-
Punha Ekada Aavaghad Afghanistan ( पुन्हा एकदा अवघ
अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमधील शीतयुद्धात भरडल्या गेलेल्या अफगाणिस्तानची घडी आजही व्यवस्थितपणे बसलेली नाही. पत्रकार निळू दामले यांनी २००३ मध्ये या देशात फिरून त्याचे रिपोर्ताज ‘अवघड अफगाणिस्तान’ या पुस्तकाच्या माध्यमातून मांडले होते. याच सुमारास तालिबान्यांचा पाडाव झाल्याने तेथे शांतता नांदेल, अशी अटकळ जगभरात व्यक्त होत होती. मात्र, अनेक जमातींमध्ये विभागल्या गेलेल्या आणि सांस्कृतिक-धार्मिक कल्पनांमध्ये रूतलेल्या अफगाणिस्तानवर आजही तालिबान्यांचा प्रभाव आहे, हे दामले यांना त्यांनी २००७ साली केलेल्या या देशाच्या दुसर्या यात्रेत आढळले. या यात्रेदरम्यानचे अनुभव आणि अफगाणिस्तानवरील अन्य मजकुराचा अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. तालिबानींच्या अस्तित्वामुळे अमेरिकी फौजांना तेथून पूर्णपणे माघारी जाणे अशक्य असल्याने अफगाणिस्तानचे आणि तालिबान्यांच्या प्रभावाखाली असलेल्या पाकिस्तानचे भवितव्य काय, हे सांगणे कठीण आहे, हा त्यांनी काढलेला निष्कर्ष अस्वस्थ करतो.
-
Touching the Void (टचिंग द व्हाईड)
गिर्यारोहण करताना अपघात होत असतात. या पुस्तकात अशा अपघाताचे आणि त्यात सापडलेल्या ज्यो सिंप्सन या गिर्यारोहकाचा जो अनुभव आहे, तो चित्तथरारक आहे. अँडीज पर्वत रांगांतील 21,000 फूट उंचीच्या हिमशिखरावरून ज्यो खाली कोसळला. तो मृत्युमुखी पडलाय असेच सगळ्यांनी गृहीत धरले होते, मात्र पर्वताच्या एका कपारीत पडलेला ज्यो जिवंत होता. प्रचंड अडचणींना तोंड देऊन ते सायमन थेट्सच्या तळावर परतला. मूळ इंग्रजीत असलेले हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने मराठीत आणले आहे. उष:प्रभा पागे यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.
-
Bharatratna
भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान मिळविणाऱ्यांमध्ये सात महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. या पुरस्कारावर या सात मंडळींनी आपल्या कर्तृत्वाने नाव कोरले आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यापासून ते पंडित भीमसेन जोशी यांच्यापर्यंतच्या सात व्यक्तींच्या कारकिर्दीचा आढावा नयन सरस्वते यांनी या पुस्तकात घेतला आहे. या सात मंडळींनी किती वेगवेगळ्या संघर्षाला तोंड दिले आणि आपले ध्येय कसे साध्य केले, ते सारे या पुस्तकातून एकत्रितपणे समोर येते.