-
Shreeganesha
गंगीला पदर येऊन ती मकरात बसली तेव्हापासून या खडकलाटेचे डोळे तिच्याकडं लागून आहेत. तिच्या रूपाची पडलेली भूल अजून तशीच आहे; कारण गंगीचं अंग चांगलं उफाड्याचं आहे आणि थोरवड अंगाच्या ह्या गंगीचं कातडंही हळदीगत गोरंपान आहे. तिच्या नाकाचा शेंडा जरासा खुडल्यागत दिसतो; पण तेच नाक तिला शोभून दिसतं असं तिथल्या तरुण पोरांचं मत आहे. तिच्या गो-या गालावर डाव्या बाजूला एक हिरवा तीळ आहे, तो तिला पाहणा-याच्या मनावर ठसल्याशिवाय राहत नाही. तिच्यासारखा वाकडा भांग गावातल्या दुस-या कुठल्या पोरीनं अजून काढला नाही, अनेक कुभांडं त्या गावानं तिच्यावर रचली आहेत. तिच्यासारखे कानावर फुगे पाडणारी पोर त्या गावात निपजायला अजून किमान दहा वर्षं तरी जावी लागतील !
-
Bhetigathi
तो असा बसताच चाबूक कडाडे... वादी पिंजून जाई, तुटून जाई. निबार कातडीवर वळ उठत. दवबिंदूगत रक्ताचे थेंब अंगावर थरथरत उभे राहत. कोयंड्याची काठी चिंबून, एकेक कुंडं मनगटाएवढा उठे; पण सर्जा जागचा हलत नसे. हे बघून लोक त्याला 'बशा' म्हणायचे. बशा बौल म्हणून सर्जाचं नाव बद्दू झालं. म्हातारपणी त्याच्या नशिबी बोल आला. त्याच्या गुणाला बट्टा लागला.... मृगाचा पाऊस सुरूझाला आणि सर्जाचं हाल कुत्र खाईनासं झालं. म्हशीपुढची काढलेली चिपाडं, शेणामुतात भिजलेला गदाळा त्याच्या वाट्याला येऊ लागला. पोट जाळायला तो तेसुद्धा खायचा - हपापून अपरूबाईनं खायचा. पण त्याच्या पोटाची खळगी भरली नाहीत. आतडी रिकामी राहिली. त्यात कामानं त्याची झडती घेतली आणि आता बसलं तर उठता येईना आणि उठलं तर बसता येईना अशी त्याची दशा झाली.
-
Vidnyanatil Saras Ani Suras
विज्ञान इतिहासाची पाने ही शास्त्रज्ञांच्या जीवनकथांनी आणि शोधांच्या रंजक कथांनी नटली आहेत. साध्या सेफ्टी पिनपासून अणुबाँबपर्यंत अनेकविध जे शोध लागले, ते संशोधकांच्या, शास्त्रज्ञांच्या परिश्रमांची, चिकाटीची आणि मुख्यत: त्यांच्या प्रतिमेची साक्ष पुरवितात. विज्ञानइतिहासातील अशीच काही पाने उलगडून दाखविण्याचा हा प्रयत्न. या पुस्तकात लिओनार्दो द विंची या प्रख्यात चित्रकारातील संशोधक भेटेल, नोबेल, पॉलिंग, साखारॉव्ह, भटनागर हे संशोधक-शास्त्रज्ञ भेटतील, तसेच अँस्पिरीनपासून विजेच्या दिव्यांपर्यंत अनेक शोधांच्या रंजक कथा वाचायला मिळतील. विज्ञानातील हे सारे 'सरस' तितकेच 'सुरस'ही आहे. ते तितक्याच रंजक पद्धतीने मांडलेले या पुस्तकात आढळतील.
-
One Shot
सहा शॉट्स. पाच ठार. काही तासांत बिनतोड पुराव्याच्या आधारावर गुन्हेगाराला अटक, पण तो तोंडातून अक्षर काढत नाही. शेवटी खूप प्रयत्नांनंतर तो बोलतो, "तुम्ही चुकीच्या माणसाला पकडले आहे... माझ्यासाठी जॅक रीचरला बोलवा." जॅक रीचरचा इतरांना शोध घेता येत नसला तरी टी.व्ही.वरच्या बातम्या बघून तो यायला निघालेलाच असतो. त्याची खात्री असते की काही तरी घोटाळा आहे. गुन्हेगार लष्करातला नेमबाज असताना एक शॉट चुकलाच कसा ? आणि शहरात पोहोचल्यावर रीचरच्या लक्षात येते की त्याचे या शहरातले अस्तित्व कुणाला तरी खुपते आहे. रीचर तेरा वर्षे मिलिटरी पोलीस असतो. तपास करण्यात, माग काढण्यात तरबेज. त्याला भानगडीत अडकवण्यासाठी निरपराध व्यक्तीचा खून करण्यापर्यंत मजल गेल्यावर, संतापलेला रीचर बचाव पक्षाच्या तरुण आणि सुंदर अशा वकिलाला घेऊन त्यांच्यामागे लागतो. त्याला माहीत असते की खरा गुन्हेगार शोधायचा तर तेवढेच कावेबाज आणि निर्दय व्हायला हवे. प्रत्येक पावलाला गोळीचे उत्तर गोळीनेच द्यायला हवे.
-
Circle Of Light
किरणजीत अहलुवालियाची कहाणी ही फार भयानक आणि धक्कादायक असली, तरी कहाणीचा शेवट मात्र विजयोत्सवाचा आहे. अतिशय कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतही जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादाचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच ही जीवनगाथा !
-
The Fakir
आत्महत्येकडे कल असलेला एक हिप्पी आणि अजब विनोदबुद्धी असलेला एक फकीर, असा प्रवास जो तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकेल.... जिथं देव आणि गुरूवास करतात, त्या तुमच्या अंतर्मनाला अर्पण केलेला, 'फकीर' हा श्वास रोखायला लावणारा, आत्म्याच्या साहसी मुशाफिरीचं रेखाटन करणारा 'अक्षर' नजराणा आहे. जिवंत असण्याचा आनंद अनुभवा, सोपं पण आयुष्य बदलून टाकणारं, सर्वांबद्दल दयाभाव राखण्याचं तत्त्वज्ञान शिका आणि बदलाकडचं पहिलं पाऊल उचलून स्वत:ला बरं करा. ही आहे एक चित्तवेधक कहाणी. कर्म, दैवी कृती, मृत्यूनंतरचं आयुष्य, आत्म्याचा आत्म्याशी संपर्क, प्रार्थनेतली शक्ती, श्रद्धा आणि क्षमा, ऊर्जा आणि बरं करणं, चांगुलपणात देवाचा शोध घेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतत गुरूशी सुसंवाद साधून राहाणं, यासारखे गहन प्रश्न, ती सोप्या, समजेल, उमजेल अशा पद्धतीनं हाताळते. 'द फकीर' फक्त तुम्हाला कसं जगायचं एवढंच शिकवत नाही... पण मरण कसं स्वीकारायचं तेही शिकवतं.
-
Girls Of Riyadh
त्या गुप्त जगातील एक दृश्य : चार तरुण मुलींचा प्रेम, अभिलाषा आणि इस्लामिक रूढी ह्यांच्या अरुंद खाडीतून केलेला तो प्रवास. प्रत्येक आठवड्यात शुक्रवारची प्रार्थना संपल्यावर एक ई-मेल आॅनलाईन नेटवर्कवरील सदस्यांत प्रसारित केली जाते. रियाधमधील विद्यापीठात शिक्षण घेणा-या गाम्राह, मिचौल्ली, सादीम आणि लामीस या चार उच्चस्तरीय विद्यार्थिनींच्या आयुष्यातील विदारक वास्तव वर्षभराच्या कालावधीत समोर आले. एकीकडे उच्च स्तरात आणि दुसरीकडे रूढीग्रस्तेत अडकलेल्या या मुली आहेत. या पेचातून त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या नकळत केलेले डेटिंग, अनुभवलेले शहरी जगणे, सेक्स आणि यातून त्यांच्या आयुष्याची झालेली पडझड आपल्यासमोर येते. ह्या चार तरुणी अगणित सामाजिक, प्रेमविषयक, व्यावसायिक आणि लैंगिक दु:खांना तोंड देतात. एकविसाव्या शतकातील सुशिक्षित तरुणीला अजूनही जुन्या पद्धतीने जगणा-या समाजात वाढत असताना, न संपणा-या सांस्कृतिक मतभेदांना सामोरे जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या तरुण सौदी स्त्रियांच्या गुंतागुंतीच्या जीवनातून प्रकटलेली एक दुर्मीळ आणि अविस्मरणीय जाणीव म्हणजे 'गर्ल्स आॅफ रियाध' ! त्यांच्या आश्चर्यचकित करणा-या गोष्टी ह्या आपल्याहून कितीतरी वेगळ्या असणा-या संस्कृतीच्या समाजात प्रकट होत आहेत, ही एक लक्षणीय बाब म्हणावी लागेल.
-
Vishvalli
सगळेजण त्याला त्वेषाने मारू लागले. त्याला फरफटत, मारतच सगळे वाड्याकडे आले आणि पायरीवर टाकून निघून गेले. शुद्धीवर आल्यावर "पाणी पाणी" करत दिगूनं प्राण सोडला. मरताना त्याच्या मनात एकच भावना थैमान घालत होती. सूड ! सूड ! गावाचा सूड ! इतकी वर्ष मला तुम्ही एकटं ठेवलंत, तळमळत ठेवलंत. आता मला रक्त हवंय. मी माझी सोय केलीय. कायमची. डॉक्टरचा भयानक चेहरा आणि ओठांबाहेर येणारे तीक्ष्ण सुळे ती बघतच राहिली.
-
Kabuliwalyachi Bangali Bayko
बंगाली ब्राह्मण कुटुंबातील एका सुशिक्षित मुलीनं, सर्वांचा विरोध झुगारून, एक परदेशी मुसलमान तरुणाशी लग्न केलं आणि सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील एका लहानशा गावात ती मोठ्या विश्वासानं गेली. पण तिथं गेल्यावर तिच्या लक्षात आलं की ह्या देशात येण्यासाठी रस्ता आहे. पण जाण्यासाठी नाही. तिथली सगळीच माणसं वाईट नव्हती; पण काही लबाड, स्वार्थी माणसांमुळे तिला तिथं बंदी होऊन राहावं लागलं. आठ वर्षांच्या ह्या बंदिवासात तिला आलेले भलेबुरे अनुभव, तिथलं साकळलेलं जीवन आणि तालिबानसारख्या धर्मांधांबरोबर निकराचा विरोध करून भारतात पळून येताना सोसावा लागलेला भयंकर थरार ह्यांची ही कहाणी. तिच्या जीवनाची ही करुण कहाणी वाचताना आपणही गोठून जातो.
-
Mud City
Parvana's best friend, Shauzia, has fled Afghanistan and is faced with surviving on her own on the streets of Peshawar, Pakistan. With her dog as her only friend, she must scrounge for food, beg for money and look for a safe place to sleep every night. B
-
Parvana's Journey
PARVANA entered the little settlement, stepping carefully through the rubble. She peered into what was left of the one-room mud houses. Mattresses, rugs, cook-pots and tea cups were scattered everywhere. Parvana recognized the run-for-your-life look.
-
The Breadwinner
PARVANA felt the shadow before she saw it, as the man moved between her and the sun. Turning her head, she saw the dark turban that was the uniform of the Taliban. A rifle was slung across his chest as casually as her father's shoulder bag had been sl
-
Raja Ravivarma
आजवर भारतीय साहित्यात चित्रकाराच्या जीवनावर कोणीही काहीही लिहिलेले नाही. मानवी जीवनाला सांस्कृतिक, भावननिक समृद्धतेकडे घेऊन जाणार्या विविध कलांचे महत्त्व महान कलाकारांनीच सिद्ध केलेले असते. जीवनात येणार्या सुख दु:ख, मान अपमानाला सामोरे जातानाही या कलावंतांची दृष्टी आणि अभिव्यक्ती कलात्मकतेचे दर्शन घडवते. भारतीय चित्रकलेला एक वेगळे वळण लावणार्या थोर चित्रकाराच्या जीवनाचे कलात्मक व भावात्मक दर्शन ही कादंबरी घडवते. काव्यमय भाषाशैली आणि नाट्यपूर्ण अभिव्यक्ती ही देसाईंची लेखन वैशिष्ट्ये. "राजा रविवर्मा’ मध्ये रणजित देसाईंमधल्या "कलावंताचे’ आणि "माणसाचे’ उत्स्फूर्तपण मधूनमधून कारंजासारखे उसळताना आढळते. माणसाला कलेची भूक का लागते ? जीवन आणि कला यांचा संबंध कोणत्या प्रकाराचा असतो ? अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ वाचकाच्या मनात उठतं आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद वाचकाला मिळतो.