-
Jaganyachi Gatha (जगण्याची गाथा)
आधुनिकरणाच्या टप्प्यावर गावाची प्रचंड पडझड होत आहे. भौतिक साधने व यंत्रसामगीच्या धावत्या गतीमुळे मानवी जीवनाचा कायाकल्प अपरिहार्य ठरतो आहे. नवी मने घडत आहेत. जागतीकिकरणाने प्रभावित काळाचे दृश्य स्वरुपबरोबरच मानवी आंतरिकतेवरही आघात होत आहेत. हा कालबदलतील दुभंग, पेच मोहन कुंभार याच्या कवितेत मध्यवर्ती आहे. नगर केंद्री मानवी कोलाहलाच अटीतटीचा संघर्ष या कवितेत आहे. शहर आणि गाव या व्द्व्दसमासातून तो व्यक्त झाला आहे . तो भूत आणि वर्तमानाशी सांधलेला आहे .शहरकेन्द्रि मूल्यांच्या चौखूर आक्रमणाची नोंद या कवितेत आहे . एका अर्थाने भूमी ,प्रदेश व संस्कृतीवरील हे आक्रमण आहे . भूतकाळातील विसाव्याच्या सावलीतून त्याच्या वाट्याला आलेल्या परके व पोरकेपणाची जाणीव आहे . याचा शेवट काय असेल या भीतीचे सावट तीवर आहे. मायनिगरुपाने शेती व प्रदेश बेचिराख करणाऱ्या काळ्या सावलीचे गडद सूचन या कवितेत आहे . वर्तमानातल्या क्षणांना तोलून धरणारी विसाव्याच्या सृष्टीतील ओलाव्याची क्षणचित्रे या संवेदनशीलतेत आहेत . ती संयत अशा भाषारुपातून व तळाकोकनी बोलीचिन्हांच्या लयींतून अवतीर्ण झाली आहेत . भूमी , निसर्ग व मानवी जगावर होणाऱ्या आक्रमणाची नोंद यंत्रसंस्कृतीशी निगडीत हिंस्त्र प्रतिमांमधून घेतली गेली आहे . मनुष्य व निसर्गाजीवनातला अस्वस्थ . कालस्वर जगण्याची गाथा मधून व्यक्त झालेला आहे .
-
Moulin Rouge (मुलाँ रूज)
"मुलॉं रूज' ही हेन्री या फ्रान्समधल्या एका चित्रकाराची कहाणी आहे. फ्रान्समधील तुलूझ लोत्रेक या प्रख्यात घराण्यात जन्मलेला हेन्री ऐन शैशवाच्या उंबरठ्यावर एका विचित्र आजाराची शिकार होतो. त्यामुळे त्याच्या कंबरेखालील शरीराची वाढ खुंटते. आजारपणामुळे बिछान्यावर खिळलेल्या मुलाचे हेंगाडे रूप पाहून वडील तोंड फिरवून निघून जातात, तर आई एकुलत्या एक मुलाच्या भवितव्याच्या चिंतेने अश्रू ढाळीत बसते. अशा अवस्थेतील हेन्रीची चित्रकार बनण्याची इच्छा राजघराण्याच्या लौकिकाला साजेशी नसली, तरी हट्टाने तो चित्रकलेचे शिक्षण घेण्याचे ठरवतो. त्यासाठी तो पॅरिसच्या गावकुसाबाहेरील मोंमार्त्र या वस्तीत राहायला जातो. आपल्या तोलामोलाच्या राजघराण्याच्या जगापेक्षा मोंमार्त्रमधील कष्टाचे, मोलमजुरीचे काम करणारे सामान्य लोक, सर्कस व नाटकातील कलाकार या विश्वात तो समरसून रममाण होतो. आपल्या सभोवतीच्या रंगिल्या नशाजीवनाची त्याने केलेली पेंटिंग्ज आणि पोस्टर्स यांनी तुलूझ लोत्रेकला आधुनिक चित्रकलेच्या प्रवाहात स्वतःचे स्थान मिळवून दिले.
-
Dakin - Ek Amanavi Pratha (डाकीण एक अमानवी प्रथा)
‘डाकीण- एक अमानवी प्रथा’ या संध्या नरे-पवार लिखित पुस्तकात नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड या महाराष्ट्रातील जिल्ह्य़ांमध्ये आजही आदिवासी समाजात ठाण मांडून असलेल्या डाकीण प्रथेचा आणि त्यानिमित्ताने मानवसमाजाच्या इतिहासात ही अघोरी प्रथा कशी जन्माला आली, तिची पाळंमुळं, तिचा सर्वदूर प्रसार, त्यातून पुरुषप्रधान व्यवस्थेद्वारे स्त्रीजातीचं होणारं दमन, शोषण याचा सर्वागीण वेध घेण्यात आलेला आहे.
-
Shivaji Kon Hota ? (शिवाजी कोण होता ? )
इतिहासातील थोर पुरुषांना वेठीस धरून स्वार्थ साधण्याचा खेळ आपल्या देशात वर्षानुवर्ष सुरू असल्यामुळेच या थोर पुरुषांची नेमकी ओळख करून घेणं जरुरीचं असतं. कारण इतिहासाचं विकृतीकरण करून या थोर पुरुषांची खरं तर बदनामीच झालेली असते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत गोविंद पानसरे यांनी `शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहून फार मोठी कामगिरी २२ वर्षांपूर्वीच बजावलेली आहे. खरं तर हे पुस्तक नव्हेच ती एक छोटेखानी, अवघ्या ७४ पानांची पुस्तिका आहे. पण त्या पुस्तकातून पानसरे यांनी उभं केलेलं छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्त्व, हे कोणाला सातशे पानं लिहून जमणार नाही, इतकं प्रभावी आहे. छत्रपतींविषयी समाजात वेगवेगळय़ा प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्षं केलं जात आहे. शिवरायांच्या हयातीतच त्यास प्रारंभ झाला होता, ही बाब तर सर्वश्रुतच आहे. पण पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी'चा राजा होता, ते दाखवून दिलं आहे
-
Menduchya Antarangat
जिल टेलर या मेंदूवर संशोधन करणाऱ्या स्वतःलाच ब्रेन स्ट्रोक झाला ; त्या साक्षात्कारी अनुभवाची कथा .....
-
Phoenixchya Rakhetun Uthla Mor
'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' हा नाटककार जयंत पवार यांचा पहिला कथासंग्रह. या संग्रहात एकूण सात कथा आहेत. त्यातल्या बहुतेक कथांना पार्श्वभूमी आहे ती या मुंबईची, तिथल्या गिरणगावाची, कामगारवस्तींची, चाळसंस्कृतीची, तिथल्या सामान्य माणसाची आणि त्याच्या छोट्या मोठ्या आनंदाची, दु:खाची, शल्यांची, ताणांची आणि माणसाच्या कोतेपणाची, त्याच्याच लपलेल्या अहंपणाची.