Trikalsandhya ( त्रिकालसंध्या)
ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक. त्यांचा लहानपणापासूनचा प्रवास यात आहे. पत्रकारितेतील अनुभव, त्याचबरोबर अनंतराव भालेराव, बाबा दळवी यांच्याकडून कसं शिकायला मिळालं, ते लिहितानाच या दोघांचंही व्यक्तिचित्र नेमकेपणानं मांडलं आहे. पत्रकारितेत आलेले अनुभव सांगताना न्यायालयीन खटले, विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांचं वागणं, याबाबत विस्तारानं लिहिलं आहे.