-
The Happy man (द हॅपी मॅन)
पाश्चिमात्य साहित्याचे श्रेष्ठ लेखक म्हणून सॉमरसेट मॉम विश्वप्रसिध्द आहेत . कथाकार म्हणून त्यांच्या लेखणीचा प्रभाव समकालीन साहित्यावर होता, तो आजही आहे. प्रत्येक शब्दा -शब्दातून त्यांची कथा उलगडत जातो आणि वाचकाला चकित करते . नवसाहीत्यातील आधुनिकता आणि सैदर्यावाद यांचा समन्वय साधणारी मॉमची कथा ,मानवी संवेदना आणि जीवनानुभव यांचे कलात्मक प्रदर्शन करते. क़थातील पात्रांची रचना आणि भावना यांचे समर्थ चित्रण करणाऱ्या ह्या कथा वाचकांना केवळ भावूक करत नाहीत तर अंतर्मुखही करतात. मॉम यांनी कथा, कादंबरी, नाटक, अशा विविध वाड्मयप्रकारांत विपुल लेखन केले आहे .वैश्विक साहित्यातील ह्या महान कलाकाराच्या कथांचा मराठी अनुवाद वाचकांना नक्की आवडेल ,त्यांचा वाडमयीन आकलन अधिक विस्तूत समृध्द करतानाच उत्तम साहित्य वाचल्याचा आनंदही त्यांना प्राप्त होईल.
-
Floriston Bangla (फ्लॉरिस्टन बंगला)
'फ़्लॉरिस्टन बंगला' हि सत्य घटनेचा आधार असलेली कथा अभूतपूर्व आणि रोमांचकारी आहे . मरणोतर जीवनाच्या अस्तित्ववर जगाच्या प्रत्येक काना -कोपऱ्यातून काही ना काही मांडलं गेल आहे. त्यातील सत्य असत्येचा इथे शोध नाही ;परंतु प्रस्तुत कादंबरीतील अनुभव स्वत :अनुभवला आहे . सदेह नायक ,त्याची विदेही -प्रेयसी आणि त्या दोघांचा मित्र या तिघांमधील हृदय नात्याचा मोह वाचकांनाहि पडेल यात शंका नाही. श्रद्धा -अंधश्रद्धेच्या भोवऱ्यात न अडकता या कृतीतील कलात्मकतेचा आस्वाद वाचकांनी घ्यावा हि अपेक्षा .
-
Colonel's Wife Aani Iter Katha (कर्नल्स वाईफ आणि इ
पाश्चिमात्य साहित्याचे श्रेष्ठ लेखक म्हणून सॉमरसेट मॉम विश्वप्रसिध्द आहेत . कथाकार म्हणून त्यांच्या लेखणीचा प्रभाव समकालीन साहित्यावर होता, तो आजही आहे. प्रत्येक शब्दा -शब्दातून त्यांची कथा उलगडत जातो आणि वाचकाला चकित करते . नवसाहीत्यातील आधुनिकता आणि सैदर्यावाद यांचा समन्वय साधणारी मॉमची कथा ,मानवी संवेदना आणि जीवनानुभव यांचे कलात्मक प्रदर्शन करते. क़थातील पात्रांची रचना आणि भावना यांचे समर्थ चित्रण करणाऱ्या ह्या कथा वाचकांना केवळ भावूक करत नाहीत तर अंतर्मुखही करतात. मॉम यांनी कथा, कादंबरी, नाटक, अशा विविध वाड्मयप्रकारांत विपुल लेखन केले आहे .वैश्विक साहित्यातील ह्या महान कलाकाराच्या कथांचा मराठी अनुवाद वाचकांना नक्की आवडेल ,त्यांचा वाडमयीन आकलन अधिक विस्तूत समृध्द करतानाच उत्तम साहित्य वाचल्याचा आनंदही त्यांना प्राप्त होईल.
-
Don Yashswi Lokyudhe (दोन यशस्वी लोकयुद्धे)
व्हिएतनाम युद्ध यशस्वी झाल्यावर, स्थापन झालेल्या व्हिएतनामी सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधींनी जगात प्रथम मान्यता दिली होती. नंतर हो-ची-मिन्ह व्हिएतनाम अध्यक्ष भेटीवर आले असताना त्यांनी मोहन धारिया - प्लानिंग कमिशन उपाध्यक्ष यांच्याशी बोलताना वरील उद्गार काढले होते. मोगल विरुद्ध मराठे व फ्रेंच-अमेरिकन विरुद्ध व्हिएतनाम या दोन लोकयुद्धांतील साम्यस्थळे व तुलना दाखविण्याचा या पुस्तकात प्रयत्न केला आहे. ज्या छोट्या राष्ट्रांवर साम्राज्यवादी लोकांची आक्रमणे होतील त्या राष्ट्रांना वरील युद्धनीतीच्या अभ्यासाचा फायदाच होईल.
-
Divtya (दिवटया)
दलित साहित्यात आत्मकथनाला मोठे स्थान आहे. वर्षानुवर्षे अन्याय सहन करणारा, पिचलेला हा समाज आज थोडेफार चांगले जीवन जगत असला तरी ‘दलित’ शिक्का अजूनही पुसला गेलेला नाही. म्हणूनच या समाजातील अनेकांनी आत्मकथनातून झालेल्या अन्यायाचे चित्रण केले आहे. परिस्थितीचे चटके सहन केलेल्या खुशाल डवरे यांनीही ‘दिवट्या’ ही आत्मकथा लिहिली. पण त्यात इतरांकडून होणार्या अन्यायापेक्षा स्वतःमुळे कुटुंबावर झालेल्या अन्यायाचे चित्रण त्यांनी केले आहे. एका देवदासीमुळे त्यांच्या आयुष्यात ज्या घडामोडी घडल्या त्याबद्दल त्यांनी प्रामाणिकपणे लिहिले आहे. कोणालाही न दुखवता स्वतःच्या आयुष्याचा पट त्यांनी अलिप्तपणे मांडला आहे. म्हणूनच हे पुस्तक वेगळे ठरते.