Ramrao Kahani Bhartachya Sheti Sankatachi (रामराव कहाणी भारताच्या शेती संकटाची)
शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखल्या जाणार्या महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील कापूस उत्पादक रामराव पंचलेनीवार यांनी २०१४ मधील एका सकाळी दोन बाटल्या कीटकनाशक प्राशन केले. जर आत्मघाताचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला असता तर शेतकरी आत्महत्येच्या आकड्यांमधील ( आता अप्रकाशित ) इतरांसारख्या एक आकडा बनून राहिले असते. कारण भारतात प्रत्येक तीस मिनिटाला एक शेतकरी आपले प्राण गमावतो. केवळ महाराष्ट्रातच गेल्या दोन दशकांत अशा ६० हजार आत्महत्या झालेल्या आहेत. पण चमत्कार व्हावा तसे रामराव यातून बचावले. रामरावांच्या माध्यमातून त्यांनी शेती संकट सोप्या शब्दांत मांडले आहे. या माध्यमातून त्यांनी भारतीय शेतकर्याचे दैनंदिन आयुष्य आणि त्यातील आव्हाने जशीच्या तशी वाचकांसमोर उलगडली आहेत. त्यांचा संघर्ष आणि अनेक बाबतींत येणारे अपयश, दलदलित फसावे अशा समस्यांना त्याचे तोंड देणे आणि या सगळ्याचा शेवट करण्यासाठी त्याला टोकाचा निर्णय घ्यावा लागणे हा सगळा पटच वाचकांसमोर उभा राहतो.