Kunya Ekachi Dharangatha (कुण्या एकाची धरणगाथा)
नाशिक जिल्ह्यातला बागलाण तालुक्याचा परिसर हा वर्षानुवर्षे पाण्यासाठी तहानलेला भाग. इथल्याच गोपाळ मोरे नावाच्या गरीब शेतक-याने हा भाग पाण्यात भिजवण्याची इच्छा मनात धरली आणि तिचा चिवट वृत्तीने पाठपुरावाही केला. या इच्छेपोटी आमदारापासून पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांचा पिच्छा पुरवला...आणि शेवटी आपल्या दुर्दम्य आकांक्षा आणि परिश्रमांनी धरण मिळवलंच. त्याची ही गोष्ट..इतिहासातले तुटक धागेदोरे जुळवत पन्नास वर्षांच्या अज्ञातवासातून बाहेर काढलेली...