-
Sthalantar (स्थलांतर)
एखाद कुटुंब हे समाजवीणीतील एक अणु ठरू शकतो नव्हे असतोच अशी अनेक विविध कुटुंब मिळूनच कुठलाही समाज बनत असतो. पुढे पुढे हा प्रवाहाच राष्ट्रीय प्रवाहाला जाऊन मिळतो व राष्ट्रीय… देश बनत असतो. हि परिवर्तनाची प्रक्रिया धीमी असते. पण ती तेवढीच अपिहार्य आणि अटळ आहेच आहे. ह्या परिवर्तन प्रक्रियेत रूढी, परपंरा नीती व मूल्ये तावून सुलाखून निघतात व एका नव्याच पण बदललेल्या स्वरुपात जाणवत असतात.
-
Kala Khandak (काळा खंदक)
विजू, बाबूजी जीभ टाळ्याला चिकटली होती. त्यांचे पांढरे फक्क चहरे पाहून ते केंव्हाही खाली पडतील असे वाटत होते. "अ..अव्या!" मी धीर गोळा करीत घसा साफ़ करीत म्हटलं. पण अवि समोर पाहत होता माझ्या बोलण्याकडे त्याचं लक्ष नव्हत. मीही समोर पाहिलं आणि गोठला! भितिनं आमची ह्रदय बंद पडतील असं वाटत होतं. विजू, बाबु डोले बाहेर आल्यासारखे वाटारल्या नजरेने पाहत राहिले. त्या रेशमी पडद्यामागुन एक गोरी पान नाउ वारी पातळ नेसलेली कुणी मावशीबाई हळूहळू आमच्या दिशेने येत होती. पण आम्ही काही करू शकत नव्हतो. तेथून पळून जाणं शक्य नव्हतं. पायात शिसे भारल्यासारख ते जड झाले होते. त्या बाईच्या हातातील बांगडया कीणकीणल्या. आश्चर्याने आणि अनुकंपेने आमच्याकडे पाहात त्या बाई बोलल्या "कसे रे आलात इकडे?...आणि उघडे? तुम्हा कोवाल्या तरुण पोरांना पाहिलं टार तो राक्षस सोडेल का तुम्हाला?"
-
Mafiyachya Magarmithit (मफियाच्या मगरमिठीत)
अमेरिकेत स्थायिक झालेला एक सिविलियन तरुण आपल्या आजीला भेटण्यासाठी म्हणून माय देशात येतो. त्याचा आगमनाने कही लोकांच्या पोटात भीतीचा गोला उठतो. त्याला मारन्याचाही प्रयत्न होता. त्याचा धर्मगुरु असनार आजा त्याला सुरुवातीला मदत करीत नाही. एका रात्रि पुरेशी ओळख असणारी एक तरूणी! त्याच्या पाठीशी उभी राहते. त्याचा बाप कोण होता? त्याने ठेवलेला वारसा के होता? मानवी संबंध आणि गुन्हेगारिचे विश्व ह्यांचे चित्रण करणारी थरारक कहाणी. (फिलीप लॉरेन ह्यांच्या 'ए माफिया किस' ह्या कादंबरीवर आधारित.)
-
Kasturicha Game ( कस्तुरीचा गेम)
कस्तूरी आता बेडवर होती. पण कस्तुरीचं पीणं थांबत नहव्त. मानेकाका एकदा म्हणाले, "विजू भाऊ, कस्तुरीनं तुम्हाला खोट्या आरोपावरून जेलमध्ये टाकालं. तुम्हाला देश सोडावा लागल पण तिथे रुबाबात राहते आहे." "तीनं केलं ते बरं केलं." विजू म्हणाला. "काय म्हणता?" माने काकानं आश्चर्यानं विचारलं. "तीनं काय बरं केलं?" "ती अशी वागली म्हणून मी जेल मधे गेलो. मला आशा सारखी बायको मिळाला. भगवान सारखा मित्र मिळाला. तुमच्यासारखे काम मिळाले. हे सगळ कस्तूरीमुले झालं. तीनं गेम केला पण फ़ायदा माझा झाला."
-
kanyavatibhav (कन्यावतीभव)
'आज मुलीही मुलांप्रमाने प्रत्येक क्षेत्रात चमकत आहेत. त्यांच्या बरोबरीने त्यांच्या पेक्षा वरचढ, सरस कामे करीत आहेत. कुठेही कमी पडत नाहीत. अत्युंच्य पदी पोहोचल्या आहेत. भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी एक स्त्रीच होत्या. एवरेस्ट सर करणारी बचेंन्द्रपाल आहे. आवकाश यात्री कल्पना चावला आहेत. पहिला न्यायाधीश फापिता बीबी आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आहेत. तेंव्हा मलाही माझ्या मुलींचा अभिमान आहे. त्याही उच्च शिक्षीत आहेत. त्यांचा पायावर आज त्या उभ्या आहेत. त्या माझ्या मुली नाहीत टार मुलेच आहेत!'
-
Balachi Chahul (बाळाची चाहुल)
"केशव तू उगाचच बाऊ करतोस बग. त्यात कठीन काय आहे? माधवरावांच्या पत्नीची रमाबाईची भूमिका तू उत्तम वथावली होतीस. त्या भूमिकेबद्दल तुला बक्षीशही मिळालं होतं.' "श्री हवं ते बक्षिस तुला घे. पण मला या नासत्या भानगडीत अदाकवु नकोस. माला जाऊ देत." "सारखं काय रे पळायला पाहातोस. सिनेमात सुध्हा पुरुष स्त्री पार्ट करताच ना. मग तुला के झाल?" "ए ते नाटक सिनेमातलं वेगळं असतं आणि ते लोकांना ठाउकही असतं. ते त्यांचाकड़े एक विनोद म्हणून पाहतात. पण इथे प्रत्यक्षात करायचयं लोक माझी टर उड़वतील. माझ जीवन बरबाद होइल रे श्री. हयात मला ओढू नकोस आधीच मला नोकरी नाहिये. त्यात माझ्या किशोरीला हे कळलं तर, तर ती मला मिळण्यापूर्वीच सोडून जाईल रे. ही तुझी अफलातून आयडीया तुझ्या जवालाच ठेव. माझं असं हसं करू नकोस रे."
-
Bhramjal (भ्रमजाल)
आपल्या आईच्या चारित्र्यावर कोणी गरळ ओकावी हे त्याला कधीच सहन झाल नह्व्त. पण सत्यही तो नाकारणार नव्हता. सत्य हे होतं की त्याच्या आईचे अशा पुरुषाशी संबंध आले होते की ज्यांच नाव ती कोणालाच सांगू शकत नह्व्ती. पृथ्वीराज चौहान. अतुल, तुझी आई पृथ्वीराज चौहानच्या प्रेमात पडली होती. आपल्या परींन ही गोष्ट कोणाला कळू नये याची ती खटपट करीत होती. पण ही गोष्ट मी ओळखली होती. अतुलन दोन्ही हातान चेहरा झाकला. छाती खुसमाटावी असा एक हुंदका त्यानं दिला. अखेरीस त्याच्या जन्मदात्या आईनेच त्याला फसवले होते. एक गुन्हेगाराचे रक्त त्याच्या अंगात खेलत होते. वान नाही पण त्याचा गुण त्याच्या रक्तात उतरला होता. अतुलने पनावालेले डोळे टिपले. कोणावर दोषारोप करायची वेळ केव्हाच निघून गेली होती. हा चरचरता व्रण सोबत घेउन त्याला जगावे लागणार होते.