-
Vadalatil Deepstambha (वादळांतील दीपस्तंभ)
जो भगवी वस्त्रें त्याला नाहीं, तरी पण जो जन्मभर संन्याशाचें जीवन जगला – समाजाच्या कल्याणासाठीं जो चंदनासारखा झिजत राहिला, अशा एका योद्धयाची ही जीवनगाथा— पू. सरसंघचालकांच्या शब्दांत सांगायचे, तर `संघनिर्मात्याविषयीं लिहिलेली ही कादंबरी हें मराठी ललित साहित्यामध्यें एक वैशिष्ट्यच म्हणावें लागेल.’
-
Nagin (नागीण)
पहिल्या झटक्यात नाग लोळवायला हवा आणि दुसऱ्या झटक्यात नागीण उलथी करायला हवी. जुळी आहेत. मारली, तर दोन्ही मारायला हवीत. नाहीतर एक जायचं नि एक राह्य़चं. घाव घालता येईल असा तो नागाला आवाक्यात घेत होता. हातातली शक्ती एकवटत होता. आणि एकाएकी नाग मागं मान फिरवून बघायला गेला. त्याच क्षणी घाव वर्मी बसला. नाग हातभर उडाला आणि उलटा फिरला. फडा काढून उभा राहिला; पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या अंगभर विलक्षण कळ आली. आपलं अंग गळून पडलंय वाटलं. धड फूत्कारताही येईना. बापूनं दुसरा टोला फडा गवसून लगावला. तो भुईसपाट झाला. जागच्या जागी लोळू लागला. आ वासलेलं तोंड माती घोळू लागलं. एव्हाना नागीण पसार झाली होती. चंद्रा पळत पळत आली. नाग गतप्राण होऊन पडला होता. तोंड मातीनं माखलं होतं. शरीर उलटपालटं झालं होतं. कसलं विपरीत धूड. क्षणापूर्वी तर नजर ठरत नव्हती. आगीचा लोळच होता.’ ..या ओळी आहेत मराठीतील ज्येष्ठ कथालेखक चारुता सागर यांच्या ‘नागीण’ कथासंग्रहातील ‘नागीण’ या कथेतील. यातून बापू आणि नागिणीचा विरह मनाला चटका लावून जातो. वाचकही प्राणी आणि मानवाचं दु:ख वेगळं समजत नाहीत. अशी विलक्षणता त्यांच्या सर्वच कथांतून वेगवेगळ्या घटना-प्रसंगांतून प्रकट झालेली आहे.
-
African Safari (आफ्रिकन सफारी)
जयंतरावांची तीष्ण नजर हे त्यांच्या लिखाणचं वैशिष्टय आहे. वाईल्ड लाईफ अभ्यासात निसर्ग आणि प्राण्यांचे बारकावे शब्द आणि आणि कॅमेरा-याने ते अचूकतेने टिपतात. याचे प्रत्यंतर म्हणजे 'आफ्रिकन सफारी' हे त्यांचं पहिलं पुस्तक आणि पुस्तकातील चित्रं आहेत.
-
Kailas - Manas ( कैलास - मानस)
कैलास पर्वत हे सृष्टीचे बीज मानले जाते. तसेच ही संकल्पभूमी आहे इथे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. विष्णू व शंकर यांचे संकल्प म्हणजे ब्रह्मदेवाचे सृजनत्व अशी हिंदूंची श्रद्धा आहे. कैलास हे शंकर आणि पार्वतीचे हिमालयातील निवास्थान, तर मानस यां सरोवराची निर्मिती केली. गौतम बुद्धांनी याच सरोवराच्या मध्यभागी बसून जगाला ज्ञान दिले. महानुभाव पंथीय त्यांचा हंस अवतार मानसमध्ये झाला. असं मानतात. तर जैन धर्माचे पहिले तीर्थकर ऋषभदेवाचे महानिर्वाण कैलासाहून झाले वेद, उपनिषदे, स्कंदपुराण, महाभारत आणि मेघदूत यां ग्रंथात कैलास-मानसाचा उल्लेख आहे. मराठी संतांचे मेरुमणी संत नामदेवांनी तेराव्या शतकात हिमालय ओलांडून कैलास - मानसाची यात्रा केली. तसा त्यांचा अभंग आहे . कैलास मानस हे श्रीकृष्ण, दत्त्तात्राय, जैन तीर्थकर आणि आदिशक्ती महालक्ष्मीची भूमी आहे . असे हे हिमालयातील निसर्गचक्राची बदलती सुंदर रूपे, अद्भूत सौंदर्याचा अनुभव आणि मानस काठाची निळ्याभोर आकाशाखालाची चिरशांतता अनुभवणे हे या प्रवासाचे वेगळेपण आहे
-
Mamacha Vada (मामाचा वाडा)
"मामाचा वाडा' या कथासंग्रहात एकूण चौदा कथा आहेत. या सर्व कथा बहुतेक ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त झालेल्या आहेत. या कथासंग्रहातील पेटलेला क्षण, अवर्षण, विहीर, पाषाण या कथा प्रामुख्याने दारिद्य्र व्यक्त करतात.