Lankecha Sangram (लंकेचा संग्राम)
लंका जळेल, अंधःकार व्यापेल. पण प्रकाश टिकू शकेल? भारत, खिपू ३४०० वखवख. राग. दुःख. धुमसते निखारे, युद्धाची ठिणगी पेटवण्यासाठी अधीर पण हे युद्ध वेगळे आहे. हे धर्मासाठी आहे. सर्वश्रेष्ठ देवीसाठी हे युद्ध आहे. सीतेचे अपहरण झालेले आहे. निडरपणे ती रावणाला तिला ठार मारण्याचं आव्हान देते - रामाला शरण यायला लावण्यापेक्षा ती मरण पत्करेल. दुःखाने आणि क्रोधाने राम वेडापिसा झाला आहे. तो युद्धाच्या तयारीत आहे. संताप हे त्याचे इंधन आहे. एकाग्रचित्तता हे त्याचे सुकाणू आहे. आपण अजिंक्य आहोत अशी रावणाची समजूत होती. आपण वाटाघाटी करून शरणागती घडवून आणू असा त्याचा विचार होता. त्याला माहीत नव्हतं... भारतीय प्रकाशन विश्वातील सर्वात वेगवान खपाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मालिकेतील -राम चंद्र मालिकेतील पहिली तीन पुस्तके राम, सीता आणि रावण यांच्या वैयक्तिक प्रवासाचा शोध घेतात. या विशेष चौथ्या पुस्तकात, त्यांच्या कथांचे धागे एकमेकांवर आदळतात आणि स्फोट होतो एका नृशंस संग्रामाचा. धर्मनियमांनी बांधलेला राम निर्दय, क्रूर रावणाचा पराभव करेल? लंका भस्मसात होईल, की कॉडलेल्या वाघासारखी पलटून तुटून पडेल? विजयासाठी युद्धाची भयानक किंमत मोजावीच लागेल का? सर्वात महत्त्वाचे, विष्णूचे उत्थान होईल? आणि या भूमीच्या खऱ्या शत्रूंना विष्णूचे भय वाटेल? कारण भीतीपोटीच प्रेम जन्म घेते. "अमीश भारताचा सर्वात मोठा साहित्यिक रॉकस्टार आहे.' - शेखर कपूर