-
Die for me (डाय फॉर मी)
आपला श्वास रोखून धरायला लावणारी रहस्यमय कादंबरी..
-
Ayushyache dhade giravtana (आयुष्याचे धडे गिरवताना
आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात, अनेक घटना-प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातून वेगवेगळे अनुभव येतात. त्यातले काही अनुभव चांगले असतात, काही घटना वाईट. काही सुखकारक असतात, तर काही दु:खदायक. काही व्यक्ती चमत्कारिक असतात, तर काही अनुभव मन थक्क करणारे.... हे अनुभव, या व्यक्ती आपल्याला बरेच काही शिकवून जातात. आपले आयुष्य विविध अंगांनी संपन्न करतात; परिपक्व बनवतात. या संग्रहात सुधा मूर्ती यांनी या अनुभवांना आणि व्यक्तिरेखांना कथारूप दिले आहे. या कथा जशा सुधा मूर्ती यांच्या आहेत, तशा त्या तुमच्या-आमच्या आहेत; विलक्षण चमत्कृतींनी भरलेल्या, गुंतागुंतीच्या जीवनाविषयीच्या आहेत. सहजसोप्या कथनशैलीतून उलगडत जाणाऱ्या या कथा ‘आयुष्याचे धडे’ देतात; अंतर्मुख करतात.
-
The Darker Side (द डार्कर साइड)
अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीचा (...की मुलाचा?) विमानात, तीस हजार फूट उंचीवर झालेला खून म्हणजे; हिंस्र मधमाशांच्या पोळ्यावर मारलेला दगडच ठरतो. एकामागोमाग एक खून उघडकीस येतात. खुनी माणूस जाहीररीत्या पूर्वसूचना देऊन खून करू लागतो. या खुन्याची शिकार करायला निघाली आहे; एफ.बी.आय.ची स्पेशल एजंट स्मोकी बॅरेट. भूतकाळाचं प्रचंड ओझं मनावर असलेली, एका हल्ल्यात पती व मुलीला गमावून बसलेली, बलात्कार झालेली आणि तरीही त्वेषाने खुन्याला पकडण्यासाठी सज्ज झालेली! कोण बाजी मारणार या अघोरी सामन्यात? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या कथासूत्रात गुरफटून जाण्यासाठी तयार व्हा! लीसा रीडच्या खुन्याचा तपास एजंट बॅरेटच्या हाताखाली चालू असतो, तोच रोझमेरीच्या खुनाची बातमी येते आणि समोर येते, एक काळीकुट्ट खुनांची मालिका...
-
Chintamukt Jivan (चिंतामुक्त जीवन)
शरीराला सबल करण्यासाठी ज्याप्रमाने जीवनसत्व, प्रथिने व पौष्टिक पदार्थांची जरुरी असते, त्याचप्रमाने मनाला क्रियाशील व उत्साही बनविण्यासाठी खास 'मानसिक' पौष्टिक अहराची जरुरी असते. मनात व शरीरात खोलवर दडलेले ताणतणाव दूर करून आनंदी जीवन जगण्याचे अनंत उपाय या पुस्तकात दिलेले आहेत. यात भीतीवर विजय कस मिळवाव. ताजेतवाने कसे रहावे. स्वत:ला कसे ओळखावे. अश्या अनेक समस्यांवर मानसशास्त्रीय सुयोग्य मार्गदर्शन केले आहे. चिंतामुक्त यशस्वी जीवनासाठी सर्वतर्हेचे ' मानसिक पौष्टिक आहार ' पुरविण्याचे प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
-
Gammat Goshti (गंमत गोष्टी)
खासबातमीचं भांडवल करणाया किसन न्हाव्याची तहा... पंचनाम्यात दुरुस्ती कशी करायची याचे प्रात्यक्षिक घेणारा नारायण कॉन्स्टेबल... दिल्लीला प्रदर्शन पाहण्यास निघालेल्या पाटलांनी घेतलेले विशेष ‘दर्शन’.... डिगूनानांच्या क्रियाकर्माला केवळ पैशांमुळे मिळालेला ‘वारस’....! नवशिक्षणशास्त्राचा प्रयोग बासनात गुंडाळून; पुन्हा ‘विद्या येई’चा पाठ गिरवणारे नवशिका शिक्षक... वधूसंशोधनाऐवजी ‘बुद्रुक’ का ‘खुर्द’ या फेऱ्यातच अडकलेला वर... अन् लगीन घरात सफाईने हात मारून सर्वांसमक्ष पोबारा करणारा ‘भामटा’.... ...या आणि अशाच इरसाल पात्रांचा आपल्या ग्रामीण शैलीतून मागोवा घेणाया द.मा. मिरासदारांच्या ‘गंमत गोष्टी’!
-
Bhutacha Janma (भुताचा जन्म)
...ही भुते कुठेही असू शकतात. ती अमक्या ठिकाणी नाहीत, असे कुणालाही छातीवर हात ठेवून सांगता यायचे नाही. साधारणपणे सांगायचे म्हणजे ती कुठल्याही पडक्या वाड्यात, विहिरीत, मसणवटीत असतातच. विशेषत: विहिरीत हडळ असते आणि ती सुंदर बाईचे रूप घेऊन इकडेतिकडे हिंडत असते. पिंपळावर तर मुंजा हटकून असतो आणि वड, पिंपरणी, लिंब असल्या झाडांवरही भुते माकडासारखी गर्दी करून बसलेली असतात. दिवसा ती काही करीत नसली, तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते. त्या वेळी मात्र ती कुठेही आणि कुणाच्याही वेषात भेटतात. त्यांचे पाय उलटे असतात असे म्हणतात; पण तसे काही त्यांच्यावर बंधनच आहे असे नाही. अमावस्येच्या रात्री तर ती हमखास फिरायला निघालेली असतात. अशा वेळी त्यांच्यासंबंधी काहीही बोलणे अगर त्यांच्या दृष्टीस पडणे, हे धोक्याचे असते.
-
Gudgulya (गुदगुल्या)
काही वर्षांपूर्वी मराठी लघुकथेला नवा बहर आला. जुनी चाकोरी सोडून धीट अशा काही नव्या वाटा पडल्या. या वाटांपैकी गावाकडील गोष्टी सांगणारी वाट सवघड. म्हणून त्या दिशेने वर्दळ वाढली. इतकी की बघता बघता पाऊलवाटेचा गाडीरस्ता झाला, अनेक चाकोया उमटल्या, फुपोटा उडू लागला, अनेक ग्रामीण कथा लिहिल्या गेल्या. ग्रामीणकथेच्या निशाणाखाली आज पुष्कळ शिलेदारांची गर्दी झालेली आढळते. पण मिरासदारांनी पाडलेली वाट अजून पाऊलवाटच आहे. तिच्यावर गर्दी उसळलेली नाही. कारण ती वाट सवघड नाही. उत्तम म्हणून गाजलेल्या मिरासदारांच्या कथांतून गावरान विनोद अगदी जसाच्या तसा आढळतो. हेच मिरासदारांचे अपूर्व असे यश आहे.
-
Chutkyachya Goshti (चुटक्याच्या गोष्टी)
गावात आलेल्या भोंदू "महाराजा`ची साक्ष शिवा जमदाडेबाबत खरी ठरते, तेव्हा... घरात शिरलेल्या चोरांना एक " धोरण` ठरवून रामभाऊ किल्ल्या देतात, तेव्हा... गावाचा "विकास` करायला विकासयोजना अ¬धिकारी नकार देतो, तेव्हा... अपघातात सापडलेल्या तलाठ्याविषयी गावकऱ्यांना वाटणारी "हळहळ` तिरस्कारात बदलते, तेव्हा... पैज लावणाऱ्या दामूची फजिती होते अन् ती त्याच्या जीवावर बेतते, तेव्हा... बायको आजारी पडावी यासाठी खटाटोप करणाऱ्या नवऱ्याच्या प्रयत्नांना यश येते, तेव्हा... पारावरच्या पाटलांची थाप खरी ठरते, तेव्हा... ग्रामसु¬धार योजनेच्या माध्यमातून शाळेची "प्रगती` होते, तेव्हा... "हेळातील भीषण प्रकार` पोरखेळ ठरतो, तेहा... भविष्य बघण्याचा "नाद` असलेल्या दत्तूचं भविष्य खरं ठरतं, तेव्हा.... द. मां. च्या "चुटक्याच्या गोष्टी` मधून मानवी स्वभावाचे विवि¬ध पैलू आपल्या समोर येतात. त्यातील काही आपल्याला अंतर्मुख करतात... तर काही हसवतात...!
-
Mi Ladachi maina Tumchi (मी लाडाची मैना तुमची)
मराठी रंगभूमीला वगनाट्याची ओळख नवी नाही. विच्छा माझी पुरी करा च्या लोकप्रियतेने ते सिद्धही केले आहे. वगनाट्याचे हे तंत्र अगदीच लवचिक असते... कलावंताच्या प्रतिभेनुसार आणि प्रयोगानुसार त्यात सतत बदल घडत असतात... त्यामुळेच वगनाट्याची गणना ‘स्वैर’ नाट्यात होत असावी.... ...वगनाट्याची ही लोकप्रियता लक्षात घेऊन, द. मा. मिरासदारांनी मी लाडाची मौना तुमची या गाजलेल्या वगनाट्याचे पुस्तकात रूपांतर केले. या वगनाट्याचे वौशिष्ट म्हणजे यासाठी लागणारा गण, गौळण, लावणी आणि मधला वग ही सगळी गीतरचना कै. ग. दि. माडगूळकर यांनी केली आहे. ...वगनाट्याच्या ऐवजी ‘प्रहसन’ (फार्स) म्हणूनही ते रंगमंचावर येऊ शकेल. यासाठी केलेला हा पुस्तकरूपी प्रयत् निश्चितच वाखाण्याजोगा आहे. ‘सोकाजीराव टांगमारे’ या नावाने आजही त्याचे प्रयोग होत आहेत.
-
Ganara Mulukh (गाणारा मुलुख)
ठणठणपूरच्या चक्रमादित्य महाराजांकडे एक गानसेन नावाचा गवई येतो. त्याच्या अदाकारीवर महाराज फिदा होतात. गवयाची इच्छा पूर्ण करायची म्हणून एक अचाट आदेश आपल्या प्रजेला लागू करतात. त्यामुळे होणाया गंमती अनुभवा ‘गाणारा मुलुख’ या नाटिकेमध्ये.
-
The Feast Of God ( द फिस्ट ऑफ गॉड)
प्रत्येक युद्धातून आपल्याला काही ना काही बोध घेण्यासारखा असतो. पण तसा तो घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे हे खरे महत्त्वाचे असते. नाहीतर युद्धात जे सैनिक किंवा नागरिक प्राणास मुकले असतील, त्यांचे बलिदान व्यर्थच ठरते. इराक-कुवेत. युद्धानेही एक धडा जगाला शिकवला आहे. फ्रेडरिक फोरसीथ यांच्या बहुतेक कादंबर्या या एखाद्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या असतात. प्रस्तुत मूळ कादंबरीचे स्वरूपही असेच आहे. इराक-कुवेत युद्धाच्या आणि त्या वेळी जगभरात देशोदशी घडलेल्या राजकीय घटनांच्या प्रचंड पार्श्वभूमीवर एका प्रत्यक्ष घडलेल्या युद्धाच्या इतिहासामध्ये कौशल्यपूर्ण रीतीने गुंफलेली काल्पनिक पात्रांची कथानके, असे या मूळ पुस्तकाचे दोन पदर आहेत. त्यामुळे या पुस्तकाची भाषाशैलीही त्यांनी अपरिहार्यपणे दोन वेगळ्या प्रकारची वापरलेली आहे. मूळ पुस्तकात जेव्हा इतिहासात घडलेले प्रसंग किंवा राजकीय घडामोडी वर्णन केल्या आहेत, तेव्हा फोरसीथ यांची भाषा स्वाभाविकपणे काहीशी कोरडी, एखाद्या वृत्तनिवेदकाच्या शैलीची, त्रयस्थपणे घटनेचे वर्णन करणारी आहे. पण काल्पनिक किंवा खर्या पात्रांमध्ये, काल्पनिक किंवा प्रत्यक्ष घडलेले प्रसंग जेव्हा ते वर्णन करतात, तेव्हा मात्र त्यांची भाषा आपोआपच प्रसंगानुरूप त्या त्या भावना दर्शवणारी, त्या पात्रांच्या क्रिया-प्रतिक्रियांचे अचूक वर्णन करणारी, त्यांचे परस्परसंबंध रंगवणारी अशी झालेली आहे.
-
The Seventh Secret ( द सेव्हन्थ सिक्रेट)
पावलांचा अजिबात आवाज होऊ न देता रेक्स फोस्टर त्या दारापाशी पोहोचला. दाराचं हँडल पकडून त्यानं ते हळूच फिरवलं त्याला कुलूप नव्हतं ! दाराला हलकेच फट पाडून त्यानं पलिकडे नजर टाकली. त्या दारापलीकडे खाली उतरत जाणारा एक जिना त्याला दिसला. आपण एका गुंतागुंतीच्या भुयारी तळघरापाशी येउन पोहोचलो आहोत, असंच त्याला प्रथम वाटलं पण..... दुसर्याच क्षणी त्याचं तोंड आश्चर्यानं वासलं गेलं! त्या जिन्याच्या तळाशी त्याला दुसरा एक फ्युरर बंकर दिसला ! आणि..... आपल्याला काय आढळलंय याची त्याला अकस्मात जाणीव झाली ! ज्याच्या शोधासाठी त्यानं आत्तापर्यंत जिवाचं रान केलं होतं तोच हा जगाला अज्ञात असलेला हिटलरचा गुप्त बंकर होता ! हिटलरच्या भूमिगत साम्राज्यात नेणारी जबरदस्त रहस्यमय कादंबरी ! आयर्विंग वॅलेस यांची प्रचंड लोकप्रिय ठरलेली, 'उत्कृष्ट अनुवाद' म्हणून नावाजल्या गेलेल्या कादंबरीची द्वितीय आवृत्ती.
-
First To Die (फर्स्ट टु डाय)
विक्रमी खपाचे उच्चांक निर्माण करणारा सध्याच्या काळातील लोकप्रिय लेखक जेम्स पॅटरसन यांची एक खळबळजनक रहस्यकथा. वैयक्तिक गंभीर समस्या, सामाजिक सुरक्षेची जबाबदारी आणि नव्यानं फुलणारं प्रेम या तिहेरी पेचात अडकलेल्या लिंडसे बॉक्सर या महिला पोलिस इन्स्पेक्टरची रोमांचक कहाणी. नवपरिणीत जोडप्यांची हत्या करणारा विकृत खुनी आणि त्याला कोर्टासमोर खेचून कडक शासन देण्यासाठी कटिबद्ध झालेला 'वुमेन्स मर्डर क्लब'. भावी सुखी जीवनाची सुंदर स्वप्नं रंगवत हनिमून साजरा करणार्या तरुण वधुवरांचे मृतदेह लाजिरवाण्या अवस्थेत उघडकीस येतात. योजनाबद्ध खून करणारा लिंगपिसाट गुन्हेगार एकेक पुरावा मागे ठेवत पोलिसखात्याची मती गुंग करुन सोडतो आणि या रहस्याची उकल करण्यासाठी, स्वत:च्या अडचणीवर मात करुन, लिंडसे बॉक्सर आकाशपाताळ एक करते. तिच्या या धडपडीला उत्तम साथ देतात, अन्य तीन महिला - एक बातमीदार, एक सरकारी वकील आणि एक शवचिकित्सक डॉक्टर - रहस्याच्या या भोवर्यात वाचकही वेगानं फिरत राहतो...
-
The Last Don ( द लास्ट डॉन)
कोणत्याही स्वरूपाची गुन्हेगारी, ही, खरं तर, जात, धर्म, प्रांत, देश या सगळ्या सीमा ओलांडून सगळ्या प्रकारच्या समाजांत, पार इतिहासपूर्व काळापासून कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात असलेली सामाजिक प्रवृत्ती आहे. हीच गुन्हेगारी जेव्हा संघटित स्वरूप धारण करते, तेव्हा मात्र ती त्या समाजाची, राष्ट्राची -- फार कशाला, सार्या जगाची -- डोकेदुखी बनते आणि समाजाच्या दुर्दैवानं, ज्यांच्याकडं समाजानं न्यायदानाची अपेक्षा करायची, त्या न्यायसंस्थेशी, राजकीय नेत्यांशी किंवा पक्षांशी जर अशा संघटित गुन्हेगारीनं हातमिळवणी केली, तर मात्र या डोकेदुखीचं रूपान्तर अत्यंत झपाट्यानं कॅन्सरमध्ये होतं. सुसंघटित गुन्हेगारी, तीमध्ये गुंतलेली, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभागी असलेली 'माणसं’, तिचे विविध पैलू, पदर, अंतर्प्रवाह, अंतर्गत कलह, त्या 'माणसां’चे विविध मनोव्यापार, या सर्व गोष्टी जनसामान्यांपुढं उलगडून ठेवणारं जे काही लेखन जगभरात झालं आहे, त्यामध्ये जे एक नाव प्रामुख्यानं घेतलं जातं, ते म्हणजे प्रख्यात अमेरिकन लेखक मारिओ पुझो याचं. प्रचंड व्यासंग आणि भरपूर संशोधन करून, ललित लेखनाच्या माध्यमातून; पण बर्याचशा वस्तुनिष्ठ पद्धतीनं, गुन्हेगारांना किंवा गुन्हेगारीला कुठंही देवत्व न देता किंवा त्याचं समर्थनही न करता मारिओ पुझोनं विलक्षण कौशल्यानं हे चित्रण केलेलं आहे. 'द डार्क एरिना’, 'फॉर्च्युनेट पिल्ग्रिम’, 'गॉडफादर’, 'फूल्स डाय’, 'द सिसिलियन’, 'ओमेर्ता’, 'द फोर्थ के’ या त्याच्या याआधीच्या सर्व जगभरात गाजलेल्या कादंबर्या आहेत. 'द लास्ट डॉन’ ही मारिओ पुझोची नवी कादंबरीही संघटित गुन्हेगारीचंच भेदक चित्रण करणारी असली, तरी जाणत्या वाचकाला सावध आणि अंतर्मुख करणारी आहे.
-
J.R.D Tata Yanche Patra (जेआर.डी टाटा यांचे पत्र)
सध्याच्या वेगवान जगात ई-मेल्स ,सेलफोन, अशांसारख्या तत्पर संपर्कमाध्यमामुळे जग जवळ आणले आहे :पण एकेकाळी मुख्यत्वे पत्र या माध्यमातून संपर्क साधला जात असे पत्रांतून कामांच्या तपशीलाखेरीज आपुलकी व जवळीकही साधली जात असे . शिवाय हि पत्रे पत्रं त्या एका विशिष्ट कालखंडाचा दस्तएवज बनून इतिहास अभ्यासकांना व भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरत असत .पत्र हा कायमस्वरूपी माहितीस्त्रोत असतो . या पुस्तकातील सुमारे ३०० पत्र इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत . जे .आर. डी. टाटा या विलक्षण व्यक्तिमत्वाच्या चिकित्सक लेखणीतून उतरलेली हि विविध विषांयान स्पर्श करणारी पत्र तत्कालीन सामाजिक , राजकीय, आर्थिक, औघोगिक अशा अनेक क्षेत्रंच दर्शन घडवतात आणि विसाव्या शतकातील एक महान, बहुआयामी व्याक्तीत्वंच अनेकपदरी अंतरंग उलगडून दाखवतात .
-
Vadal Matha Te 1965 Bharat-Pak Yuddha (वादळ माथा त
२० नोव्हेंबर, १९६२ ला यशवंतराव चव्हाण भारताचे 'सरंक्षण मंत्रिपद' भुषविण्यासाठीच दिल्लीला गेले. 'हिमालयाच्या संरक्षणसाठी सह्याद्री' या शब्दात मराठी जानतेने त्यांना निरोप दिला. पण दिल्लीत दाखल झाल्यानंतर सह्याद्रिला काय मनोव्यथा सहन कराव्या लागल्या याची जाणीव जनतेला झाली नाही. यशवंतरावांनी सर्व व्यथा सहन केल्या व एका वर्षात पंडित नेहरूंचा विश्वास व दिल्लीत आपले विशिष्ट स्थान प्रस्थापित केले. चीन विरुद्ध १९६२ मधील युधातिल पराभवानंतर यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधेर्य उच्वान्यसाठी विशेष प्रयत्न केले, तसेच सैन्याला लागणारी सामुग्री, स्वयंचालित बंदुका, दारूगोळा व सर्व निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी कारखाने उभारण्याचे कार्य तत्परतेने पार पाडले त्यामुळे १९६५ च्या भारत-पाक युद्धामध्ये भारताला विजय मिळाला. ताश्कंदमध्ये सापडतील. या सर्व घटनांचा व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडी उहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे.
-
Pavitram (पवित्रम्)
"सोडून देतो मांझ काम.पण जसे जन्म होत राहतात,तसेच मृतयुही.मग त्या कलेवरांचं काय करायचं? कोण दशक्रिया करणार,अग्नि देणार?कारण ही कलेवरं जर अग्निरहित राहिली तर रोगराई पसरेल. प्रेत खालच्या जातीतलं की वरच्या ह्यांन काय फरक पडणार? सडताना जात दिसत नाही."सगळे स्तब्ध झाले. दत्तू पुजारी शांतपणे उठला... कालिंदी म्हणाली,"तुम्ही योग्य तेच केलंत.आत्तपर्यंत प्रत्येक शुभकार्यात मला टाळण्यत आलं.हीन वागणूक देण्यात आली.आता नदी पलीकडच्यांनीही मला टाळावं? शेवंताकडे बारसं होतं.मला नाही बोलावलं.ही एवदीशी होती शेवंता.जेव्हा हीला.वैद्य त्या वस्तीत यायला तायर नव्हते की तिला इथे आणलेलं त्यांना चालत नव्हतं.त्यांनाही आता पवित्र-अपवित्र जाणवू लागलं?" दाराआडून एकणारा गोविंदा मात्र दुखावला.जो त्रास वर्गातील मुलं आपल्याला देतात,तसाच त्रास ही मोठी माणसं आईबाबांनाही देतात? मग तयांचजवळ तक्रार ती काय करायची?