Karanta (करंटा)
स्वातंत्र्योत्तर कालखंडामधील अनेक स्तरांवरील नैतिक अधः पतनाची कथा भाऊ पाध्ये यांच्या करंटा या कादंबरीतून साकार होते. या कादंबरीमधून मुंबईसारख्या औद्योगिक शहरातील कामगार युनियनचे जग त्याला असलेल्या अनेक परीमानांसह उभे राहते. स्वार्थाचा स्पर्श न झालेला कार्यकर्ता आझादचाचा, परवड झालेले त्याचे कौटुंबिक आयुष्य, मूल्यनिष्ठ माणसांची ससेहोलपट करणारे युनियनमधील राजकारण, या साऱ्याला असलेले आर्थिक संदर्भ या सर्व गोष्टींचा लेखाजोखा भाऊ पाध्ये अत्यंत तटस्थपणे मांडतात. कामगार चळवळीचे आतून चित्रण करताना त्यांची मानुस्पनावरची नजर किंचीतशीही हटत नाही. -हरिश्चंद्र थोरात