-
Harberiyam (हर्बेरियम)
जुनी नाटके प्रेक्षकांच्या दीर्घ काळ स्मरणात असतात. त्यांना ती नाटके पुन्हा पाहता यावीत यासाठी "हर्बेरियम'चा उपक्रम राबवणारे सुनील बर्वे हे अभिनेते वेगळेच आहेत. नाट्यसृष्टीत हा उपक्रम राबवून पाच नाटकांचे केवळ 25 प्रयोग करून आजच्या बिझी कलावंतांना पुन्हा रंगमंचावर आणून प्रेक्षकांना आनंद देणाऱ्या या उपक्रमाची सुरवात आणि त्याचा सगळा प्रवास कसा झाला, हे या पुस्तकात सांगितले आहे. रंगभूमीवरच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाने बरेच वादळ उठवले होते. या उपक्रमातील सहभागी मंडळींकडूनच या पुस्तकासाठी लेख घेण्यात आले असून, त्याचे संकलन केले आहे. मंदार जोशी यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. "हर्बेरियम' या प्रयोगाची संकल्पना समजावून सांगण्याबरोबरच या उपक्रमाची ऐतिहासिक नोंद लिखित स्वरूपात या पुस्तकामुळे झाली आहे.
-
Jawaharlal Nehruche Netrutva-Ek Sinhavalokan (जवाह
भारत स्वतंत्र झाल्यावर जवाहरलाल नेहरूंचे पुरोगामी, संवेदनाक्षम आणि द्रष्टे नेतृत्व लाभले म्हणूनच संसदीय लोकशाहीची सुदृढ पायाभरणी होऊ शकली आणि धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्था स्थिरावू शकली. या दोन्ही बाबतींतील नेहरूंचे योगदान न विसरता येण्याजोगे आहे. अर्थात काश्मीरचा रेंगाळलेला संघर्ष, चीनबरोबरचा चिघळलेला सीमावाद अशा अनेक समस्यांचे ओझेदेखील त्यांच्या चुकांमुळेच आपल्याला अजूनही वाहावे लागते आहे. तथापि जमाखर्चाचा हिशोब मांडायचाच झाला, तर नेहरूंनी दिलेल्या देणग्यांचे पारडे निश्चितच जड आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या उत्तुंग नेतृत्वाच्या प्रदीर्घ कारकिर्दीचे सिंहावलोकन आहे.
-
Gau Tyana Arti (गाऊ त्यांना आरती)
खुली-छुपी युद्धं, नैसर्गिक कोप किंवा कोणतीही आपत्ती त्यांच्या मनोबलावर मात करू शकत नाही. अशा दुर्दम्य इच्छाशक्तीचे आपले सैनिक, सैनिकी दलं, युद्धप्रसंग आणि घटना यांची माहिती देणारं हे पुस्तक...