Lagebandhe (लागेबांधे)
अजाणत्या वयात जवळच्या नातेसंबंधातील व्यक्तींनी केलेल्या मानसिक-भावनिक पोषणाचे संस्कार आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम करणारे ठरतात. दारिद्यातही मनाची श्रीमंती जपणार्या काही व्यक्ती मधु मंगेश कर्णिक यांच्या आयुष्यात आल्या. त्यांच्याशी असलेले `लागेबांधे’ या पुस्तकातून हळूवारपणे व्यक्त झाले आहेत. आयुष्यभर पुरेल अशा अगणित कडूगोड आठवणींची शिदोरी देणार्या मंगेशदादा, आतेबाय, होनीआजी, वारणामावशी, अनू, प्रेमा यांसारख्या सुहृदांविषयी केलेले आत्मीय लेखन.