Lakshyavedh (लक्ष्यवेध)
सुलतानी राजवटीविरुद्ध उठाव करून हिंदूंचं स्वतंत्र राज्य उभं करण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी उभं आयुष्य वेचलं स्वराज्य उभ करताना सुरुवातीला अनेक संकटं उभी राहिली. या संकटापैकी सर्वात पहिलं आणि मोठं संकट म्हणजे अफझलखानाची स्वारी. प्रचंड सैन्यानिशी खानानं स्वराज्यावर चढाई केली. राजांना जिवंत पकडून नेण्याची त्याची गर्वोक्ती होती. तर खानाला मारल्याशिवाय स्वराज्याबद्दल दबदबा निर्माण होणार नाही हे राजे जाणून होते. शिवाजी अफजल भेटीत जे भीषण नाट्य घडले आणि जी अभूतपूर्व कत्तल मराठ्यांनी केली त्याला इतिहासात तोड नाही. या विलक्षण नाट्याचे चित्रण करणारी ही कादंबरी.