Vishvalli

सगळेजण त्याला त्वेषाने मारू लागले. त्याला फरफटत, मारतच सगळे वाड्याकडे आले आणि पायरीवर टाकून निघून गेले. शुद्धीवर आल्यावर "पाणी पाणी" करत दिगूनं प्राण सोडला. मरताना त्याच्या मनात एकच भावना थैमान घालत होती. सूड ! सूड ! गावाचा सूड ! इतकी वर्ष मला तुम्ही एकटं ठेवलंत, तळमळत ठेवलंत. आता मला रक्त हवंय. मी माझी सोय केलीय. कायमची. डॉक्टरचा भयानक चेहरा आणि ओठांबाहेर येणारे तीक्ष्ण सुळे ती बघतच राहिली.

Book Details

ADD TO BAG