-
Independence (इंडिपेन्डन्स)
१९४६ चा भारत. बदलाचं वारं घेऊन आलेला. अशा भारतातल्या बंगालमधील राणीपूरमध्ये राहणाऱ्या डॉ. नंदकुमार यांच्या तीन मुलींची ही गोष्ट. प्रिया, जामनी आणि दीपा यांची. फाळणीच्या दंगलीत डॉ. नंदकुमार यांची हत्या होते. आणि तिघींचं आयुष्य पार बदलून जातं. प्रियाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न एका दृढ निश्चयात परिवर्तित होतं, तर दुसरीकडे जामनी आणि दीपा आपल्या आईला रजाई बनवण्यात हातभार लावून घर सावरतात. त्याचवेळी दीपा मुस्लिम लीगच्या रजाच्या प्रेमाने झपाटून जाते आणि घरदाराला अंतरते. रझासोबतच्या प्रवासात तिचा देशही सुटतो. या सगळ्यात जामनी मात्र आईचा आधार बनून राहते. पण तरीही फाळणीची झळ तिला सुखानं जगू देत नाही. या लाटेत तिन्ही बहिणींचं आयुष्य हेलकावे खात राहतं. या तीन बहिणींची गोष्ट वेगवान कथानकासोबत आणि अंगावर शहारे आणणाऱ्या घटनाक्रमाने अचंबित करत राहते.
-
Dnyanyogi Eknath (ज्ञानयोगी एकनाथ)
संत एकनाथांच्या जीवनावरची ही कादंबरी आहे. एकनाथांच्या घराण्याची पूर्वपीठिका, त्यांचं जन्मरहस्य, त्यांचा जन्म ते त्यांनी घेतलेली जलसमाधी इथपर्यंतचा प्रवास या कादंबरीतून उलगडला आहे. एकनाथांचं बालपण, त्यांचा गुरूशोध, जनार्दन स्वामींशी त्यांची झालेली भेट, त्यांच्या सहवासात बहरत गेलेली त्यांची प्रतिभा, शूलभंजन नावाच्या छोट्याशा पर्वतावर त्यांनी केलेली तप:साधना, त्यांनी वेळोवेळी रचलेले अभंग, भारुडं, गवळणी, चतु:श्लोकी भागवताचं मराठीत केलेलं भाषांतर, चातुर्वर्ण्य, शिवाशिव, अस्पृश्यांना मिळणारी वागणूक याबद्दल त्यांनी वेळोवेळी आपल्या आचरणातून-बोलण्यातून व्यक्त केलेली नाराजी, त्यामुळे त्यांना सनातन्यांचा झालेला विरोध, गिरिजेशी झालेला विवाह, ज्ञानेश्वर-माउलींच्या समाधीचा जीर्णोद्धार आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्याचं एकनाथांच्या हातून घडलेलं कार्य इ.प्रसंग-घटनांतून त्यांचं संपन्न गृहस्थाश्रमी आणि आध्यात्मिक जीवन उलगडत जातं. एकनाथांच्या जीवनावरची रसाळ, भावसंपन्न कादंबरी.
-
Iravati Karve (इरावती कर्वे)
डॉ.इरावती कर्वे.पहिल्या भारतीय स्त्री मानव शास्त्रज्ञ! १९२८-३० च्या काळात जर्मनीत जाऊन त्यांनी ‘शारीर मानवशास्त्र’ या विषयात पीएचडी मिळवली आणि आपल्या संशोधनातून तत्कालीन जर्मनीतील वंश श्रेष्ठत्वाच्या सिद्धांतला आव्हान दिले. भारतात परतल्यावर आपल्या 'शारीर मानवशास्त्रा' च्या अभ्यासाला त्यांनी 'सांस्कृतिक मानवशास्त्र' भारतविद्या, 'वांशिक-एतिहासिक' आणि पुरातत्वशास्त्र अशा विविध ज्ञानशाखाची जोड दिली. परिणामी मानवशास्त्राचा त्यांचा अभ्यास बहुपेडी झाला. 'जात म्हणजे विस्तारित नातेसंबंधांचे वर्तुळ' अशी जातीची व्याख्या करून जातियुक्त समाजाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी त्यांनी रंगीबेरंगी गोधडीचा दृष्टांत दिला... यातूनच 'किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया ' व हिंदू सोसायटी : अँन इंटरप्रिटेशन ' हे मौलिक ग्रंथ आकाराला आले. जे आजही जगभरातील मानवशास्त्र - समाज शास्त्राच्या अभ्यासकांकडून अभ्यासले जातात.' मराठी लोकांची संस्कृती ', ' आमची संस्कृती ', ' संस्कृती ' या ग्रंथातून त्यांनी मराठी संस्कृतीचा शोध घेतला . तसेच व्याख्याने व वैचारिक लेखामधून नवसमाजरचनेचे प्रारूप उभे केले. एव्हढेच नव्हे तर , शारीर सांस्कृतिक मानवशास्त्र व समाजशास्त्र यात काम करणारी विद्यार्थ्यांची एक पिढी घडवली. डॉ. इरावती कर्वे म्हटले की चटकन त्यांचे ' युगांत ' आठवते. त्याशिवाय अनोख्या वाटेवरच्या ललितलेखिका म्हणूनही इरावती कर्वे यांचे नाव आदराने घेतले जाते.परंतु त्यापलीकडे जाऊन ' भारतातील आद्य स्त्री मानव शास्त्रज्ञ ' ही त्यांची ओळख अधिक ठसठ शीत करण्याचा प्रयत्न , म्हणजे त्यांचे हे चरित्र !
-
Aag (आग)
प्रत्येकच माणसात देव आणि दानव दोघांचा अंश असतो. कोणतीही दुर्घटना माणसाची जणू परीक्षाच घेत असते. अशा प्रसंगातच माणसात किती देवत्व आहे आणि किती दानवत्व आहे, ते समजून येते. दुर्घटनेच्या काळातच माणसातलं देवत्व किंवा दानवत्व खऱ्या अर्थाने बाहेर येतं. आग ही कादंबरी सत्य घटनेवर आधारित आहे. एका धार्मिक कार्यक्रमात दोनशेहून अधिक लोकांचा आगीत होरपळून जीव गेला होता. त्या दुर्घटनेत लोकांचं काय झालं असेल, त्यांची स्थिती कशी झाली असेल, त्याचा विचार यात केला आहे. एखादी दुखद घटना माणसाला कसं हादरवून टाकते, ही त्याची गोष्ट आहे. ही वेदनेची गोष्ट आहे. माणसाच्या नातेसंबंधांचे पदर उलगडवून दाखवणारी ही गोष्ट आहे. एखाद्या दुखद घटनेचा माणसाचा असणारा संबंध सांगणारी ही गोष्ट आहे. ही माणसातल्या देवत्वाची आणि दानवत्वाची गोष्ट आहे.
-
Faceless Facebook (फेसलेस फेसबुक)
फेसलेस फेसबुक : हा विस्तीर्ण पोकळीतील कुशल माणसांचा सतेज चेहरा आहे. ज्या दोन हातांनी या विश्वनिर्मितीत मोलाचं योगदान दिलं, त्या हातांचं निर्विवाद प्रतिनिधित्व आहे. लेखकाने शोधलेली माणसं केवळ काळजात कोलाहल करत नाहीत, तर आपलं स्वतंत्र घर करुन राहतात. ज्या माणसांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास काळाच्या ओघात नजरेआड होतो, नेमकी तीच माणसं लेखकाला दिसतात आणि लेखक आपल्यासमोर त्यांचं जग रेखाटतो. 'फेसलेस फेसबुक' मध्ये लिहलेली सगळी पात्रं आपल्या अवतीभोवती खोल रुजलेली आहेत. बन्याचदा ती माणसं आपल्या सगळ्यांची सावलीसुद्धा झालेली आहेत. पण आपल्याकडून ती दुर्लक्षिली गेली आहेत. त्या माणसांच्या सावलीची कृतज्ञता लेखकाने शब्दात व्यक्त केली आहे. मनोरंजनाचा विडा उचललेला सोंगाड्या बालम, जुन्या वस्तूंशी नातं जोडलेला संग्राहक भगवान, चळवळ जिवंत रहावी यासाठी अहोरात्र झगडून मेलेला राजाराम, माय भगिनींच्या सेवेला आयुष्य समर्पित केलेला अमोल, कुस्तीसाठी जगलेला आणि बैलांसाठी राबलेला मल्हारी अशी सगळी पात्रं डोक्यात झिणझिण्या आणून सोडतात. काळजाची तार छेडतात. या सगळ्या माणसांना समाजाने न्याय दिला का ? हा सवाल उभा करतात. या सगळ्यांच्या गोष्टी मांडताना लेखकाने केलेली शब्दफेकिची जादू नक्कीच भुरळ पाडते. त्यामुळे हि पात्रं आपलीशी होऊन जातात. जगण्याच्या खोल तळाशी जाऊन माणसांच्या भावभावनांचा शोध घेतात. गावाकडील माणसांच्या जगण्यातली अस्सलता आणि त्यांच्या अफाट कर्तृत्वाची सर्जनशाळा म्हणजे 'फेसलेस फेसबुक' आहे. मला हे पुस्तक प्रचंड भावलंय. त्यामुळेच गेल्या काही वर्षातला 'व्यक्तिचित्रण' मांडणारा उत्तम लेखक म्हणून मी मारुती शिरतोडे यांच्याकडे पाहतो. शरद तांदळे
-
He She It Part 1 Antar Prawas (ही शी इट भाग १ अंतर
मी आयुष्यात कुठल्या दिशेने चाललो आहे? मला आयुष्यात काय मिळवायचे आहे? सर्व भौतिक सुख, यश, असूनही मी खुश नाही. माझ्या मनात कायम एक पोकळी आहे जी कशानेही भरून निघत नाही. मी करिअर, पैसा, प्रेम, प्रॉपर्टी, सुखसुविधा, इत्यादी सगळ्या प्रकारे हे पोकळी भरून खढण्याचा प्रयत्न केला, पण तरीही एक शून्यता, रिक्तता कायम राहतेच. माझ्या आयुष्यात असे काय आहे जे साध्य करायचे राहिले आहे आणि ते साध्य केल्यावर खरंच हे पोकळी भरून निघेल का? माझ्या मनातील हे अंतर द्वंद्व कधीतरी शांत होईल का?” हे आणि असे अनेक प्रश्न, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, हळूहळू, त्याला त्याच्या आयुष्यातील, अस्तित्वातील सर्वात प्राचीन पण अत्यंत नवीन अशा एकाच प्रश्नाकडे घेऊन गेले. तो प्रश्न म्हणजे, "कोण आहे मी?" इतक्यात, पहिल्यांदाच, ‘ती’ त्याच्या मनात हळूच कुजबुजली, "चल शोधूया, तू कोण आहेस ते...! तू बाहेर सगळीकडे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलास. सगळे मार्ग पडताळून पाहिलेस. ओळखी अनोळखी सर्वांचे मत व विचार जाणून घेतले, तरीही तुला तुझे उत्तर सापडले नाही. पण, अजूनही एक मार्ग शेष आहे जिथे तुला तुझे उत्तर नक्कीच सापडेल. तो मार्ग म्हणजे स्वतःच्या मनात, अंतरात, स्वस्वरूपाचे ज्ञान शोधणे, विकसित करणे आणि कोण आहे मी? हे अनुभवाने जाणून घेणे होय. जसा बीजामध्ये वृक्ष लपलेला असतो अगदी तसेच प्रत्येक प्रश्नात त्याच्या उत्तराचे बीज दडलेले असते. आपण तुझ्याच अंतर्मनात उत्तर शोधूया. बोल, आहे का तुझी तयारी स्वतःला स्वतःमध्ये शोधण्याची?" अशा प्रकारे एका अज्ञात, अनपेक्षित, आकस्मिक, अनाकलनीय आणि अत्यंत गूढ अशा अंतर प्रवासाला सुरूवात झाली.
-
Ramachya Pavlanvar Paool (रामाच्या पावलांवर पाऊल)
नवासातल्या वास्तव्यादरम्यान राम ज्या ज्या मार्गावरून पुढे गेले त्या सर्व स्थानांचा शोध घेत प्रवास केला तर…? अशी विलक्षण कल्पना लेखकद्वयीला सुचली आणि लागलीच त्यांनी आखणी करायला घेतली. आणि मग सुरू झाला त्यांचा प्रवास… अयोध्या… दंडकारण्य… पंचवटी… किष्किंधा… रामेश्वरम आणि मग श्रीलंका… या प्रवासात त्यांना स्थानिक लोक, पुजारी, महंत भेटले. सर्वांनी रामायणाशी जोडलेल्या अनेक आख्यायिका, कथा आणि कहाण्या ऐकवल्या. त्यातील अनेक कथा या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक अभ्यासपूर्ण तसंच रंजकही झालं आहे. प्रवासात लेखकद्वयीला असं लक्षात आलं की, या कथांच्या विविध आवृत्त्या असल्या, तरी त्यांना बांधून ठेवणारी नैतिकतेची चौकट एकच आहे ! पिढ्यान् पिढ्यांपासून भारतीय जनमानसात रुजलेल्या; लोकजीवन, सांस्कृतिक-सामाजिक अवकाश आणि भक्ती-परंपरा यांच्या संचिताचा अविभाज्य भाग झालेल्या रामकथेसोबत केलेला अनोखा शोधक प्रवासानुभव… रामाच्या पावलांवर पाऊल !
-
Bharat Chin Sambandhanchi Pradirgh Kheli (भारत चीन
चीनच्या धूर्त धोरणीपणामुळे शिष्टाईच्या प्रांतात भारत चीनकडे – विशेषतः १९६२च्या युद्धानंतर संशयाच्या नजरेने पाहत आला आहे. असं असूनही या उभय देशांच्या संबंधांचं सखोल आकलन फार कमी वेळा मांडण्यात आलं. काही घटना-प्रसंगांमुळे तत्कालीन चर्चा-वादविवाद झाले, अजूनही ते होत असतात, पण त्याच्या खोलात फारसं कुणी जात नाही. भारताचे माजी परराष्ट्र सचिव तसंच चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेल्या विजय गोखले यांनी या पुस्तकात उभय देशांमध्ये झालेल्या वाटाघाटींचा, त्यामधील बदलांचा वेध घेतला आहे. भारत-चीन यांच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजपर्यंत सहा महत्त्वाच्या वाटाघाटींच्या खेळ्या झाल्या. या प्रदीर्घ वाटाघाटींच्या परिप्रेक्ष्यातून भारत-चीन संबंधांचा चिकित्सक ऊहापोह ते करतात, तसंच सद्यस्थितीकडेही पाहतात. भारताशी शिष्टाईच्या पातळीवर वाटाघाटी करताना चीन कोणते डावपेच आखतो, कोणत्या क्लृप्त्या लढवतो आणि कोणती साधनं वापरतो, याचा शोध गोखले पुस्तकात घेतात. त्याचा फायदा पुढील काळातील वाटाघाटींमध्ये भारतीय अधिकाऱ्यांना व्हावा, तसंच नागरिकांमध्ये या विषयाबद्दल जनजागृती व्हावी, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. सातत्याने बदलणाऱ्या भारत-चीन संबंधांचा विश्लेषणात्मक मागोवा घेणारं पुस्तक… भारत-चीन संबंधांची प्रदीर्घ खेळी
-
Shah Ani Katshah (शह आणि काटशह)
रुग्णावर उपचार करताना आलेल्या निरनिराळ्या अनुभवांतून मिळाला एक अमिट धडा : डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्यात विसंवाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरते वैद्यकीय व्यवसायातील चुरस ! १९८७ साली घडलेली एक सत्यकथा ! वैद्यकीय प्रवेशांमधे होणार्याा गोंधळांची ! त्याविरुद्ध आवाज उठवणार्या् लढ्याची ! प्रशासन, विद्यार्थी-पालक अन् वृत्तपत्रे यांनी एकमेकांवर आणि न्याययंत्रणेवर टाकलेल्या डावपेचांची ! या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तज्ज्ञाने घेतलेला वृत्तांतवेध :
-
Mumbai Gangwar (मुंबई गॅंगवॉर)
ही कथा आहे मुंबईची… मुंबईने पाहिलेल्या एका काव्याची. राक्षसी महत्त्वाकांक्षेची, मुंबईवर राज्य केलेल्या भाईलोकांची, त्यांच्या प्रतिस्पर्ध्याची… त्यातून निर्माण झालेल्या वैमनस्याची, खूनबाजीची आणि हे थांबवण्यासाठी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावणाऱ्या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांची, त्यांचा लगाम हाती धरणाऱ्या राजकारण्यांची… ही गोष्ट आहे सोन्या-चांदीच्या स्मगलिंगची, पाकीटमार- ब्लॅकरवाल्यांची, मटका जुगारवाल्यांची, वेश्याव्यवसाय करणाऱ्या पोरींची, दलालांची, धारावीतल्या चुलीवर रटारटा उकळणाऱ्या हातभट्टीची आणि चामड्याच्या गोदामात लपवलेल्या चरस-गांजाची… ही गोष्ट आहे शॉटकट मारून मोठी स्वप्नं पाहणाऱ्या माणसांची… ही गोष्ट आहे भरडल्या गेलेल्या मुंबईतल्या सामान्य कुटुंबांची… “जगण्याचा संघर्ष ‘खल्लास’ करण्यासाठी पाहिजे पैसा… खूप सारा पैसा आणि तो सरळ मिळत नाही, त्यासाठी पावले वाकडी टाकावी लागतात,” अशा समजुतीतून उभा राहतो काळा धंदा आणि हा धंदा कितीही ‘गंदा’ असला तरी तो करण्याची लत एकदा लागली की त्यातून सुटका नाही ! वरवर फिक्शन वाटणारी, पण नकळतपणे तुम्हाला वास्तवाच्या समोर उभी करणारी कादंबरी… मुंबई गँगवॉर!
-
Bakhar Lalitadityachi (बखर ललितादित्याची)
काश्मीरनरेश ललितादित्य मुक्तापीडचा जीवनप्रवास आठव्या शतकात संपूर्ण आशिया खंडावर लोकोपयोगी निर्माणकार्ये करणारा, ललितादित्याएवढा प्रभाव टाकणारा सम्राट झाला नाही, हे एक वास्तव आहे. ललितादित्याचे समग्र जीवन मुळातच एवढे झंझावाती आणि साहसी आहे की, लेखिकेला ते कादंबरीरूपात मांडावेसे वाटले. या कादंबरीच्या रूपाने ललितादित्याची तेजाने झळाळणारी जीवनगाथा आपल्यासमोर आली आहे. दोन स्तरांवर कादंबरी पुढे नेण्याचे आणि तिला अजून थरारक बनवण्याचे कौशल्य डॉ. लिली जोशी यांनी दाखवलेले आहे. त्यामुळे कादंबरीची वाचनीयताही वाढलेली आहे. ललितादित्याच्या जीवनाची नाळ वर्तमानाशी भिडवण्याचे लेखिकेचे कौशल्य उत्कृष्ट कादंबरीकाराचे गुण त्यांच्यात आहेत, याचे निदर्शक आहे. या कादंबरीच्या माध्यमातून भारतीय इतिहासात एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या, पण इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या ललितादित्य या महान सम्राटाकडे लक्ष वेधून घेण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक आणि अभिनंदनास्पद कार्य डॉ. लिली जोशी यांच्याकडून पार पडले आहे. बहुतेक सर्वच मराठी कादंबरीकार मराठी इतिहासातील महानायकांच्या प्रभावक्षेत्रात वावरत असताना त्यांनी थेट काश्मीरच्या इतिहासाकडे झेप घेतली आणि एक दुर्लक्षित, पण गौरवास्पद इतिहासाला वाचा फोडली, हे त्यांचे साहित्यकार्य राष्ट्रीय पातळीवर दखलपात्र आहे. संजय सोनवणी (प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक)
-
Kridapatu Te Kridamaharshi (क्रीडापटू ते क्रीडामहर
गुरुवर्य डॉ. अरुण दातार म्हणजे शरीरसौष्ठवजन उचलणे, पॉवर लिफ्टिंग, सूर्यनमस्कार या क्षेत्रांतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि वने आर्ट या क्रीडाप्रकाराचे जनका आई-वडिलांचे उत्तम संस्कार, गुरुवयांचे उत्कृष्ट मार्गदर्शन आणि मित्रमंडळींचे उत्कट प्रेम या त्रिवेणी संगमातून त्यांनी विद्यार्थिदशेतच अनेक बक्षिसांसह क्रीडापटू म्हणून अभिनंदनीय कामगिरी केली. विवाहानंतर झालेल्या भीषण अपघातात होत्याचं नव्हतं झालं सुड शरीर कायमचं जायबंदी झालं, परंतु भेटलेली देवमाणसं, कमालीची सहनशीलता आणि सुविद्य पत्नीनं शुश्रूषेसह दिलेलं मानसिक पाठबळ यांमुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. पुढे पत्नीच्या आग्रहामुळे व्यायामशाळा हेच जीवितकार्य मानून शेकडो कीडापटू घडवले. त्यांच्या विद्यार्थ्यांनी पुणे श्री ते विश्व श्री असं यश संपादन करत सूर्ण जिमची कीर्ती सर्वदूर पोहोचवली. यथावकाश सरांनाही अनेक पुरस्कारांसह क्रीडामहर्षी पदवी प्राप्त झाली. अर्थात, हा प्रवास सोपा नव्हताच. नित्य नवा संघर्ष असला, तरी असंख्यांच्या जीवनात हर्ष पेरून, आपलं बोनस आयुष्य राष्ट्रकार्यासाठी समर्पित करणारे डॉ. अरुण दातार आणि संतसाहित्य समरसून जगणाऱ्या गुरुवर्या डॉ. आरती दातार या दाम्पत्याने वळणावळणांवर भेटलेल्या मदतीच्या हातांचा ओघवत्या शैलीत परामर्श घेतला आहे. व्यायामातून आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, विवेक, शिस्त, सहकार्य, संयम, सातत्य, साधना, साहस, सेवा अशा नानाविध वैश्विक मूल्यांचं संस्करण असलेले हे हा शब्दधन प्रत्येकासाठी प्रेरक आहे. शक्ती आणि भक्तीचं प्रतीक आहे. दातृत्व आणि दूरदृष्टीचं द्योतक आहे. कृतार्थता आणि कृतज्ञतेचा परिपाक आहे. म्हणूनच 'क्रीडापटू ते क्रीडामहर्षी ही यशोगाथा नक्कीच संग्राह्य आहे. डॉ. लता पाडेकर (संत साहित्याच्या अभ्यासक)
-
Eka Phandivarchi Phakhara (एका फांदीवरची पाखरं)
तिन्हीसांज..... ना दिवस ना रात्र अशा काळाचा तुकडा.... तिघींची आयुष्यं त्या तुकड्यावर हेलकावत होती. जणू एकाच फांदीवरची तीन पाखरे । चारू, संध्या आणि पल्लवी... नवीन आयुष्याला तिघींनाही आता सामोरे जायचं होतं. निर्णय घ्यायचे होते. आपापल्या परीनं आयुष्यात रंग भरायचे होते. हाती आलेल्या पत्त्यांनिशी आयुष्याचा डाव खेळायचा होता. कसा रंगणार होता हा खेळ?...