Spashta Bolayach Tar (स्पष्ट बोलायचं तर)
२०१४ ते २०१७ या काळातल्या प्रमुख घटनांचा वेध या लेखसंग्रहात आहे. २०१४ च्या मे महिन्यात नरेंद्र मोदी बहुमत मिळवून पंतप्रधान झाले. विकासाची स्वप्नं आणि मनमोहनसिंग सरकारविरुद्धचा राग अशा घोड्यावर मोदी स्वार झाले होते. त्यांच्या विजयाने जनतेत एक नवी आशा निर्माण झाली होती. पण पहिल्या शंभर दिवसातच या आशेला तडा जायला सुरुवात झाली. सर्व राजकारण एका नेत्याभोवती फिरु लागलं. विकास राहिला बाजूला आणि नवे राजकीय, सामाजिक, आर्थिक तणाव राज्या-राज्यात निर्माण झाले. प्रामुख्याने या तणावांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न मी या लेखसंग्रहात केला आहे.