-
Vedh Pavsacha Arthat Goshta Mansoonchi (वेध पावसाच
उकाड्यापासून सुटका, पाण्याच्या दुर्भिक्षापासून मुक्ती इत्यादींमुळे मान्सूनच्या पावसाचं स्वागत सुखकारकच. दरवर्षी दक्षिण आशिया विशेषतः भारत देश या पावसानं न्हाऊन निघतो. हिंदी महासागरापासून वाहणाऱ्या मोसमी वार्यांची परिणीती म्हणजे भारतामधील पावसाळा. त्यालाच आपण मान्सून म्हणतो. खरं तर मान्सून हि एक मोठी गुंतागुंतीची आणि अद्यापही संपूर्णपणे न उलगडलेली हवामान प्रणाली आहे.
-
Vidnyanini Bhag 2 (विज्ञानिनी भाग २)
विज्ञान प्रसारासाठी ,समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याकरिता विद्यान कथांचा उपयोग अधोरेखित झाला आहे. विज्ञान कथा हा स्वतंत्र कथा प्रकार म्हणूनही मान्यता पावला आहे.marathi विज्ञान परिषदेच्या मासिक विज्ञान पत्रिकेतील काही निवडक कथांचा हा संग्रह.
-
Shambhar Shodhkatha (शंभर शोधकथा)
१००० मैल व्यासाच्या आणि सुमारे २० कोटी चौरस मैल क्षेत्रफळ असणाऱ्या पृथ्वी गोलाला सहज एका तर्फेच्या सहाय्याने उलथून टाकण्याच्या गोष्टी करणाऱ्या आर्किमिडीज (इ.स.पू. २८७ ते २१२) , ते डॉलीचे क्लोनिंग करणाऱ्या निमूटपर्यंत आणि बायोमट्रिक्स, ह्यूमन जिनोम पर्यंतच्या मनुष्याचे जीवन बदलून टाकणाऱ्या संशोधकाच्या या काही निवडक शोधकथा.
-
Vidnyanadharit-Nisarg-Sanvardhan-Sanrakshan (विज्ञ
आज एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात 'संवर्धन-जीवशास्त्र म्हणजेच 'कॉन्झर्व्हेशन बायोलॉजी' हि एक स्वतंत्र, बहुआयामी तरीही इतर विज्ञानशाखा स्वतःबरोबर जोडणारी, अशी विद्याशाखा म्हणून उदयाला येण्यामागेही दोनअडीचशे वर्षांपूर्वीपासून लागत गेलेले शोध,त्यानं वाढत गेलेली मनुष्यजातीची (निदान शास्त्रीय पातळीवरची) जाणीव, महायुद्धांसारख्या काही घटना हे सगळं कारणीभूत आहे. हा एका विज्ञानाचा इतिहास आहे. त्यामुळे यात प्राचीन भारताची निसर्ग राखण्याची परंपरा इत्यादी असा कुठलाही भाग विचरत घेतलेला नाही. विज्ञानाची मुलतत्व, निसर्ग-संरक्षण-संवर्धन यात कसकशी शिरली आणि त्यामुळे आज हि विद्याशाखा म्हणून कशी प्रस्थापित झाली आहे, याचा हा आढावा.
-
Aarogyache Gupit (आरोग्याचे गुपित)
अवघ्या मनुष्याची धडपड असते ती सुखी जीवन जगण्याची,प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगवेगळी असली तरी सुखी जीवनाची प्राथमिक अट म्हणजे आरोग्यपूर्ण जीवन. आरोग्यपूर्ण जगण्यासाठी फार मोठ्या ग्रंथ अभ्यासाची गरज नसून छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या व पाळल्या तर आपण सहजपणे आपले आयुष्य आरोग्यपूर्ण जगू शकू असा विश्वास निर्माण करणारी हि काही टिपणे...
-
Vidnyan-Shikshan-Gangotri Indian Institute Of Scie
"श्रेष्ठ प्रतीच्या ज्ञानाचे संपादन करायचे असेल तर गर्दी,गोंधळ आणि बाजारी गजबटापासून दूर आणि अलिप्त वातावरणाची नितांत गरज असते. याच कारणाने प्रचिउन मनीशी एकाकी पर्वतशिखरांवर किंवा घनदाट जंगलात तपःसाधना करण्यासाठी गेले आणि त्यांच्या तशा एकांतिक तपश्चर्येतून विशुद्ध,उमदे आणि विशाल असे मानवी जीवनविषयक दयन उदयाला आले. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स हे खरोखरच असे उत्तुंग एकांत शिखर आहे, जेथे गेल्या सात दशकांमध्ये वैज्ञानिक उत्कृष्टता बहरत गेली...!"
-
Ya Shetane Lala Lavila (या शेताने लळा लाविला)
शेती म्हणजे भुई रुजवण्याची किमया.जगाचं उदरभरण करण्यासाठी माणसाला मिळालेलं वरदान! भूईची सेवा करणाऱ्या शेतकरी बळीवंतना मी ईश्वर मानतो. पण तोच शेतकरी आज मरणप्राय झाला आहे. आत्महत्येची काळोखी वाट चालू लागला आहे. मीही औरंगाबाद जिल्ह्यातल्या पळसखेड या माझ्या गावी गेली पन्नास वर्ष शेती करतोय. इथली जमीन म्हणजे बरड टेकड्या. जवळ नदी-नाला नाही. केवळ कोरडवाहू शेती. त्यात सततचे दुष्काळ,अतिवृष्टी,गारपीट,सरकारी अनास्था. पण अस्मानी आणि सुलतानी दोन्ही प्रकारच्या संकटांना तोंड देत मी शेतीत टिकून राहिलो. कितीदा उध्वस्त झालो,पण दर वेळी जिद्दीने उभा राहिलो. नवं तंत्र,नवी पीकपद्धत वापरली. पाणी साठवणीचे नाना प्रयोग केले. आणि शेती बहरत गेली. विकासाची हि गंगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचावी,यासाठी सरकारच्या पाठीशी लागून प्रयत्न करत राहिलो. मला या अनुभवातून कळलेलं शेती-पाण्याचं ज्ञान समाजाला द्यावं,या हेतूने सांगितलेली,हि माझी शेतीशी संबंधित आत्मकथा.
-
Sandhivatache Dhukhane (संधिवाताचे दुखणे)
संधिवात म्हणजे काय, याची सविस्तर माहिती देत डॉ. श्रीकांत वाघ येथे या आजारावर काय उपचार करता येतील याची माहिती देतात. संधिवाताच्या आजाराचे स्वरूप, त्याची व्याप्ती याबद्दल शास्त्रीय माहिती देत 21 प्रकरणांमध्ये वाघ या महत्त्वाच्या आजारांकडे लक्ष वेधण्यात यशस्वी होतात. केवळ वाचकांनाच नाही, तर या क्षेत्रातील वैद्यकीय व्यावसायिकांनाही ही माहिती खूप मोलाची ठरेल. या आजारावरील औषधे व त्यासंबंधी घ्यावयाची दक्षता याबद्दल वाघ यांनी स्वतंत्र प्रकरण दिले आहे.
-
Maitra (मैत्र )
लेखन, अभिनय, संगीतादी कला, वक्तृत्व अशा अनेक प्रांतात स्वच्छंद संचार करणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्याकडे मैत्रीची श्रीमंतीही भरपूर होती. या समृद्धीलाच त्यांनी या पुस्तकात शब्दबध्द केले आहे. केसरबाई केरकर, नानासाहेब गोरे, पंडित विष्णू दिगंबर, खानोलकर, गौरकिशोर घोष, शाहूमहाराज, माटे मास्तर, दादा धर्माधिकारी, ज्योत्स्ना भोळे, तसेच मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष, वसंत सबनीस, अशा अनेक थोरांशी जुळलेल्या स्नेहातून, आपुलकीतून हे सुंदर शब्द उमटले आहेत. या भावबंधामधून व्यक्तीमत्व उभी राहिली आहेत. या व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ट्ये, गुण, त्यांच्या कलेची महती, कामावरील- साहित्य-कलेवरील श्रद्धा यांचा वेधही पुलंनी घेतला आहे. पु.लं. च्या पूर्वप्रकाशित निवडक लेखांचा संग्रह म्हणजेच ‘मैत्र’.... ‘मैत्र’ पुस्तक भाई म्हणजेच पु.ल. यांनी विषयाचा अनुसरुन त्याचे मित्र ‘नंदू नारळकर’, ‘मनू गर्दे’, ‘दत्तू गर्दे’ यांच्या मैत्रीला अर्पण केले आहे. सदर पुस्तकात समाविष्ट लेख : * केसरबाई : एका तेज:पुंज स्वराचा अस्त (महाराष्ट्र टाईम्स, २५ सप्टेंबर १९७७) * नानासाहेब गोरे : प्रफुल्ल होवोनि सुपुष्प ठेलें (महाराष्ट्र टाइम्स, १३ जून १९८२) * पंडित विष्णु दिगंबर (सत्यकथा, सप्टेंबर १९७२) * खानोलकरचे देणे (सत्यकथा, ऑगस्ट १९७६) * गौरकिशोर घोष (सुगंध, १९७७) * शाहूमहाराज : एक धिप्पाड माणूस (राजर्षी शाहू गौरव ग्रंथ, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग १९७६) * माटे मास्तर (महाराष्ट्र टाइम्स, ३१ ऑगस्ट १९८६) * हमीद : एक श्रेष्ठ प्रबोधनकार (महाराष्ट्र टाइम्स, १५ मे १९७७) * जीवन त्यांना कळलें हो (महाराष्ट्र टाइम्स, २५ नोव्हेंबर १९८४) * दादा धमार्धिकारी (साधना, १७ जून १९७८) * शरदाचे चांदणे (महाराष्ट्र टाइम्स, २७ एप्रिल १९८६) * ज्योत्स्ना भोळे नावाची माझी एक बालमैत्रीण (संगीत-कला-विहार, एप्रिल १९७५) * रामकिंकरदा (महाराष्ट्र टाइम्स, वार्षिक १९८०) * सखे-सोबती गेले पुढती (हंस, मार्च १९७८) * मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष (सत्यकथा, जुलै १९६३) * स्नेहधर्मी वसंत सबनीस (महाराष्ट्र टाइम्स, २७ डिसेंबर १९८७) * स्थानबध्द वुडहाऊस (सुगंध, १९७६) * जाने क्यूं आज तेरे नाम पे रोना आया (मौज, दिवाळी १९७९)
-
Pannashicha Bhojya (पन्नाशीचा भोज्या)
माणसाच्या आयुष्यात पन्नासावं वर्ष हे स्थिरावण्याचं वर्ष आहे. लेखक रवी अभ्यंकर यांनी या वर्षात मागे वळून स्मरणरंजन केलं आहे. हे स्मरण वैयक्तिक असलं, तरी त्यात आसपासच्या समाजाचं प्रतिबिंब पडलेलं दिसून येतं. या शालेय आठवणी आहेत, आजूबाजूला घडलेल्या घटनांवर भाष्य आहे. 'नावाचा जुगार, शाळेसाठी वशिला,' 'ध्येय, तत्व, व्यवहार आणि सोय,' 'वास्तुशांतीचा नारळ,' 'ऐश्वर्या सुश्मिता युक्ता लारा चोप्राप्रिया,' 'घर घर की कहाणी,' 'एकटा जीव,' 'पहिली कमाई' अशा लेखांतून अभ्यंकर हलक्याफुलक्या, नर्म विनोदी शैलीने आठवणींचा खजिना समोर ठेवतात. आठवणी सांगताना त्यांनी विविध विषयांवर भाष्यही केले आहे.