Pharaocha Sandesh ( फराओचा संदेश )
ही गोष्ट आहे बरोबर ४,३०० वर्षांपूर्वी घडलेली. भारताला त्या काळात मेलुहा म्हणत. नागरी संस्कृतीने कळस गाठायला सुरुवात केली होती. मेलुहाचे साहसी व्यापारी पार सुदूर असिरिया ते इजिप्तपर्यंतचा कठीण प्रवास करीत आर्थिक समृद्धी साधत. वेगवेगळ्या राजदरबारांतही प्रतिष्ठा मिळवत. सत्ता, धर्म आणि संपत्ती याभोवती जगातील संस्कृतींचे परस्परसंबंध बनत अथवा बिघडत. या काळातही अशी माणसे जन्मतच होती जी काळावर मात करून मानवी संस्कृतीच्या इतिहासाला नवे वळण देत असत. ‘फराओचा संदेश!’ ही कथा याच विलक्षण काळात घडते.