Manatal... Manapasun ( मनातलं ... मनापासून )
जीवनातील वाटा - वळणांवर पावलं टाकताना, प्रत्येकाच्या वाटयाला, कळत-नकळत नकोसा वाटणारा प्रवासही येतो. त्याला ब-याचवेळा आपणच जबाबदार असतो. हे न कळल्यामुळे त्यातून निर्माण होणा-या मानसिक संघर्षात, बुद्धी आणि भावना यांचा समतोल बिघडतो. आणि संभ्रम उत्पन्न होतो. अशा वेळी आपल्याला गरज असते ती, 'मनातलं, मनापासून' समजून घेणा-याची! ती गरज हे पुस्तक पूर्ण तर करीलच, शिवाय 'मनातलं सांगा आणि मनापासून जगा', हेही जाणवून देईल!