-
He She It Part 1 Antar Prawas (ही शी इट भाग १ अंतर
मी आयुष्यात कुठल्या दिशेने चाललो आहे? मला आयुष्यात काय मिळवायचे आहे? सर्व भौतिक सुख, यश, असूनही मी खुश नाही. माझ्या मनात कायम एक पोकळी आहे जी कशानेही भरून निघत नाही. मी करिअर, पैसा, प्रेम, प्रॉपर्टी, सुखसुविधा, इत्यादी सगळ्या प्रकारे हे पोकळी भरून खढण्याचा प्रयत्न केला, पण तरीही एक शून्यता, रिक्तता कायम राहतेच. माझ्या आयुष्यात असे काय आहे जे साध्य करायचे राहिले आहे आणि ते साध्य केल्यावर खरंच हे पोकळी भरून निघेल का? माझ्या मनातील हे अंतर द्वंद्व कधीतरी शांत होईल का?” हे आणि असे अनेक प्रश्न, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, हळूहळू, त्याला त्याच्या आयुष्यातील, अस्तित्वातील सर्वात प्राचीन पण अत्यंत नवीन अशा एकाच प्रश्नाकडे घेऊन गेले. तो प्रश्न म्हणजे, "कोण आहे मी?" इतक्यात, पहिल्यांदाच, ‘ती’ त्याच्या मनात हळूच कुजबुजली, "चल शोधूया, तू कोण आहेस ते...! तू बाहेर सगळीकडे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलास. सगळे मार्ग पडताळून पाहिलेस. ओळखी अनोळखी सर्वांचे मत व विचार जाणून घेतले, तरीही तुला तुझे उत्तर सापडले नाही. पण, अजूनही एक मार्ग शेष आहे जिथे तुला तुझे उत्तर नक्कीच सापडेल. तो मार्ग म्हणजे स्वतःच्या मनात, अंतरात, स्वस्वरूपाचे ज्ञान शोधणे, विकसित करणे आणि कोण आहे मी? हे अनुभवाने जाणून घेणे होय. जसा बीजामध्ये वृक्ष लपलेला असतो अगदी तसेच प्रत्येक प्रश्नात त्याच्या उत्तराचे बीज दडलेले असते. आपण तुझ्याच अंतर्मनात उत्तर शोधूया. बोल, आहे का तुझी तयारी स्वतःला स्वतःमध्ये शोधण्याची?" अशा प्रकारे एका अज्ञात, अनपेक्षित, आकस्मिक, अनाकलनीय आणि अत्यंत गूढ अशा अंतर प्रवासाला सुरूवात झाली.
-
Ramachya Pavlanvar Paool (रामाच्या पावलांवर पाऊल)
नवासातल्या वास्तव्यादरम्यान राम ज्या ज्या मार्गावरून पुढे गेले त्या सर्व स्थानांचा शोध घेत प्रवास केला तर…? अशी विलक्षण कल्पना लेखकद्वयीला सुचली आणि लागलीच त्यांनी आखणी करायला घेतली. आणि मग सुरू झाला त्यांचा प्रवास… अयोध्या… दंडकारण्य… पंचवटी… किष्किंधा… रामेश्वरम आणि मग श्रीलंका… या प्रवासात त्यांना स्थानिक लोक, पुजारी, महंत भेटले. सर्वांनी रामायणाशी जोडलेल्या अनेक आख्यायिका, कथा आणि कहाण्या ऐकवल्या. त्यातील अनेक कथा या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक अभ्यासपूर्ण तसंच रंजकही झालं आहे. प्रवासात लेखकद्वयीला असं लक्षात आलं की, या कथांच्या विविध आवृत्त्या असल्या, तरी त्यांना बांधून ठेवणारी नैतिकतेची चौकट एकच आहे ! पिढ्यान् पिढ्यांपासून भारतीय जनमानसात रुजलेल्या; लोकजीवन, सांस्कृतिक-सामाजिक अवकाश आणि भक्ती-परंपरा यांच्या संचिताचा अविभाज्य भाग झालेल्या रामकथेसोबत केलेला अनोखा शोधक प्रवासानुभव… रामाच्या पावलांवर पाऊल !
-
Bharat Chin Sambandhanchi Pradirgh Kheli (भारत चीन
चीनच्या धूर्त धोरणीपणामुळे शिष्टाईच्या प्रांतात भारत चीनकडे – विशेषतः १९६२च्या युद्धानंतर संशयाच्या नजरेने पाहत आला आहे. असं असूनही या उभय देशांच्या संबंधांचं सखोल आकलन फार कमी वेळा मांडण्यात आलं. काही घटना-प्रसंगांमुळे तत्कालीन चर्चा-वादविवाद झाले, अजूनही ते होत असतात, पण त्याच्या खोलात फारसं कुणी जात नाही. भारताचे माजी परराष्ट्र सचिव तसंच चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेल्या विजय गोखले यांनी या पुस्तकात उभय देशांमध्ये झालेल्या वाटाघाटींचा, त्यामधील बदलांचा वेध घेतला आहे. भारत-चीन यांच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजपर्यंत सहा महत्त्वाच्या वाटाघाटींच्या खेळ्या झाल्या. या प्रदीर्घ वाटाघाटींच्या परिप्रेक्ष्यातून भारत-चीन संबंधांचा चिकित्सक ऊहापोह ते करतात, तसंच सद्यस्थितीकडेही पाहतात. भारताशी शिष्टाईच्या पातळीवर वाटाघाटी करताना चीन कोणते डावपेच आखतो, कोणत्या क्लृप्त्या लढवतो आणि कोणती साधनं वापरतो, याचा शोध गोखले पुस्तकात घेतात. त्याचा फायदा पुढील काळातील वाटाघाटींमध्ये भारतीय अधिकाऱ्यांना व्हावा, तसंच नागरिकांमध्ये या विषयाबद्दल जनजागृती व्हावी, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. सातत्याने बदलणाऱ्या भारत-चीन संबंधांचा विश्लेषणात्मक मागोवा घेणारं पुस्तक… भारत-चीन संबंधांची प्रदीर्घ खेळी
-
Shah Ani Katshah (शह आणि काटशह)
रुग्णावर उपचार करताना आलेल्या निरनिराळ्या अनुभवांतून मिळाला एक अमिट धडा : डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्यात विसंवाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरते वैद्यकीय व्यवसायातील चुरस ! १९८७ साली घडलेली एक सत्यकथा ! वैद्यकीय प्रवेशांमधे होणार्याा गोंधळांची ! त्याविरुद्ध आवाज उठवणार्या् लढ्याची ! प्रशासन, विद्यार्थी-पालक अन् वृत्तपत्रे यांनी एकमेकांवर आणि न्याययंत्रणेवर टाकलेल्या डावपेचांची ! या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तज्ज्ञाने घेतलेला वृत्तांतवेध :
-
Mumbai Gangwar (मुंबई गॅंगवॉर)
ही कथा आहे मुंबईची… मुंबईने पाहिलेल्या एका काव्याची. राक्षसी महत्त्वाकांक्षेची, मुंबईवर राज्य केलेल्या भाईलोकांची, त्यांच्या प्रतिस्पर्ध्याची… त्यातून निर्माण झालेल्या वैमनस्याची, खूनबाजीची आणि हे थांबवण्यासाठी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावणाऱ्या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांची, त्यांचा लगाम हाती धरणाऱ्या राजकारण्यांची… ही गोष्ट आहे सोन्या-चांदीच्या स्मगलिंगची, पाकीटमार- ब्लॅकरवाल्यांची, मटका जुगारवाल्यांची, वेश्याव्यवसाय करणाऱ्या पोरींची, दलालांची, धारावीतल्या चुलीवर रटारटा उकळणाऱ्या हातभट्टीची आणि चामड्याच्या गोदामात लपवलेल्या चरस-गांजाची… ही गोष्ट आहे शॉटकट मारून मोठी स्वप्नं पाहणाऱ्या माणसांची… ही गोष्ट आहे भरडल्या गेलेल्या मुंबईतल्या सामान्य कुटुंबांची… “जगण्याचा संघर्ष ‘खल्लास’ करण्यासाठी पाहिजे पैसा… खूप सारा पैसा आणि तो सरळ मिळत नाही, त्यासाठी पावले वाकडी टाकावी लागतात,” अशा समजुतीतून उभा राहतो काळा धंदा आणि हा धंदा कितीही ‘गंदा’ असला तरी तो करण्याची लत एकदा लागली की त्यातून सुटका नाही ! वरवर फिक्शन वाटणारी, पण नकळतपणे तुम्हाला वास्तवाच्या समोर उभी करणारी कादंबरी… मुंबई गँगवॉर!
-
Bakhar Lalitadityachi (बखर ललितादित्याची)
काश्मीरनरेश ललितादित्य मुक्तापीडचा जीवनप्रवास आठव्या शतकात संपूर्ण आशिया खंडावर लोकोपयोगी निर्माणकार्ये करणारा, ललितादित्याएवढा प्रभाव टाकणारा सम्राट झाला नाही, हे एक वास्तव आहे. ललितादित्याचे समग्र जीवन मुळातच एवढे झंझावाती आणि साहसी आहे की, लेखिकेला ते कादंबरीरूपात मांडावेसे वाटले. या कादंबरीच्या रूपाने ललितादित्याची तेजाने झळाळणारी जीवनगाथा आपल्यासमोर आली आहे. दोन स्तरांवर कादंबरी पुढे नेण्याचे आणि तिला अजून थरारक बनवण्याचे कौशल्य डॉ. लिली जोशी यांनी दाखवलेले आहे. त्यामुळे कादंबरीची वाचनीयताही वाढलेली आहे. ललितादित्याच्या जीवनाची नाळ वर्तमानाशी भिडवण्याचे लेखिकेचे कौशल्य उत्कृष्ट कादंबरीकाराचे गुण त्यांच्यात आहेत, याचे निदर्शक आहे. या कादंबरीच्या माध्यमातून भारतीय इतिहासात एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या, पण इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या ललितादित्य या महान सम्राटाकडे लक्ष वेधून घेण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक आणि अभिनंदनास्पद कार्य डॉ. लिली जोशी यांच्याकडून पार पडले आहे. बहुतेक सर्वच मराठी कादंबरीकार मराठी इतिहासातील महानायकांच्या प्रभावक्षेत्रात वावरत असताना त्यांनी थेट काश्मीरच्या इतिहासाकडे झेप घेतली आणि एक दुर्लक्षित, पण गौरवास्पद इतिहासाला वाचा फोडली, हे त्यांचे साहित्यकार्य राष्ट्रीय पातळीवर दखलपात्र आहे. संजय सोनवणी (प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक)
-
Kridapatu Te Kridamaharshi (क्रीडापटू ते क्रीडामहर
गुरुवर्य डॉ. अरुण दातार म्हणजे शरीरसौष्ठवजन उचलणे, पॉवर लिफ्टिंग, सूर्यनमस्कार या क्षेत्रांतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि वने आर्ट या क्रीडाप्रकाराचे जनका आई-वडिलांचे उत्तम संस्कार, गुरुवयांचे उत्कृष्ट मार्गदर्शन आणि मित्रमंडळींचे उत्कट प्रेम या त्रिवेणी संगमातून त्यांनी विद्यार्थिदशेतच अनेक बक्षिसांसह क्रीडापटू म्हणून अभिनंदनीय कामगिरी केली. विवाहानंतर झालेल्या भीषण अपघातात होत्याचं नव्हतं झालं सुड शरीर कायमचं जायबंदी झालं, परंतु भेटलेली देवमाणसं, कमालीची सहनशीलता आणि सुविद्य पत्नीनं शुश्रूषेसह दिलेलं मानसिक पाठबळ यांमुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. पुढे पत्नीच्या आग्रहामुळे व्यायामशाळा हेच जीवितकार्य मानून शेकडो कीडापटू घडवले. त्यांच्या विद्यार्थ्यांनी पुणे श्री ते विश्व श्री असं यश संपादन करत सूर्ण जिमची कीर्ती सर्वदूर पोहोचवली. यथावकाश सरांनाही अनेक पुरस्कारांसह क्रीडामहर्षी पदवी प्राप्त झाली. अर्थात, हा प्रवास सोपा नव्हताच. नित्य नवा संघर्ष असला, तरी असंख्यांच्या जीवनात हर्ष पेरून, आपलं बोनस आयुष्य राष्ट्रकार्यासाठी समर्पित करणारे डॉ. अरुण दातार आणि संतसाहित्य समरसून जगणाऱ्या गुरुवर्या डॉ. आरती दातार या दाम्पत्याने वळणावळणांवर भेटलेल्या मदतीच्या हातांचा ओघवत्या शैलीत परामर्श घेतला आहे. व्यायामातून आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, विवेक, शिस्त, सहकार्य, संयम, सातत्य, साधना, साहस, सेवा अशा नानाविध वैश्विक मूल्यांचं संस्करण असलेले हे हा शब्दधन प्रत्येकासाठी प्रेरक आहे. शक्ती आणि भक्तीचं प्रतीक आहे. दातृत्व आणि दूरदृष्टीचं द्योतक आहे. कृतार्थता आणि कृतज्ञतेचा परिपाक आहे. म्हणूनच 'क्रीडापटू ते क्रीडामहर्षी ही यशोगाथा नक्कीच संग्राह्य आहे. डॉ. लता पाडेकर (संत साहित्याच्या अभ्यासक)
-
Eka Phandivarchi Phakhara (एका फांदीवरची पाखरं)
तिन्हीसांज..... ना दिवस ना रात्र अशा काळाचा तुकडा.... तिघींची आयुष्यं त्या तुकड्यावर हेलकावत होती. जणू एकाच फांदीवरची तीन पाखरे । चारू, संध्या आणि पल्लवी... नवीन आयुष्याला तिघींनाही आता सामोरे जायचं होतं. निर्णय घ्यायचे होते. आपापल्या परीनं आयुष्यात रंग भरायचे होते. हाती आलेल्या पत्त्यांनिशी आयुष्याचा डाव खेळायचा होता. कसा रंगणार होता हा खेळ?...
-
Draupadi Samrajya Sthapana Part 2 (द्रौपदी साम्राज
खांडवप्रस्थ - एक उजाड माळरान, वास्तव्यासाठी प्रतिकूल... समोर आलेल्या निर्वासितांची समस्या आणि आर्थिक अस्थिरतेशी दोन हात करताना पांडवांची राज्य विस्ताराची वाटचाल, की तिचे एक आई म्हणून तिच्या मुलांसोबतचे नाते असो, या सर्व गोष्टींचा अनुभव या कथेत घ्या. या प्रवासात देविका, वलंधरा, सुभद्रा, कारेणुमती आणि विजया या घरातील कुशल, हुशार आणि मेहनती स्त्रियांनी द्रौपदीच्या आधिपत्याखाली एकत्र येऊन एका महान साम्राज्य स्थापनेसाठी आपापल्या परीने कसे योगदान दिले, हे पाहा. नारीशक्तीच्या या अफाट कर्तृत्वाच्या कथांचा आनंद घ्या...
-
Draupadi Kuruvansh Pravesh Part 1 (द्रौपदी कुरुवंश
द्रौपदीची आई, महाराणी प्रीश्ती, मानवी हक्कांची पुरस्कर्ती आणि एक चतुर राजकारणी म्हणून ओळखली जात असे. आपल्या मुलीच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि तिला खंबीर बनवण्यात महाराणींचा मोठा वाटा होता. अशा स्वतंत्र विचारांच्या राजकन्येने, माँ कुंतींनी चुकून सांगितलेली गोष्ट आंधळेपणाने कशी ऐकली असती? सर्व पांडव तिच्याशी लगेचच विवाहबद्ध होण्यास तयार झाले का? बुद्धिमान सहदेव आणि दूरदृष्टी असलेली द्रौपदी यांनी एकत्रितपणे विभाजनासाठी युक्तिवाद केला, त्याचा परिणाम म्हणून दुर्योधन हस्तिनापुराच्या सिंहासनावर कायदेशीररीत्या बसू शकला का? खुल्या आणि मुक्त विवाहाची गुंतागुंत (बहुपतित्व), सत्तेचा आणि राजकारणाचा अनाठायी प्रयत्न, असामान्य आणि विलक्षण मैत्री, सर्वसमावेशकता आणि लिंग-समानतेला सक्रियपणे प्रोत्साहन देणाऱ्या भावंडांचे एकमेकांशी असलेले बंध, अशा अनेक गोष्टी उलगडून दाखवणारी प्राचीन महाकाव्याची ही कालातीत कथा आहे. पाच भागांत उलगडत जाणाऱ्या, एका साम्राज्ञीचा जीवनपट कथेच्या रूपात सादर केलेला आहे.
-
Inuchi Gosht (इनुची गोष्ट)
एका मजुरी करणाऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेल्या युनुसचा संघर्ष हा आधीच काही कमी नव्हता. वेटर, सेल्समन, सिक्युरिटी गार्ड मिळेल ते काम करत, तो पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत अन् सोबत अधिकारी होण्याचं स्वप्नही बाळगून होता. अशात त्याच्या आयुष्यात नियतीने कॅन्सररुपी घाला घातला. आता इनु मरणार या विचाराने अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. पण आपल्या इनुकडे लढण्याची अन् आईला सुखाचे दिवस दाखविण्याची उमेदच निराळी होती. आईच्या चेहऱ्याकडे आणि संघर्षाकडे पाहून त्याला जगण्याची नवी उमेद मिळाली. आर्थिक तसेच बाकीच्या असंख्य अडचणी, त्यात अनेक असाध्य रोग एकाच वेळी त्याला झाले, अगदी मृत्यूच्या जवळ पोहोचूनही अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहण्याचा चंग बांधलेल्या इनुने हिंमतीने कॅन्सरवर मात केली. त्याची ही मात फक्त असाध्य आजार झालेल्यांनाच नाही तर माझ्यासारख्या अनेकांना आयुष्याकडे बघण्याची नवीन उमेद आणि दृष्टी तर देतेच पण कोणत्याही परिस्थितीशी लढणाऱ्या प्रत्येकाने स्वानुभव असलेली 'इनुची गोष्ट' वाचावी आणि अंर्तमनात सांगवं की संघर्ष मान्य आहे "कारण अजून मी जिंवत आहे..."
-
Vector (व्हेक्टर)
NEW YORK CITY CAB DRIVER YURI DAVYDOV IS A DISGRUNTLED RUSSIAN EMIGRE POISED TO LASH OUT AT THE ADOPTIVE NATION HE BELIEVES HAS DENIED HIM THE AMERICAN DREAM. A FORMER TECHNICIAN IN THE SOVIET BIOLOGICAL WEAPONS SYSTEM, BIOPREPARAT, YURI POSSESSES THE KNOWLEDGE TO WREAK HAVOC IN HIS NEW HOME. BUT BEFORE HE EXECUTES HIS PLANNED PIECE DE RESISTANCE OF VENGEANCE, HE EXPERIMENTS FIRST ON HIS SUSPICIOUS LIVE-IN GIRLFRIEND, THEN ON A FEW POOR-TIPPING FARES.... DR. JACK STAPLETON AND DR. LAURIE MONTGOMERY (BOTH LAST SEEN IN CHROMOSOME 6) BEGIN TO WITNESS SOME UNUSUAL CASES IN THEIR CAPACITY AS FORENSIC PATHOLOGISTS IN THE CITY'S MEDICAL EXAMINER'S OFFICE: A YOUNG, HEALTHY BLACK WOMAN DIES OF RESPIRATORY FAILURE, A GREEK IMMIGRANT SUCCUMBS TO A SUDDEN, OVERWHELMING PNEUMONIA. AT THE SAME TIME, THE PAIR ARE PRESSURED FROM ABOVE TO FOCUS ON A HIGH-PROFILE STRING OF SUSPICIOUS DEATHS OF PRISONERS IN POLICE CUSTODY. WHEN AN UNEXPECTED BREAKTHROUGH PERSUADES JACK THAT THESE SEEMINGLY UNRELATED DEATHS ARE REALLY CONNECTED MURDERS, HIS COLLEAGUES AND SUPERIORS ARE SKEPTICAL. ONLY LAURIE IS SOMEWHAT CONVINCED. BUT THE QUESTION SOON BECOMES WHETHER THE PAIR WILL SOLVE THE PUZZLE BEFORE YURI UNLEASHES INTO THE STREETS OF NEW YORK THE ULTIMATE TERROR: A MODERN BIOWEAPON. WITH SIGNATURE SKILL, ROBIN COOK HAS CRAFTED A PAGE-TURNING THRILLER ROOTED IN UP-TO-THE-MINUTE BIOTECHNOLOGY. VECTOR IS ALL-TOO-PLAUSIBLE FICTION AT ITS TERRIFYING BEST.
-
Shivnetra Bahirji Khand 4 (शिवनेत्र बहिर्जी खंड ४)
Immerse yourself in the gripping fourth volume of 'Shivnetra Bahirji Naik', a thrilling historical Marathi novel that brings to life the valorous tales of medieval warfare. This 2025 edition features stunning cover art depicting a dramatic horseback warrior scene set against a mystical twilight backdrop. The narrative weaves through intense battle sequences and strategic warfare, making it a compelling read for history enthusiasts and fiction lovers alike. The book's masterful storytelling transports readers to an era of swords and cavalry, where honour and duty reign supreme. Written by Prem Dhade, this volume continues the saga with rich historical detail and engaging plot developments. The dramatic cover illustration, featuring a mounted warrior with a soaring eagle overhead, perfectly captures the epic scale of this historical narrative. Perfect for readers who appreciate detailed historical fiction and enthusiasts of Marathi literature.
-
Sata Uttarachi Kahani (साता उत्तराची कहाणी)
Good read. Value for money. Do buy and read. Should not take more than a few hours to read. Entertaining. Brilliant book by VP Kale. He writes close to life. Light hearted & relaxing.