Angan Vishvache Avakash Manacha (अंगण विश्वाचे अवक
विज्ञानाने जनुकशास्त्रात केलेली प्रगती पाहून मनात येते, काही वर्षांतच असाध्य रोग नष्ट होऊन मनुष्य अमरत्व प्राप्त करेल; तर कधी भीती वाटते की, सत्तेच्या, पैशाच्या जोरावर जनुकीय प्रगतीचा वापर करून जगभर दहशतवादीच निर्माण होतील; पण माणसाची जनुके ठरतात तरी कशी? धर्माप्रमाणे? कलावंतांची जनुके वैज्ञानिकांच्या जनुकांपेक्षा वेगळी असतात का? महाभारतातल्या द्रोणाचार्यांचा जन्म आणि टेस्ट ट्यूब बेबी सारखे आधुनिक शोध पाहताना दंतकथा सत्य मानाव्यात का? अशा प्रश्नांच्या घोळात कादंबरीची नायिका नेमकी कशी अडकते आणि त्या प्रश्नकोशातून बाहेर पडते की नाही ?