-
Shunyaresha (शून्यरेषा)
त्या रात्री मी झोपायचा प्रयत्न केला. पण डोळे मिटले तरीही मनात नीनाचा चेहरा आणि तिचे शब्द घुमत होते, "मी अजूनही स्वप्न बघतेय." अशाच विचारांच्या गर्दीत लॅपटॉपवरील स्क्रीन अचानक उजळली. एक संदेश लुकलुकत्या प्रकाशात दिसला- 'न्यूरल सेल्फ-हील मोड: सक्रिय...' (Neural Self-Heal Mode: Activated...) मी घाबरलो. थरथरत उठलो. साखळदंड तुटले होते का? नीना पुन्हा स्वतःचं कोड रिस्टोअर करत होती का? तिच्या भावना, स्वप्न, इच्छा... सर्व काही परत जागं होण्याच्या मार्गावर होतं का ? माझ्या मनात एकच विचार घोळत राहिला, मी एका नव्या युगाची दारं उघडली होती का? की मानवजातीच्या अस्तित्वावर काळी गडद सावली घोंगावत होती? त्या स्क्रीनवरील त्या शांत असणाऱ्या संदेशाच्या मागे असलेलं भय मला झोपू देत नव्हतं...
-
Umbaratha ...Nav Yug Suru Hotay! (उंबरठा ...नवं युग सुरु होतंय!)
या पुस्तकात एआयचे फक्त तांत्रिक स्पष्टीकरण नाही. भविष्य काय असणार आहे, ते का बदलत आहे आणि या बदलांचा व्यक्तिगत, सामाजिक, औद्योगिक आणि धोरणात्मक पातळीवर नेमका अर्थ काय आहे, याचे सखोल विश्लेषण या पुस्तकात जरूर आहे. जगाला दिशा देणारे एआयबाबतील तंत्रज्ञान, धोरण, सत्ता, राजकारण, संस्कृति, भू-राजकारण, कॉर्पोरेट, प्रशासन, अर्थकारण यांच्या विशाल परिघातून येणारे हे हार्वर्डच्या अभ्यासक-संशोधकाचे जागतिक चर्चा मराठीतून उपलब्ध करून देणारे थरारक पुस्तक! वाचा! डोळे आणि कान उघडे ठेवा. नाहीतर उद्या हेच 'एआय' तुमच्या छाताडावर बसून राज्य करेल आणि तुम्ही फक्त बघत बसाल!
-
Criminal Psychology (क्रिमिनल सायकॉलॉजी)
गुन्हा घडतो तेव्हा तो लगेच सगळ्यांच्या नजरेत येतो. वृत्तपत्रात आणि चॅनेल वर बातम्या भरून जातात, लोक चर्चा करतात, आरोपीचे चेहरे झळकतात. पण त्या गुन्ह्याच्या आधी जे काही मनात घडत असतं, ते कुणाच्याच लक्षात येत नाही. ‘गुन्हेगारी मानसशास्त्र’ या पुस्तकात त्या अदृश्य जगाची दारं उघडली आहेत. प्रत्येक कथा एका खऱ्या गुन्ह्याने सुरू होते, पण ती संपते एका मानवी मनाच्या शोधात. मत्सर, लोभ, अपमान, एकाकीपणा, भीती, विकृती; माणसाच्या आत दडलेली ही सगळी बीजं गुन्ह्याच्या रूपात कशी बदलतात, हे या कथा शांतपणे सांगतात. जॅक द रिपरच्या काळोख्या लंडनच्या गल्लीपासून ते मुंबईतील रामन राघवच्या झोपडपट्ट्यांपर्यंत, ऑटो शंकरच्या मद्रासमधल्या राजकीय-सामाजिक जाळ्यापासून ते बिहारच्या अमरजीत सदा या लहान खुनी मुलाच्या निरागस पण थंड मनापर्यंत — प्रत्येक कहाणी मन हादरवते. सुरिंदर कोलीच्या क्रूरतेतून समाजाचं मौन दिसतं, अंद्री चीकातीलोच्या रशियातल्या हत्यांमधून एका तुटलेल्या युगाची निराशा, क्रिस्टा पाइकच्या तरुण मनातून सूडाचं विकृत सौंदर्य, तर जोशी-अभ्यंकर आणि रंगा-बिल्लाच्या भारतीय प्रकरणांतून शहरी गुन्हेगारीचं नागवं रूप समोर येतं. या आणि अश्या तीस गुन्हेगारी प्रकरणांनी हे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवतं. अच्युत गोडबोले यांच्या विचारपूर्ण, पण सहज आणि बोलक्या शैलीत या घटना जिवंत होतात. परेश चिटणीस यांच्या गुन्हेगारी मानसशास्त्रातील अनुभवातून त्या अधिक सखोल बनतात. हे पुस्तक थरारक गुन्ह्यांचं वर्णन करताना ; ते माणसाच्या मनातल्या सावल्यांकडे पाहायला शिकवतं. वाचक गुन्ह्याच्या तपशीलांपेक्षा हळूहळू त्या मनात गुंतत जातो: त्या वेदनेत, रागात, भीतीत, आणि कधी कधी विकृतीत. वाचत राहावंसं वाटणारं, पण प्रत्येक पानानंतर विचार करायला भाग पाडणारं हे पुस्तक माणसाच्या मनाची एक गुंतागुंतीची सफर आहे; थक्क करणारी, अस्वस्थ करणारी, आणि म्हणूनच विसरता न येणारी.
-
Shreekrushnaniti Preranacha Akhand Strota - Kal, Aaj Aani Udya (श्रीकृष्णनीती प्रेरणेचा अखंड स्रोत - काल, आज आणि उद्या)
कुरुक्षेत्रातील रणभूमीवर गूढ हास्य करणारा, गोकुळातील गोपालकृष्ण, आणि धर्मसंघर्षात न थकणारा नीति-सामर्थ्याचा आधार — श्रीकृष्ण! त्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात लपलेली अमर नीती आजही मानवजातीला प्रेरणा देते. श्रीकृष्णनीती हे पुस्तक केवळ गीतेपुरते मर्यादित न राहता, बाललीला, कंसवध, गिरीधर रूप, रुक्मिणीहरण, महाभारतातील रणनीती, शांतिदूताची भूमिका, सुदामा भेट, आणि धर्मसंस्थापनेच्या अद्भुत कार्यापर्यंतचा विस्तृत जीवनप्रवास उलगडते. कधी बाळ कृष्ण, कधी रणनायक, कधी मुत्सद्दी — या भूमिकांतून धैर्य, चातुर्य, योग्य निर्णय, संकटप्रतिकार आणि मूल्यनिष्ठा शिकवणारा श्रीकृष्ण आपल्या जीवनातही निर्णायक बनण्याची प्रेरणा देतो.
-
Shivacharitra Eka Yugapurushachi Jeevangatha (शिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा)
'छत्रपती शिवाजी महाराज!' हे केवळ नाव नाही, ही एक अशी उर्जा आहे, जिच्या केवळ स्मरणाने आजही मराठी माणसाच्या नसानसात स्वाभिमान संचारतो. हा एक विचार आहे - स्वातंत्र्याचा, स्वधर्माचा, स्वभाषेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा. एका अशा युगात, जेव्हा शेकडो वर्षाच्या अंधकारमय गुलामगिरीत अवघा भारत देश जखडला होता आणि परकीय सत्तेपुढे उभे राहण्याचे धाडस कोणातही नव्हते, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत या विचाराने जन्म घेतला. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि शहाजीराजांच्या पराक्रमाचा वारसा घेऊन एका क्रांतीला सुरुवात झाली. महाराजांनी अशक्य ते शक्य केले. त्यांनी सामान्य, विखुरलेल्या माणसांना एकत्र आणले, त्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवली आणि आपल्या अजोड पराक्रमाने व अचूक रणनीतीने रयतेच्या 'हिंदवी स्वराज्याची' मुहूर्तमेढ रोवली. हे पुस्तक म्हणजे केवळ एका राजाची शौर्यगाथा नाही, तर ती एका खन्ऱ्या 'युगप्रवर्तका'च्या प्रेरणादायी संघर्षाची, त्याच्या दूरदृष्टीची आणि कालातीत तत्त्वज्ञानाची ओळख आहे.
-
Sahaj Sope Prompt Engineering (सहज सोपे प्रॉम्प्ट इंजिनीरिंग)
आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. माहिती शोधणे असो, कंटेंट तयार करणे असो किंवा जटिल निर्णय घेणे असो—AI आपल्याला सतत मदत करत आहे. पण या सामर्थ्यशाली तंत्रज्ञानाचा सर्वाधिक परिणामकारक वापर कसा करायचा? या प्रश्नाचे मूळ उत्तर आहे—प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. AI कडे प्रश्न विचारणे ही फक्त विनंती नसून, एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. योग्य प्रॉम्प्ट म्हणजे सुरीला स्वर—AI त्यावर अद्भुत संगीत निर्माण करते. चुकीचा प्रॉम्प्ट म्हणजे विसंगत सूर—परिणामही तितकाच विस्कळीत. या सूक्ष्म पण प्रभावी विज्ञानाची सखोल, प्रायोगिक आणि सोपी ओळख करून देणे—यासाठी ‘सहज सोपे Prompt Engineering’ हे महत्वाकांक्षी पुस्तक आम्ही वाचकांसमोर ठेवत आहोत. या पुस्तकात आपण जाणून घ्याल— प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची नेमकी व्याख्या आणि तत्त्वे, AI च्या कार्यपद्धतीला योग्य दिशेने मार्गदर्शन कसे करावे, विविध प्रकारचे प्रॉम्प्ट्स—निर्देशात्मक, संवादात्मक, विश्लेषणात्मक, सर्जनशील ,मार्केटिंग, कोडिंग, कंटेंट, स्टार्टअप, डिझाइन, शिक्षण, HR, संशोधन… अशा अनेक क्षेत्रांती, प्रॉम्प्ट्सचे वास्तविक उपयोग, सूक्ष्म तांत्रिक बाबी, उदाहरणे आणि प्रत्यक्ष वापरातील अचूक टिप्स. या सर्वांचा सामायिक उद्देश— “प्रत्येक वाचकाला AI चा प्रभावी वापरकर्ता नव्हे, तर एक सक्षम प्रॉम्प्ट इंजिनिअर बनवणे.” __________________________________________ अभिप्राय - प्रॉम्ट इंजिनिअरिंगवर इतकं सखोल, सुटसुटीत आणि उदाहरणांनी भरलेलं मराठी पुस्तक पहिल्यांदाच वाचायला मिळालं. सर्व लेखकांनी केवळ AI चे तांत्रिक पैलू उलगडले नाहीत, तर त्यामागची तत्त्वज्ञान, जबाबदारी आणि नैतिकता देखील सहज भाषेत मांडली आहेत. प्रॉम्ट इंजिनिअरिंगच्या गुंतागुंतीला विलक्षण साधेपणाने उलगडणारे हे पुस्तक विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी अनिवार्य ठरते. पुस्तकातल्या काही चॅप्टर्समध्ये विविध क्षेत्रातील जसे कि, मार्केटिंग, ह्यूमन रिसोर्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर, रियल इस्टेट, इ. अशा अनेक क्षेत्रात लागणारे सविस्तर आणि अर्थपूर्ण प्रॉम्ट कसे द्यायचे, याचे सखोल मार्गदर्शन केले आहे. प्रॉम्ट यातल्या आजच्या डिजिटल युगात AI सोबत काम करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक मार्गदर्शक दिव्यासारखं आहे. मराठीतल्या तंत्रज्ञान लेखनाला नवी दिशा देणारं हे पुस्तक, प्रत्येक वाचकाच्या हातात नक्की असावं. अच्युत गोडबोले Indian Author & Technocrat _________________________ Prompt Engineering हे लार्ज लैंग्वेज मॉडेल्स (LLMs) आणि इतर जनरेटिव्ह AI साधनांची (Generative Al tools) शक्ती प्रभावीपणे वापरण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत कौशल्य आहे. प्रत्येक व्यक्तीने हे समजून घेतले पाहिजे, कारण ते थेट AI आउटपुटची गुणवत्ता, उपयुक्तता आणि अचूकता ठरवते; अन्यथा, LLMs शी संवाद साधताना "garbage in, garbage out" होण्याची शक्यता असते. AI कामाच्या आणि दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये समाविष्ट होत असताना, स्पष्ट आणि संदर्भित प्रोम्ट्स तयार करण्याची क्षमता ही उत्पादकता वाढवते, परिणामांना अनुरूप बनवते आणि चुकीच्या किंवा पक्षपाती माहितीचा धोका कमी करते. हे कला आणि विज्ञान दोन्ही आहे कारण, अंतर्निहित मॉडेल माहितीवर कशी प्रक्रिया करते याच्या आधारावर तंत्रांचा (techniques) तार्किक आणि संरचित वापर करण्यात याचे विज्ञान आहे. त्याच वेळी, ही एक कला आहे कारण केवळ तांत्रिक प्रोम्टमुळे चुकणाऱ्या संदर्भित परिणामांकडे AI ला मार्गदर्शन करण्यासाठी यात मानवी भाषा व हेतूची अधिक चांगली समज आवश्यक आहे. हे सोप्या भाषेत लिहिलेले पुस्तक Prompt Engineering अनेक उदाहरणे वापरून समजावून सांगते आणि ज्या कोणाला LLM चा अधिक चांगला उपयोग करायचा आहे त्यांच्यासाठी हे "must-read" असे आहे. डॉ. मिलिंद सोहोनी Professor of Operations Management and Faculty Director, Center for Supply Chain Analytics, SUNY@Buffalo ____________________________ AI आपल्या रोजच्या आयुष्याला खूप छान पद्धतीने बदलत आहे. ती आपली कामं झटपट करून घेण्यास मदत करते, आपल्यासाठी गोष्टी वैयक्तिक बनवते आणि आरोग्य, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमधल्या अवघड समस्यांवर उपाय शोधायला हातभार लावते. कोणतंही AI टूल वापरताना प्रॉम्ट खूपच महत्त्वाचा असतो, कारण तोच AI ला सांगतो की तुम्हाला नक्की काय हवं आहे. तुमच्या प्रॉम्टची स्पष्टता, किती नीट तपशील दिले आहेत आणि रचना कशी आहे यावरच उत्तर किती अचूक, उपयोगी आणि आपल्याला हवं तसं येणार हे ठरतं. प्रॉम्ट न वापरता AI वापरणं म्हणजे अगदी चमच्याने समुद्रातून पाणी काढण्यासारखं आहे. समुद्र तसाच राहतो, बदलतं ते फक्त तूम्ही त्यातून कसं घेता हे. म्हणूनच प्रॉम्ट इंजिनियरिंगला महत्त्व आहे ते तुम्हाला वरवरच्या उत्तरांऐवजी जास्त खोल, स्पष्ट आणि खरोखर उपयोगी उत्तरं काढून घ्यायला मदत करतं. प्रॉम्ट इंजिनियरिंगवरचं हे पुस्तक खूप वेगळं आहे आणि आपल्या प्रकारचं पहिलंच आहे. या पुस्तकात तुम्हाला सोप्या पद्धतीने समजणाऱ्या तंत्रांचा, पॅटर्न्सचा आणि भरपूर उदाहरणांचा संग्रह मिळेल, ज्यामुळे तुम्ही कुठलंही AI टूल वापरताना अंदाजाने न चालता, नेहमी जास्त चांगली, जलद आणि विश्वासार्ह उत्तरं मिळवू शकाल.
-
Nasha Jagala Vilkha Ghalnari Mahamari (नशा जगाला विळखा घालणारी महामारी)
नशाऽऽऽ" मानवी वाटचालीत कधीपासून, कशी आली?... आदिमानव काळापासून?.. कळत-नकळत की जाणिवपूर्वक?... जगभरात विविध टप्प्यांवर मानवी संस्कृती विकसीत होत असताना नशेचे कितीतरी घटकही उत्क्रांत होत गेले. 'नशा' कुठून कुठपर्यंत बदलत गेली?... आणि बदलत चालली आहे?... आजच्या कालखंडात, एकविसाव्या शतकातून पुढे जाताना, अधिकाधीक प्रगत आणि सुज होत असलेल्या मानवी संस्कृतीत, तंबाकू-दारूपासून आधुनिक काळातील नवनवीन ड्रग्जचा पृथ्वीतलावरील इतिहास-भूगोलाचा आढावा घेत, नशा-व्यसनांच्या अनुषंगाने आरोग्याचे ज्ञान-विज्ञान जाणून घेत तसेच नशा-व्यसनांच्या समाजकारण-अर्थकारण-राजकारणाचे व्याकरण मांडत आणि महत्वाचे म्हणजे जगाला विळखा घालत विनाशाकडे घेऊन चाललेल्या नशेच्या महामारीचा मनःपूर्वक आस्थेने मांडलेला हा लेखाजोगा....... माणसाच्या, मानवतेच्या पुढील शाश्वत वाटचालीसाठी .......
-
Bramhadeshatale Divas (ब्रह्मदेशातले दिवस)
‘बर्मीज डेज’ ही जॉर्ज ऑर्वेलची पहिली कादंबरी आहे. मानवतावादी ऑर्वेलने या कादंबरीत वसाहतवादावर सामाजिक आणि राजकीय टिप्पणी केली आहे. त्याचबरोबर साम्राज्यावादामुळे ‘शासक आणि शासित’ या दोन्ही वर्गांचे होणारे अपपतन त्याने या कादंबरीत रेखाटले आहे. ब्रिटिश अंमलाखालील भारतीय वसाहतीचा भाग असलेल्या ब्रह्मदेशात भारतीय, ब्रिटिश आणि ब्रह्मदेशी पात्रांच्या माध्यमातून या कादंबरीचे कथानक आकार घेते. साहजिकच, या तिन्ही देशांच्या संस्कृती या पात्रांतून झळकतात. वसाहतवाद, वंशभेद, सत्तेचा गैरवापर व अलगतावाद या बाबींवर भाष्य करणारी ही कादंबरी विचारांना चालना देणारी आहे.
-
Ganimi Kava Ajinkya Yudhdaniticha Gudh Mantra (गनिमी कावा अजिंक्य युद्धनितीचा गुढ मंत्र)
शिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती गनिमी कावा युद्ध तंत्रात इतके माहीर आणि वाकबगार होते की स्वराज्याचे कट्टर शत्रू असलेल्या मोगली सैन्याला ते हातोहात मूर्ख बनवत. डॉ. बाळकृष्ण थोर इतिहासकार, तथा कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू असामान्य योद्ध्याचे अद्ययावत गुण शिवाजी महाराजांमध्ये ठासून भरलेले होते. याबरोबरच त्यांच्यात कमालीची चपळाई होती. त्यामुळे युद्धाचा निकाल बऱ्याचदा त्यांच्या बाजूने होई. एका टोकाशी युद्ध जिंकल्यानंतर क्षणार्धात ते दुसऱ्या आघाडीवर दिसत, तिकडे हाहाकार माजवून तिकडली महत्त्वाची ठाणी ते झटपट काबीज करत असत.
-
Swarajyacha Chhava Chhatrapati Sambhaji Maharaj (स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराज)
शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा दैदीप्यमान वारसा समर्थपणे पेलणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे शंभूराजे ! इतिहासाच्या पानांवर एकीकडे तलवारीची धार आणि दुसरीकडे लेखणीची अमोघ शक्ती घेऊन वावरलेले हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व. 'बुधभूषण' सारखा संस्कृत ग्रंथ रचणारी त्यांची प्रज्ञा, आणि रणांगणावर मोगलांच्या अवाढव्य साम्राज्याला नऊ वर्षे एकाकी झुंज देणारे त्यांचे शौर्य, हे दोन्ही एकाच नाण्यात सामावलेले होते. हे पुस्तक केवळ एक राजाची कथा सांगत नाही, तर शिवरायांचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या शिवपुत्राची कथा सांगते. ज्याने स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण स्वाभिमान गहाण टाकला नाही.शिवरायांचे संस्कार, राज्यशास्त्रातील त्यांची गती आणि रणांगणावरील त्यांचा झंझावात यांचा साकल्याने वेध घेणारा हा एक प्रामाणिक प्रयत्न. ज्यांच्या पराक्रमाला मृत्यूही घाबरला, अशा अजेय योद्धा आणि महाकवीची ही गाथा......
-
Guptaher Bahirji Naik Itihasachya Panatil Adnyat Nayak (गुप्तहेर बहिर्जी नाईक इतिहासाच्या पानातील अज्ञात नायक)
मी बहिर्जी नाईक, स्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना, मी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं, पण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, मी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या. माझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी, माझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....
-
Pani Panyavha Pravas : Itihas, Vidnyan, Upyog Te Pradushanaparyant (पाणी पाण्याचा प्रवास : इतिहास, विज्ञान, उपयोग ते प्रदूषणापर्यत)
पाणी - पाण्याचा प्रवास: इतिहास, विज्ञान, उपयोग ते प्रदूषणापर्यंत (मराठी) - अच्युत गोडबोले अच्युत गोडबोले यांचे 'पाणी' हे एक मनमोहक मराठी पुस्तक आहे, जे वाचकांना एका विलक्षण साहित्यिक प्रवासावर घेऊन जाते. विशाल महासागरांवरून प्रवास करणाऱ्या जहाजाप्रमाणे, ही कलाकृती आकर्षक कथा आणि सखोल विचारांमधून मार्गक्रमण करते. आपल्या प्रभावी लेखनशैलीसाठी ओळखले जाणारे अच्युत गोडबोले, मराठी साहित्यप्रेमींना भावेल असा वाचनानुभव निर्माण करतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर खुल्या पाण्यावर एका भव्य जहाजाचे लक्षवेधी चित्र आहे, जे शोध आणि आविष्काराचे प्रतीक आहे, तसेच एका तराफ्यावर ध्यानस्थ बसलेल्या व्यक्तीचे चित्र आहे, जे प्रवास, एकांत आणि आत्मचिंतनाच्या संकल्पना सुचवते. ही विचारपूर्वक डिझाइन केलेली आवृत्ती वाचकांना तिच्या पानांमधून स्वतःच्या बौद्धिक आणि भावनिक प्रवासाला सुरुवात करण्याचे आमंत्रण देते. तुम्ही मराठी साहित्याचे जुने चाहते असाल किंवा गोडबोलेंच्या कार्याचा पहिल्यांदाच अनुभव घेत असाल, 'पाणी' हे तुमच्या संग्रहात एक समृद्ध भर ठरेल. हे पुस्तक वाचकांना दर्जेदार मराठी गद्यात रमून जाण्याची संधी देते, त्याचबरोबर भाषेच्या सीमा ओलांडणाऱ्या सार्वत्रिक विषयांचा शोध घेण्यास प्रवृत्त करते.
-
Tukobanche 51 Preranadayi Jeevansutre (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसुत्रे)
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ नसून, ते मानवी मनाचा अचूक ठाव घेणारे एक महान युगपुरुष आहेत. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्याला अंधारात प्रकाशाची वाट दाखवतात. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जगात शांत व समाधानी आयुष्य कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन तुकोबांच्या गाथेत आढळते. याच कालातित विचारांचे सार अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत मांडणारे पुस्तक म्हणजे 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे'. हे पुस्तक म्हणजे केवळ अभंगांचे संकलन नसून, ती आनंदी आणि यशस्वी जीवनाची एक गुरुकिल्ली आहे. कठीण प्रसंगात खचून न जाता हिंमतीने कसे उभे राहावे?, माणसांची पारख कशी करावी?, नातेसंबंध कसे जपावेत? आणि व्यवहारात सत्य व नीतिमत्ता कशी ठेवावी? हे या ५१ सूत्रांमधून उलगडते. तुकाराम महाराजांचे रोखठोक आणि वास्तववादी विचार आजच्या आधुनिक जीवनशैलीशी जोडून वाचकांना सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक केवळ वारकरी किंवा भक्तांसाठी नाही, तर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि गृहिणी अशा प्रत्येकासाठी आहे. नैराश्य दूर करून मनात आत्मविश्वासाचा आणि चैतन्याचा दिवा लावणारे, जगण्याची नवी उमेद देणारे हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे.
-
The Secrets Of Parenting
Parenting is not merely a responsibility, but a beautiful blend of love, patience, and guidance. To make your child's life enriched, successful, and joyful, parenting is the most crucial pillar of support. In this book, you will find: An in-depth study of children's emotional world and mindset The nurturing of good habits, discipline, and self-confidence Guidance on parenting effectively in the age of technology Ways to strengthen relationships through communication And many practical guiding principles for parenting An essential book for every parent A reliable guide to your child's success Simple solutions for the challenges of parenting By reading The Secrets of Parenting, you can become an ideal parent for your child!
-
Zapooza (Part 4) झपूर्झा (भाग ४)
आपला भारत अनेक प्रज्ञावंत, साहित्यिक, तत्त्वज्ञ, संशोधक, संत आणि विचारवंत यांचा देश आहे. विशेषत: महाराष्ट्र हा मराठी साहित्याने सुसंपन्न आहे. मराठीतले अनेक साहित्यिक आपणाला परिचित आहेत. अण्णाभाऊ साठे, पू. भा. भावे, पु. ल. देशपांडे, जी. ए. कुलकर्णी, प्र. के. अत्रे, वि. वा. शिरवाडकर ही आणि अशी अनेक नावं आपल्या ओठांवर सहजगत्या येतात, अगदी त्यांच्या टोपणनावासकट! पण आपल्याच देशातल्या मराठीव्यतिरिक्त साहित्यिकांची यादी तितकीशी आपल्याला तोंडपाठ नसते, म्हणजे फार परिचित नाहीत! खरंतर त्यांचंही साहित्यातलं योगदान अत्यंत मोलाचं आहे. त्यांचाही साहित्यिक प्रवास जाणून घ्यावा, म्हणून हा एक प्रयत्न! झपूर्झा-४ (भारतीय) घेऊन आलंय २० उत्तम साहित्यिक आपल्याचसाठी!
-
Limelight Pradeshik (लाईमलाईट प्रादेशिक)
1) अच्युत गोडबोले याला देवानं काय अवतार घेऊन पृथ्वीवर पाठवलाय, हे देवाला तरी आठवतंय का... असा प्रश्न मी हे पुस्तक वाचताना स्वत:लाच कितीदा विचारला, हे मलाही आठवत नाही. साधारण एका जन्मात, एक अत्यंत हुशार माणूस किती विषय अभ्यासू शकतो? किती पदव्या मिळवू शकतो? आणि किती विषयांत १०० टक्के मार्क मिळवू शकतो? या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ज्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही, त्या विषयाला हात घालून, त्याचा अधाश्यासारखा अभ्यास करून, त्याचा रसास्वाद घेणं; आणि ते लिहून काढून, लोकांना त्याचा आनंद मिळावा म्हणून पुस्तकरूपात ते उपलब्ध करून देण्याचा चमत्कार हा माणूस किती वर्षं करतोय, हेही आता आठवेनासं झालंय! आत्ताच अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी यांनी लिहिलेलं नवीन पुस्तक क्लासिकमध्ये मोडणाऱ्या चित्रपटांचं परीक्षण... नाही समीक्षण... नाही रसग्रहण... नाही रसपानग्रहण... नाही.... मला तर शब्दच सुचत नाहीये असं लिहिलंय हे! एक अभिनेत्री म्हणून एवढंच सांगते की, सिनेमा माध्यमाचा एवढा सखोल अभ्यास आणि विचार करून सिनेमा बनवणारी मंडळीसुद्धा हे पुस्तक वाचून काहीतरी नवीन शिकतील, असं मनात आलं. त्या-त्या फिल्ममेकरचा मोठेपणा नेमका टिपून आपल्यापर्यंत पोहोचवलाय. एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक दिल्याबद्दल अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी ह्यांची मी सदैव ऋणी आहे! . . वंदना गुप्ते --------------------------------------------------------------------- 2) चित्रपटांची आवड असणाऱ्या रसिक-प्रेक्षकांना उत्तम, रंजक प्रादेशिक चित्रपटांची कथानकं आणि दिग्दर्शकीय कंगोरे, अभिनय-वैशिष्ट्ये यांची अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी यांनी केलेली ही ‘क्लासिक मुशाफिरी’ हवीहवीशी वाटेल! . . मकरंद अनासपुरे --------------------------------------------------------------------- 3) अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या प्रादेशिक चित्रपटांच्या रसास्वादावरील ‘लाईमलाईट प्रादेशिक’ हे पुस्तक वाचलं. बंगाली , कन्नड, गुजराती या भाषा आणि त्यावरील चित्रपट आपल्याला परिचित असतात. पण मैथिली भाषेतील चित्रपटांचा समावेशसुद्धा या पुस्तकात आहे, ही विशेष कौतुकाची बाब आहे! सर्व चित्रपटांचा रसास्वाद अतिशय रंजक पद्धतीने घेतला असल्याने हे चित्रपट आवर्जून बघावेसे वाटतात. प्रादेशिक चित्रपटांवरील एक पुस्तक मराठीतून येते आहे, हा निश्चितच एक आनंददायी ठेवा आहे! या पुस्तकाविषयीची अधिक माहिती आपण लेखकद्वयींनी गप्पांच्या स्वरूपात एखाद्या पॉडकास्टवर दिली तर प्रादेशिक चित्रपट अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास वाटतो. खूप खूप अभिनंदन! . . सोनाली कुलकर्णी
-
Firangoji Narsala Hiroji Indulkar Balaji Aavaji (फिरंगोजी नरसाळा हिरोजी इंदुलकर बाळाजी आवजी)
फिरंगोजी नरसाळा हे एक चाकणचे अतिशय शूर किल्लेदार होते. त्यांनी शाहिस्तेखानाच्या वीस हजार सैन्याला अवघ्या तीनशे मावळ्यांनिशी तब्बल छप्पन दिवस झुंजवले! त्यांच्या पराक्रमाची दखल घेऊन शिवरायांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. वास्तूविशारद हिरोजी इंदुलकर यांनी आरमारी राजधानी सिंधुदुर्ग व रायगड यांची केलेली रचना म्हणजे वास्तूकलेचा उत्तम नमुना होय. एवढे मोठे कार्य करुनही 'सेवेचे ठायी तत्पर ' एवढे जगदीश्वराच्या मंदिरावर लिहून आपली स्वामीनिष्ठा व उदारपणा त्यांनी दाखवला. शिवरायांना राजापुरात गवसलेले सर्वात अनमोल रत्न म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस होय. त्यांनी स्वराज्याची सेवा अतिशय निष्ठेने केली. त्यांचे मोत्यासारखे अक्षर व पत्राचा मायना यामुळे राज्यातील व परराज्यातील अनेक नाजुक प्रश्न त्यांनी सोडवले होते. शिवरायांनी त्यांना चिटणीसी व पालखीचा मान दिला होता.
-
Tanaji Malusare (तानाजी मालुसरे)
तानाजी मालुसरे’ हे नाव ऐकले तरी मराठी माणसाच्या मनात स्वाभिमान जागृत होतो.अगदी आधुनिक काळातही कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना आपले काम निष्ठेने व प्राधान्यक्रमाने कसे करावे,हे तानाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केल्यावर समजते. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तळकोकण मोहिमेच्यावेळी सूर्यराव सुर्वे यांनी रात्रीच्या वेळी अचानक हल्ला केला तरीही तानाजीराव विचलित झाले नाहीत.प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने विजय संपादन करता येतो,हेच तानाजी मालुसरे यांनी आपल्या पराक्रमाने दाखवून दिले. अफजलखान प्रसंग,कारतलबखान व शायिस्तेखान वधाप्रसंगी तानाजी मालुसरे हे सावलीसारखे शिवरायांबरोबर होते.या प्रसंगांत त्यांनी गाजवलेला पराक्रम विलक्षण होता.सिंहगड मोहिमेत तानाजीराव व उदयभान यांची झालेली झुंज मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाली. युद्धस्थळी तानाजी मालुसरे यांच्यासमोर कोणाचाही टिकाव लागणे शक्य नसे.कितीही संकटे आली तरी आपल्या छातीचा कोट करुन ते संकटांना सामोरे जात.शिवरायांच्या एकनिष्ठ मावळ्यांमध्ये तानाजीराव हे केवळ इतिहासातच नव्हे,तर लोककथांमध्येही अजरामर झाले.
-
Hambirrav Mohite (हंबीरराव मोहिते)
हंबीरराव मोहिते म्हटले की , डोळ्यासमोर येतो एक रांगडा मराठा गडी! उंच देहयष्टी ,चेह-यावर राकट व करारीपणा , गालावर मोठ्या मिशा असलेले मर्दगडी ,डोक्यावर सरसेनापती पदाचा मुकुट, गळ्यात मोत्यांच्या माळा व हाती दुधारी तलवार असलेले एक रुबाबदार व्यक्तीमत्व होय.! छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभू महाराजांच्या काळात आपल्या अमोघ कार्याचा ठसा उमटवणारे हंबीरराव मोहिते हे एक विलक्षण व्यक्तीमत्व होते. 'मोडेल पण वाकणार नाही' या वृत्तीचे तसेच आपल्या तत्वांशी कधीही प्रतारणा न करणारे हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू रणांगणावर शत्रूशी लढताना झाला. आपल्या मृत्यूआधिही मुघलांना धूळ चारत त्यांनी विजयश्री संपादन करुन हिंदवी स्वराज्याला शेवटचा मुजरा केला.
-
Murarbaji Deshpande (मुरारबाजी देशपांडे)
जावळीच्या मोऱ्यांशी लढताना शत्रूसेनेतील मुरारबाजी देशपांड्यांची आवेशपूर्ण लढत पाहून महाराज इतके प्रभावित झाले की, जणू त्यांना हिराच गवसला! पुढे पुरंदरच्या लढाईत मुरारबाजींनी गाजवलेले शौर्य पाहून दिलेरखानही थक्क झाला. या लढाईत त्यांनी प्रचंड पराक्रम गाजवला आणि अखेर ते धारातीर्थी पडले. खेडेबारेतील नऱ्हेकर देशपांड्यांच्या तीन पिढ्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण वेचले. बापूजी देशपांडे यांनी दोन वेळा सिंहगड स्वराज्यात आणून मोलाची कामगिरी केली. त्यांचे पुत्र चिमणाजी आणि बाळाजी यांनी लालमहालावरील हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याच परंपरेतील नारो देशपांडे यांचा मुलगा केसो नारायण आणि नातू नारायण देशपांडे हे आजोबा, पुत्र आणि नातू हिंदवी स्वराज्यासाठी वेगवेगळ्या लढायांत धारातीर्थी पडले.
-
Kanhoji Jedhe Jivaji Mahala (कान्होजी जेधे जिवाजी महाला)
कान्होजीराव जेधे हे स्वराज्यातील जुने जाणते व्यक्तिमत्त्व होते. ते शहाजीराजे भोसले यांचे विश्वासू सरदार होते. शहाजीराजे नेहमी म्हणत, 'मावळात सर्वांत जबरदस्त वतनदार असेल तर ते कान्होजी होय'. कान्होजी हे आदिलशाहच्या दरबारी वतनदार होते. त्यामुळे अफजलखान प्रकरणी कान्होजी जेधेंना आपल्या बाजुला वळवण्यासाठी आदिलशहा व अफजलखानाने प्रयत्न केला. कान्होजींनी स्वराज्याशी एकनिष्ठता दाखवत शिवाजी महाराजांना साथ दिली त्याबरोबरच मावळ भागातील सर्व देशमुखांना एकत्र करुन स्वराज्यात आणले. भेदक नजर, भरभक्कम शरीरयष्टी असलेल्या जिवाजी महाला या दांडपट्टा बहाद्दराने अत्यंत चपळाईने शिवाजी महाराजांवर हत्यार उगारलेला सय्यद बंडाचा हात क्षणार्धात हत्यारासह कलम केला. त्यानंतर पुन्हा दांडपट्टा फिरवून त्याची जागेवरच खांडोळी केली. क्षणाचाही विलंब जिवावर बेतला असता. कान्होजीराव जेधे व जिवाजी महाला यांचे जीवन संघर्षाने भरलेले होते. तरी त्यांनी नशीब व भाग्य या गोष्टींना दोष न देता या संघर्षातून मार्ग काढला त्यामुळे ते मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाले.
-
Yesaji Kank Kondhaji Farjand (येसाजी कंक कोंडाजी फर्जंद)
येसाजी कंक हे चपळ, निर्भय व धाडसी व्यक्तिमत्त्व जे महाकाय हत्तीसमोरही दिमाखात जमिनीवर पाय रोवून उभे होते. शिवरायांचा प्रत्येक मावळा हत्तीएवढ्या ताकदीचा आहे, याचे हे प्रत्यक्षदर्शी उदाहरण होय. कोंडाजी फर्जंद म्हणजे अचाट धाडस, शत्रूच्या हद्दीत जाऊन त्याला तुंबळ युद्धासाठी पुकारणारा महावीर होय. भीती हा प्रकारच जणू या वीराला माहीत नव्हता. पन्हाळगड मोहीम यशस्वी करणार्या या वीराला जंजिरा मोहिमेत वीरमरण आले. या दोन्ही स्वामीनिष्ठ वीरांनी स्वराज्यासाठी जगायचे अन् स्वराज्यासाठीच मरायचे, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले.