-
Pimpalpan Part-10 ( पिंपळपान भाग-१०)
आशयसमृद्ध,भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका 'चं रंगरूप खुलवत राहिला आहे . मनाचा ठाव घेनार्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका' चं बलस्थान . मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकाहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिगग्ज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणार हे पिंपळपान ....
-
Pimpalpan Part-9 ( पिंपळपान भाग-९)
आशयसमृद्ध,भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका 'चं रंगरूप खुलवत राहिला आहे . मनाचा ठाव घेनार्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका' चं बलस्थान . मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकाहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिगग्ज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणार हे पिंपळपान ....
-
Dhoka ( धोका )
‘ढोका’ मधे मध्य टप्प्यावर आयएसआयएस बरोबर आंतरराष्ट्रीय सीमापार दहशतवाद पार्श्वभूमी आहे. इसिसच्या दहशतवादी कारवायांवर आधारित ही कदाचित पहिली भारतीय थ्रीलर कादंबरी आहे. तसेच, कथानक आणि पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याचा पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि पश्तूनिस्तानला ‘मुक्त’ करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांभोवती फिरणारा भूखंड फिरला आहे. संजय सोनवणी यांच्या या कादंबरीतून इसिसचे भयानक जग उलगडले आहे.
-
Pharaocha Sandesh ( फराओचा संदेश )
ही गोष्ट आहे बरोबर ४,३०० वर्षांपूर्वी घडलेली. भारताला त्या काळात मेलुहा म्हणत. नागरी संस्कृतीने कळस गाठायला सुरुवात केली होती. मेलुहाचे साहसी व्यापारी पार सुदूर असिरिया ते इजिप्तपर्यंतचा कठीण प्रवास करीत आर्थिक समृद्धी साधत. वेगवेगळ्या राजदरबारांतही प्रतिष्ठा मिळवत. सत्ता, धर्म आणि संपत्ती याभोवती जगातील संस्कृतींचे परस्परसंबंध बनत अथवा बिघडत. या काळातही अशी माणसे जन्मतच होती जी काळावर मात करून मानवी संस्कृतीच्या इतिहासाला नवे वळण देत असत. ‘फराओचा संदेश!’ ही कथा याच विलक्षण काळात घडते.
-
Petlele Morpees ( पेटलेलं मोरपीस )
समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतल्या त्या दोघी लहानपणापासून एकत्र वाढल्या आणि आयुष्याच्या एका वळणावर त्यांना एकमेकींबद्दल आकर्षण वाटू लागलं आणि त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला,मात्र त्यांच्या लेस्बियन असण्याचा फायदा त्यांच्याच घरच्यांनी राजकारणात आपली पोळी भाजून घेण्यासाठी कसा करून घेतला, हे सांगणारी नितीन थोरात यांची उत्कंठावर्धक कादंबरी 'पेटलेलं मोरपीस'...
-
Soang ( सोंग )
संज्यानं दोन वेळा साडी नेसली होती ती फक्त परिस्थिती तशी होती म्हणून. एकदा सोंगात आणि एकदा नाटकात. पण आता त्यानं कायमस्वरूपी साडी नेसायचं ठरवलं होतं. त्याला हे जमेल? नितीन थोरात यांची आगळीवेगळी कादंबरी.. सोंग...
-
Shukkatha (शुककथा)
'शुककथा' हा मूळ संस्कृत भाषेत लिहिल्या गेलेल्या 'शुकसप्तती' या ग्रंथातल्या सत्तर कथांचा अनमोल ठेवा. वाक् चतुर आणि पतीविरहात मनोमन झुरत असल्याने कदाचित कुमार्गाला जाऊ शकणारी एक विरहोत्कंठिता यांच्यातल्या संवादावर आधारित या कथा असून, यातल्या प्रणयोत्सुक, धाडसी, धूर्त आणि परिस्थितीशी दोन हात करून स्वप्राणरक्षण करण्यात तरबेज स्त्रिया या कथांची रंगात आणखी वाढवतात. बुद्धिमान शुकानं आपल्या रसाळ, ओघवत्या शैलीत स्वामिनीला ऐकवलेल्या बोधपूर्ण कथा आणि त्यायोगे स्वामिनीचं चारित्र्यहनन टाळण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न, हे ' शुककथा ' चं सार. साहस, शृंगार, विनोद, बुद्धीचातुर्य, धाडस अशा विविध काव्यरसांनी सजलेल्या या कथा खिळवून ठेवणाऱ्या आहेत.
-
Kathavali 2 (कथावली 2)
मानवी संबंध हा कथा-कादंबर्यांचा अनादी कालापासूनचा विषय. कथा लिहिणार्याचं भावविश्व, त्याचा प्रदेश, व्यवसाय, आयुष्यातले अनुभव या अनुषंगानं कथेचा आशय बदलत जातो. त्यानुसार मानवी संबंधांचे कंगोरे उलगडत जातात. त्यातूनच सशक्त कथा साकारतात. भारतभर असे समर्थ मराठी लेखक आहेत. अशाच लेखकांच्या कथांचा एकत्रित संच म्हणजे ‘कथावली’!
-
Pimpalpan 8 (पिंपळपान -भाग 8)
आशयसमृद्घ, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ‘मेनका’चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणार्या विलक्षण प्रवाही कथा हे ‘मेनका’चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Pimpalpan 7 ( पिंपळपान -भाग ७ )
Anuradha Gurav Asha Parchure Shripad Kale Dnyaneshwar Nadkarni Yashwant Karnik G.Va.Behere D.S.Kakdeआशयसमृद्घ, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ‘मेनका’चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणार्या विलक्षण प्रवाही कथा हे ‘मेनका’चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Bedakhal ( बेदखल )
मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वटवानी आणि त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता वटवानी यांनी आतापर्यंत भारतामध्ये रस्त्यांवर दिशाहीन भटकणार्या जवळपास सात हजार मनोरुग्णांवर उपचार करून त्यांची कुटुंबीयांशी पुनर्भेट घडवून आणली आहे. एका अंदाजानुसार, अजूनही जवळपास चार लाख मनोरुग्ण असेच रस्त्यांवर भटकत आहेत. या मनोरुग्णांच्या कथा हृदय पिळवटून टाकणार्या असल्या, तरीही लेखकाने वस्तुनिष्ठ पद्धतीने अनुभवांची मांडणी केली आहे. हे कार्य करण्यास प्रेरणा कशाने मिळाली आणि या प्रश्नासंदर्भात समाज आणि सरकारने काय केले पाहिजे, यावर लेखकाने पुस्तकात नेमकेपणाने भाष्य केले आहे.