जीवघेण्या जाळ्यात ओढला जातो एक असं मोहजाल, जे त्याला अखेर मृत्यूच्या दारात नेऊन ठेवणार आहे. त्याच्या गळ्याभोवती सर्व बाजूंनी फास आवळला जाणार आहे. त्याला यातून वाचवू शकेल, अशी एकमेव व्यक्ती आहे, आणि ती म्हणजे डिटेक्टिव्ह अल्फा ! पण अल्फा हे कसं साध्य करेल?
-
Shitpetitun Jevha Jag Yete... (शीतपेटीतून जेव्हा जाग येते...)
क्षितिज देसाई यांच्या 'शीतपेटीतून जेव्हा जाग येते...' या कथासंग्रहातील कथा आपल्याला एका अद्भुतरम्य दुनियेची सफर घडवून आणतात. अनामिक भविष्यातील त्या काळात माणसानं अंतराळात मुक्त विहार करण्याचं कौशल्य साध्य केलं आहे. त्याच्या मदतीनं त्यानं परग्रहांवर वसाहती स्थापन केल्या आहेत. धरतीपासून तिथपर्यंतचा पल्ला कमीत कमी वेळात गाठण्यासाठीच्या वेगवान वाहतूक यंत्रणेची स्थापना केली आहे. व्यक्ती-व्यक्तींमधील संपर्कासाठी भाषेच्या किंवा मोबाईलसारख्या यंत्रांच्या माध्यमांची गरज उरलेली नाही. मेंदूंची थेट जोडणी आणि तीही कोणत्याही तारांचा किंवा अशाच साधनांचा वापर न करता, विचारांचं आदानप्रदान करत आहे. आहारासाठी अनोख्या पोषणव्यवस्थेची रुजवात केली गेली आहे. आपलं तारुण्य राखून भविष्यात प्रवेश करण्यासाठी शीतपेटीची, हायबरनेशनची सोय झालेली आहे. आपल्याला हव्या त्या काळासाठी त्यात स्वत:ला गोठवून घेऊन परत जागं करणं शक्य झालं आहे. यंत्रमानव म्हणजेच रोबो सर्व सेवांसाठी तत्पर आहेत. मानव आणि यंत्रमानव एकमेकांबरोबर गुण्यागोविंदानं नांदत आहेत. त्यांचं सहजीवन बहरलेलं आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील विस्मयकारक प्रगतीनं साकारलेल्या या अनोख्या दुनियेत निसर्गानं त्याच्यावर लादलेल्या यच्चयावत शारीरिक आणि भौतिक मर्यादा माणसानं केव्हाच झुगारून दिल्या आहेत. सुखसोईंची परमावधी गाठलेली आहे पण माणसातील हीन प्रवृत्तींवर मात करणं मात्र त्याला शक्य झालेलं नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंच्या त्याच्यावरच्या विळख्यातून सुटका करून घेण्यात तो अपयशीच ठरला आहे. त्यामुळंच याही दुनियेत चोऱ्या होतात, पण संपत्तीच्या किंवा दागदागिन्यांच्या नाही तर संगणकीय कोडच्या. फसवणूक होते, पण तिचं स्वरूप वेगळं आहे. तरीही त्या आहेत चोऱ्याच. चोरून मारून इथंही अनधिकृत कालप्रवास होतो. घुसखोरी होते. याही दुनियेत खंडणीसाठी अपहरण होतं पण ते माणसाचं नसून यंत्रमानवांचं होतं. तेही घाऊक पद्धतीनं. खंडणी रोख पैशाच्या रूपात नाही तर क्रेडिट कॉईन्सच्या स्वरूपात मागितली जाते. आतंकवाद अजूनही बोकाळलेलाच आहे, पण अतिरेकी बाहेरून येत नाहीत सुरक्षा यंत्रणेतील कोणाच्या तरी संगणकीय जुळ्याच्या रूपात घरभेदी बनून हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात सुरक्षा यंत्रणाही नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांना शोधून काढतातच.
-
Betavarche Te Dogha (बेटावरचे ते दोघं)
दोन वेगळ्या कथा… दोन वेगळ्या अनुभूती… 1. ‘बेटावरचे ते दोघं’ (Fantasy Fiction) : आपण एका निर्जन बेटावर आलो आहोत, असं एका तरुण आणि तरुणीला समजतं. ते अदल्या दिवशी रात्रीपर्यंत त्यांच्या घरातच असतात. सकाळी त्यांचे डोळे उघडतात, ते त्या निर्जन बेटावरच. तिथे ना प्राणी असतो, ना मानवी अस्तित्वाची एकही खूण. तिथून बाहेर पडण्याचा अघोरी मार्ग त्यांना समजतो, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. एकमेकांना न ओळखणाऱ्या आणि आपापल्या आयुष्यात वैवाहिक जीवनाच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या त्या दोघांना तो मार्ग सर्वथा अस्वीकार्ह असतो. 2. ‘स्मृतीविप्लव’ (Science Fiction) : इ.स.2150… ‘बैतीस्तान’ या देशात ‘विस्लोहत’ ही मूलतत्त्ववादी संघटना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे युवक आणि युवतींची स्मृती नष्ट करून त्यांच्या मनात दहशतवादी विचार रुजवण्याचं काम करत असते. त्या संघटनेतील दहशतवादी ‘लीना’ नावाच्या युवतीचं अपहरण करतात आणि तिला एका बंकरमध्ये नेतात. तिथल्या एका तरुण दहशतवाद्याच्या मनात लीनाबाबत प्रेम निर्माण होतं आणि तिच्याशी बोलल्यावर त्याच्या मनात दहशतवादाविषयी काही प्रश्नही निर्माण होतात. लीनावर स्मृती नष्ट करण्याचा प्रयोग होऊ नये, असं त्याला वाटतं; मात्र तो काहीही करू शकत नाही.
-
Muldravyanchya Jadui Duniyet (मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत)
हेमंत साने यांचे ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत!’ हे पुस्तक खरोखरच ज्ञानाचा एक उजळ दीपस्तंभ आहे. ११८ मूलद्रव्यांची माहिती एवढ्या सोप्या, प्रवाही आणि रसास्वादक मराठीत देऊन त्यांनी विज्ञानाला सामान्यांच्या दारी नेले आहे. शास्त्रीय अचूकता, सुस्पष्ट मांडणी आणि उपयुक्त परिशिष्टांमुळे हे पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे, विज्ञानप्रेमी आणि सर्वसाधारण वाचक—सर्वांसाठीच अमूल्य ठरते. विज्ञानाची गुंतागुंत सहजतेने उलगडून दाखवण्याची ही खरोखरच प्रेरणादायी किमया आहे. - पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर
-
Monalisache Smit (मोनालिसाचे स्मित)
राजकारण! प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्याला वेढून राहिलेला विषय. राजकारणाशिवाय सामाजिक जीवन असूच शकत नाही. मग कोणला त्यात रुची असो अथवा नसो. प्रत्येकाचे राजकीय मत हे असतेच. लोकांची ही मते स्वानुभवावरून, टीव्हीवरील बातम्यांवरून, वृत्तपत्रातील लेख- अग्रलेखांवरून बनत असतात. इतर कोणत्याही माध्यमापेक्षा वृत्तपत्रातील लेख- अग्रलेखांमधून तत्कालीन राजकीय घटनांचे विस्तृत विश्लेषण केले जाते. या लेखांमधून राजकीय व्यक्तींचे शह-प्रतिशह, डावपेच यांचे दर्शन तसेच राजकीय घटनांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिणामांबद्दलच्या परखड विचारांचे प्रकटीकरण होत असते. राजकीय घटनांचा, व्यक्तींचा शोध म्हणजे आपल्या सामाजिकतेचा शोध. वृत्तीप्रवृत्तींचा शोध. असा शोध घेणारे हे काही राजकीय विषयांवरील, व्यक्तींवरील विचारप्रवर्तक लेख. काही लेखांना तत्कालीन परिस्थितीचे संदर्भ आहेत. काही लेखातून राजकीय धुळवडीचे विषण्ण करणारे चित्रण आहे. तर काही लेखांतून मोनालिसाच्या स्मिताप्रमाणे गूढतेचे धुके दाट झाले आहे. आजकालच्या पुढच्या पायरीवरून या घटनांकडे, व्यक्तींकडे पाहताना या लेखांमधील विचारमंथन वाचकांना अंतर्मुख करेल.
-
Marma (मर्म)
खांडेकरांच्या परंपरेतील कथालेखक, कादंबरीकार, नाटककार आपापल्या पद्धतीने जीवनवादाचा पुरस्कार करत राहिले. सुनील मंगेश जाधव हेही याच पद्धतीने जीवनवादाचा पुरस्कार करत राहिले. सुनील मंगेश जाधव हेही याच परंपरेतील चांगले लेखक आहेत. वि. स. खांडेकर शिक्षक होते. सुनील जाधव हेही शिक्षक आहेत. राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. गेली १५ ते २० वर्षे ते कथालेखन करीत आहेत आणि त्यांचे काही कथासंग्रह यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत. 'मर्म' या त्यांच्या नव्या कथासंग्रहात दहा कथांचा अंतर्भाव असून या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांचा भूगोल, घटना आणि लोकजीवनाचं दर्शन या कथांमधून घडतं. या कथासंग्रहातील सगळ्या कथांमध्ये मला आवडलेली कथा म्हणजे 'दहेरजा' ही आहे एका नदीची गोष्ट. नदीच्या अंतरंगात परकायाप्रवेश करून लेखकानं जणू जलप्रदूषण करणाऱ्या कंपनीशी लढा दिला आहे. दहेरजा नदी ज्या प्रदेशांतून वाहते त्या सगळ्या भागाशी लेखकाची ओळख असावी, अशा वास्तववादी घटना, प्रसंग, व्यक्ती आणि त्यांचे संवाद चित्रित करण्यात लेखकानं कसूर ठेवलेली नाही. हे तरुण पुढे दहेरजा वाचवण्यासाठी कसा लढा देतात आणि त्यात ते यशस्वी होतात की अपयशी, हे वाचकांना कळायला हवं असेल तर सुनील मंगेश जाधव यांनी त्यासाठी कादंबरी लिहिली पाहिजे. -- डॉ. महेश केळुसकर
-
Side Effects (साईड इफेक्ट्स)
गूढकथा हा साहित्यप्रकार मोजक्याच लेखकांनी जाणीवपूर्वक हाताळलेला आहे. तो समजून घ्यायचा तर त्याचं भयकथा, वा रहस्यकथांपेक्षा वेगळा असणं आधी लक्षात घ्यायला हवं. गूढ हे केवळ अतींद्रिय स्वरुपाचं, दहशत दाखवणारं असत नाही, तर ते आपल्या आयुष्याशी जोडलेलंही असू शकतं. कोणतीही गोष्ट तर्काच्या पलीकडील भासण्यातून, तिच्या अनाकलनीय असण्यातून ते आकार घेत असतं, आणि आपल्याला कोड्यात पाडत असतं. आपली एखादी कृती, एखाद्या नात्यामागचे गुंतागुंतीचे अर्थ, आपण गृहीत धरत असलेल्या प्रेम वा द्वेष यासारख्या मूलभूत भावनांचं उगमस्थान, अशा कोणत्याही घटकात गूढता सामावून राहिलेली असू शकते. रामदास खरे अशा घटकांचा शोध या कथासंग्रहातून घेताना दिसतात. अपवाद वगळता खरेंच्या बहुतेक कथांची पार्श्वभूमी परिचित वळणाची आहे. वास्तववादी पद्धतीची. या व्यक्तिरेखा आपण आपल्या अवतीभवती पाहिलेल्या आहेत. पण कथेच्या ओघात या व्यक्तीरेखांच्या आयुष्यात उभे रहाणारे पेच, त्यांना ठराविक साच्यातून बाहेर काढतात. त्यांच्याकडे पाहण्याचा एक नवा, अनपेक्षित पैलू आपल्यापुढे ठेवतात, जो कथांमधला गूढतेचा धागा अधोरेखित करतो. -- गणेश मतकरी
-
Shobhadarshak Streevadacha Vividharangi Aavishkar (शोभादर्शक स्त्रीवादाचा विविधरंगी आविष्कार)
जगातील सर्व धर्मांचे प्रवर्तक पुरुष होते. येशू, पैगंबर, शंकराचार्य, जैनमुनी आणि बुद्ध पुरुष. त्यांनी स्त्री - धर्म पुरुषापेक्षा निराळा केला आणि त्यातही पुरुषाला झुकते माप दिले आणि स्त्री जीवन पुरुषकेंद्री बनण्याच्या प्रक्रियेला नैतिक अधिष्ठानही दिले. जेव्हा पुरुष प्रस्थापित धर्म नव्हते तेव्हाचे स्त्री जीवन कसे होते? पुरुषाचे जीवन कसे होते? त्यातील वेगळेपण नेमके कोणते आणि ते वेगळेपण तयार होण्यामागच्या प्रेरणा नैसर्गिक होत्या की मानवनिर्मित अशा सगळ्या प्रश्नांचा ऊहापोह आजवरच्या तत्त्वज्ञानातून, साहित्यातून, कलांमधून होत आला आहे. त्याची ओळख झाली तर आपल्या जाणिवा प्रगल्भ व्हायला मदत होईल म्हणून हा खटाटोप.
-
Swapnashilp (स्वप्नशिल्प)
प्रतिभा रानडे यांच्या लेखणीतून उतरलेला जोगिंदर पॉल यांच्या उर्दू 'ख्वाबरू' आणि इंग्रजी 'Sleepwalkers' या लघुकादंबरीचा 'स्वप्नशिल्प' हा सशक्त अनुवाद. हिंदुस्तानच्या फाळणीनंतर भारतातील कित्येक मुस्लीम पाकिस्तानात निघून गेले होते, त्यांना अजूनही मुहाजिर-निर्वासितच समजले जाते, त्या संबंधातील ही कादंबरी. यांतील प्रत्येक व्यक्तिरेखा ही एकेका वृत्ती-प्रवृत्तीचं प्रतीक आहे. त्यामध्ये वैविध्य असलं तरी त्या सगळ्या व्यक्ती 'पाकिस्तान म्हणजे काय', 'फाळणी की स्वातंत्र्य' या प्रश्नांच्या उत्तराचा शोध आपापल्या परीने घेत आहेत. कादंबरीतील मुख्य पात्र 'दीवाने मौलवी साहेब' मात्र या सगळ्यांपासून कोसो दूर आहेत. ते अजूनही पाकिस्तानची मागणी करण्यातच रमले आहेत; पण अखेरीस त्यांच्या या कल्पनेच्या राज्याचा ठिकऱ्या- ठिकऱ्या उडतात, तेव्हा त्यांना 'पाकिस्तान म्हणजे काय', ह्याची खरी जाणीव होते. मग ते दुसऱ्या कल्पनेच्या राज्यात विहार करू लागतात. मनात विषण्णतेबरोबरच करुणेची भावना जागी करणारी, वेगळ्या दुःखाचं आणि मनोविश्वाचं दर्शन घडवणारी रंजक अशी ही कादंबरी !
-
Tufanatalya Panatya (तुफानातल्या पणत्या)
वृषाली मगदूम गेल्या साडेतीन दशकांपासून गरीब, पीडित, शोषित महिलांच्या समस्या सोडविण्याचे काम तळमळीने करीत आहे. डम्पिंग ग्राउंडवर, कौटुंबिक सल्ला केंद्रात, किंवा प्रत्यक्ष वस्तीत गेल्यावर अनेक तऱ्हेच्या समस्या घेऊन महिला येतात. या समस्यांची तड लावल्याशिवाय किंवा न्याय मिळाल्याशिवाय वृषाली स्वस्थ बसत नाही. या पुस्तकातील साऱ्याच कहाण्यांतील नायिका विलक्षण ताकदीच्या आहेत. समोर आशेचा एकही किरण नाही, आयुष्य वाऱ्यावर भिरकावून दिल्यासारखे आहे. वेदना वास्तवाच्या पलीकडच्या आहेत. अशा एका वळणावर अंतस्थ ताकदीला बाहेरच्या ताकदीचं बळ मिळतं. त्या पेटून उठतात, संघर्ष करतात, अगदी तुफानाचाही न डगमगता सामना करतात. वाट्याला आलेलं भागधेय स्वीकारून शांत संयत, चिवटपणे झुंज देत जगणं 'साकार' करत आहेत. स्त्री वर्गाच्या पलीकडे जाऊन व्यापक मानवी जीवनातील दुःख व त्यातून येणारी व्याकुळता यांचा शोध वृषालीची लेखणी घेताना दिसते. --- अजित मगदूम