-
Shantidoot ( शांतिदूत)
शांती ही विलक्षण गोष्ट आहे आणि स्वातंत्र्य अत्यंत पवित्र. 'कार्डिनल्स' आणि 'नीलपंखी' जे पक्षी आपापसात लढाया करतायत. संभ्रमात पडल्यामुळे नीलपंखी जे पक्ष्याला डगमगायला झालं. त्याला आपली तलवार लहानग्या कार्डिनलच्या मानेवर उतरवताच आली नाही. कार्डिनलने आपले डोळे मिटले आणि तलवारीच्या वाराची वाट पहात त्याने मान आक्रसून घेतली... नॅन्सी यी फान सहावीत असताना क्रांतियुद्धं, दहशतवाद आणि 9/11 च्या घटनेचा अभ्यास करत होती. त्याच रात्री तिला लढाई करत असलेल्या पक्ष्यांबद्दलचं धडकी भरवणारं स्वप्न पडलं. दुस-याच दिवशी तिने विश्वशांतीचा संदेश देण्याकरता कादंबरी लिहायला सुरुवात केली. अवघ्या बारा वर्षांच्या या अत्यंत बुद्धिमान बाललेखिकेने मैत्री आणि साहस या गुणांच्या जोरावर जुलमावर कशी मात करता येऊ शकते, ते या सशक्त कादंबरीतून दाखवून दिलेलं आहे.
-
Pray Savaj ( प्रे सावज )
पृथ्वीतलावरील प्रचंड प्रजातींपैकी फक्त मानव, चिम्पँझी व ओरंगउटान ह्यांच्यात स्वत्वाची जाणीव असते. तरीही आपल्यामधला स्वत:बद्दलचा भ्रम हा मानवजातीचा खास गुणधर्म आहे. एकविसाव्या शतकात कधीतरी आपल्या या संभ्रमातून उद्भवलेल्या बेदरकारपणाची आणि वाढत्या तंत्रज्ञानामधील शक्तीची टक्कर होणार आहे. ही टक्कर नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आणि संगणक तंत्रज्ञान यात घडून येईल. ह्या तीनही तंत्रज्ञानामधील नॅनो तंत्रज्ञान सर्वात नवीन आहे. ह्यामध्ये अत्यंत सूक्ष्म यंत्रे, म्हणजे मानवी केसांच्या जाडीपेक्षा १००० पट लहान आकाराची यंत्रे बनवण्याचा ध्यास घेतलेला आहे. याद्वारे येत्या पन्नास-शंभर वर्षात नवीन प्रकारचे सजीव उदयाला येण्याची शक्यता आहे. मानवाने त्यांची रचना केली, म्हणून त्यांना कृत्रिम म्हणता येईल. पण ते पुनरुत्पादन करू शकतील.... त्यांची उत्क्रांती फारच वेगळ्या पद्धतीने आणि प्रचंड वेगाने होईल.... त्यांचा मानवजातीवर आणि जैवमंडलावर होणारा परिणाम विलक्षण असेल.... स्वत:ला प्रगत करू शकणार्या अतिसूक्ष्म शिकारी यंत्रमानवांच्या एका झुंडीवरचा संशोधकांचा ताबा सुटतो आणि.... भविष्यात घडू शकेल अशी थरारक विज्ञानकथा
-
Chicken Soup For The Womens Soul
स्त्रीची व्याख्या अनेक प्रकारांनी करता येईल. विद्यार्थिनी, कन्या, मौत्रीण, पत्नी, आई, गृहिणी, व्यावसायी! प्रत्येक रूप हे खास अलौकिक असे असते. तरी त्यांतही एक असा सामान्य धागा असतो. तो प्रत्येकीच्या स्वभावात असतो. प्रेमाचे बंध हळुवारपणे जपणारी, आजीवन मौत्री किंवा नाते निभावणारी, निवडलेल्या क्षेत्रांशी बांधिलकी घट्ट करणारी ही स्त्री! कौटुंबिक जीवनात फुलोरा फुलवणारी, त्याच बरोबर सामाजिक जीवनही सुसह्य करणारी! New York Times च्या Chicken soup for the Soul ह्या मालिकेत वेगवेगळ्या शीर्षकांखाली भावभावनांचे खास मिश्रण आहे! या पुस्तकामध्ये स्त्रीशी निगडित असलेल्या सार्या गुणवौशिष्ट्यांचे मार्मिक चित्रण आढळते. स्त्रीच्या आत्म्याची मंगलता व सौंदर्य इथे प्रगट होते! व्यावसायिक असो की गृहिणी, बालिकेपासून वृद्ध स्त्री पय|त सगळ्यांना हे अनुभव भावतील. ह्यातून त्यांना स्फूर्ती, आनंद मिळेल. इतकेच नव्हे; तर स्वत:चीही ओळख होऊ शकेल. ह्या अनुभवांची सोबत दीर्घकालपर्यंत स्त्रियांना मिळू शकेल.
-
Chicken Soup For The Sisters Soul
आपल्याला बहीण असणं आणि आपण कुणाची तरी बहीण असणं किती भाग्याचं आहे याचा साक्षात्कार घडवणार्या हृद्य कथा! ""ती नेहमीच माझ्या पाठीशी उभी असते.'' ""तिच्याविना मी सौरभौर होईन!'' ""मी तिला काहीही सांगू शकते.'' ""मी तिच्याशी दिवसा-रात्री कधीही बोलू शकते.'' "चिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल' मधल्या कथांमधून वारंवार येणारी ही वाक्यं खूपच बोलकी आहेत. हे पुस्तक म्हणजे ह्या अनोख्या नात्याची थोरवी मानण्याचा एक उत्सवच आहे! बहिणी असतात आपल्या अत्यंत मौल्यवान अनुभवांच्या खजिनदार. आपली सुख-दु:ख वाटून घेणार्या साक्षीदार. कुटुंबाच्या वाट््याला आलेले काळेकुट्ट क्षण जोडीनं भोगणार्या सख्या. आपल्याला सर्वाधिक ओळखणार्या आपल्या मौत्रिणी. विविध अनुभवांद्वारे या कोमल नात्याचे अनेक तलम पदर उलगडून दाखवणार्या ह्या प्रेरणादायी कथा आपल्या मनाच्या सहसंवेदनेची तार झंकारत ठेवतात!
-
Chicken Soup For The Couples Soul ( चिकन सूप फॉर क
देवाने गाठी जरी स्वर्गात बांधल्या, तरी विवाह साजरे होतात इथे पृथ्वीवरच! ते निभवावेही लागतात आपल्या तुपल्यालाच! कसं निभावतो आपण हे नातं? - त्याच्या या कथा! एकांड्या आयुष्यात दुस-याचा प्रवेश झाला, की जीवनाचे आयाम बदलतात. मग प्रेमाच्या बहरात सप्तरंगी स्वप्न फुलतात. रोमान्स, स्फूर्ती, उत्साहाची कारंजी उडतात. जबाबदारी वाढली की संघर्ष आला - संकटं आली! एकमेकांच्या मदतीनं त्यांनाही तोंड देण्याची हिंमत येते. प्रेम कार्यप्रवण बनवतं - प्रेम व्यक्तीला स्वतंत्र करतं. कधी भानावर आणायचं कर्तव्य पार पाडतं - कधी आत्मभान जागृत करतं! एकमेकाला गृहीत धरलं तरी एकमेकाचा आदर करायला शिकवतं. मुरलेले प्रेम जन्मोजन्मीची साथ करतं. हळुवार प्रेम तितकंच कणखरही असतं. कुटुंब-समाज अशा अवघ्या पसार्यात स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घ्यायला प्रवृत्त करतं. पती-पत्नीच्या सहजीवनाच्या अशा या कथा आपल्या प्रत्येक भावनेला स्पर्श करतात. काही कथा जुन्या - पण आजही तितक्याच ताज्या वाटणा-या - कालातीत! देशातीतही. फरक फक्त संस्कृतीचा आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या चष्म्यातून कथा वाचल्या, की लक्षात येतं, अरे या तर आपल्याच कथा - आपल्या आयुष्यात आपल्या आसपास घडणा-या! कपल्ससाठी असणारं हे "चिकन सूप', "तुमचं - आमचं सेम असतं' याची प्रचीती देणा-या!
-
Alive ( अलाइव्ह )
चाळीस उतारू व पाच कर्मचारी यांना घेऊन उड्डाण केलेले ते विमान अँडीज पर्वतावर आदळले. तुकडे झालेल्या विमानाचा अर्धा भाग एवढाच आसरा त्यांना उरला ! थोडीशी वाईन व काही चॉकलेटे एवढेच खाद्य ! अपघात झाला तेव्हा फक्त 32 जण वाचले होते. काही दिवसात 27 उरले. मग 19 आणि शेवटी फक्त 16 ! शेवाळेसुद्धा नसलेल्या बर्फाच्छादित उंचीवर ते 72 दिवस कसे जिवंत राहिले ? कसे वागले ? त्यांची सुटका कशी झाली ? आणि सुटकेनंतर त्यांना कोणत्या अनुभवाला सामोरे जावे लागले ? याची रोमांचकारी सत्यकथा !
-
India In Slow Motion ( इंडिया इन स्लो मोशन )
तीस वर्षांहूनही अधिक काळ बी. बी. सी. चे भारतातील प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना मार्क टुली यांना 'वाईट सरकारी प्रशासन' या केवळ एकाच कारणामुळे भारताच्या प्रगतीला खीळ बसली आहे हे लक्षात आलं. अयोध्या प्रकरणानंतर खुद्द अयोध्येमधील हिंदू लोकांची सहिष्णू वृत्ती, गालिचे विणणार्या बालकामगारांच्या प्रश्नाचे खरे आणि राजकीय स्वरूप, तेहलका प्रकरणातून उघड झालेला संरक्षण खात्यातील भ्रष्टाचार, हैदराबादचे 'सायबराबाद' करण्याचा चन्द्राबाबू नायडू यांचा प्रयत्न, गुजराथमधील जलसंधारणाचे खाजगी स्तरावरील प्रयत्न, शेतकर्यांच्या आत्महत्या, काश्मीरमधील खरी परिस्थिती अशा अनेक विषयांना मार्क टुली यांनी मर्मग्राही स्पर्श केलेला आहे. अनेक भारतीयांना अजूनही माहीत नसलेले असे एक वेगळे विश्व त्यांनी उलगडून दाखवलेले आहे. या सर्वांतून 'सारे जहॉंसे अच्छा' असलेला आपला भारत देश अजून मागे का रेंगाळतो आहे, याचे उत्तर त्यांनी फार समर्पकपणे दिले आहे.
-
Mera Parivaar (मेरा परिवार)
रशियाचा 'सर्टिफिकेट आॅफ आॅनर' हा मानाचा पुरस्कार मिळालेली नटाशा ही खरंतर एक सामान्य रशियन नागरिक, अनाथाश्रमात वाढलेली, परिस्थितीनंही बेताची परंतु, अनाथ मुलांविषयी मनात असलेल्या प्रेमाच्या ऊर्मीतून अन् अनाथपणाच्या दु:खातून तिचा जीवनप्रवास सुरू होतो. लग्न झाल्यानंतर मूल होण्याची शक्यता नाही, हे समजल्यावर नटाशा आणि तिचा नवरा डेहिड समजूतदारपणानं अन् एकमतानं, परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेली अनाथ मुलं आपल्या घरी आणतात. नटाशा या मुलांची आई बनून त्यांचं पालनपोषण करते, त्यांच्या उत्कर्षासाठी जिवापाड प्रयत्न करते. हे सगळं करत असताना आलेले बरेवाईट अनुभव आणि सहजीवनातील चढउतार यांचं प्रांजळ कथन...
-
vapu ( वपु )
एक कलाकार आणि एक माणूस या दोनही पातळ्यांवर ते समरसून आयुष्य जगले. स्वत:जवळ देण्यासारखं जे काही होतं ते त्यांनी आयुष्यात भेटलेल्या प्रत्येकाला दिलं. सर्वांना समृद्ध केलं. त्यांच्या या नव्या पौलूवर त्यांच्याच लेकीनं, स्वातीनं लिहिलेलं हे पुस्तक आपल्याला त्यांच्या आठवणी देऊन समृद्ध करते. स्वत:च्या, आपल्या लाडक्या बापूंच्या चुकांची प्रांजळपणे कबुली देत स्वाती चांदोरकर लिहितात, तुम्ही मला माझ्या लग्नातला घरचा आहेर दिलात त्यात म्हटलं होतात, "आयुष्यात घडून गेलेल्या चांगल्या गोष्टींचं जतन कर म्हणजे आयुष्यभर अशीच हसत राहशील.' हाच संदेश तुमच्या आमच्या घरचा आहेर.
-
Manavi Manogunancha Shodh Ghenarya Katha
जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन या अमेरिकेतल्या सर्वप्रिय, सुप्रसिद्ध अशा दोन वक्त्यांनी मिळून संकलित केलेल्या या कथा जगाच्या कानाकोपर्यातल्या जनमासाच्या मनाला जाऊन भिडल्या आहेत, भावल्या आहेत. या कथांमधील आशावाद, बुद्धीवाद तुम्हाला येणारं नैराश्य झटकून टाकायला मदत करेल. अतिशय विचारपूर्वक निवडलेल्या या कथा म्हणजे 'अशक्य' शब्दप्रयोगाला झुगारून देऊन आपल्या आयुष्याचा मार्ग उजळून टाकणार्या आहेत. जेव्हा कधी तुम्हाला तुमचा मुद्दा ठामपणे मांडावासा वाटेल, एखाद्या मित्र-मैत्रिणीला स्फूर्ती द्यावीशी वाटेल किंवा लहान मुलाला शिकवण द्यावीशी वाटेल, तेव्हा या पुस्तकातील अनेक हृदयस्पर्शी कथांचा हा ठेवा नक्की उपयोगी पडेल.
-
Nirbachit Kalam (निर्बाचित कलाम)
पुरुषप्रधान समाजात स्त्रीचे अधिकार आणि स्त्रीमुक्ती ह्यांविषयी जे काही बोलले जाते, त्यामध्ये बांगलादेशच्या लेखिका तसलिमा नासरिन यांचा आवाज नि:संशय सर्वाधिक वरचा आणि सर्वांत अधिक खळबळ माजविणारा आहे. रूढी न मानणार्या, वादविवादपटू आणि स्पष्टवक्त्या तसलिमा यांच्या ह्या पुस्तकामुळे बांगलादेशात प्रचंड वाद उठले आणि त्यामुळे तसलिमा चर्चेच्या केंद्रबिंदू ठरल्या. त्यांच्या ह्याच धक्कादायक पुस्तकाला 'आनंद-पुरस्कार’ मिळाल्यामुळे आपल्या देशातही विविध स्तरांवर कुतूहल जागृत झाले. या विस्फोटक पुस्तकात मूळ लेखांबरोबरच, त्याच प्रकारच्या आणखी काही लेखांची भर घालण्यात आली आहे. या पुस्तकात, लेखिकेने आपल्या बालपणापासून मनावर कोरल्या गेलेल्या आठवणी, कोणताही आडपडदा न ठेवता, लिहिल्या आहेत. ह्या आठवणी अतिशय कटू आहेत; पण त्या अतिशय प्रामाणिकपणे लिहिल्या आहेत, ह्यात शंका नाही. या पुस्तकात, पुरुषप्रधान समाजात स्त्रीला एक भोगवस्तू समजून कसे वागविले जाते, स्त्रीच्या पायात, धर्मशास्त्र् सुद्धा, कशी बेडी अडकवू पाहते; एवढेच नाही, तर ईश्वरकल्पनेतही स्त्रीच्या छळाचे इंधन, अप्रत्यक्षपणे, कसे घातले गेले आहे, व्यवहारात प्रत्येक स्तरावर, प्रत्येक पतिपत्नी-संबंधांत - थोडक्यात संपूर्ण स्त्रीजीवनात - पुरुषांची लालसा, नीचपणा, हिंस्रपणा, अधिकार गाजविण्याची कृती, लबाडी आणि प्रत्येक गोष्टी दखल देण्याची सवय कशी दिसून येते, ह्याविषयी आपली मते लेखिकेने अगदी धीटपणे मांडली आहेत.
-
Pratidwandi ( प्रतिद्वंद्वी )
त्याला अनूची तीव्र अशी आठवण आली. तो लवकरच पूर्ण बरा होत होता आणि आता तिची तशी गरज राहणार नव्हती. पण तिची ही आठवण त्या गरजेपलीकडचीच होती हे त्याला आतून लख्ख समजले. तिची आठवण तिच्या त्याला वाटणार्या स्पर्शाच्या ओढीचीही नव्हती. त्याही पलीकडली होती. त्याची वरची खोली, छत, भिंती, खिडकी, बाजूची गच्ची, ती बाई, तिचा व्यायाम, ते मूल, ती सळसळणारी झाडे आणि अनू, तिची नि त्याचा घडलेला, न घडलेला संवाद हे सगळे एकच चित्र होते. त्याच्यातल्या कार्तिक नसले या दुसर्या कोणीतरी ते काढले होते. त्याला गरज होती ती या सगळ्यांच्या एकत्रित असण्याची. भले त्या एकमेकांत काही अनुबंध न का असेना !
-
Davrani ( डवरणी )
विविध मानवी स्वभावांचा मार्मिक वेध, बदलत्या खेड्याचे अंतर-स्पर्शी सूक्ष्म तणाव, समाजाच्या आणि व्यक्तींच्या जीवनातील विपरीत नाट्य, सखोल गहिरे कारुण्य, उत्कट काव्यात्मकता, ग्रामीण शृंगार आणि अनघड पौरुष, स्पंदनशील मनाची प्रतिमायुक्त चिंतने आणि चैतन्यपूर्ण लवचिक भाषा यांनी यादवांची कथा इथे डवरलेली आहे. कलात्मकतेचे आणि सच्च्या सामाजिकतेचे संयमी भान त्यांनी या कथांतून सहजतेने सांभाळलेले जाणवते.
-
Rutuveglare ( ऋतूवेगळे )
स्त्री म्हणून जगताना येणार्या अनुभवांचे आणि प्रश्नांचे विश्लेषण करणारा, स्वातंत्र्योत्तर काळातील एका प्रतिनिधीक वर्गाचे चित्रण करणारा, गत शतकाअखेरीस विज्ञानाने जगण्याचा अर्थच बदलवून टाकला असला तरी माणसांच्या मनातील सनातन संघर्ष मात्र तसाच आहे हे दाखवणारा कथासंग्रह. हे सारे तात्विक वाटत असले आणि ह्यात कथा भरडली गेली असावी, असे वाटत असले तरी तसे झालेले नाही. तिने आपले एक वेगळेच विश्व निर्माण केले आहे न् तिच्या गुंगीतून सावरल्यावर लक्षात येते की लेखिका कळत-नकळत आपल्याला बरेच काही सांगून गेली आहे. ह्या लेखिकेचे शब्द मुळातच नादमधुर असतात, आणि त्यांना संगीताचा साज मिळाल्यावर ते अधिकच लयकारी निर्माण करून जातात ह्याचा प्रत्यय ह्या संग्रहांतील कथा वाचतानाही येतो जसे, "धुवाधार म्हणतात तसला हा पाऊस, मल्हार भराला यावा तसा". शेवटी आपले जीवनतही शिल्पासारखेच, लेखिका म्हणते त्याप्रमाणेच "आपणच आपले सारे संचित, सगळ्या भावना, आनंद, दु:ख या शिल्पात पाहतो आणि त्याला अर्थ देतो".
-
Pratiksha ( प्रतीक्षा )
प्रतीक्षा' ही कादंबरी रणजित देसाईंच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी प्रकाशित झाली. पुनर्लेखनासाठी देसाईंनी ती बाजूला ठेवून दिली होती. परंतू पुनर्लेखन होवू शकले नाही. या कादंबरीत एक भावपूर्ण प्रेमकहाणी चित्रित झालेली असून यातील वातावरण आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. संपूर्ण कथानक हिमालयाच्या परिसरात घडते. कादंबरीचा नायक अतृत्प आणि असफल प्रेमजीवनातून आलेल्या निराशेपोटी भटकत असतो. खर्या प्रेमासाठी फिरत फिरत हिमालयात येतो आणि येथेच त्याची नायिकेशी गाठ पडते. नायक अतिशय हलक्या व भावपूर्ण अंत:करणाचा आहे. तर नायिका सुंदर, सत्वशील, प्रमळ, संयमी कर्तव्यदक्ष आणि विचारी आहे. अतिशय अलगदपणे या दोघांमधील भावबंध विणले जातात. ती हळूहळू घट्ट होणारी वीण वाचकाला मंत्रमुग्ध करते. प्रेमाचा संयमित आविष्कार हा अधिक शृंगारिक असतो याचा प्रत्यय ही कादंबरी वाचताना येतो. बाबांच्या व्यक्तिरेखेतून पाप, पुण्य, प्रेम जीवन परमेश्वर इत्यादी विषयांची वेगळी पण ठाम मते वाचकांपुढे येतात. कथेला आणि व्यक्तीरेखनाला पुष्टी देणारे विचार म्हणून कादंबरीत त्याला विशेष स्थान आहे. कादंबरीतील वातावरण निर्मिती ही लक्षणीय आहे. निसर्गवर्णनाबरोबरच लोकजीवनाचेही चित्रण येथे आढळते. एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारचे रहस्यपूर्ण कथानक रंगवून लेखकाने ही छोटेखानी कादंबरी वाचकांच्या मनाला भिडवण्याचा प्रयत्न केला आहे.
-
Sahityikacha Gaon (साहित्यिकाचा गाव)
समाजात वावरणारं साहित्यिकाचं मन सामान्यांपेक्षा अधिक संवेदनशील,चिंतनशील आणि भावनाशील असतं. त्यामुळं इतरांना साध्या वाटणार्या घटनाही साहित्यिकाला मात्र सामाजिकदृष्ट्या अधिक अर्थपूर्ण वाटतात. त्यांच्यावर तो अधिक गंभीरपणे चिंतन करतो. त्याच्या भावनाशील मनाला त्या अधिक खोलवर भिडतात. पुष्कळ वेळा पारंपरिक संदर्भ असलेल्या, सणादी सांस्कृतिक संदर्भ असलेल्या नेहमीच्या घटनांचा महत्त्वाचा उदात्त संदर्भ जनलोक हरवतात. त्यामुळे त्या सणांना विकृती, विपरीत गती प्राप्त झालेली असते. त्या विकृति-विपरीत गतीच्या पलीकडे जाणीवपूर्वक जाऊन त्या सणांचे मूळ जन्म-प्रयोजन शोधते. प्रयोजन कळले की साधे सणही श्रीमंत आणि जिवंत वाटू लागतात. मग ते हवेहवेसे वाटू लागतात. त्यांचे जिवलग, घनिष्ठ नाते संस्कार हरवलेल्या आपल्या मनाला कळते आणि मनही सजग, समृद्ध होते. चांगल्या साहित्याच्या निर्मितीच्या प्रत्यक्षातील जन्मखुणा, घटना-स्थळे यांच्याविषयीची जिज्ञासा सुजाण-सुशिक्षित माणसाला सतत असते. त्या जिज्ञासापूर्तीमुळे साहित्यकृतींची जन्मरहस्ये कळतात, जन्मदात्या साहित्यिकाच्या वृत्ती-प्रवृत्ती समजतात. जिज्ञासापूतीचा निखळ आनंद मिळतो. प्रस्तुत संग्रहात याच (समाज, संस्कृती आणि साहित्य) तीन पैलूंवर आधारित लालित्यपूर्ण शब्दशिल्पे आणि रंगचित्रे समाविष्ट आहेत. रसिकांना ती अंतर्मुख करतील, जगण्याचे उत्कट क्षण देतील, अनुभवसमृद्ध करतील.
-
Indira ( इंदिरा )
३१ ऑक्टोबर, १९८४... सकाळची वेळ. त्या आपल्या बगिच्यातून चालत निघाल्या होत्या. चेहर्यावर स्मितहास्य. दोन्ही हात जोडून नमस्कार करत.इंदिरा नेहरू गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली.त्यांनी आपलं जीवन जसं व्यतीत केलं, अगदी तसाच मृत्यू त्यांना प्राप्त झाला. माणसांच्या गर्दीत असूनही शेवटी एकाकीच एका महानाट्याचा, एका आयुष्याचा हा असा महाभयंकर शेवट झाला. ज्या युगात भारतीय राष्ट्रवादाने जन्म घेतला त्याच युगात इंदिराजींचा जन्म झाला. त्यांचे पिता जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना 'क्रांतीचे अपत्य' म्हणून संबोधले. शरीर, मनाने कणखर अशा इंदिराजींना स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे, हे मुळी विधिलिखितच होतं. ही भूमिका अंगिकारताना सुरुवातीला त्या काहीशा कचरल्याही होत्या. एकेकाळी शरीरप्रकृतीने नाजूक व स्वभावाने लाजाळू व अंतर्मुख असलेल्या इंदिराजींनी एकदा राजकारणातील ही आपल्यावर पडलेली जबाबदारी स्वीकारली व त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. जगातील सर्वात सामर्थ्यशाली व महत्त्वपूर्ण नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या त्या पंतप्रधान बनल्या, परंतु येथील समाजात धर्मांधर्मांमध्ये दुफळी माजलेली होती. या अवाढव्य देशातील समाजाची मानसिकता समजण्यास अत्यंत क्लिष्ट होती. येथे पुरुषांचे वर्चस्व होते. जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राचे नेतृत्व ज्या स्त्रीने समर्थपणे संभाळले, विसाव्या शतकाच्या इतिहासात ज्या स्त्रीने आपली नाममुद्रा उमटवली व ज्या स्त्रीला 'वूमन ऑफ द मिलेनियम' म्हणून गौरवण्यात आले अशा एका स्त्रीच्या जीवनाचा मागोवा कॅथरीन फ्रँक यांनी येथे घेतला आहे.