-
Samikshecha Antaswar (समीक्षेचा अंत:स्वर)
‘समीक्षेचा अंत:स्वर’ हा प्रा. देवानंद सोनटक्के यांचा ‘सामर्थ्याचा स्वर’ या ग्रंथानंतरचा दुसरा समीक्षाग्रंथ. ग्रंथात एकूण १७ लेख असून ते पूर्वी विविध चर्चासत्र आणि नियतकालिके यांतून प्रसिध्द झाले आहेत. या ग्रंथात साहित्यविचार आणि उपयोजित समीक्षा अशा दोन प्रकारांचे लेख आहेत. कुसुमावती देशपांडे, बा. सी. मर्ढेकर, भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याविचारांची, वसंत आबाजी डहाके यांच्या समीक्षेच्या सांस्कृतिक दृष्टीची चर्चा करणारे तात्विक लेख आहेत तर मर्ढेकर, करंदीकर, अरुण कोलटकर,श्रीधर शनवारे, ग्रेस अरुण काळे, दीपक रंगारी यांच्या कविता आणि श्याम मनोहर (शीतयुद्ध सदानंद), ह. मो. मराठे (काळेशार पाणी) आसाराम लोमटे (इडा पीडा टळो) यांच्या साहित्यकृतींची आस्वादक समीक्षा केली आहे.