Gokulgatha (गोकुळगाथा)
पाच लाख म्हशी. दोन लाख गायी. अठराशे कर्मचारी. असंख्य उत्पादक. चाळीस लाख ग्राहक. या साऱ्याचं नांदत कुटुंब म्हणजे कोल्हापूरचा दुधसंघ- 'गोकुळ'. आणि या 'गोकुळ'ला प्रगतीपथावर नेणारा नंदागोप म्हणजे अरुण नरके. सलग दहा वर्ष या संघाचं अध्यक्षपद भूषवणारे अरुण नरके म्हणजेच गोकुळ अन गोकुळ म्हणजेच अरुण नरके असं समीकरण सिद्ध झालेलं. म्हणूनच अरुण नरके यांनी सांगितलेलं आत्मकथन बनलंय, 'गोकुळगाथा'.