-
Jeta Mi Bhagyavan Kartutvan (जेता मी भाग्यवान कर्त
डॉ. ज्ञानराज गायकवाड यांच्या या आत्मचरित्रात त्यांना करावा लागलेला संघर्ष तर कळतोच, शिवाय ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्नही कळतात. हिंदी विषयातील त्यांची रुची आणि त्यासाठी त्यांनी घेतलेल[...]
-
Tai Mi Collector Vhayanu ! (ताई, मी कलेक्टर व्हयनू
प्रतीक्षा करणार्या आम्हा सर्वांना गेटच्या बाहेर काढण्यात आले. निकाल चार-पाच नोटीस बोर्डांवर लावल्यानंतर गेट उडण्यात आले. मोठा कोलाहल झाला व निकालासाठी ताटकळत बसलेले सर्वजण नोटीस बोर्डांवर मधमाशांसारखे जाऊन चीपकले. मी बोर्डासमोर उभ्या असलेल्या मुलांच्या कंबरांमधून जागा करून माझे मुंडके मध्ये घुसवले आणि मान वर करून तालिकेकडे बघू लागलो. तालिकेत माझे नाव बघितले तेव्हा माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. माझ्या हृदयाचे ठोके काही सेकंदांसाठी बंद झाले! तालिकेत दिसणाऱ्या माझ्या रँककवरून मला आय.ए.एस. मिळणार हे निश्चित झाले होते. जे मी अनुभवत होतो त्यावर माझा विश्वास बसत नव्हता.मी घरी आतुरतेने वाट बघत असलेल्या स्मिताला आणि नंतर माझ्या माऊलीला-ताईला-आनंदाची बातमी कळवण्यासाठी उतावीळ झाले होतो. त्यांना फोन करतोपर्यंत माझा कंठ दाटून आला होता व डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ताईने फोन उचलताच मी जोराने ओरडलो, "ताई, मी कलेक्टर व्हयनू!"
-
Rangmudra( रंगमुद्रा)
हे सारेच जण मोठे कलावंत. प्रत्येकानं आपल्या कर्तृत्त्वानं कलेच्या क्षेत्रात ठसा उमटवलेला. या कलावंतांचं व्यक्तिमत्त्व, त्यांची जडणघडण, त्यांचं योगदान यांचा वेध घेत घेत रंगभूमीचं प्रयोजन, समाजाच्या अभिरुचीची घडण, सर्जनशील निर्मितीची प्रक्रिया यांचाही शोध.
-
Rashtirya Swayamsewak Sanghane Gamawaleli Varse( र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या डॉ. संजीव केळकर यांनी संघाच्या कार्यपद्धतीचे या पुस्तकात विश्लेषण केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडलेल्या काही मंडळींपैकी दोघा-तिघा मंडळींनी जी पुस्तके लिहिली त्यापेक्षा हे पुस्तक वेगळे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाबद्दल आस्था असतानाही केळकर यांनी येथे कठोर चिकित्सा केली आहे. संघाला गोळवलकर यांच्या मार्गाने यश मिळणार नाही, तर देवरस यांच्या सर्वसमावेशक पद्धतीनेच उज्ज्वल काळ असेल, असे मत लेखक मांडतात. गोळवलकर यांनी संघाच्या कामाची दिशा बदलली. त्यामुळे संघटनेचे बरेच नुकसान झाले. केळकर यांनी अनेक पुस्तकांचे संदर्भ घेऊन, विविध पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून केळकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. अशोक पाध्ये यांनी मराठी अनुवाद केला आहे. अभ्यासक आणि सामान्य वाचक दोघांनाही हे पुस्तक आवडेल.