Digital Bharat (डिजिटल भारत)
पूर्वी तंत्रज्ञान व संलग्न तंत्रे फक्त मूठभर श्रीमंतांच्या हातात असत. बहुजन समाज त्यापासून लांबच होता. चैनीच्या गोष्टी म्हणून उपकरणांची संभावना एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी होत असे. घरोघरी मातीच्या चुली जाऊन स्मार्टफोन, संगणक आले. तरुण पिढीने ते लवकर आत्मसात केले. पण प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांनीही यापासून दूर जाऊ नये, आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला हर तऱ्हेने सक्षम, स्वतंत्र, स्वतःच्या पायांवर उभे राहायला मदत करेल. 'सबलीकरणाचा' हा एक नवीन दृष्टिकोन आहे, हे पुस्तक लिहायचा खरे तर हाच हेतू आहे.