Shodh Gramin Arogyacha (शोध ग्रामीण आरोग्याचा)
रोगांवरचे अत्याधुनिक उपचार सोडाच, जिथे रोगाबाबत पुरेशी माहितीही नसते. अशा ग्रामीण भागालाच डॉ. हिम्मतराव बावस्करांनी आपलं कार्यक्षेत्रं मानलं. ग्रामीण भागात जन्मलेल्या अन वाढलेल्या डॉ.बावस्करांनी अज्ञान, गरिबी फार जवळून अनुभवली. साप-विंचवाचा दंश अन त्याने होणारे मृत्यू, कुपोषण, प्रदूषणामुळे होणारे आजार यांच्या जोडीला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यांसारखे पूर्वी श्रीमंतांचेच मानले जाणारे विकारही ग्रामीण भागात शिरकाव करत आहेत. या सारया व्याधींबद्दलची सजगता अन उपचारांमधील तत्परता सारयांच्या मनावर ठसवणारे शोध ग्रामीण आरोग्याचा