-
Anand Janmala (आनंद जन्माला)
मुकुंद आणि सुनंदाची भेट झाली ‘संततिनियमन करावे की नाही?’ या परिसंवादाच्या निमित्ताने. मग त्यांचं लग्न होतं. त्यांच्या संसारवेलीवर अरुणच्या रूपाने गोंडस फूल उमलतं. अरुणच्या जन्मानंतर मुकुंद मूल न होण्याची शस्त्रक्रिया करून घेतो; पण सुनंदाला पुन्हा दिवस गेले असल्याची चाहूल लागते आणि मुकुंदा हैराण होतो. सुनंदाच्या चारित्र्यावर शंका उत्पन्न करणारी परिस्थिती निर्माण होते. त्याचा पुण्यात बदलून आलेला मावसभाऊ गोविंदा त्याच्या अनुपस्थितीत सुनंदाशी गप्पा मारायला येत असल्याचं, त्याच्या लक्षात आलेलं असतं. गोविंदाला खरं म्हणजे सुनंदाशी लग्न करायचं असतं; परंतु मुकुंदाने तिला मागणी घातल्यावर आपला विचार बदलून गोविंदा दुसर्या गावी निघून गेलेला असतो. मुकुंदाने सुनंदाला मागणी घालण्यापूर्वी तिलाही तो पसंत होता, असं सुनंदाने म्हटल्याचं मुकुंदाला आठवत असतं. त्यांच्या सुखी संसारात संशयासुराने प्रवेश केलेला असतो... काय होतं पुढे? मुकुंद आणि सुनंदाच्या भावांदोलनांची कहाणी.
-
Rigeta (रिगेटा)
या कथासंग्रहातील ‘घाणेरीचं फूल’ कथेतील सवर्ण चित्रकार दलित मुलीशी प्रतारणा करून परदेशी मुलीशी लग्न करतो आणि ती दलित मुलगी आत्महत्या करते. ‘तोडगा’ मधील सुमार रूपाच्या सुनंदाचं लग्न लागत असताना मांडवातच तिचा नवरा मरण पावतो आणि त्यानंतर लग्नाआधी तिच्यावर मोहित झालेल्या बापूंनी तिला लिहिलेलं पत्र ती वाचते आणि तिच्या उजाड जीवनात ते पत्र ‘ओअॅसिस’ आणतं. ‘जखम’ कथेतील चाळिशी उलटलेल्या, संसार उत्तम तर्हेने मार्गी लागलेल्या सुमतीचा कॉलेजमधील मित्र प्रभाकर तिच्या घरी येतो. सुमतीने आणि त्याने एकत्र घालवलेल्या उत्कट प्रेमाच्या क्षणांचं स्मरण तो तिला देऊ पाहतो. ‘देणं’ या कथेत ईव्हा या स्वैर परदेशी तरुणीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती (विशेषत: स्त्री-पुरुष संबंधांच्या बाबतीत) आणि पाश्चात्त्य संस्कृतीची तुलना भारतीय लेखकाच्या मनात येते. मानवी जीवनातील योगायोग, नियती, मानवी मन, स्त्री-पुरुष, कला आणि जीवन या कोलाजमधून साकारलेल्या वाचनीय कथांचा संग्रह.
-
The Princess (द प्रिन्सेस)
भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याच्या मार्गावर असतानाच्या संस्थानिकांच्या मानसिकतेचं चित्रण ही कादंबरी करते. त्या निमित्ताने त्या वेळचा संस्थानांचा कारभार, संस्थानिकाच्या पत्नीचं जीवन, संस्थानांमधील सामाजिक-सांस्कृतिक जीवन, तिथल्या चालीरीती, त्यांचा डामडौल इ. वर्णन या कादंबरीत येतं. दादा हे बेगवाड या छोट्याशा संस्थानाचे अधिपती. संस्थानिक असल्याचा अभिमान त्यांच्या नसानसांत भिनलेला असतो. त्यांचा मुलगा अभय लहानपणापासून संस्थानिक वातावरणात वाढलेला असतो. दादांचं आणि अभयचं वैवाहिक जीवन, त्यांची अंगवस्त्रं याच्या चित्रणातून संस्थानांमधील स्त्री-जीवन समोर येतं. हिंदुस्थानातून ब्रिटिशांची सत्ता हद्दपार होण्याच्या मार्गावर असताना संस्थानांचं अस्तित्व राहणार की नाही, असा प्रश्न निर्माण होतो आणि दादांमधला कट्टर संस्थानिक अस्वस्थ होतो. अभय मात्र होणार्या बदलांना सामोरा जायला तयार असतो. दादा हे बदल स्वीकारतात का? संस्थानांचं आणि संस्थानिकांचं प्रातिनिधिक, सर्वांगीण चित्रण करणारी कादंबरी.
-
Smruti ganga ( स्मृतिगंगा)
भा.द.खेरांना त्यांऱ्याजीवनात अनेक व्यक्ती भेटल्या. त्यांपैकी काहींना लेखरूपात गुंफायचं काम त्यांनी केलं. सावरकरांऱ्याबचावासाठी उभे राहिलेले धर्मवीर भोपटकर...भा.द.खेरांना ‘केसरी’द्वारे प्रगतिपथावर नेणारे जयंतराव टिळक...‘हसरे दु:ख’ या पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया पत्ररूपाने देणारे पु.ल.देशपांडे...न्याय क्षेत्रातील उच्च पदं भूषवणारे खेरांचे शाळासोबती दादा देशमुख... ‘शेवग्याऱ्याशेंगा’ लिहिणारे य.गो. जोशी...पावसचे स्वामी स्वरूपानंद...सुनील गावस्कर...लंडनमधील भवानी तलवार, कोहिनूर हिरा आणि नटराजाऱ्यामूर्तीसाठी लढणारे बॅरिस्टर भास्करराव घोरपडे...विनम्र कवी/गीतकार गंगाधर महांबरे...प्रतिकूल परिस्थितीतही ‘रोहिणी मासिक सुरू ठेवणारे वसंतराव काणे...खेरांवर मनापासून प्रेम करणारे त्यांचे चुलतबंधू नानासाहेब...या सगऱ्याव्यक्तिचित्रांसह भा. द. खेरांनी ‘केसरी’तील दिवसांऱ्याआठवणी जागवऱ्याआहेत. वाचकांना स्नेहधारांमध्ये न्हाऊ घालणारी ही ‘स्मृतिगंगा’ आहे.
-
Sur Bharala Antari (सुर भरला अंतरी )
लेखक-पत्रकार भा.द.खेर यांनी बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, विनायकराव पटवर्धन, भीमसेन जोशी, सुधीर फडके, हिराबाई बडोदेकर, जे.एल.रानडे, शंकरराव बिनीवाले, गजाननराव वाटवे, इ.जुन्या-जाणऱ्याकलावंतांची नजाकतभरी वैÂफियत मांडून त्यांचे थोरपण सांगितलं आहे. तसेच हे श्रेष्ठ कलावंत कसे दिलदार होते याचे मार्मिक किस्सेही या पुस्तकातून वाचायला मिळतात. कलाकारांतही राग-लोभ,वाद-विवाद अबोला होतो.; पण तरीही कलेवर त्याचा परिणाम होऊ न देता कलाकार कलेविषयीचं आपलं योगदान रसिकांना भरभरून देतात. कलावंताचं मन कायम सरस्वतीच्या, उत्तुंग प्रतिभेने भारावलेले असतं; अनंत दु:ख-यातना सहन करून, आर्थिक झळ सोसूनही कुठलाही सच्चा कलावंत आपली कला मुक्तहस्ते उधळत असतो, हेही सूत्र या लेखांतून जाणवतं. सर्वच कलाकारांऱ्याकलेचं आणि या व्यक्ती आपऱ्याजीवनात माणूस म्हणून किती श्रेष्ठ होत्या, याचं दर्शन या पुस्तकातून घडतं.
-
Smrutiyatra (स्मृतियात्रा)
प्रथितयश साहित्यकार, राजकारणी, पत्रकार, इतिहासकार, कवी अशांऱ्यालेखकाबरोबरऱ्याव्यक्तिगत सहवासाऱ्याआठवणींचा ललितरम्य आलेख म्हणजे ‘स्मृतियात्रा हे भा. द. खेर यांचे पुस्तक. लेखक, कवी, राजकारणी अशी विविधांगी व्यक्तिमत्वं, सावरकर, तात्यासाहेब केळकर, श्री. म. माटे, द. वा. पोतदार, वि.स. खांडेकर, ना. सी. फडके, ग. दि. मा. , आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण, नरसिंह राव इ. विविध क्षेत्रांतील नामवंतांवर प्रसंगपरत्वे लिहिलेऱ्यालेखांचं हे संकलन आहे. सावरकरांची पराकोटीची सकारात्मकता...नरसिंह रावांची विद्वत्ता आणि त्यांच्यातील माणुसकी...यशवंतराव चव्हाणांची साहित्यिकांविषयीची आस्था...वृद्धावस्थेऱ्यालक्षणांचा उच्चारही न करणारे द. वा. पोतदार... आवेशपूर्ण, ओजस्वी असं वत्तृÂत्व असलेले पु. भा. भावे... अष्टपैलू काव्यप्रतिभा लाभलेले कवी मनमोहन...इ. नामवंतांऱ्यागुणांचं दर्शन घडविणारी ही स्मृतियात्रा वाचकांना ऱ्याऱ्याकाळात घेऊन जाते.
-
Vijay (विजय)
विजय हा कादंबरीचा नायक... वैमानिक... परंतु एका विमान अपघातात त्याचं कमरेपासून खालचं शरीर निकामी होणं... या घटनेच्या काही महिन्यांपूर्वीच नीलाशी त्याचा झालेला विवाह... नीलाचं आता काय होणार, या विचाराने त्याने आत्महत्येचा विचार करणं... परंतु त्याच्या आईने त्याला परावृत्त करणं...त्याने आईकडून एक वचन घेणं... अप्पासाहेब हे गिरणीमालक, त्यांची मुलगी निर्मला, विजयचा मावसभाऊ अरविंद, या कादंबरीतील अन्य व्यक्तिरेखा...अरविंदचं अप्पासाहेबांच्या गिरणीत काम करणं...निर्मलेचं मन अरविंदकडे आकृष्ट होणं...अप्पासाहेब अरविंदला मॅनेजर करू पाहत असतानाच त्याने कामगारांचा पक्ष घेऊन, राजीनामा देऊन संपात उतरणं...तुरुंगात जाणं...नंतर त्याचं विजयच्या घरी येणं...त्यावेळी नीलाने आपल्या मनातील गुपित त्याला सांगणं...विजयने त्याच्या आईकडून कोणतं वचन घेतलं होतं? अरविंदने कोणाच्या प्रीतीचा स्वीकार केला? नीलाच्या की निर्मलाच्या? कौटुंबिक, औद्योगिक पार्श्वभूमीवर रंगलेलं भावनाट्य.
-
Smrutisugandh (स्मृतिसुगंध)
लेखक म्हणून, पत्रकार म्हणून, मित्र म्हणून, शिष्य म्हणून अनेक नामवंतांचा सहवास भा. द. खेर यांना लाभला. या सर्व थोर व्यक्तित्वांच्या सहवासातील आठवणींना त्यांनी या व्यक्तिचित्रसंग्रहातून उजाळा दिला आहे. इंदिरा गांधींच्या पहिल्या भेटीतच नेहरू घराण्यावर कादंबरी लिहिण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद यांच्या सहवासात त्यांना मंत्र-तंत्र शक्ती प्राप्त झाल्याचे ते सांगतात. मनोहर माळगावकरांचा मोठेपणा सांगताना ‘दि प्रिन्सेस’ या कादंबरीचा मराठी अनुवाद करण्याची संधी त्यांनी नाममात्र एक रुपया रॉयल्टी घेऊन दिल्याचं ते नमूद करतात. ना. सी. फडके यांच्या मखमली भाषेच्या पाऊलवाटांचा माग घेत गेल्याचं ते सांगतात. श्री. पु. गोखले, शिवाजीराव भोसले, वि. स. वाळिंबे इत्यादींच्या आठवणीही त्यांनी जागविल्या आहेत. या व्यक्तिचित्रांच्या अनुषंगाने तत्कालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीचंही दर्शन घडतं. हा व्यक्तिचित्रणात्मक स्मृतिसुगंध नक्कीच दरवळणार.
-
Sanjeevan (संजीवन)
‘संजीवन’ ही विख्यात लेखक भा. द. खेर यांची ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारलेली भावरम्य कादंबरी आहे. वारकरी सांप्रदायाने संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांना ‘माउली’ हे वात्सल्यपूर्ण नामाभिधान दिलेलं आहे. ज्ञानेश्वरांवर अनेक विद्वान साहित्यिकांनी विविध प्रकारची ग्रंथनिर्मिती केली आहे. संस्कृत भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ‘ज्ञानेश्वरी’ प्रत्येक भाविकाच्या श्रद्धेचा विषय आहे. ज्ञानेश्वर हा प्रत्यक्ष विष्णूने लोककल्याणासाठी घेतलेला अवतार आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. चिकित्सक संतसाहित्यिकांनी ‘ज्ञानेश्वरी’चा अन्वयार्थ विशद करणारे भाष्यग्रंथ लिहिले आहेत. भा. द. खेर त्यांच्या ‘संजीवन’ कादंबरीत विठ्ठलपंत-रुक्मिणी (ज्ञानेश्वरांचे मातापिता) यांच्या विवाहापासून ते ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीपर्यंतचे घटना-प्रसंग रसाळ भाषेत वर्णिले आहेत. खेर यांची लेखनशैली साधीसोपी पण लालित्यपूर्ण असल्यामुळे आपसूकपणे वाचनात तन्मयता येते. कादंबरीतील भावोत्कट करुण प्रसंगात आपण (वाचक) भारावून जातो. परमेश्वरानं मानवदेह धारण करून अवतारकार्य संपल्यावर आत्मरूपात विलीन व्हावं, तसा ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधिसोहळा तर कादंबरीतील उत्कर्षबिंदूच आहे.
-
Shree Gajanan Darshan (श्री गजानन दर्शन)
‘श्री गजानन दर्शन’ हे विख्यात लेखक भा. द. खेर यांनी ओघवत्या भाषेत लिहिलेले संतचरित्र. संतकवी दासगणू यांनी लिहिलेल्या ‘श्री गजानन विजय’ या एकवीस अध्यायांच्या पोथीतील गजानन महाराजांच्या चरित्राचे त्यानी संक्षेपाने गद्यरूपात विवरण केले आहे. प्रसंगानुरूप महाराजांनी केलेल्या चमत्काराचे वर्णन पोथीत वाचायला मिळते. (स्वत: लेखकांना महाराजांची प्रचिती आली आहे.) अनेक भक्त श्रद्धेने नित्यनियमाने पोथीचे पारायण करतात. महाराजांची उपासना करणार्याच्या संकटकाळी धाव घेऊन संकटमुक्त करतात, असा भाविकांचा अनुभव आहे. अनेकांना वेगवेगळ्या रूपांत दर्शन देऊन त्यांनी मार्गदर्शन केले आहे. प्रस्तुत ग्रंथात चमत्कारांचे शास्त्रीय विश्लेषण करणारा लेख आहे. त्यात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ-संशोधकांच्या अध्यात्म विषयावरील विचारांचा मागोवा घेण्यात आला आहे. या पुस्तकात भाविकांना महाराजांचे आलेले अनुभव ग्रथित केले आहेत, ते विस्मयचकित करणारे आहेत. मूळ पोथीतील फलश्रुतीवर भाष्य करणारा लेख पुस्तकात समाविष्ट केला असून शेवटी नित्योपासनेसाठी महाराजांचे मंत्र आणि स्तोत्रे दिली आहेत. अशा ग्रंथाच्या वाचनामुळे श्रद्धा दृढ व्हायला मदत तर होतेच, शिवाय भक्तीमुळे शक्ती (आधार) प्राप्त झाल्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.
-
Lokmanaya Tilak Darshan (लोकमान्य टिळक दर्शन)
`लो. टिळक दर्शन’ हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं चरित्र आहे. प्राधान्याने टिळकांच्या राजकीय जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांतून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा या चरित्रातून घेतला आहे. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीच्या आधारे स्वातंत्र्य मिळविण्याचं आवाहन टिळकांनी जनतेला केलं आणि ती चतु:सूत्री राबवण्यासाठी ते सक्रिय झाले ते शेवटपर्यंत. या पुस्तकात टिळकांनी केलेली होमरूल चळवळ, मवाळ पक्षाशी त्यांचा झालेला सघर्ष, त्यांनी वेळोवेळी लिहिलेले अग्रलेख, त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया, विविध सभांमध्ये त्यांनी घेतलेला भाग, त्यांनी वेळोवेळी जनतेच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा केलेला प्रयत्न, त्यांचे गाजलेले वेदोक्त प्रकरण, ताई महाराज प्रकरण, त्यांना वेळोवेळी घडलेले तुरुंगवास, मंडालेची काळ्या पाण्याची शिक्षा, रँडच्या खून खटल्यात त्यांना गोवण्याचा झालेला प्रयत्न, टिळकांनी इंग्रज सरकारवर भरलेला अब्रूनुकसानीचा खटला, त्यामुळे त्यांना झालेला मनस्ताप आणि सोसावा लागलेला आर्थिक भुर्दंड, त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत केलेली न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसनची स्थापना आणि नंतर केवळ तत्त्वासाठी त्या संस्थेच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा, राजकीय जीवनात टिळकांना लाभलेले अनुयायी, टिळकांची लोकप्रियता, त्यांच्या विचारांनी क्रांतिकारकांना पुरविलेलं बळ आणि जनतेत पसरलेलं चैतन्य, मुस्लिम समाजाबद्दल त्यांना वाटणारी आस्था इ. अनेक मुद्दे, घटना, प्रसंग अधोरेखित करण्यात आले आहेत, ज्यातून टिळकांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचं आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाचं यथार्थ दर्शन घडतं. योगी अरविंद, मंडालेच्या तुरुंगात त्यांना स्वयंपाक करून जेवायला घालणारा कुलकर्णी इ. लोकांनी टिळकांबद्दल लिहून ठेवलं आहे.
-
Setubandhan (सेतुबंधन)
रामाच्या जन्मापासून ते त्याने जलसमाधी घेईपर्यंतचा त्याच्या जीवनाचा समग्र प्रवास या कादंबरीतून चित्रित केला आहे. अर्थातच विश्वामित्रांच्या सान्निध्यातील राम-लक्ष्मण यांचे जीवन, राम-सीता आणि रामाच्या अन्य बंधूंचा विवाह, रामाच्या राज्याभिषेकाची दशरथाने केलेली घोषणा, त्यावर वैÂकयीने रामाला चौदा वर्षं वनवासात पाठवण्याचा धरलेला हट्ट, राम-लक्ष्मण सीता यांचं वनवासातील जीवन आणि वनवासादरम्यानच्या घटना...जसे रामाने केलेला अहल्येचा उद्धार...रावणाने सीतेचं केलेलं अपहरण...हनुमान-सुग्रीवासह रामाला भेटलेली वानरसेना...राम-रावण युद्ध...रावणाचा मृत्यू...सीतेचं अग्निदिव्य...राम-लक्ष्मण-सीतेचं वनवास संपून अयोध्येत आगमन...रामाचं राज्यारोहण...लोकापवादावरून गर्भिणी सीतेचा रामाने केलेला त्याग...रामाने केलेल्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी लव-कुश या त्याच्या पुत्रांशी त्याची झालेली भेट...आणि कालांतराने रामाची झालेली अवतारसमाप्ती...रामायणातील मुख्य आणि उपकथानकांमधून निर्माण झालेल्या उत्कट भावनाट्याचा नवरसपूर्ण आविष्कार
-
Berlin Gangela Milale (बर्लिन गंगेला मिळाले)
जर्मनीतील हैडेलबर्ग या हिंदू धर्माचा प्रभाव असलेल्या शहरातील म्यूलर कुटुंबाची ही कथा. मानफ्रेड म्यूलर आणि त्यांचा मुलगा फ्रान्झ म्यूलर हैडेलबर्ग विद्यापीठात भारतीय संस्कृतीचे प्राध्यापक असतात आणि हिंदू धर्माचे चाहतेही. एर्ना ही फ्रान्झची पत्नी. तिला मात्र हिंदू धर्माविषयी चीड असते. मानफ्रेड यांच्या मृत्यूनंतर फ्रान्झ भारतात जाऊन संन्यास घेतो. तिथेच राहतो. एर्ना-फ्रान्झचा मुलगा अल्बर्ट. त्याला मात्र हिंदू धर्मापासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न एर्ना करत असते. त्यात ती बऱ्यापैकी यशस्वीही होते; पण फ्रान्झच्या भारतातील मित्राची मुलगी भारती जर्मनीला शिक्षणासाठी येते आणि म्यूलर कुटुंबात राहायला लागते. तिच्यात आणि अल्बर्टमध्ये प्रेमांकुर फुटतो , त्यांच्या जवळिकीतून भारतीला दिवस जातात. दरम्यान, फ्रान्झचा मृत्यू होतो. भारतीमुळे अल्बर्टही हिंदू धर्माकडे आकर्षित होतो; पण एर्नाच्या भीतीने भारतातील नोकरी नाकारतो. भारती आणि अल्बर्टला प्रश्न पडतो की, एर्नाला आपल्या प्रेमाविषयी, भारतीच्या गरोदरपणाविषयी कसं सांगावं. कसा सुटतो हा तिढा?
-
Gaon Tethe Deo (गाव तेथे देव)
< BACKNext > GAON TETHE DEV by B. D. KHER 0 Reviews facebook sharing buttontwitter sharing buttonpinterest sharing buttonwhatsapp sharing buttonlinkedin sharing buttonblogger sharing buttontelegram sharing buttonemail sharing button Previous Next* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately. Availability : Available ISBN : 9789394258891 Edition : 2 Pages : 176 Language : MARATHI Category : NOVEL Quantity 1 INR 250.00+ ADD TO CARTBuying Options: Print Books: Summary(English) Summary(Marathi) Awards Translation Adaptation Youtube आंबेगाव हे कोकणातील एक छोटंसं गाव. शिवाजीराव भोसले हे गावातील ुप्रतिष्ठित जमीनदार. पिढीजात किती जमीन त्यांच्या नावाने आहे. आंबेगावात भोसल्यांचं पुढाकाराचं घराणं सर्वांत जुनं. ब्राह्मणाची चार घरं; बाकी सर्व गाव मराठ्यांचा व कुळवाड्यांचा. पण कुणी मोठा नाही; कुणी धाकटा नाही. सगळे एकोप्यानं राहत. पोटापाण्याचा प्रश्न आला, तर गावकरी शिवाजीरावांकडे धाव घेत. दैवी संकट आलं की त्र्यंबकगुुरुजींकडे जात. शंकराच्या देवस्थानाची देखभाल करणाNया पुरोहित त्र्यंबक गुरुजींना दोन मुलं- दोन मुली. त्यांतील मोठा श्याम हा शेती बघत असे. त्र्यंबक गुरुजींच्या पाठीवर १७ वर्षांनी झालेल्या श्रीधरला शिक्षणात गती होती. पण गावात कॉलेज नव्हतं. बाहेरगावी जायची गावची पद्धत नव्हती. मग शिकवण्या घेऊन त्याने आपला जम बसवला. सिंधूबरोबर लग्न झालं. सुखासमाधानानं तीन वर्षं संसार केला; पण एका मुलाला जन्म देऊन तिचा मृत्यू झाला. या आईवेगळ्या मुलाचं- जगन्नाथाचं घरात सर्व जण मायेनं लालन पालन करत. सिंधू नसलेल्या घरात श्रीधरचं मन रमेना. आंबेगाव सोडून श्रीधरने दुसरीकडे नोकरीस जाण्याचे ठरवले. इकडे शिवाजीरावांनाही आपल्या दोन मुलांच्या अपमृत्यूचा धक्का सोसावा लागला; पण मुलगी जान्हवीच्या हट्टाने आता गावात हायस्वूÂलचीही सोय झाली. जगन्नाथ आणि जान्हवी बरोबरीने शाळेत जात होते. आता शंकररावांच्या इच्छेविरुद्ध व गावाच्या रीतीविरुद्ध दोघांनी पुण्याला कॉलेजला प्रवेश घेतला. जान्हवीच्या आजीकडे- आई पुतळाच्या माहेरी ती राहू लागली. जगन्नाथ हॉस्टेलवर राहू लागला. दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमभावना निर्माण झाल्या. जान्हवीच्या आजीलाही हा हुषार जगन्नाथ नातजावई म्हणून आवडला. दरम्यान शंकररावांचा अकस्मात मृत्यू झाला. दोघांच्या कुटुंबांचा कितीही घरोबा असलातरी हा जातीपातीविरुद्ध केलेला विवाह पसंत पडणे शक्य नव्हते; पण शहराचे पाणी प्यायलेल्या आजीच्या पाठिंब्याने हा विवाह पार पडला. आजीच्या ओळखीमुळे व समाजातील दबदब्यामुळे शब्द टाकताच जगन्नाथला बँकेत मोठ्या पदावर नोकरीही मिळाली. श्रीमंत आजीने लग्नाची भेट म्हणून नवा बंगलाही नातीला व नातजावयाला दिला. जगन्नाथाच्या घरचे मात्र या सगळ्या घटनांमुळे त्याला दुरावले. मनोमन जगन्नाथ या सगळ्यामुळे थोडा दुःखी झाला होता; मात्र त्याला आता पाऊल मागे घेता येत नव्हते. परिस्थितीच्या विचित्र वैÂचीत तो अडकला होता. जान्हवीच्या खर्चीक स्वभावामुळे जगन्नाथची तिला पैसे पुरवण्यात तारांबळ उडू लागली. बँकेतही आडमार्गाने पैसा मिळवण्यासाठी तो उद्युक्त झाला. आपण करतो ते बरोबर नाही, हे कळूनही तो परिस्थितीपुढे हतबल झाला. नोकरी गमावण्याची वेळ त्याच्यावर येऊन ठेपली. त्यातच बँकेचे अधिकारीही जाब विचारायला पोलिसांना घेऊनच आले... काय घडले त्यानंतर... जगन्नाथ या संकटातून बाहेर आला का? कोणी मदत केली का? बापू आणि जान्हवीचा झगडा संपला का?
-
Shubhmangal (शुभमंगल)
< BACKNext > SHUBHMANGAL by B. D. KHER 0 Reviews facebook sharing buttontwitter sharing buttonpinterest sharing buttonwhatsapp sharing buttonlinkedin sharing buttonblogger sharing buttontelegram sharing buttonemail sharing button Previous Next* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately. Availability : Available ISBN : 9789394258877 Edition : 2 Pages : 144 Language : MARATHI Category : NOVEL Quantity 1 INR 220.00+ ADD TO CARTBuying Options: Print Books: Summary(English) Summary(Marathi) Awards Translation Adaptation Youtube ’शुभमंगल’ कथेतील सुनंदाच्या वडिलांचा चमत्कारिक स्वभाव तिला घर सोडून बाहेर पडण्यास भाग पाडतो. आपल्या मर्जीविरुद्ध लग्न करावे लागल्याचा राग ते इतक्या वर्षांनंतर मुलांवर, बायकोवर काढत असतात. त्यांना कुटुंबीयांची कोणतीच गोष्ट पटत नसते. त्यातच मुलीचे- सुनंदाचे लग्न आपल्या बॉसची मर्जी संपादन करण्यासाठी त्याच्या वाया गेलेल्या मुलाशी लावण्याचा प्रयत्न ते करतात, तेव्हा आईला दुःखात ठेवून सुनंदावर घर सोडण्याची वेळ येते. ती आपल्या आपल्या मैत्रिणीच्या आधाराने पायांवर उभी राहते. अशातच योगायोगाने तिची ओळख मुकुंदाशी होते. दोघांची मने एकमेकांशी जुळतात. पण त्याच सुमारास देशातील परिस्थिती बिघडते. सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे मतभेद होतात. संघ त्याविरुद्ध सत्याठाहाचे रणशिंग फुंकतो. त्यावर बंदी घातली जाते. यात मुकुंदाचे लक्ष तिकडे आकर्षिले जाते. देशप्रेमाने भारावलेला मुकुंद त्यात उडी घेतो. सुनंदाचे प्रेम मुकुंद स्वीकारतो का, त्यांचे शुभमंगल होते का, यासाठी वाचावी ’शुभमंगल’ कादंबरी या पुस्तकातील दुसरी कादंबरी ’प्रायश्चित’. यात समीरवर आपल्या विधवा आंधळ्या आईची व पोरक्या मामेबहिणीची जबाबदारी समीरवर असते. मामाने समीरचे वडील वारल्यावर त्या दोघांना आधार दिलेला असल्याने आता त्याच्या पश्चात त्याची मुलगी समीरच्या आधाराने राहत असते. त्यामुळे समीरच्या आईच्या मनात आपल्या भावाचे ऋण फेडण्यासाठी त्याच्या मुलीला- सरोजला आपली सून करून घ्यायचे असते. सरोजही मनाने समीरमध्ये गुंतलेली असते. परंतु दुकान तपासणीच्या निमित्ताने समीर कादरभाईच्या दुकानात 3-4 वेळा जातो, आणि त्याची पुतणी- शिरीनकडे आकर्षिला जातो. ती मुस्लिम असूनही सर्व धर्मांचा तिचा अभ्यास, त्यातील गांधीजी, विवेकानंद यांच्याविषयी तिला वाटणारा आदर अशा गोष्टींनी तो प्रभावित होतो. तिला हिंदू धर्माचीही चांगली माहिती असते. आपला जोडीदार हिंदूच असावा, असा विचारही शिरीन त्याच्याकडे उघड करते. ती आपल्या काकाच्या आश्रयानेच राहत असते. ती समीरकडे ओढली जाते. समीरही शिरीनच्या प्रेमात पडतो. सरोज मनापासून त्याची चाहती आहे व आपल्या आईच्या पसंतीची आहे. शिरीन भेटण्यापूर्वी सरोज त्याला आवडत होती; पण आता शिरीनची त्याच्यावर जादू झाली आहे. पण शिरीन मुस्लिम असल्याने हे कसे जमायचे? सरोजला याची कुणकुण लागली आहे. अशातच एकदा शिरीन गायब होते. तिचा ठावाठिकाणाही त्याला लागत नाही. इकडे शिरीनच्या काकाने घात केला आहे. एका तोतया सरदाराला त्याने आपल्या पोरक्या पुतणीला पैशासाठी विकले आहे. त्या कोठडीतील जाफरभाईला तिची दया येते. त्याला तिच्याबद्दल आपलेपणा वाटतो. तो त्या नराधमाच्या तावडीतून तिला सोडविण्याचे ठरवतो. आपण येथे कसे आलो, हे सांगताना त्याने हिंदू-मुस्लिम झगड्याच्या वेळी आपल्या धर्मबांधवांच्या दबावाखाली हिंदू मित्राचा खून केल्याचे सांगतो. त्याबद्दल त्याला फार वाईट वाटत असते. त्यासाठी त्याला तुरुंगातही जावे लागते; मात्र पोलिसाच्या मदतीनेच तो तुरुंगातून पळ काढतो आणि आता या सरदाराच्या ताब्यात सापडतो. शिरीनच्या लक्षात येते, की समीरच्या वडलांचा खून करणारे हे आपले वडीलच आहेत. लहानपणी त्यांचे फोटो पाहिलेले ेतिच्या लक्षात येते. दोघे त्या तोतया सरदाराच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी होतात. शिरीनही आपल्या वडलांना आपली कहाणी व समीरबद्दल सांगते. दोघे समीरकडे येतात. समीर शिरीन व तिच्या वडलांच्या भेटीने आनंदित होतो. समीर शिरीनशी लग्न करतो, की सरोजला स्वीकारतो? ललितरम्य भाषा, चित्तथरारक मांडणी, कथानकाची आकर्षकता आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वभावरेखन हे भा. द. खेर यांच्या कादंबर्यातून दिसणारे लेखनगुण या दोन्ही कादंबर्यांतून प्रकर्षाने प्रकट झालेले दिसतील.
-
Sukhacha Lapandav (सुखाचा लपंडाव)
प्रसिद्ध लेखक भा. द. खेर यांची ‘सुखाचा लपंडाव’ ही कादंबरी प्रेमत्रिकोनाची शोकांतिका म्हणता येईल अशा स्वरूपाची आहे. डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणेने संघकार्यात निष्ठेने भाग घेणारा सुखवस्तू व सुशिक्षित तरुण कुमार आणि चारचौघींसारखी दिसणारी, सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील सुशील, सुस्वभावी कॉलेजयुवती पुष्पमाला तसेच गौर वर्णाचे, बंगाली वाटावेत असे सालस युवक डॉ. सतीश या तिघांची ही प्रेमकहाणी आहे. प्रवासादरम्यान संकटातून सोडवणारा कुमार पुष्पमालेला आपलासा वाटतो; परंतु कुमारची आधीपासूनची मैत्रीण माधुरीसाठी त्याच्या प्रेमाला पुष्पमालेनं नकार दिला; त्यामुळे त्याची दारुण निराशा होऊन तो एकाएकी नाहीसा झाला होता. तसेच तिच्यावर मनापासून प्रेम करणाNया डॉ. सतीशनांही (त्यांच्याविषयी आपल्या मनात केवळ आदरभाव आहे, असे सांगून) त्यांच्याबरोबर जाण्यास पुष्पमालेनं नकार दिला होता; त्यामुळे ते निराश होऊन व्यसनाच्या आहारी गेले होते. अर्थात कादंबरीची नायिका पुष्पमालेनं हे सारं दुःख स्वतःवर बुद्धिपुरस्सर ओढवून घेतलं होतं. आयुष्यात पुढे जे जे दुःखोपभोग तिच्या वाट्याला आले, त्याचं बीज तिच्या आणि कुमारच्या पहिल्या भेटीतच रोवलं गेलं होतं. यापुढील कथा तर आणखी हृदयद्रावक आहे. अचानक नाहीसा झालेला कुमार सैन्यात भरती होतो आणि युद्धात मारला जातो तर विवाहित स्त्रीला पूÂस लावून पळवल्याच्या आरोपावरून डॉ. सतीश यांना तुरुंगवास भोगावा लागतो. अर्थात पोलीस अधिकारी दादासाहेब यांनीच सूडभावनेनं डॉक्टरांविरुद्ध हा बनाव घडवून आणलेला असतो, कारण त्यांची मुलगी अचला हिच्या प्रेमाला डॉ. सतीश यांनी नकार दिलेला असतो. या सर्व घटना-प्रसंगांबद्दल विचार करताना पुष्पमालेला असं वाटू लागतं की, ‘या साNया अनर्थाला मुळात मीच कारणीभूत आहे. हाताशी आलेलं सुख गमावण्यात आपण वेडेपणा तर केला नाही? खोट्या अभिमानाला बळी पडून आपण आत्मवंचना तर केली नाही? असे प्रश्नही तिच्या मनात येतात. तीन वर्षांच्या अवधीत कित्येक वेळा खोट्या अभिमानाला बळी पडून हाती आलेलं सुख मी स्वतःहून दूर लोटलेलं आहे. मला आयुष्यात सुख लाभण्याऐवजी माझी आणि सुखाची वारंवार फारकतच होत गेली. जणू काही सुखाचा आणि माझा लपंडावच चालू आहे.’ अर्थात ही या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आहे या कादंबरीतील घटना-प्रसंगांना स्वातंत्र्यपूर्व काळाची पाश्र्वभूमी आहे; त्यामुळे काही राष्ट्रीय चळवळी आणि राष्ट्रीय आपत्ती यांचा प्रासंगिक कथानकात चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतलेला आहे. खेर यांची लेखनशैली सोपी व सुबोध आहे. भवितव्यतेचा खेळ म्हणून आदी आणि अंत विविध प्रकारची वळणे घेत असतानासुद्धा एकाच वर्णनात बसतील असे जुळवले आहेत. कादंबरी वाचताना अगदी अखेरपर्यंत मनोरंजन होत राहाते. मात्र, या कलाकृतीचा परिणाम वाचकाला जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा गंभीरपणे विचार करावयास लावणारा आहे.
-
Hasre Dhukha ( हसरे दुःख )
'माझं आयुष्यच नाट्यमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वतःच अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दुःख दाखवून देतो.’ आपल्या हसर्या मुखवट्यातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणार्या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी.