Saundaryache Upasak- Kusumagraj (सौंदर्याचे उपासक-
कविवर्य कुसुमाग्रज हे मराठी मनाला कायम आदरणीय राहिलेलं व्यक्तिमत्त्व. त्यांना साहित्यसंमेलनाचं अध्यक्षपद मिळणं, त्यांचा 71 वा वाढदिवस साजरा होणं अथवा त्यांना ज्ञानपीठ हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिळणं, या घटना संपूर्ण महाराष्ट्राला जिव्हाळ्याच्या वाटणाऱ्या आहेत. अशा काही प्रासंगिक निमित्तानं लिहिलेले लेख आणि त्यांच्या मृत्यूनंतर लिहिले गेलेले लेख यांतून चिकित्सक निवड करून "सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज‘ हे पुस्तक साकार झालं आहे. सुमारे तीन हजार लेखांमधून निवड केली असून, पुस्तकात दोन विभागांत त्यांची मांडणी केली आहे. एकूण 31 लेख आहेत कुसुमाग्रजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक ज्ञात-अज्ञात पैलूंचं दर्शन या पुस्तकातून घडतं.