Hatya (हत्या)
श्री.ना. पेंडसे यांच्या कादंमबरीविश्वात 'ह्त्या' ही कादंमबरी विशेषत्वाने उठून दिसते; ती तिच्यातील वेगळेपणाने. वास्तावाच्य्या पातळीवरील, तर्कसंगत आणि ह्रदय अशी ही कथा पेंडसे यांनी आपल्या कादाम्बरिसाठी निवडली आणि पेंडसे यांची कादंबरी खर्या अर्थाने जीवनाशी पहिल्यांदा अधिक समरस झाली;परिस्थितीने आबाळलेला, शारीरिक व्यंगामुळे अव्हेरलेला आणि गरिबीने, पिचलेला असा हा कुठल्याही अर्थाने तत्कालीन 'नायक' न शोभणारा, पौगंडावस्थेतील मुलगा या कादंबरीचा नायक झाला ही तत्कालीन वाडःमयाभिरुचिच्या चौकटीत न बसणारी गोष्टी होती. आपल्या वेदनेची आणि परिस्थितीने दिलेल्या चटक्यांची खालच्या सुरात दू:खार्त अशी मान्दानी करणारी आणि काळजाला हात घालणारी ही कादंबरी आहे. पेंडसेविश्वातील पुढील कादंबर्यांच्या विकासाची बिजी या कादंबरीत सुप्त्पने विखुरलेली दिसतात. 'ह्त्या' च्या निमित्ताने पेंडसे यांनी मराठी कादंबरीतील 'हीरो' ची प्रतिमा पार बदलवून टाकण्याचे जे धाडस केले, त्यासाठी तरी या कादंबरीचे मोल आपण मान्य करायला हवे.