-
Yugdrashta Maharaja (युगद्रष्टा महाराजा)
देशात स्वातंत्र्यपूर्व काळात पाचशे ते सहाशे संस्थाने होती. या संस्थानांपैकी पुरोगामी राजा म्हणजे सयाजीराव गायकवाड. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाजसुधारकांना मदत करणारे सयाजीराव ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणार्या क्रांतिकारकांनीही मदत करत होते. साहित्य, कला, नाट्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला अशा सर्व बाबींना उत्तेजन देणारा हा राजा सर्वार्थाने वेगळा होता. ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांनी अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून ही कादंबरी लिहिली आहे. 528 पानांच्या या कादंबरीत सयाजीरावांचे अनेक पैलू लेखकाने मांडले आहेत. सयाजीराव किती मोठे होते, हे या कादंबरीने सहजपणे लक्षात येते. लेखकाने खूप मोठा काळ अत्यंत ताकदीने उभा केला आहे. Authors: बाबा भांड
-
Bel Bhandara (बेल भंडारा )
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपट मांडणारं हे पुस्तक बघताक्षणीच वाचकाला आवडेल इतकी देखणी निर्मिती झाली आहे. डॉ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेबांबरोबर 11 वर्षं सातत्यानं चर्चा करून, त्यांच्याविषयीचं सर्व लेखन अभ्यासून हे चरित्र लिहिलं आहे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अवघं आयुष्य पुस्तकात मांडणं अवघड होतं; पण सागर देशपांडे यांनी ते उत्तम केलं आहे. मासिकाच्या आकारातील या पुस्तकाची निर्मितीही त्यातील मजकुराइतकीच दर्जेदार आहे.
-
Vishkha ( विशाखा )
उत्कट जीवनानुभव, स्वानुभवापासून ते राष्ट्रप्रेमापर्यंत विषयांचे वैविध्य, लालित्यपूर्ण आणि ओघवती भाषाशैली या विविध गुणांनी युक्त असणारा विशाखा हा काव्यसंग्रह जगन्मान्य कवी कुसुमाग्रजांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलाय. सुरेख काव्यानुभूती देणारा हा कवितासंग्रह प्रत्येकाने आपल्या घरात, हृदयात व मनातही जपून ठेवावा असाच आहे.
-
Vatevarchya Savalya ( वाटेवरच्या सावल्या )
त्रास्थपणे मागे वळून पाहता येईल आणि ज्यासंबंधी काही बोलता येईल अशा काही वक्ती आठवणीमधे घर करतात ज्या ठिकाणी आपण थांबलो, थबकलो अशी आपल्या आयुष्यातील ती विरामचिन्हेच होत. शिरवाडकरांचे आत्मपर कथन पूर्वी विरामचिन्हे नावाने प्रकाशित झाले होते. त्यात काही लेखांची भर घालून वेगळा नावाने त्याची ही नवी आवृत्ती.
-
Vijayache Mansshastra (विजयाचे मानसशास्त्र)
ज्या खेळाडूंना क्रीडाक्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करायची असेल, त्या सार्यांनाच हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. कारण यात बहुमोलाचे ज्ञान आणि संकल्पना दिलेल्या आहेत. म्हणून श्री. बाम यांनी हे पुस्तक लिहिले, हे फारच उत्तम झाले असे मला वाटते… राहुल द्रविड,क्रिकेटपटू श्री. बाम यांच्यासारखाच पराकोटीचा साधेपणा, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करण्याची अपेक्षा बाळगणार्या सर्वच खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी याचा अभ्यास करायला हवा म्हणजे क्षमता प्रगट करण्याच्या मार्गातले मानसिक अडथळे त्यांना दूर करता येतील. असामान्य प्रतिभेचा आविष्कार असलेले हे पुस्तक क्रीडाक्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येकाने वाचायलाच हहवे…. गीत सेठी, जागतिक अजिंक्यवीर बिलीयर्ड्स हे पुस्तक वाचताना माझ्या क्रीडा जीवनाचा संपूण7 पट डोळ्यांसमोर उलगडला गेला. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, अनुभवाच्या कसोटीवर पारखलेले हे ज्ञान आणि तंत्रे आता क्रीडाक्षेत्र गाजवण्याची अपेक्षा धरणार्या सार्याच खेळाडूंना या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध आहे… अंजली भागवत, जागतिक नेमबाजीत अव्वल क्रमांक ज्याला आपला खेळ उत्तम व्हावा असे वाटत असेल, त्याने हे पुस्तक वाचायलाच हवे. सनातन अशा योगशास्त्रातल्या तंत्रांचा खजिनाच श्री. बाम यांनी या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशात आणला आहे… प्रकाश पडुकोण, जागतिक अजिंक्यवीर, बॅडमिंटन कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करायची असेल, तर हे पुस्तक वाचायलाच हवे. हृदयाला आणि मनाला शांती देणारे असेच हे पुस्तक आहे. यशस्वी होण्याचे रहस्य त्यात साध्या, सोप्या आणि सुस्पष्ट भाषेत उलगडले आहे. कमलेश मेहता,आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू हे पुस्तक खेळांडूसाठी म्हणून लिहिलेले असले तरी त्यातली तंत्रे कोणत्याही क्षेत्रातल्या समस्यांना आणि आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी सक्षम बनवू शकतात. तेव्हा ते सर्वांनीच वाचावे आणि त्यातल्या तंत्राचा उपयोग करून पाहावा.