Sanvad Parmeshwarashi (संवाद परमेश्वराशी)
मानव परिवाराचं पुनरुज्जीवन करणं, हा संवाद परमेश्वराशी – भाग ३’ या पुस्तकामागचा उद्देश आहे. स्वत:ला जाणून घेऊन नव्या दिशेने कसं जायचं याचं मार्गदर्शन या पुस्तकात केलं आहे. केवळ माणसाच्या जन्माला येणं, जगणं आणि मरणं, एवढीच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता नाही, तर अखंडपणे स्वत:ची उन्नती करत राहणं, हे त्याच्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे, असा विचार या पुस्तकात मांडला आहे. आपण कोण आहोत आणि काय होऊ शकतो याबद्दल हे पुस्तक बोलतं. ते जुन्या आणि नव्या मार्गांबद्दल संगतं, तसंच ते नव्या-जुन्या समजुती, कालबाह्य संकल्पना आणि सदैव उपयोगी संकल्पना यावरही भाष्य करतं. भूत आणि भविष्याच्या मध्यावर उभा राहून माणूस सतत प्रगती कशी करत राहील, नवनिर्मितीच्या दिशेने त्याची पावलं कशी पडतील, याचं विस्तृत विवेचन या पुस्तकातून केलं आहे.