- 
                                    
Maharashtratil Aitihasik Wade (महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे)
'वाडा' म्हटले की डोळ्यांपुढे चौसोपी घरातील नांदती कुटुंबे येतात. वादा म्हणजे गोकुळच असे. राजे, त्यांचे मंत्रीगण यांचे वडे तर जास्तच अलिशान असत, पण पुढे आर्थिक स्थितीमुळे वाड्यांची जागा अपार्टमेंटने घेतली. आता तर जुने वाडे म्हणजे इतिहासाच्या मागे राहिलेल्या खुणा आहेत. महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे जुने वाडे आजही उभे आहेत. त्यांचे जतन डॉ. सदाशिव स. शिवदे यांनी पुस्तकातून केले आहे. 'महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे (भाग १) मध्ये एकूण ५० वाड्यांचे वर्णन त्यांनी केले आहे. वस्तूची विविधता, बांधकामातील वैशिष्ठ्ये, रेखीवपणा याची माहिती स्थापत्य विशारद व इतिहास संशोधक व सामान्य वाचकांसाठीही उत्कंठापूर्ण ठरेल.
 - 
                                    
Shree Swami Raja(श्री स्वामी राजा)
श्री अक्कलकोट स्वामी म्हणजे प्रत्यक्ष अवतारी विभुती. त्यांच्या कृपाप्रसादाचा अनुभव आजही कित्येकांना येतो. मनःशांती लाभणे हा फार दुर्मिळ लाभ. श्री स्वामींच्या नुसत्या स्मरणानेही दुर्मिळ मनःशांती प्राप्त होते, असे सांगणारी सर्व थरातील माणसे जेव्हा भेटतात, तेव्हा वाटते की ही नुसती अंधश्रद्धा नाही तर प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि मग अवतारी पुरुषाच्या जीवनात डोकावण्याचा मोह होतो. ते जीवन पहिले की मन थक्क होते. ही अशी लेखनसेवा त्यामुळेच घडते. 'श्री स्वामी राजा' ही कादंबरी म्हणजे स्वामींच्या भव्यदिव्य साक्षात्कारी स्वरूपाला अर्पण केलेली भक्तिसेवाच आहे.
 - 
                                    
Raja Manus ('राजा' माणूस)
भारतातले 'पॉलमुनी' म्हणून ज्यांचा गौरव झाला आणि ज्यांना तो भूषणावहच वाटत होता, असा हा 'परांजपे' नावाचा 'राजा'. नुसताच 'राजा' नव्हेतर 'राजा' माणूसच होता; तितकाच दिलदारही होता. राजाभाऊ म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीचे अनभिषिक्त सम्राटच ! त्यांनी अभिनेता व दिग्दर्शक म्हणून आपला अबाधित असा ठसा या सृष्टीवर उमटवला; ह्याचीच ही कहाणी
 - 
                                    
Rang Maza Vegla (रंग माझा वेगळा)
डॉ. जगदीश करमळकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात चाळीस डॉक्टरांची वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्तच्या क्षेत्रातील मुशाफिरी आहे. वैद्यकीय व्यवसाय सुरू असताना कला, साहित्य, संगीत, अभिनय, क्रीडा अशा दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवणाऱ्या चाळीस नामवंत व्यक्तींचा परिचय करमळकर यांनी करून दिला आहे. यातील प्रत्येकाला भेटून त्यांच्याशी चर्चा करून हे लेख लिहिलेले असल्याने यात तपशिलातील अचूकता तर आहेच, पण या मंडळींनी दुसऱ्या क्षेत्रातही यशस्वी वाटचाल कशी केली तेही समजते. लेखक झालेले गोडबोले, छायाप्रकाशयात्री जोगळेकर, पक्षीमित्र पांडे, डॉ. सरदेसाई या नामवंत डॉक्टरांसह अन्य अपरिचित अशा डॉक्टरांचीही कामगिरी या पुस्तकामुळे कळते.
 - 
                                    
Bhatkanti Kudal-Vegulyarchi(भटकंती कुडाळ-वेंगुर्ल्
तरुण गिर्यारोहक महेश तेंडूलकर यांचे यांचे कोकणातील कुडाळ आणि वेंगुर्ले या दोन ठिकाणची आणि परिसरातील विविध ठिकाणांची माहिती देणारे हे पुस्तक. पर्यटन म्हणजे केवळ दोन दिवस मौजमजा असे समजणाऱ्या मंडळी[...]