-
The Namesake
तसं पाहायला गेलं तर त्याचा सारा जीवनप्रवास अपघातांच्या मालिकेनेच भरलेला. सुरुवात झाली बाबांच्या गाडीला अपघात झाला त्या घटनेपासून... गोगोल हे नावही अपघातानेच त्याला मिळालं त्याच्या पणजीने निवडलेलं नाव त्यांना अखेरपर्यंत समजलं नाही. कलकत्ता ते केंब्रिज ह्या प्रवासात तिचं पत्र कायमचंच गहाळ झालं. ह्या एका अपघाताचे परिणाम गोगोलला अनेक वर्षं भोगायला लागले. नाव देताना आयत्या वेळी बाबांना त्यांचा अपघात, त्यातून ज्याच्या पुस्तकामुळे ते जीवानिशी वाचले त्या गोगोलच्या नावाने त्याचं नाम:करण झालं. त्या विचित्र नावाने त्याला खूप छळलं होतं. मोठा झाल्यावर त्याने ती चूक दुरुस्त केली तरीही 'गोगोल' नावाने त्याचा पिच्छा कधीच सोडला नाही. त्याचा विवाह हा देखील एक अपघातच ... भविष्यात काय घडणार हे कधीच माहीत नसतं. सारं काही अचानक सामोरं येतं. त्यासाठी कोणत्याही प्रकारची तयारी करता येणं शक्य नसतं; परंतु तेच अनुभव गाठीशी बांधून त्यामागील कार्यकारणभाव शोधायला पुढचं सारं आयुष्य पडलेलं असतं आणि मग ध्यानात येतं की कधी घडायलाच नको होत्या अशा वा कोणतंही प्रत्यक्ष कारण दिसत नसताना घडलेल्या घटनांनीच आयुष्य भरलेलं आहे.
-
Narmade Har Har
शतकानुशतके असंख्य माणसं नर्मदापरिक्रमा करीत आली आहेत. जगन्नाथ कुंटे हा असाच एक परिक्रमावासी.पण तो केवळ ’धार्मिक-आध्यत्मिक’ ओढीने निघालेला भाबडा भाविक नसून मोकळ्या मनानं अनुभूतीला सामोरं जाणारा शोधयात्री आहे. गेली अनेक वर्षं ते परिक्रमेमागून परिक्रमा करीत आहेत. एका झपाटलेल्या प्रवासाचं हे वर्णन.
-
Kalindi
’नर्मदे हर हर’ ,’साधनामस्त’ आणि ’नित्य निरंजन’, या मालिकेतील श्री. जगन्नाथ कुंटे यांचा चौथा अनुभूती ग्रंथ. ’स्वामी’ आणि पूर्वाश्रमीची त्याची पत्नी ’कालिंदी’ आणि त्या अनुशंगानं अनेक साधकांच्या प्रवासाची ही कल्पनारम्य कहाणी..
-
Majet Jagawe Kase
सध्याच्या धकाधकीच्या जमान्यात आणि जीवघेण्या स्पर्धेच्या वातावरणात आपल्याला जीवनातला आनंद मनापासून अनुभवता यावा, तो टिकवता यावा आणि इतर आप्तेष्टांनाही मुक्तहस्ताने वाटता यावा म्हणून काय करावे, कसे वागावे, याबाबत मित्रत्वाच्या नात्याने केलेले हितगूज म्हणजे हे अत्यंत लोकप्रिय पुस्तक. तत्त्वज्ञान सांगण्याचा मार्गदर्शकी आव न आणता, व्यावहारिक युक्त्याप्रयुक्त्या सुचवीत आणि आशयसंपन्न किश्शांची पखरण करीत जीवनातील मजेचे रहस्य उलगडून सांगणारे हे खुमासदार पुस्तक अशा प्रकारच्या वाङ्मयातील मानदंड ठरले आहे.
-
Business Legends (बिझनेस लेजंड्स)
जी. डी. बिर्ला, वालचंद हिराचंद दोशी, कस्तुरभाई लालभाई व जे. आर्. डी. टाटा या आपल्या आयुष्यातच 'आख्यायिका’ ठरलेल्या भारतातील चार महान उद्योगपतींच्या आयुष्याचा व अफाट कर्तृत्वाचा अत्यंत वेधक व विस्मयचकित करून टाकणारा पट येथे उलगडला आहे. ही या चार उद्योगमहर्षींची व्यक्तिचित्रं आहेत. त्यांचं व्यक्तिगत जीवन - त्यांच्या सवयी, जीवनशैली, त्यांची वैचारिक धारणा, अचूक निर्णयक्षमता, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, भोवतालचे ताणतणाव यांचे मनोज्ञ, दुर्मीळ रंग भरता भरता, त्यांच पायाभूत काम करण्याची जिद्द कशी अफाट होती, ब्रिटिश राजवटीत - प्रतिकूल परिस्थितीत कोणकोणते संघर्ष करीत त्यांनी उद्योग उभारले, अडचणींचे 'संधी’त रूपांतर करण्याचे त्यांचे सामर्ध्य किती प्रचंड होते, वैयक्तिक संपत्ती जमविण्याच्या पार पलीकडची त्यांची देशभक्तीमय उद्योजकता व आर्थिक राष्ट्रवादाची दुर्मीळ दूरदृष्टी किती प्रखर होती, याचे लेखिकेनं चैतन्यमय व गहिरे चित्र येथे रेखाटले आहे. त्यांच्या काळाच्या - देशाच्या राजकीय, आर्थिक, सामजिक ताणाबाणाच्या विस्तृत अवकाशावर हे चित्र उभं केलं आहे. हा या लेखनाचा विशेष आहे. लेखिकेनं आजवर अस्पर्श राहिलेल्या अनेक स्रोतांतून तपशील मिळवून संशोधनपूर्वक केलेलं हे लेखन नव्या उद्योजकांना प्रेरक ठरेल."
-
Taath Kanaa (ताठ कणा)
जगातील दहा न्यूरोस्पायनल सर्जनची नावे घेतली तर त्यामध्ये डॉ. पी. एस. रामाणी यांचा समावेश होतो. असे मोठे कर्तृत्व गेल्या तीस वर्षांत त्यांनी बजावले आहे. पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रियांच्या संदर्भात त्यांनी जी नवी तंत्रे संशोधिली त्यामुळे तर त्यांचे नाव या क्षेत्रात अजरामर झाले आहे.