-
Vyatha Katha (व्यथा कथा)
संभ्रमाचे सांगाती' या पुस्तकाच्या निमित्तानं डॉ. नंदू मुलमुले यांची 'लेखक' म्हणून ओळख झाली आणि मी त्यांच्या लिखाणाच्या अक्षरशः प्रेमात पडलो. एकाच वेळी बुद्धीलाही पटतंय आणि हृदयालाही भिडतंय, विचारप्रवृत्तही करतंय आणि अंतर्मुखही करतंय असा तो क्वचितच येणारा विलक्षण अनुभव. या भारावण्यातूनच पुढे 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा जन्म झाला. 'व्यथा-कथा' या त्यांच्या दुसऱ्या संग्रहातल्या कथाही तितक्याच कसदार व्हाव्यात ही गोष्ट त्यांच्या अनुभवाची समृद्धता आणि प्रतिभेची संपन्नता दर्शवते. शास्त्रीय बैठकीचा कणा असलेल्या या लेखनाला कथेचा आत्मा आणि 'व्यक्तिचित्रणाचा' चं शरीर आहे. या कथा 'माणूसकेंद्री' आहेत. आजारामागच्या लोभस माणसाचं ते त्याच्या भोवतालासकट दर्शन घडवतात. 'आजाराची लक्षणं' आणि 'स्वभावाची वैशिष्ट्यं' यांची थक्क करणारी सरमिसळ ते आपल्यासमोर ठेवतात. 'एकाकीपणा', 'भयातिरेक', ‘असुरक्षितता’,‘विस्मृती', 'संशयग्रस्तता', 'छिन्नमानस', अशा मानवी व्यथा मांडतानाही ते वाचकाला 'व्यथित' करीत नाहीत तर उलट जागृतीची, साक्षात्काराची अनुभूती देतात. लेखक मानसतज्ज्ञ असला तरी 'तज्ज्ञपणा'च्या ओझ्यापासून या कथा मुक्त आहेत. म्हणूनच ते मानसिक आजारावरचं शुष्क लेखन न होता मानवी भावभावनांचा तो रसरशीत ऐवज होतो. डॉक्टरांच्या लेखनात लालित्य आहे, चिंतनाचं सार आहे, शैलीत सामाजिक उपहास टिपणारा मिश्कीलपणा आहे, भाषेत लवचिकता आणि बहुभाषिक सजगता आहे, विषयात वैविध्य आहे. मांडणीत उत्कंठा, दृष्टीत नावीन्य आहे आणि या सगळ्यांतून खळाळत वाहणारा अनुभव आणि ज्ञानाचा अखंड स्रोत आहे. - प्रशांत दळवी ज्येष्ठ नाटककार
-
Ekla Chalo Re (एकला चलो रे)
ही कथा एका निराशेच्या कड्यावर पोहोचलेल्या, दु:खाची, वेदनेची, कौटुंबिक वाताहत झालेल्या व्यक्तीच्या जगण्याच्या संघर्षाची आहे. वाचताना मन कुंठित होते. व्याकूळ होते. परंतु संजीव सबनीस यांची विजीगीषा अशा उत्तुंग श्रेणीची आहे की त्यांना दया, करुणा, अनुकंपा यांची मातब्बरी वाटत नाही. त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास व पराकोटीची सकारात्मकता यामुळे त्यांना भोवतालच्या जगाकडून अनुकंपेची गरज वाटत नाही. अपंगावस्थेतील हॉस्पिटल, घऱ, विकलांग आश्रम यांतील दैनंदिन दिनक्रमाचे, तेथे वेळोवेळी भेटलेल्या डॉक्टरांपासून साहाय्यकांपर्यंतचे त्यांचे अनुभव वाचताना अंगावर काटा येतो.
-
Click (क्लिक)
ज्यावेळेस क्लिक आवाजासरशी कॅमेऱ्याचे शटर काही क्षण उघडून पुन्हा बंद होते त्यावेळी एक आल्हाददायक आठवण फोटो स्वरुपामध्ये साठवली जाते. असे हे फोटो आपण पुन्हा पाहतो तेव्हा ते आपण नुसते पाहत नाही तर ते पुन्हा नव्याने जगतो. आपल्या मनाच्या अंत:पटलावर काही गोष्टी कायमस्वरूपी उमटलेल्या असतात ज्यांना आपण हवं तेव्हा स्मरणात आणू शकतो. मनाने क्लिक केलेले असेच काही आल्हाददायक, हवेहवेसे क्षण पुन्हा जिवंत करणाऱ्या कथांचा संग्रह क्लिक..
-
Shakuni (शकुनी)
महाभारतात अनेक खलनायक आहेत. धीवरराज यशराज, कंस, जयद्रथ, दुर्योधन पण या सर्वांना झाकोळून टाकणारा खलनायक म्हणजे शकुनी. गांधारीचा भाऊ. दुर्योधनाचा मामा - महाभारत घडले ते याच्यामुळेच. जनमानसात आज शकुनीची जी प्रतिमा आहे ती सर्वथ: टेलिव्हिजनवर सादर झालेल्या महाभारतावर बेतलेली आहे. क्रूर, खुनशी, लंगडा अशी. पण खरा शकुनी असा नव्हता. शकुनी गांधार देशाचा युवराज होता. मुरलेला राजकारणी होता. धुरंधर योद्धा होता. भारतीय युद्धात त्याने पांडवांचे अनेक सेनापती ठार केले होते. तो कौरवांचा रणनीतिकार होता. तो गूढविद्येत प्रवीण होता. शेवटच्या दिवशी त्याने दुर्योधनाला प्राण वाचवायचा सल्ला देऊन रणभूमीवरून बाहेर पाठवले. पण तो स्वत: शेवटपर्यंत प्राणपणाने झुंजला. त्याने वीरमरण स्वीकारले. कोणीही मूळचा खलनायक नसतो. काही कारणांमुळे तो खलनायक बनतो. मग शकुनी खलनायक कसा झाला ? त्यामागची कारणे काय होती ? या सर्वांचा शोध घेणारी, शकुनीचा राजकुमार ते खलनायक हा प्रवास दाखवणारी कादंबरी...
-
Satvasheel (सत्वशील)
मी सदैव हस्तिनापूर आणि कुरुवंशाच्या हिताचाच विचार करत आलो आहे. महाराज धृतराष्ट्र, आपले पुत्र जेवढे कुरुवंशीय आहेत, तेवढेच सम्राट पांडूचे पुत्रही कुरुवंशीय आहेत. महाराज, महर्षी व्यासांच्या भविष्यकथनाचे कदाचित आपल्याला विस्मरण झाले असावे. परंतु माझ्या ते स्पष्ट स्मरणात आहे. कुरुवंशाचा विनाश होऊ नये एवढ्यासाठीच मी आपले पुत्र आणि पांडुपुत्र यांचे सख्य व्हावे म्हणून सतत प्रयत्नशील राहिलो आहे. परंतु मी हस्तिनापूरद्रोही, कुरुवंशद्रोही आहे असे आपल्याला वाटत असेल तर मला महामंत्रीपदाचा त्याग करण्याची अनुमती द्यावी अथवा आपल्या पुत्राच्या इच्छेनुसार मला दंडित करावे." जीवनभर कौरवांकडून 'दासीपुत्र' म्हणून अवहेलना सहन करणाऱ्या विदुरांनी अलिप्ततेने, निर्भयतेने आणि नि:स्पृहतेने आपले कर्तव्य पार पाडले. वेळोवेळी न कचरता कुरुवंशाच्या आणि कुरूराज्याचा हिताचा परामर्श ते देत राहिले. अशा या थोर पुरुषाच्या दृष्टीतून महाभारताचा विस्तीर्ण पट उलगडणारी कादंबरी 'सत्त्वशील'.
-
Customs Night (कस्टम्स् नाईट)
बर्वे साहेबांनी एकंदरीतच सर्व प्रकरणाचा, मुळापासून गांभीर्याने विचार केला. त्यांना मनातून खात्री वाटत होती की समोरची तरुणी खरं बोलते आहे. नटराजन साहेबांचे सुद्धा आतापर्यंतचे रेकॉर्ड चांगले होते. पण वस्तुनिष्ठ पुराव्यांकडे दुर्लक्ष करता येत नव्हतं. रेवती चंद्रन ही तरुणी यात पुर्णपणे फसली गेली होती. विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली माहिती आणि हा आत्ता आलेला फोन... नक्कीच काहीतरी मोठं कारस्थान शिजत होतं. डाव-प्रतिडावु, सत्य-असत्य, हेरगिरी, अमली पदार्थांची तस्करी आणि तून आकार घेणारं देशव्यापी षड्यंत्र यांचा थरार अनुभवायला लावणारी कादंबरी
-
Lekhsangraha (लेखसंग्रह)
मराठी मनावर पिढ्यान् पिढ्या अधिराज्य गाजवणाऱ्या जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई आणि शिखरशिंगणापूरचा शंभूमहादेव. या दैवतांबरोबरच १७ व्या शतकाने महाराष्ट्राला आणखी एका शूरवीर, लोकोत्तर दैवताची नव्हे महामानवाची देणगी दिली. ते दैवत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतवर्षाला ज्यांनी नवीन अस्मिता दिली, स्वातंत्र्याचा अर्थ सांगितला, स्वातंत्र्याचे नवे सूक्त मराठी जनतेला दिले; ते लोकोत्तर पुरुष, छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा इतिहास तर सर्वश्रुतच आहेच, परंतु त्यासोबतच महाराजांचे विचार कौशल्य, स्त्री दाक्षिण्य, जनतेचा राजा, काळाच्या पुढे जाऊन विचार करणारा पुरोगामी राजा, भाषाशैली जपणारा, धोरणी राजा हे ही काही अनन्यसाधारण गुण आहेत. महाराजांच्या अनेक गुणविशेषांपैकी काही पैलूंची माहिती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाशी संबंधित अशा विविध मासिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखमालिकेमध्ये अरुण भंडारे यांनी महाराजांची ही वेगळी भूमिका मांडायचा प्रयत्न केला आहे.
-
Yoddha Karmayogi : Eknath Sambhaji Shinde (योद्धा
"माझी आई कधी कधी मला म्हणायची, “बाबासाहेब, माणसानं नेहमी समजून वागायचं.” हे समजून वागणं जे काही आहे नं, ते एकनाथरावांमध्ये आहे. एकनाथी हा ज्ञानी मनुष्य आहे. हवाहवासा मनुष्य आहे. त्यांच्या मनात आलं की, जी काही मदत करायची ती ते तुम्हाला करणार. त्याबद्दल कुठलाही गाजावाजा करणार नाहीत. मी हे केलं, मी एवढं केलं, हा मीपणा त्यांच्यात नाही. अहंकाराचा दुर्गंधही येणार नाही. फार चांगला मनुष्य आहे. नेता असावा तर असा! ... आणि इतकं करूनसुद्धा भोळेबिचारे असंही नाहीये. त्यांच्यामध्ये जेवढे राजकारणी गुण हवेत, तेवढे नक्की आहेत. सात्त्विक आहेत. एक शिस्त आहे. ती ते बरोबर पाळणार. स्वत:चं दुःख हे आपल्यापाशी मनाच्या कपाटात ठेवायचं आणि दुसऱ्याच्या सुखाचा सतत विचार करायचा. दुसऱ्याच्या सुखात आपला आनंद व्यक्त करणं, तेही प्रामाणिकपणे, हे एकनाथरावांना जमलं आहे. हसत हसत दुःख ओलांडून पलीकडे जाण्याची ताकद परमेश्वरानं त्यांना दिलीय. - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
-
The Hidden Hindu Part 3 (द हिडन हिंदू भाग ३ )
"देवध्वज नक्की कोण आहे, नागेंद्र की ओम? परिमल आणि एलएसडी एकमेकांवर विश्वास ठेवण्यासाठी धडपडत आहेत, तर नागेंद्र मृतातून पुनरुत्थित झाला आहे. असुरक्षित आणि पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. परशुराम आणि कृपाचार्य ओमच्या कोलमडलेल्या भूतकाळात अडकले आहेत तर वृषकपी निश्चित मृत्यूशी लढत आहेत, ज्याने आधीच मिलारेपाला संपवलं आहे. पराक्रमी अश्वत्थामाला अनभिज्ञ सोडून, इतर सर्व चिरंजिवी सर्व आघाड्यांवरून निघून गेले आहेत. उरलेले शब्द कुठे लपले आहेत? नागेंद्र त्या सर्वांना शोधून श्लोक पूर्ण करेल की अमर त्याला रोखू शकेल? काळाशी झगडत असलेल्या चिरंजिवीच्या अनपेक्षित रहस्याचा उलगडा..."
-
Pasodi(पासोडी)
मराठी मनातलं 'पासोडी' या शब्दाच्या अर्थाचं साहचर्य वैचित्र्य आणि विविधतापूर्ण, विलक्षण अशा चार शतकांपूर्वीच्या प्रसिद्ध साहित्यकृतीशी निगडित आहे. प्रतिपाद्य विषयाबद्दलची अपार आस्था प्रचलित चौकटीत मांडता येऊ न शकण्यातून निर्माण झालेली पटविस्ताराची आस यातून दिसते. दीड दशकात लिहिलं गेलेलं वैविध्य असलेलं तरीही एका व्यापक सूत्रात बांधलं जाऊ शकणारं हे लेखन आहे. आस्थेच्या अंतर्कक्षेतलं जे जे काही आहे ते प्रस्तुत पुस्तकात साहित्य या एका सूत्रात आणलेलं आहे म्हणूनही या पुस्तकाचं शीर्षक 'पासोडी' असं आहे. -गणेश विसपुते
-
Scienstoriya Katha Tantradnyanachya(सायन्स्टोरीया
बॅडेडचा शोध पत्नीवरच्या प्रेमापोटी लागला. कॉफी भारतात तस्करीद्वारे आली. पेसमेकर एका अभियंत्याची कारागिरी आहे. रेफ्रिजरेटर एका डॉक्टरनं शोधलं. या काही कपोलकल्पित कथा नाहीत तर आख्खं मानवी आयुष्य बदलवून टाकणाऱ्या शोधगाथा आहेत. अत्यंत रंजक, प्रेरक आणि उद्बोधक अश्या 'सायन्स्टोरी या'
-
Scienstoriya Katha Shodhanchya(सायन्स्टोरीया कथा श
लुई पाश्चरनं 'रेबिज'वर लस शोधली ही गोष्ट नाही.. ती त्याला नेमकी का शोधावी वाटली? त्यासाठी त्यानं काय काय केलं? कुठल्या पातळीवरचे धोके पत्करले? यापाठचं नेमकं निरिक्षण कसं गवसलं? या आणि अश्या एक ना अनेक प्रश्नांच्या शोधामागं दडलीये खरी गोष्ट.. बरं लस अशीच येत नाही.. सुई असते तेव्हा इंजेक्शन येतं आणि इंजेक्शन येतं तेव्हा कुठं लस येते.. मानवी संस्कृती ही रिले रेस प्रमाणं आहे एकानं दिलेली बॅटन पुढं सरकते तेव्हा कुठं ही शर्यत चालू रहाते.. अश्याच नानाविध बॅटन्सच्या गोष्टी रंजक, प्रेरक आणि उद्बोधक 'सायन्स्टोरी या
-
Renaissance State (रेनेसॉन्स स्टेट)
हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या प्रदीर्घ आणि संघर्षमय इतिहासाचे चित्तवेधक कथन आहे. या पुस्तकात महाराष्ट्र या महान राज्याच्या 2,000 वर्षांच्या अस्तित्वातील महत्त्वाची तत्थे आणि पैलू यांची नोंद आहे. या पुस्तकात लेखक महाराष्ट्र प्रदेशाची कथा सांगत आहेत. या प्रदेशाच्या राजकारणाला, समाजाला आणि इतिहासाला कवेत घेत या कथनाचा व्यापक पट सातवाहनांपासून ते वर्तमानापर्यंत उलगडत, हे पुस्तक क्वचितच ज्ञात असणार्या कथांची नोंद करतं : बलशाली मुगलांना गुडघे टेकायला लावणारं साम्राज्य, वैवाहिक लैंगिक संबंधांमध्ये संमतीचा प्रश्न थेट राणी व्हिक्टोरियापर्यंत नेणारी एक स्त्री, काळाच्या कित्येक योजने पुढे असलेले समाजसुधारक, जीवनाच्या विभिन्न क्षेत्रांत अग्रेसर राहिलेले स्त्री-पुरुष, डाव्या-उजव्या विचारांच्या तसेच दलित अस्मितेच्या चळवळींची उत्क्रांती, गांधींचे मार्गदर्शक आणि गांधींचे मारेकरी या सर्वांसह या प्रदेशाच्या उत्तरेतील सत्ताकेंद्रांशी संघर्ष करण्याच्या प्रदीर्घ परंपरेलाही हे पुस्तक उजाळा देतं. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या जडणघडणीचा हा असा लेखाजोखा आहे, जो इथल्या अभिमानी जनतेस पात्र आहे; मात्र जो आजवर अलिखितच राहिला होता.