Tufanatalya Panatya (तुफानातल्या पणत्या)
वृषाली मगदूम गेल्या साडेतीन दशकांपासून गरीब, पीडित, शोषित महिलांच्या समस्या सोडविण्याचे काम तळमळीने करीत आहे. डम्पिंग ग्राउंडवर, कौटुंबिक सल्ला केंद्रात, किंवा प्रत्यक्ष वस्तीत गेल्यावर अनेक तऱ्हेच्या समस्या घेऊन महिला येतात. या समस्यांची तड लावल्याशिवाय किंवा न्याय मिळाल्याशिवाय वृषाली स्वस्थ बसत नाही. या पुस्तकातील साऱ्याच कहाण्यांतील नायिका विलक्षण ताकदीच्या आहेत. समोर आशेचा एकही किरण नाही, आयुष्य वाऱ्यावर भिरकावून दिल्यासारखे आहे. वेदना वास्तवाच्या पलीकडच्या आहेत. अशा एका वळणावर अंतस्थ ताकदीला बाहेरच्या ताकदीचं बळ मिळतं. त्या पेटून उठतात, संघर्ष करतात, अगदी तुफानाचाही न डगमगता सामना करतात. वाट्याला आलेलं भागधेय स्वीकारून शांत संयत, चिवटपणे झुंज देत जगणं 'साकार' करत आहेत. स्त्री वर्गाच्या पलीकडे जाऊन व्यापक मानवी जीवनातील दुःख व त्यातून येणारी व्याकुळता यांचा शोध वृषालीची लेखणी घेताना दिसते. --- अजित मगदूम